Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2716

मनपा निवडणूक; सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’

औरंगाबाद – राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकांचे प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाग जाहीर झाले, सुनावणी, हरकती ही झाल्या प्रभागानुसार इच्छुक कामालाही लागले. मात्र, औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरूच आहे. अगोदर संगणकात तर्फे जनरेट होणारी तारीख 3 मार्च होती. आता 30 मार्च करण्यात आल्याचे याचिकाकर्ते समीर राजूरकर यांनी सांगितले.

जानेवारी 2020 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने वॉर्ड आरक्षण, वॉर्ड रचनेची प्रक्रिया पूर्ण केली होती. ही प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अलीकडेच राज्य शासनाने कायद्यात बदल करत प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात शपथपत्र ही दाखल केले.

3 मार्च रोजी संगणकातर्फे जनरेट होणारी तारीख पडली. मात्र, संगणकातर्फे जनरेट होणारी तारीख आता 30 मार्च झाल्याचे राजूरकर यांनी सांगितले. संगणकातर्फे जनरेट केल्या तारखेनुसार याचिका बोर्डावर येत नाही. रजिस्ट्रारमार्फत बोर्डावर लावण्यात आलेल्या काही प्रकरणांची सुनावणी होते.

मराठवाड्यातील 14 विद्यार्थी युक्रेनमधून परतले

औरंगाबाद – मराठवाड्यातील 100 विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी केलेले असून ते तिकडेच अडकले आहेत. विभागीय प्रशासनाकडे काल उशिरापर्यंत आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील 14 जण परत आल्याची माहिती कळवली आहे. यातील अनेक जण दिल्लीत आणि मुंबईत असून ते सोमवारी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी येतील.

लातूरचे ऋतुजा देशमाने, वेदांत शिंदे, परभणीतील संजीवकुमार इंगळे, जालन्यातील किरण भंडारी, संकेत उखर्डे, तेजस पंडित, सुयोग धनवाई, नांदेड मधील स्नेहा महाबळे, प्रशांत नरोटे, तेजस गायकवाड, संजीवनी वन्नाळीकर, सत्यम गवळी, दीपक काकडे, उस्मानाबादची केतकी कोकाटे असे 14 जण काल परतले.

युक्रेनमधील व्हिनयस्टा, युझोई, ओबॅस्क, ओडेसा, किव्ह, लिव्ह, जॉर्जिया आदी ठिकाणच्या विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी मराठवाड्यातील विद्यार्थी आहेत. रशियाकडून राजधानी किव्हसह विविध ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ला होत आहे.‌

नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा, जाळपोळीत पाच मोटारसायकल जळून खाक

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर या ठिकाणच्या एका वसतीगृहात दोन विद्यार्थ्यांच्या गटामध्ये किरकोळ कारणावरून मोठा राडा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या जाळपोळीत पाच मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. आदिवासी बहुल विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना शांत केले. या प्रकरणी दोषी असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एका शुल्लक कारणावरून हि तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे.

विद्यार्थ्याच्या दोन गटात अनेक जण किरकोळ जखमी
विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ कारणावरून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हा राडा झाला आहे. या भांडणात दोन मोटारसायकली जाळण्यात आल्या तर तीन मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच इस्लापूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. तसेच या प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

किनवट तालुक्यातील इस्लापुर इथल्या या वसतिगृहात सहावी ते बारावी वर्गात शिकणारे विद्यार्थी वास्तव्यास आहेत. हे वसतिगृह राज्य सरकारच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून चालवण्यात येते. या ठिकाणी राज्याच्या विविध भागातील आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी वास्तव्याला असतात. यातूनच या विद्यार्थ्यांमध्ये हे दोन गट पडले आणि हि हाणामारीची घटना घडली.

हॉस्टेलला सोडण्याच्या बहाण्याने राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने अल्पवयीन मुलीसोबत केले ‘हे’ कृत्य

Sumedh Shyamkumar

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका हॉस्टेल संचालकाने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य केले आहे. हा नराधम आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे. या आरोपीने पीडित मुलीला हॉस्टेलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने रस्त्यातच तिच्यासोबत लैंगिक चाळे केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी आंधळगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सुमेध श्यामकुवर असे गुहा दाखल झालेल्या आरोपी नराधमाचे नाव आहे. हा आरोपी मुलींच्या हॉस्टेलचा संचालक आहे. तसेच तो राष्ट्रवादीचा नेता देखील आहे. हि घटना उघडकीस येताच शाळेच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात असलेल्या यशोधन ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारा संचालित महिला समाज गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास आरोपी सुमेध श्यामकुवर पीडित मुलीच्या घरी गेला होता.त्यावेळी आरोपीने पीडितेच्या वडिलांना फोन करून आपण मुलीला हॉस्टेलमध्ये घेऊन जाण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. यानंतर स्वत: हॉस्टेल संचालकच मुलीला घेऊन जायला आल्याने वडिलांनी मुलीला आरोपीसोबत पाठवले.

यानंतर हा नराधम आरोपी पीडितेला चारचाकी गाडीत बसवून घेऊन गेला. यानंतर काही अंतर गेल्यानंतर आरोपीनं निर्मनुष्य ठिकाणी कार थांबवली. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला. यानंतर हॉस्टेलमध्ये पोहोचल्यानंतर पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार आपल्या एका मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर त्या मैत्रिणीने पीडितेच्या वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकताच पीडितेच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेच आंधळगाव पोलीस ठाण्यात जाऊन हॉस्टेल संचालक आणि राष्ट्रवादी नेते सुमेध श्यामकुवर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

FPI ने फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारातून आतापर्यंत काढले 35,506 कोटी रुपये

नवी दिल्ली । विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारातून 35,506 कोटी रुपये काढले आहेत. FPI चा भारतीय बाजारपेठेतील विक्रीचा हा सलग पाचवा महिना आहे.

ऑक्टोबर 2021 पासून FPI भारतीय बाजारातून सतत माघार घेत आहेत
ऑक्टोबर 2021 पासून FPI भारतीय बाजारातून सतत माघार घेत आहेत. मार्च 2020 पासून फेब्रुवारी 2022 मध्‍ये FPI चा जावक सर्वाधिक आहे. त्यावेळी FPI ने भारतीय बाजारातून 1,18,203 कोटी रुपये काढले होते.

डिपॉझिटरी डेटानुसार, FPI 1 ते 25 फेब्रुवारी दरम्यान इक्विटीमधून 31,158 कोटी रुपये आणि कर्ज विभागातून 4,467 कोटी रुपये काढले आहेत. यादरम्यान त्यांनी हायब्रीड इंस्ट्रूमेंट्समध्ये 120 कोटींची गुंतवणूक केली आहे.

रशिया-युक्रेन तणावामुळे FPI सावधगिरी बाळगत आहेत
मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर (मॅनेजर रिसर्च) हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, “यूएस मध्यवर्ती बँकेने उत्तेजक उपाय मागे घेण्याची आणि व्याजदरात उशीरा वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर FPI ने बाहेरचा फ्लो वाढला आहे. याशिवाय रशिया-युक्रेन तणावामुळे FPI सावध पवित्रा घेत आहेत आणि भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांपासून दूर राहत आहेत.”

FPI आणखी पैसे काढू शकतात
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले की,”डॉलरच्या तुलनेत रुपयाचा कल, कच्च्या तेलाच्या किंमती, अमेरिकेतील बॉंड यिल्ड यावरून FPI चा कल निश्चित केला गेला असता. यूएस मध्ये, FPI 10 वर्षांच्या बॉंडवरील रिटर्न वाढल्यावर बाँड मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सध्या या सर्व गोष्टींचा परिणाम FPI वर होत आहे. अशा परिस्थितीत FPI आणखी पैसे काढू शकतात.

पेटीएम पेमेंट्स बँक की एअरटेल पेमेंट्स बँक? बचत खात्यावर कोण जास्त व्याज देत आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पेमेंट्स बँका अपवादांसह पारंपारिक बँकेसारख्याच असतात. पेमेंट्स बँका लहान प्रमाणात काम करतात आणि त्या क्रेडिट जोखीम घेत नाहीत. त्या Differentiated आणि Universal Banks नाहीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ते कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वगळता बहुतेक आर्थिक कार्ये हाताळू शकतात. तसेच अशा बँकांमध्ये 2 लाख रुपये जमा करण्याची मर्यादा आहे. पेमेंट्स बँकांना RBI द्वारे डिफरेंशिएटेड बँकेचे लायसन्स दिले जाते, ज्यामुळे त्यांना कर्ज देता येत नाहीत.

भारतात सध्या अशा 6 पेमेंट्स बँका आहेत. यापैकीच APBL (Airtel Payments Bank Ltd.) आणि PPBL (Paytm Payments Bank Ltd.) या दोन बँका मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचू शकल्या आहेत.

Airtel Payments Bank व्याज दर
एअरटेल पेमेंट्स बँक आपल्या बचत खात्यातील 1 लाख रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट्सवर 6 टक्के तर 1 लाख रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सवर 2.5 टक्के वार्षिक व्याज देते. एअरटेल पेमेंट्स बँकेत खाते आधार आधारित ई-केवायसी वापरून उघडता येते. यासाठी ग्राहकाचा फक्त आधार नंबर आवश्यक आहे. ग्राहक काही मिनिटांत एअरटेल थँक्स अ‍ॅप वापरून व्हिडिओ कॉलसह एअरटेल पेमेंट्स बँक खाते डिजिटली उघडू शकतो.

Paytm Payments Bank व्याज दर
पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या बचत खात्यावर वार्षिक 2.5% दराने व्याज देते. पेटीएम पेमेंट्स बँक इंडसइंड बँकेच्या भागीदारीत FD देखील ऑफर करते. पेटीएम पेमेंट बँक FD खात्यावर 5.5% पर्यंत व्याज मिळू शकते.

विरारमध्ये भरदिवसा गोळीबार; ‘या’ शिवसेना नेत्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल

Crime Gun

विरार : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळील विरारमध्ये भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये एका 35 वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात संबंधित तरुणाला चार गोळ्या लागल्या असून तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. विरारमध्ये भरदिवसा हा गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी शिवसेना नेत्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. समय चौहान असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत समय हे एक व्यापारी असून फर्निचर आणि बाजार भरवण्याचे काम करत होते. घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी समय चौहान हा मनवेल पाडा येथून आपल्या घराकडे निघाला होता. घराच्या दिशेनं जात असताना अचानक आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात मृत समयला चार गोळ्या लागल्या आणि तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.

यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळ्या लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी एका शिवसेना नेत्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुदेश चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना नेत्याचे नाव असून ते माजी नगरसेवक आणि वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती देखील आहेत. हल्लेखोरांनी ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली हे अजून समजू शकलेले नाही. मृत समय चौहान हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती होता. त्याच्यावर यापूर्वी एक हत्येचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विरार पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनला मंत्रिमंडळाची मंजुरी, आता आरोग्याशी संबंधित माहिती ऑनलाइन रेकॉर्ड केली जाणार

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी आयुष्मान भारत डिजिटल मिशनला (ABDM) मंजुरी दिली. या मिशनसाठी 5 वर्षांसाठी 1,600 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.

NHA ही आयुष्मान भारत डिजिटल मिशनची अंमलबजावणी करणारी संस्था आहे
सरकारी निवेदनानुसार, आयुष्मान भारत डिजिटल मिशनद्वारे टेलीमेडिसिन आणि राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य सेवांच्या निवडीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देऊन दर्जेदार आरोग्य सेवांचा न्याय्य आणि सुलभ प्रवेश बळकट केला जाईल. नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) ही आयुष्मान भारत डिजिटल मिशनची अंमलबजावणी करणारी संस्था असेल.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन काय आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची घोषणा केली. या योजनेंतर्गत खाते तयार केल्यानंतर नागरिकांना हेल्थ कार्ड दिले जाते. या हेल्थ कार्डमध्ये आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. ही योजना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशाच्या काही भागात सुरू करण्यात आली होती.

पहिल्या 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला
निवेदनानुसार, आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा पायलट प्रोजेक्ट लडाख, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव, पुडुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप या 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण झाला. त्यात असे नमूद केले गेले आहे की, 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत, 17,33,69,087 आयुष्मान भारत आरोग्य खाती तयार केली गेली आहेत आणि 10,114 डॉक्टर आणि 17,319 आरोग्य सुविधा ABDM मध्ये रजिस्टर्ड आहेत.

सरकारचे म्हणणे आहे की, डिजिटल हेल्थ सोल्यूशन्स हे आरोग्य परिसंस्थेमध्ये अनेक वर्षांमध्ये अत्यंत फायदेशीर ठरले आहेत आणि को-विन, आरोग्य सेतू आणि ई-संजीवनी यांनी हे दाखवून दिले आहे की तंत्रज्ञान हे आरोग्यसेवेपर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

अर्थसंकल्पानंतर आर्थिक विकासावर DPIIT च्या वेबिनारला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करतील

Narendra Modi

नवी दिल्ली । सर्वसाधारण अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी होणाऱ्या उडिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड म्हणजेच DPIIT च्या वेबिनारला संबोधित करतील. DPIIT ने रविवारी ही माहिती दिली.

निकम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना 28 फेब्रुवारीपूर्वी 2020-21 च्या मूल्यांकन वर्षासाठी आपल्या टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,” प्रिय करदात्यांनो, तुमचा ITR ई-व्हेरिफिकेशन/व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख समोर आहे, संधी सोडू नका. घाई करा !”

5 सत्रात चर्चा होईल
DPIIT ने सांगितले की,”या वेबिनारचा उद्देश आर्थिक विकासाला गती देण्यासाठी समन्वय स्थापित करणे हा आहे.” निवेदनानुसार, पंतप्रधान गती शक्तीचे व्हिजन आणि त्याचा अर्थसंकल्पाशी एकरूपता यावर सर्व सहभागींना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या भाषणानंतर, सहभागी पाच सत्रांमध्ये भाग घेतील ज्यामध्ये देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्रातील विविध पैलूंवर चर्चा केली जाईल.

वेबिनारमध्ये ही लोकं सामील होतील
DPIIT चे सचिव अनुराग जैन ‘राष्ट्र एक संपूर्ण दृष्टिकोण’ या विषयावरील सत्राचे नेतृत्व करतील. या सत्रात गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टलवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव गिरीधर अरमाने, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राजेश अग्रवाल आणि NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे देखील सहभागी होणार आहेत.

PM गतिशक्ती योजना काय आहे
PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन ही एकात्मिक योजना आहे, जी लोकांची, वस्तूंची आणि सेवांची अखंडित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी अंतर भरून काढण्यासाठी काम करेल.

खुशखबर ! जन धन खातेदारांना मिळणार 1.3 लाख रुपये, जाणून घ्या कसे?

Jandhan Account

नवी दिल्ली । जर तुम्हालाही जन धन खाते उघडायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जनधन खातेधारकांना केंद्र सरकारकडून 1.30 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. जर तुम्हालाही याचा लाभ घ्यायचा असेल तर आजच या योजनेत नोंदणी करा. प्रधानमंत्री जन धन योजना- PMJDY अंतर्गत, ग्राहकांना अनेक प्रकारची आर्थिक मदत मिळते.

तुम्हाला अशा प्रकारे मिळेल 1.30 लाखांचा फायदा
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये खातेदाराला एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. यामध्ये अपघात विमाही दिला जातो. खातेदाराला 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचा सामान्य विमा दिला जातो. अशा परिस्थितीत खातेदाराचा अपघात झाल्यास 30 हजार रुपये दिले जातात. या अपघातात खातेदाराचा मृत्यू झाल्यास एक लाख रुपये दिले जातात, म्हणजेच एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ मिळतो.

खाते कोण उघडू शकतो ?
>> भारतातील कोणताही नागरिक या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतो.
>> खाते उघडण्यासाठी किमान वयोमर्यादा 10 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
>> या योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही पात्र भारतीय नागरिक कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते उघडू शकतो.
>> याशिवाय तुम्ही बँक मित्रामार्फतही हे खाते उघडू शकता.

फायदे काय आहेत ?
>> या खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळते.
>> जर तुम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडले असेल, तर तुम्हाला किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
>> या खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळते.
>> या योजनेअंतर्गत उघडलेल्या खातेधारकाला 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते.
>>18 ते 65 वयोगटातील कोणतीही व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकते.
>> PMJDY खातेधारक ज्यांच्याकडे RuPay कार्ड आहे त्यांना देखील 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा मिळतो.

जन धन खाते म्हणजे काय ?
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हा सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे जो बँकिंग/बचत आणि डिपॉझिट अकाउंट, कर्ज, विमा, पेन्शनमध्ये प्रवेश सुनिश्चित करतो. हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटवर उघडले जाऊ शकते. PMJDY खाती झिरो बॅलन्स ठेवून उघडली जात आहेत.

खाते कसे उघडायचे ?
प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. मात्र , जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता. जर तुमचे दुसरे बचत खाते असेल तर तुम्ही ते जन धन खात्यात बदलू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून जास्त आहे, तो जन धन खाते उघडू शकतो.

‘ही’ कागदपत्रे आवश्यक आहेत
जन धन खाते उघडण्यासाठी KYC अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड या कागदपत्रांचा वापर करून जन धन खाते उघडता येते.