Monday, December 22, 2025
Home Blog Page 2845

कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेऊन मी शरण होतोय – नितेश राणे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आज नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कणकवली न्यायालयात मी न्यायालयाचा आदर राखत मी शरण जात आहे, असे राणे यांनी यावेळी सांगितले.

भाजप आमदार नितेश राणे हेआज कणकवली न्यायालयात शरण आले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता पर्यंत मला अटक करण्यासाठी राज्य सरकारने जे बेकायदेशीरपणे प्रयत्न केले. मात्र, काल न्यायालयाने माझ्याबाबत जो निर्णय दिला आहे. त्यावरून मी न्यायालयाचा आदर राखत स्वतःहून हजर होत आहे, असे राणे यांनी म्हंटले. तत्पूर्वी राणे यांनी एक सूचक ट्विट केले. अमित शाह यांचा फोटो पोस्ट करत समय बलवान है, असे ट्विट राणे यांनी केले आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1488804496595898373?s=20&t=bMZzlNH23fG3qXqTgDKa9Q

दरम्यान नितेश राणे हे शरण येण्यापूर्वी राणे हे कोर्टात शरण येणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली. तर नितेश राणे शरण आल्यास त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. यापूर्वी तीनवेळा जामीन फेटाळल्यांनंतर चौथ्यांदा काल सत्र न्यायालयाने जामीन फेटळला त्यानंतर राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. मात्र आज राणेंनी स्वतःहून  कोर्टासमोर शरण येणार असल्याची माहिती दिली.

कराडच्या प्रेमलाताई कॉलेजने फसवणूक केल्याचा आरोप : नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

प्रेमलाताई इंटिग्रेटेड कॉलेज कराड येथे विद्यार्थ्यांनी गेल्या तीन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नर्सिंग कॉलेज कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्नता नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

प्रेमलाताई कॉलेजमध्ये जवळपास 30 ते 35 विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे. नर्सिंग कॉलेजसाठी प्रवेश घेतलेल्या तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज वर गंभीर आरोप केले आहेत. तसेच नर्सिंगची पदवी मिळालेल्या काही विद्यार्थीनींनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. पदवी मिळालेल्या विद्यार्थिनींनी नोकरीसाठी गेलेल्या ठिकाणी ही पदवी बनावट असल्याचा सांगितले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच विद्यार्थी यांनी महाविद्यालयातील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन तयार केले होते.

 

सदरील निवेदन प्रेमलाताई इंटिग्रेटेड कॉलेज यांच्या प्राचार्यांना देण्यासाठी गेले असता व्यवस्थापनातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या निवेदनात म्हटले आहे की नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेले असूनही विद्यार्थ्यांना तासिका वेळेवर होत नाहीत. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात नर्सिंग मॅनेजमेंट डिपार्टमेंट उपलब्ध नाही. प्रात्यक्षिक दिले जात नाही, तसेच हॉस्पिटलला ड्युटी वर पाठवले जात नाही. प्राध्यापक वेळेवर प्रात्यक्षिक घेत नाहीत व तासिकाचे वेळापत्रक कॉलेजकडे नाही. परीक्षेचा कालावधी जवळ आला तरीही रजिस्ट्रेशनचा विषय अजूनही संपला नाही. निवेदनावर शहरमंत्री गणेश डुबल, जिल्हा संयोजक अजय मोहिते यांची स्वाक्षरी आहे.

तीन पानी जुगार अड्यावर तुफान राडा, ‘तेरी भी चुप.. मेरी भी चुप’ भूमिकेमुळे अद्याप पोलिसांत नोंद नाही

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरजेतील स्टॅन्ड परिसरात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्यावर तुफान राडा झाला असून मिरज आणि सांगली मधील दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत कोयता, काठ्यांचा सर्रास वापर करण्यात आला. एकावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.

शहर बस स्थानक हे गजबजलेले ठिकाण आहे. त्या ठिकाणी काही अंतरावर तीन पानी जुगार जोमात सुरू आहे. या जुगार अड्‌ड्यावर मिरज, सांगली आणि ग्रामीण भागातील ही काहीजण जुगार खेळण्यासाठी येतात. परंतु याची कुणकुण पोलिसांना नाही याचे मात्र आश्‍चर्य वाटत आहे. या जुगार अड्यावर मिरज आणि सांगली मधील काही तरूण जुगार खेळण्यासाठी आले होते. यामध्ये दोघांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाली.

सांगलीतील तरूण व खॉजावस्ती येथील तरूण एकमेकांना भिडले. या हाणामारीत कोयता, खुरपे, काठ्या, दगडांचा वापर झाला. या हाणामारीत दोघे जखमी झाले. एकावर शासकीय रूग्णालयात तर एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या हाणामारीची नोंद पोलिसात झाली नव्हती. या जुगार अड्यावरील तुफान हाणामारीची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर सर्वांनीच तेरी बी चुप मेरी बी चुप ही भूमिका बजावल्यामुळे अद्यापही पोलिसांत याची नोंद झाली नाही.

सरकारची अब्रू जातेय हे लक्षात आले आहे, शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज विरोधानंतर निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही, असे वक्तव्य केले. यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. वाईनच्या निर्णयावरून सरकारची अब्रू जात आहे. हे शरद पवार यांच्या लक्षात आले आहे. या सरकारमधील नेत्यांना शहाणपण असेल तर ते निर्णय मागे घेतील, अशी टीका फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी वाईन संदर्भात एक वक्तव्य केले. आता शरद पवार याच्याही लक्षात आणलेले आहे कि वाईनचा निर्णय हा चुकीचा आहे. समाजातील सर्व स्थरातून ता निर्णयाला प्रचंड स्वरूपात विरोध केला जात आहे. या निर्णयामुळे सरकारची अब्रू जात आहे. वाईन कंपन्यांशी जे काही डीलिंग करून जोकाय हा निर्णय घेतला गेला. काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

या सरकारमधील नेत्यांना शहाणपण असेल तर ते वाईनचा निर्णय मागे घेती नाही तर आम्ही जनतेमध्ये जातच आहोत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, असा भाजपचा संकल्प आहे, असे फडणवीस यांनी यावेळी म्हंटले.

बोगस रिडींग पाठविताना रंगेहाथ पकडले, उपसरपंचांकडून महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे एकाच ठिकाणी बसून बोगस रिडींग पाठविताना एकास रंगेहाथ पकडले. उपसरपंच मोहन पाटील यांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केल्यामुळे महावितरण कडून येणाऱ्या अवाजवी व बोगस बिलाबाबत स्पस्ट पुरावाच सापडला आहे. याबाबतचा व्हिडीओ संपूर्ण राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आज सर्वत्र या व्हिडीओची व महावितरणच्या भोगळ कारभाराची चर्चा सुरू होती.

शेतीची सर्व थकीत बिले भरणे शक्य नसल्यामुळे जमेल तेवढी रक्कम गोळा करून शेतकरी भरून वीजपुरवठा चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. संबंधित ठेकेदारांच्या बेजबाबदार पणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. असे प्रकार दिवसाढवळ्या घडत आहे.यास संबंधित अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

याबाबत मोहन पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, महावितरणच्या वतीने शेती पंपांचे रोडिंग घेणारा एक व्यक्ती गावातील एका मंदिरात बसून बोगस रोडिंग पाठवीत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर आम्ही काही ग्रामस्थांना बरोबर घेत त्याठिकाणी गेलो. सदर व्यक्ती मांजर्डे, मोराळे गावातील शेती पंपांची यादी घेऊन एकाच ठिकाणी बसून रिडींग पाठवीत असल्याचे निदर्शनास आले. अगोदर कोरोना अवकाळी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना बोगस रिडींग मुळे वीजबिल आवाच्या सव्वा आली आहेत.आजपर्यंत गावात अनेकांना बिल देण्यात आले नाही. महावितरण कर्मचारी यांच्याकडे यादी आल्यानंतर वीजबिल समजते. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

भरधाव वेगाने निघालेल्या कारमध्ये सापडले लाखो रुपयांचे घबाड, पोलिसांकडून चौघांना अटक

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या १०० फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंप समोर भरधाव वेगात निघालेल्या इंनोव्हा गाडीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची बेकायदेशीर रक्कम आढळली. त्रिमूर्ती चौक येथे नाकाबंदी साठी असलेल्या पोलिसांनी सदरची गाडी पकडली असता मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले. या गाडीमध्ये एकूण ६३ लाख ५० हजार रुपये सापडले. या प्रकरणी कोल्हापुरातील चौघांना अटक करण्यात आली आहे.

इनायतुल्ला पुणेकर, जावेद इब्राहिम पुणेकर, आशिष हिरालाल शुक्ला आणि गणेशप्रसाद गंगाप्रसाद गुर्जर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक इंनोव्हा कार आणि रक्कम असा एकूण ८९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई हि सोमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले होते. त्या प्रमाणे विश्रामबाग पोलिसांनी १०० फुटी रोडवरील त्रिमूर्ती चौक येथे नाकाबंदी केली होती.

सोमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास चेतना पेट्रोल पंप कडून भरधाव वेगात एक इंनोव्हा कार येत होती. पोलिसांना गाडीचा संशय आल्याने त्यांनी सदरची गाडी थांबवून तपासणी सुरु केली. या गाडीमध्ये संशयित चौघे बसले होते. गाडीची झडती घेतली असता पाठीमागील सीटवर एका बॉक्स मध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम पोलिसांना मिळून आली. सदरची रक्कम हि पंचासमक्ष मोजली असता तब्बल ६३ लाख ५० हजार रुपये इतकी निघाली. त्या नंतर चौघांना अटक करण्यात आली.

महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत महापालिका निवडणुकीच्या कामाला लागावे. मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश ठाकरे यांनी यावेळी दिले.

मुंबईत आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह महत्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठक संपल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या राज ठाकरे यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आज आमच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुक, सोशल मीडिया, निवडणुकीच्या दिवशीचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे? या संदर्भातील समित्या स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच उमेदवारांची यादी ठरवणे, याबाबतची चर्चा करण्यात आली.

संदीप देशपांडे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला. मराठी माणसं, हिंदुत्ववादी माणसं शिवेसेनेबरोबर आहेत का? मग शिवसेनेला अनुकुल असे कुठले वॉर्ड? मुळात असं काही नसतं, लोकाची मानसिकता आता शिवसेनेबरोबर नाही, असेही यावेळी देशपांडे यांनी म्हंटले.

आता खाद्यतेलाच्या वाढलेल्या विदेशी किमतींचा भारतीय बाजारावर कोणताही परिणाम होणार नाही

edible oil

नवी दिल्ली । गेल्या काही काळापासून पामतेलसह खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या प्रचंड वाढीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. खाद्यतेलाच्या या किंमती कमी करण्यासाठी सरकारने काही पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत तेलबिया पिकांना प्रोत्साहन देत सरकारने बजटमध्ये नवीन मिशन सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याद्वारे येत्या पाच वर्षांत तेलबियांचे उत्पादन 5 कोटी टनांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे बाजारात झपाट्याने वाढणाऱ्या खाद्यतेलाच्या किंमती तर कमी होतीलच मात्र त्याबोबरच पिकांना प्रोत्साहन दिल्याने देशातील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल.

खरे तर खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींचा परिणाम देशांतर्गत किंमतींवरही होतो, त्यामुळे बाजारासह शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद केली आहे. अर्थसंकल्प 2022 अंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला दिलेल्या अनुदानात याचा उल्लेखही करण्यात आला आहे. भारताला खाद्यतेलाच्या (तेलबिया) बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी तेलबिया पिकांसाठी NME-OS हे नवीन मिशन लाँच करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

याद्वारे पुढील पाच वर्षांत 1676 किलो प्रति हेक्टर उत्पादनासह 54.10 मिलियन टन उत्पादन घेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या हे उत्पादन 36.10 मिलियन टन असून 1254 किलो प्रति हेक्टर आहे. 3.5 मिलियन हेक्टर अतिरिक्त तेलबिया क्षेत्र (28.79 मिलियन हेक्टरवरून 32.31 मिलियन हेक्टर) मोहरी आणि सोयाबीन मिशन अंतर्गत आणले जाईल तर तांदूळ नापीक जमीन, आंतरपीक, उच्च उत्पन्न देणारे जिल्हे आणि अपारंपारिक राज्य/हंगामी तेलबियांच्या माध्यमातून पीक विविधीकरण केले जाईल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या मिशनमुळे तेल आयात अवलंबित्व 52 टक्क्यांनी कमी होऊन 36 टक्के होईल.

पाम तेल हे एक वनस्पती तेल आहे, जे जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्येही पाम तेलाचा वापर खाद्यतेलाप्रमाणे होतो. याशिवाय पाम तेलाचा वापर अनेक उद्योगांमध्ये तसेच आंघोळीचा साबण बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. सध्या जगभरात 80 मिलियन टनांहून जास्त पाम तेलाचे उत्पादन केले जाते. खाद्यतेलाच्या बाबतीत, भारताच्या आयातीपैकी दोन तृतीयांश वाटा एकट्या पाम तेलाचा आहे. भारत दरवर्षी 9 मिलियन टनांहून जास्त पाम तेल आयात करतो.

नशा आणणाऱ्या औषधांचा मोठा साठा जप्त

Medicine Tablet

औरंगाबाद – नशेखोरंना विक्री करण्यासाठी चोरट्या मार्गाने विक्रीकरिता आणलेल्या गुंगीवर्धक नशेच्या गोळ्यांचा साठा, खोकल्याचा औषधीसहा उस्मानपुरा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तौफिक रफिक फारूकी (41, रा. ब्रिजवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

याविषयी उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा परिसरातील झोपडपट्टीतील अल्पवयीन मुले तसेच शहरातील अनेकांना औषधी गोळ्या खोकल्याच्या औषधांचा नशेसाठी वापर करण्याचे व्यसन जडले आहे. प्रताप नगर मैदानाजवळ नशेच्या गोळ्या विकण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक गीता बागवडे, फौजदार प्रवीण वाघ, विनोद अबूज, हवालदार लांडे पाटील, फरहत शेख, योगेश गुप्ता, आशरफ सय्यद, सतीश जाधव आणि संदीप धर्मे यांच्या पथकाने औषधे निरीक्षक जीवन दत्तात्रय जाधव यांच्यासह सापळा रचून ही कारवाई केली.

कॉपरचे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक करत पोलिसांकडून लाखोंचा जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून कॉपरचे साहित्य चोरी करून त्यातील तांबे काढून विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. या प्रकरणी पोलिसांनी कुपवाड येथील अहिल्यानगर येथे सापळा रचून रेकॉर्डवरील तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १०१ किलो वजनाचे कॉपर असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दत्तात्रय वसंत माने, करण अजित गोसावी आणि श्रीनिवास रमेश पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी व्यक्त केली.

मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी चाणक्य चौक येथे सापळा लावला. त्यावेळी सुतगिरणी चौकाकडुन मारुती ८०० त्याच्या पाठोपाठ एक छोटा टेम्पो येत असताना दिसला. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना थांबवून गाड्यांची तपासणी केली असता मागील तांब्याच्या वायरी आणि तारा भरलेले दोन पोते मिळाले. टेम्पोच्या हौदा मध्ये तांब्याच्या वायरी आणि तारा भरलेली दोन पोती मिळाली.

त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सागितले कि, आम्ही सर्वानी मिळुन रात्रीच्या वेळी दिघंची चौकातुन पंढरपुरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजुस असलेल्या दुकानाच्या भिंतीस भगदाड पाडुन चोरी केली. तसेच अलकुड एस गावच्या हद्दीतील एका फॅक्ट्रीमधील ट्रान्सफॉर्मर व पॅनल बोर्ड चोरी केला, पुणदी फाटा येथील नवीन बांधलेल्या पंप हाऊस मधुन चोरी केली, तसेच दुधगाव येथील वारणा घाट येथुन ट्रान्सफॉर्म मधून तांब्याच्या तारा व तांब्याच्या प्लेटा चोरल्याचे सांगितले. मारुती कार मधील १०१ किलो वजनाच्या १ लाख ६ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा, टेम्पो मधील ६९ किलो वजनाच्या ६९ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा आणि चोरीत वापरलेल्या दोन्ही गाड्या असा एकूण ३ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.