Monday, December 29, 2025
Home Blog Page 2949

पैठणच्या तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंत्यासह नगरसेवकावर गुन्हा

औरंगाबाद – नगरपरिषद हद्दीत येत नसतानाही संगणमत करून जायकवाडी धरण परिसरातील ईदगाह मैदानात सिमेंट रस्ते व इतर विकास कामे करून 39 लाख रुपयांचा निधी लाटल्या प्रकरणी तत्कालीन नगर परिषदेचे मुख्याधिकारी, अभियंते यांच्यासह नगरसेवक व ठेकेदार विरोधात पैठण न्यायालयाच्या आदेशानुसार पाच जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सन 2018-19 मध्ये आपसात संगणमत करून पैठण शहरात जायकवाडी धरणाच्या बाजूला असणारे ईदगाह मैदान पैठण नगर परिषदेच्या हद्दीत येत नसताना देखील पैठण नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये असल्याचे दाखवून त्या ठिकाणी सीसी रस्ता बांधकाम करण्याचे प्रस्ताव सादर केले. आपसात संगणमत करून काम पूर्ण केल्याचे दाखवून 39 लाख 59 हजार 489 रुपयांचे बिल बनवून आपसात वाटून घेतले. या प्रकरणी शासनाची आणि जनतेची फसवणूक केली म्हणून तक्रारदार अब्रार गुलाब कुरेशी यांनी याबाबत पैठण न्यायालयात दाद मागितली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, स्थापत्य अभियंता सचिन वाघमारे, अभियंता अमित सोनवणे, चारणीया कन्स्त्रक्शन औरंगाबड आणि नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांच्यावर काल रात्री उशिरा पैठण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रामकृष्ण सागडे, चव्हाण हे करत आहेत.

सुकन्या समृद्धी योजनेद्वारे रोज 1 रुपयांची बचत करून मिळवा 50 लाखांचा फंड; कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही खूप कमी पैसे गुंतवून मोठी रक्कम जमा करू शकता. या सरकारी योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना (SSY). या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे भवितव्य तर सुरक्षित करू शकताच पण त्याचबरोबर या उत्तम गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला इन्कम टॅक्स वाचविण्यातही मदत होते. या योजनेचा लाभ दररोज 1 रुपये वाचवून देखील मिळू शकतो. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात …

सुकन्या समृद्धी योजना काय आहे ?
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही केंद्र सरकारची मुलींसाठीची एक अल्प बचत योजना आहे, जी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. सुकन्या ही लहान बचत योजनेतील सर्वोत्तम व्याजदर योजना आहे.

एवढ्या पैशातून गुंतवणूक करता येते
सुकन्या समृद्धी योजनेत फक्त रु.250 मध्ये खाते उघडता येते. म्हणजेच तुम्ही दररोज 1 रुपया वाचवला तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. SSY खात्यात एका आर्थिक वर्षात एका वेळी किंवा अनेक वेळा रु. 1.5 लाखांपेक्षा जास्त जमा केले जाऊ शकत नाहीत.

किती व्याज मिळेल ?
सध्या, SSYमध्ये 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे. यापूर्वी 9.2 टक्क्यांपर्यंत व्याजही मिळाले होते. वयाच्या 8 वर्षानंतर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खर्च झाल्यास 50 टक्के रक्कम काढता येते.

मॅच्युरिटीवर तुम्हाला 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल
समजा तुम्ही या योजनेत दर महिन्याला रु. 3000 म्हणजेच वार्षिक रु. 36000 गुंतवले तर 14 वर्षांनंतर तुम्हाला 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्षांच्या मुदतीनंतर, ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये असेल. सध्या SSY मध्ये 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे.

खाते कसे उघडायचे ?
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेच्या अधिकृत शाखेत उघडता येते. या योजनेंतर्गत, 10 वर्षापूर्वी मुलीचा जन्म झाल्यानंतर किमान 250 रुपये डिपॉझिट्ससह खाते उघडता येते. चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील.

खाते किती दिवस चालवता येते ?
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यानंतर, मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ते चालवले जाऊ शकते.

रक्कम जमा न केल्यास काय दंड आहे
दरवर्षी 250 रुपये किमान डिपॉझिट न केल्यास, खाते बंद केले जाईल आणि त्या वर्षासाठी जमा करावयाच्या किमान रकमेसह दरवर्षी 50 रुपये दंडासह ते पुन्हा चालू केले जाऊ शकते. खाते उघडण्याच्या तारखेपासून 15 वर्षांनंतर पुन्हा ऍक्टिव्ह येऊ शकते.

सोमवारपासून ‘मेस्टा’ ने घेतला शाळा उघडण्याचा निर्णय

औरंगाबाद – विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीने शासनाने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना सोयी- सुविधांअभावी घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून येत्या सोमवारपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील इंग्रजी शाळा सुरू करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संपूर्ण शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत सरसकट बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संघटनेने 11 व 12 जानेवारी दरम्यान संस्थाचालकांची ऑनलाईन बैठक घेतली. दोन वर्षांपासून कोरोनाचा सबबीखाली मुलांचे मोठ्या प्रमाणात झालेले शैक्षणिक नुकसान, तसेच पालकांचे शाळा बंद करण्याची मागणी आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती सर्वानुमते शाळा निरंतर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना संदर्भातील सावधगिरीचे सर्व नियम पाळून जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळा 17 जानेवारीपासून सुरू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे मंडळाचे संस्थापक संजय तायडे यांनी सांगितले.

आता ‘हा’ मोबाईल क्रमांक ठरवणार पंजाबचा मुख्यमंत्री कोण असावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे देशातील पंजाबसह काही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, यावेळेस पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एक नवीन कल्पना लढवली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 7074870748 हा एक फोन नंबरही जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जनतेने आपल्या नेत्याचे नाव सांगावे लागणार आहे. ते नाव सांगितल्यास ज्या नेत्याच्या नावाने जास्त कौल येईल, तोच आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे.

आम आदमी पार्टी प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहार. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंजाबमध्ये यावेळेस निवडणुकीत आणेकी नवीन कल्पना लढवणार असल्याचे सांगितले. पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काही पावलंच दूर आहोत. फक्त दोन-तीन जागांचाच प्रश्न आहे. सर्व मतदारांनी उत्साहाने मतदान करा असे आवाहनही केजरीवाल यांनी केले आहे.

अनेक पक्ष आपापल्या कुटुंबियांना, मुलाला, नातेवाईकाला मुख्यमंत्री बनवतात. पंजाबमध्ये बंद खोलीत सीएमचा चेहरा ठरवण्याची प्रथा बंद केली पाहिजे. आपण थेट लोकांनाच विचारणार आहोत कि त्यांना त्यांनी निवडून दिलेल्या नेत्यांपैकी कुणाला मुख्यमंत्री पदावर बसवायचे, हे ठरवता येईल. त्यासाठी एक फोन नंबर दिला आहे. त्यावर फोन करून लोकांनी त्यांना कोणाला मुख्यमंत्री करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव हे सांगायचे आहे, असे केजरीवाल म्हणाले

Cryptocurrency prices: PAPPAY मध्ये पुन्हा झाली 900 टक्क्यांनी वाढ, बिटकॉइननेही घेतला वेग

Online fraud

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केट 3.19% वाढले आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:47 वाजता जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $2.07 ट्रिलियन पर्यंत वाढले. बिटकॉइन आणि इथेरियम हे दोन्ही मोथे कॉईन्स नफ्यासह ट्रेड करत आहेत. इथेरियम मध्ये 3 टक्क्यांहून जास्त आणि बिटकॉइनमध्ये 2 टक्क्यांहून जास्त वाढ दिसून आली आहे. गुरुवारी, टेरा लुना, डॉजकॉइन आणि शिबा इनूमध्ये लक्षणीय वाढ होती.

गुरुवारी, बिटकॉइन 2.21% च्या वाढीसह $43,635 वर ट्रेड करत होता. बिटकॉइनने गेल्या 24 तासांत $42,541.92 चा नीचांक गाठला आणि नंतर $44,135.37 चा उच्चांक गाठला. इथेरियम 3.23% वाढून $3,335 वर ट्रेड करत आहेत. याच कालावधीत इथेरियमने $3,216.72 चा नीचांक आणि $3,401.22 चा उच्चांक गाठला. गुरुवारी बातमी लिहिली जाईपर्यंत क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे वर्चस्व 39.9 टक्के होते, तर इथेरियमचे वर्चस्व विक्रमी 19.2 टक्के होते.

‘या’ करन्सीमध्ये झाली 10% पेक्षा जास्त वाढ
Coinmarketcap च्या डेटानुसार, शिबा इनू 15 टक्क्यांहून जास्त, डोगेकॉइन 12 टक्क्यांहून जातीस आणि टेरा लुना 10 टक्क्यांहून जास्तीचे ट्रेड करताना दिसले. मार्केट कॅपनुसार, शिबा इनू करन्सी 13 व्या क्रमांकावर आहे, गेल्या 24 तासांमध्ये 15.38% च्या उडीसह $0.000032 वर ट्रेड करत आहे.

Dogecoin मार्केट कॅपच्या बाबतीत 12 व्या क्रमांकावर आहे आणि 11.80 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. ही करन्सी $0.171449 वर ट्रेड करत होती. टेरा लुना गेल्या 24 तासांमध्ये 10.51% च्या वाढीसह $80.87 वर ट्रेड करत आहे. मार्केट कॅपनुसार ती आज 9 व्या क्रमांकावर आहे.

एका दिवसात सर्वाधिक वाढणाऱ्या करन्सी
गेल्या 24 तासांत तीन करन्सीमध्ये PAPPAY मध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. या करन्सीने 900.04% झेप घेतली आहे. BrowniesSwap (BROWN) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात 520.75% ची वाढ झाली आहे आणि DECENT डेटाबेस तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये 480.74% ची वाढ झाली आहे.

स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी, वा रे ठाकरे सरकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडले. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घराच्या अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. “शेतकऱ्यांसाठी पैसे नाही पण आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी, वा रे वा ठाकरे सरकार,” अशा शब्दांत उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

केशव उपाध्ये यांनी नुकतेच ट्वीट करत ठाकरे सरकारने कालच्या मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयावरून निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही कबूल करूनही प्रोत्साहन भत्ता देत नाही. शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी करता. वा रे ठाकरे सरकार,” अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

तसेच एसटी कामगाराच्या आत्महत्येवरूनही उपाध्ये यांनी टीका केली असून त्यांनी “एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या पण तुम्हाला पाझर फुटला नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी थेट मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.

 

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीत सापडलेल्या शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालायला सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान. वा रे ठाकरे सरकार.अनियमित बांधकामे करा फक्त शिवसेनेचे आमदार की तुम्हाला सगळ माफ हेच ठाकरे सरकारचे धोरण, अशीति टीका उपाध्ये यांनी केली आहे.

खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाईही वाढली, नवीन आकडेवारी काय सांगते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर पाच महिन्यांच्या उच्चांकी 5.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये तो 4.91 टक्के होता. याशिवाय भारतातील कारखान्यांच्या उत्पादनातही 1.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) बुधवारी ही स्वतंत्र आकडेवारी सादर केली.

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर 2021 मध्ये 4.91 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 4.59 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 1.87 टक्क्यांवरून 4.05 टक्क्यांवर पोहोचला आहे.

रिझव्‍‌र्ह बँक द्वैमासिक चलनविषयक आढाव्यात प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा डेटा पाहते. प्रतिकूल आधारभूत परिणामामुळे चलनवाढीचा आकडा आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीत वर राहील, असा विश्वास सेंट्रल बँकेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण महागाईचा दर सर्वोच्च पातळीवर असेल. तेव्हापासून ते खाली येईल.

भारतात टेस्लाची कार अजून का आली नाही? यावर एलन मस्क म्हणाले “आम्ही… “

नवी दिल्ली । टेस्लाची कार भारतात लॉन्च करण्याबाबत कंपनी भारत सरकारशी सतत चर्चा करत आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी भारतीय बाजारपेठेत त्यांची इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याबाबत सांगितले आहे की, भारतात कंपनीसमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत. त्याच वेळी, NITI आयोगाचे म्हणणे आहे की, आयात शुल्क कमी करण्याच्या टेस्लाच्या मागणीवर सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते.

एका ट्विटर यूझरने एलन मस्कला विचारले होते,”टेस्ला भारतात लॉन्च करण्याबाबत काय अपडेट आहे? हे आश्चर्यकारक आहे आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात असले पाहिजेत.” मस्कने उत्तर दिले की,”कंपनीसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. टेस्ला त्यांच्याशी व्यवहार करण्यात गुंतलेला आहे.”

आयात शुल्क अडथळा
गेल्या वर्षी जुलैमध्ये, टेस्लाने पंतप्रधान कार्यालयाला इलेक्ट्रिक वाहनांवर (EV) आयात कर कमी करण्यास सांगितले होते. टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार बाहेरून आयात करून भारतात विकू इच्छित आहे, मात्र उच्च आयात कर त्यांच्या मार्गात अडथळा ठरत आहे. आयात कर कमी करण्याच्या टेस्लाच्या विनंतीला देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी विरोध केला. ते म्हणाले की,” आयात शुल्क कमी केल्याने देशांतर्गत उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीवर वाईट परिणाम होईल.”

कराबाबत लवकरच होऊ शकेल निर्णय
कर कमी करण्याच्या टेस्लाच्या विनंतीवर सरकार लवकरच विचार करू शकते. भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट उभारण्याच्या अटीवर सरकार टेस्लाची मागणी मान्य करू शकते. NITI आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की,”टेस्लाच्या प्रस्तावाचे मूल्यांकन केले जात आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.” NITI आयोग हा सरकारचा मुख्य थिंक टँक आहे जो पॉलिसी ठरवण्याबाबत प्रशासनाला मत करतो.

एलन मस्क देखील भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट उभारण्यास उत्सुक आहेत, मात्र त्यांना टेस्ला कार पहिले भारतात याव्यात अशी त्यांची इच्छा आहे. सध्याचे 60 टक्के आयात शुल्क वाढवून 40 टक्के करावे, अशी मस्कची मागणी आहे.

शिवसेना उत्तरप्रदेशात 50 ते 100 जागा लढवणार; संजय राऊतांची घोषणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या राज्यात निवडणुक लढवण्यासाठी अनेक पक्ष सज्ज झाले असून आता शिवसेनेनं देखील उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना 50 ते 100 जागा लढेल अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे

संजय राऊत हे उत्तरप्रदेश दौऱ्यावर असून आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेच्या आगामी वाटचालीबाबत भाष्य केले. यावेळीला ज्या पद्धतीने आम्ही उत्तरप्रदेशात निवडणूक लढवण्याचे ठरवतो आहे. सगळे खासदार, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या निवडणुकीमध्ये लक्ष घालून आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार असतील अशी खात्री असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी- सपा युती

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपला पक्ष उत्तरप्रदेश मध्ये निवडणूक लढणार असून समाजवादी पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांसोबत आघाडी करेल अस पवारांनी स्पष्ट केले होते. उत्तरप्रदेशात कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन होणारच आहे असं म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला.

NPCI अलर्ट : UPI पिन द्वारे होणार फसवणूक कशी टाळायची हे समजून घ्या

UPI

नवी दिल्ली । जसजसे डिजिटल ट्रान्सझॅक्शन वाढत आहेत, तसतशी फसवणूकही वाढत आहे. सायबर ठग फसवणुकीसाठी अनेक नवनवीन युक्त्या वापरत आहेत. काही वेळा एटीएम किंवा क्रेडिट कार्डबाबतही बँक खाते अपडेट करण्याबाबत बोलून लोकांची फसवणूक केली जाते तर कधी केवायसी तर कधी लॉटरी जिंकण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याची प्रकरणेही समोर येत आहेत.

या सर्व फसवणूक प्रकरणांमध्ये एक अतिशय सामान्य केस म्हणजे लॉटरी. तुम्ही कार जिंकली आहे किंवा लाखो रुपयांची लॉटरी लागली आहे, असे सांगून हे ठग कॉल करतात. भोळी लोकं त्यांच्या बोलण्यात गुरफटतात आणि कष्ट करून जमवलेला पैसा खर्च करतात.

ऑनलाइन फसवणूक
हे ठग लॉटरी जिंकण्याच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवतात आणि लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी लिंक पाठवतात आणि त्यावर क्लिक करून UPI ​​पिन टाकण्यास सांगतात. या लिंकवर एखाद्या व्यक्तीने UPI पिन टाकताच, त्याच्या बँक खात्याचा तपशील सायबर ठगांकडे जातो आणि ते खात्यातील सर्व रक्कम आपल्या खात्यात ट्रान्सफर करतात.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात घेऊन NPCI नागरिकांसाठी वेळोवेळी अलर्ट जारी करते. NPCI म्हणते की, पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकण्याची गरज नाही. तुमच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा कोणतेही पेमेंट करण्यासाठी UPI पिन वापरला जातो. UPI पिन वापरल्यावर खात्यातून पैसे कापले जातात, खात्यात पैसे येत नाहीत.

UPI पिन ही मोबाईल वॉलेटची गुरुकिल्ली आहे
UPI पिन ही एक प्रकारे तुमच्या मोबाईल फोनमध्ये टाकलेल्या तुमच्या बँक खात्यांची किल्ली आहे. ही किल्ली दुसऱ्या कोणाला मिळाली तर तो तुमचे खाते रिकामे करू शकतो. वास्तविक, ऑनलाइन ट्रान्सझॅक्शनसाठी UPI ची सर्व्हिस घ्यावी लागते आणि त्यासाठी व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस तयार करावा लागतो. ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल. व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस तुमचा फायनान्शिअल ऍड्रेस बनतो. यानंतर तुमचा बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव किंवा IFSC कोड इत्यादी लक्षात ठेवण्याची गरज नाही.

UPI वापरण्यासाठी, तुम्हाला UPI ला सपोर्ट करणारे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. पेटीएम, फोनपे, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, भीम यासह अनेक अ‍ॅप्सवर ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे.

UPI पिन कसा तयार करायचा ?
UPI सुविधेसह अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला तुमची बँक निवडावी लागेल. येथे व्हेरिफिकेशन केले जाईल. व्हेरिफिकेशन केल्यानंतर, तुमचा व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस तयार केला जातो. आता तुमच्या मदतीने तुम्ही UPI ट्रान्सझॅक्शन सहजपणे करू शकाल.

UPI पेमेंट सिस्टीम
UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस नॅशनल पेमेंट ऑफ इंडियाने विकसित केला आहे. याच्या मदतीने तुम्ही मोबाईल वॉलेटद्वारे दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकता. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही कधीही कुठूनही फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शन करू शकता.

फसवणूक कशी टाळायची ?
तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका.
नेहमी UPI ने फक्त विश्वसनीय अ‍ॅप्सवर पैसे द्या.
भीम अ‍ॅप हे सर्वात ट्रस्टेड डिजिटल पेमेंट अ‍ॅप आहे.
कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
अज्ञात लिंकवर UPI पिन वापरू नका.
अशा लिंक्सद्वारे फिशिंग स्कॅम केले जातात.
UPI पिन वेळोवेळी बदला.