Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2955

केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र; तिसऱ्या लाटेवरून दिल्या ‘या’ सूचना

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबरोबर ओमिक्रॉन व्हेरियंट बाबत उपाययोजना करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी आरोग्य सुविधांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

राज्यातील आरोग्य विभागाने राज्यात असलेल्या रुग्णालयांमध्ये 48 तास ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व्यवस्थित काम करत आहेत का?, आयसीयू (ICU), बीआयपीएपी, एसपीओ 2 प्रणालीसाठी आवश्यक व्हेंटिलेटर योग्य प्रकारे काम करत आहेत कि नाही, याचीही खात्री करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्या आहेत.

आता महाराष्ट्रात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडूनही केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाणार आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये 48 तास ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची त्यांच्याकडूनही खात्री केली जाणार आहे.

पहिल्या डावात अर्धशतक झळकावताच विराट कोहली ‘या’ स्पेशल क्लबमध्ये झाला सामील

नवी दिल्ली । विराट कोहलीने 2022 वर्षाची सुरुवात संयमी अर्धशतकाने केली आहे. तिसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 79 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही. टीम इंडियाने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या. कागिसो रबाडाने 4 बळी घेतले.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 17 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे संघ भारतापेक्षा 206 धावांनी पिछाडीवर असून 9 विकेट्स बाकी आहेत. तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत ही कसोटी जिंकून कोहलीला पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकायला आवडेल.

विराट कोहली अर्धशतक झळकावताच 99 च्या स्पेशल क्लबमध्ये सामील झाला. 99 वी कसोटी खेळत असलेल्या कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 99 व्यांदा 50 हून जास्त धावा केल्या. आतापर्यंत जगातील केवळ 3 कर्णधारच येथे पोहोचले आहेत. कोणत्याही भारतीय कर्णधाराला हे करता आलेले नाही. म्हणजेच 100 वेळा हा पराक्रम करण्यापासून कोहली फक्त एक पाऊल दूर आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या बाबतीत आघाडीवर आहे. त्याने हा पराक्रम सर्वाधिक 129 वेळा केला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने 110 वेळा हा पराक्रम केला आहे. याबाबतीत कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली या महिन्यात हा विक्रम करू शकतो. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याला अशी संधी आहे.

विराट कोहलीने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 41 शतके आणि 58 अर्धशतके झळकावली आहेत. जर त्याने आणखी एक शतक झळकावले तर तो कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचेल. सध्या तो रिकी पाँटिंगसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र 2 वर्षांपासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही.

भारताचा एमएस धोनी या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्णधार म्हणून त्याने 82 वेळा असा पराक्रम केला आहे. त्याचवेळी सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन या दोघांनी 59-59 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर इतर कोणत्याही भारतीय कर्णधाराला 50 वेळा अशी कामगिरी करता आलेली नाही.

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत सरकार चीनसाठी बदलू शकते ‘हा’ नियम

नवी दिल्ली । सीमेवर दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार चीनकडून येणाऱ्या गुंतवणुकीबाबतचे नियम शिथिल करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, महामारीच्या काळात गुंतवणुकीला गती देण्यासाठी मोदी सरकार थेट विदेशी गुंतवणूक (FDI) नियमांमध्ये काही बदल करण्याचा विचार करत आहे.

यामध्ये बदल झाल्यास, जर एखादा गुंतवणूकदार भारतीय सीमेला लागून असलेल्या देशांचा असेल आणि कंपनीमध्ये त्याची मालकी 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर अशा गुंतवणुकीच्या प्रस्तावासाठी मंजुरी घेण्याची गरज भासणार नाही. सध्या एखादी कंपनी किंवा गुंतवणूकदार भारतीय सीमेला लागून असलेल्या देशांतील असेल तर तिथून येणाऱ्या गुंतवणुकीची जास्त काटेकोरपणे तपासणी केली जाते.

पुढील महिन्यात मंजुरी मिळू शकते
ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्सनुसार, सध्याच्या नियमामुळे सुमारे $6 बिलियनची विदेशी गुंतवणूक रखडली आहे. असे मानले जात आहे की, यातील बदलाला पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत मंजुरी मिळेल. अलीकडेच, विशेषत: चीनमधून येणारी गुंतवणूक लक्षात घेऊन भारत सरकारने FDI नियमांमध्ये बदल केले आहेत.

गुंतवणूक वेगाने वाढेल
रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर 2021 पर्यंत, चीनसह इतर सीमावर्ती देशांकडून येणारे 100 गुंतवणूक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी एक चतुर्थांशहून जास्त प्रस्ताव असे आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक मूल्य 1 कोटी डॉलर्स (सुमारे 70 कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. नियम शिथिल केल्यानंतर भारतात गुंतवणूकदारांचा महापूर येईल आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल, असे मानले जात आहे.

यामुळे बदलण्यात आला FDI चा नियम
संधीचा फायदा घेत चीनने भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत चीनची संधीसाधू ताबा रोखण्याच्या उद्देशाने सरकारने FDI च्या नियमांमध्ये बदल केले गेले होते. त्यानंतर चीन, हाँगकाँग येथून गुंतवणुकीच्या प्रस्तावाला हळूहळू मंजुरी मिळू लागली. गुंतवणुकीचे डझनभर प्रस्ताव अजूनही छाननीसाठी प्रलंबित आहेत.

गुंतवणुकीत सतत वाढ
वाणिज्य मंत्रालयाच्या रिपोर्ट्सनुसार, 2020-21 मध्ये एकूण $82 अब्ज FDI आले. एप्रिल ते जुलै या कालावधीत हा आकडा 62 टक्क्यांनी वाढून $27 अब्ज झाला होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात 2014-15 ते 2020-21 या काळात एकूण $440.27 अब्ज FDI आले.

सातारा जिल्ह्यात पोलिसांच्या गुटखा कारवाईत महिलांचा गोंधळ

वाई | व्याजवाडी (ता. वाई) येथील एका गुटखा व्यावसायिकाने स्वत:च्या रहात्या घराच्या पडवीमध्ये चोरुन गुटखा ठेवून चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्यातून आणला होता. वाई पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यासाठी गेल्यानंतर महिलांनी गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी खाकी दाखवताच मार्ग मोकळा झाला अन् या छाप्यात 11 गुटख्याची पोती जप्त करण्यात आली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्याजवाडी येथील ऋषीकेश हणमंत पिसाळ याने स्वत:च्या रहात्या घराच्या पडवीमध्ये चोरुन गुटखा ठेवून चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्यातून आणला होता. तब्बल 1 लाख 10 हजार रुपयांचा हा गुटखा आणून त्याचा साठा केला असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना त्यांच्या खास खबऱ्यामार्फत मिळताच त्यांनी वाई पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार विजय शिर्के, महिला पोलिस नाईक सोनाली माने, पोलिस कॉस्टेबल किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमीत गोळे, प्रसाद दुदुस्कर यांच्या पथकाला पाचारण केले व गुटख्याच्या साठ्यावर तात्काळ छापा टाकण्याचे आदेश दिले.

तातडीने व्याजवाडी (ता. वाई) येथील ऋषीकेश हणमंत पिसाळ याच्या घरावर डिबी पथकातील पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. पण गुटखा ठेवलेल्या घरातील पडवीपर्यंत हे पोलिस पथक पोहचू नये यासाठी आरोपीच्या घरातील महिला वर्गाने गोंधळ घालून पोलिसांना हुसकावून लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण डिबी पथकाने न डगमगता गोंधळ घालणाऱ्या महिलांना कायदा समजावून सांगितला, अन्यथा कारवाईचा मार्ग मोकळा असल्याचे सांगितले.

गुटख्याचा साठा ठेवलेल्या घरातील पडवीत प्लास्टिकच्या पोत्याखाली तब्बल 11 पोती गुटखा लपवून ठेवलेला बाहेर काढुन रितसर पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतला. या गुटख्याची आजच्या बाजार भावा प्रमाणे 1 लाख 10 हजार रुपये किंमत असल्याची माहिती विजय शिर्के यांनी दिली. आरोपी ऋषीकेश हणमंत पिसाळ यास पथकाने वाई सातारा रस्त्यावरील बावधन ओढा येथे ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणले. अधिक तपास सहायक फौजदार विजय शिर्के करत आहेत.

LIC IPO लॉन्चिंगच्या वेळेबाबत खुलासा ! पब्लिक ऑफर केव्हा येईल हे जाणून घ्या

LIC

नवी दिल्ली । भारतीय आयुर्विमा महामंडळ आपल्या IPO साठी या महिन्यात म्हणजे जानेवारीच्या अखेरीस कागदपत्रे सादर करू शकते. याबाबतची तयारी सुरू असून लवकरच कागदपत्रे एक्स्चेंजकडे सुपूर्द केली जातील, असे या प्रकरणातील तज्ज्ञांनी सांगितले.

इकॉनॉमिक टाइम्सने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली असल्याचे त्यांनी लिहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात, देशातील सर्वात मोठा IPO आणणाऱ्या LIC ची एम्बेडेड व्हॅल्यू किती आहे आणि कंपनी किती शेअर्स बाजारात आणणार आहे हे कळू शकते. मात्र, सूत्रांनी असेही म्हटले आहे की, कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रॉनमुळे याच्या वेळेत बदल शक्य आहे.

वृत्तानुसार, याबाबत अर्थ मंत्रालयाचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. त्याचप्रमाणे, LIC ने देखील या संदर्भात पाठवलेल्या ई-मेलला त्वरित प्रतिसाद दिलेला नाही.

यापूर्वी, वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की, केंद्र सरकारने मार्च अखेरपर्यंत या IPO साठी आपली अंतिम मुदत निश्चित केली आहे. LIC मधील 5 किंवा 10 टक्के हिस्सेदारी विकून सुमारे 10 ट्रिलियन रुपये मिळवण्याचे सरकारचे टार्गेट आहे.

FDI चे नियमही बदलणार !
सरकार FDI शी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत असल्याचे गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला उघड झाले होते. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची निर्गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय FDI पॉलिसीमध्ये बदल करण्याची तयारी करत आहे. मात्र, एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहितीही माध्यमांमध्ये आली आहे.

सध्याच्या FDI पॉलिसी नुसार, ऑटोमॅटिक रूटने विमा क्षेत्रात 74 टक्क्यांपर्यंतच्या परकीय गुंतवणुकीला परवानगी आहे. मात्र, हे नियम LIC ला लागू होत नाहीत कारण त्याची स्थापना संसदेत कायदा पारित करून करण्यात आली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने LIC च्या इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) ला मंजुरी दिली होती.

शरद पवारांसारख्या सह्याद्री पर्वताची उंची तुमच्यासारख्या टेकड्यांना काय कळणार; राऊतांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

RAUT CHANDRAKANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचा आज राऊतांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्या इतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री किंवा हिमालयाची उंची लक्षात येणार नाही,” असे राऊतांनी प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांनि केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम सुरुच आहे. उद्या ते पंतप्रधान मोदी यांच्या सोबतच्या बैठकीत सहभागी होतील, ते आपण स्वत: पाहालच. राहिला प्रश्न शरद पवार याच्याबद्दल आपण जे काही बोललात त्याचा. शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याइतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री किंवा हिमालयाची उंची लक्षात येणार नाही.

एखादी व्यक्ती फक्त पंतप्रधानपदावर बसली म्हणून मोठी होत नाही. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची ही पंतप्रधान होण्यापूर्वीच मोठी होती. अनेक चांगल्या व्यक्ती पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत हेही लक्षात घ्यावे, असे राऊत यांनी म्हंटले.

Gold-Silver Prices : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीही झाली स्वस्त, आजचे दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोने 48,000 रुपयांच्या खाली दिसत आहे. यावेळी पाहिले तर सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही सातत्याने चढ-उतार होत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 0.06 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याचवेळी चांदीच्या दरातही 0.12 टक्क्यांची घसरण झाली आहे.

आज सोने आणि चांदी किती स्वस्त झाले ते पहा
आज, फेब्रुवारीतील डिलिव्हरीसाठी MCX सोने 0.06 टक्क्यांनी घसरून 47,659 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 61,030 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,350 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,,580 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,,580 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,580 रुपये
पुणे – 45,850 रुपये
नागपूर – 46,580 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,580 रुपये
पुणे -48,350 रुपये
नागपूर – 48,580 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4584.00 Rs 4585.00 0.022 %⌃
8 GRAM Rs 36672 Rs 36680 0.022 %⌃
10 GRAM Rs 45840 Rs 45850 0.022 %⌃
100 GRAM Rs 458400 Rs 458500 0.022 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4834.00 Rs 4835.00 0.021 %⌃
8 GRAM Rs 38672 Rs 38680 0.021 %⌃
10 GRAM Rs 48340 Rs 48350 0.021 %⌃
100 GRAM Rs 483400 Rs 483500 0.021 %⌃

फडणवीस तुम्ही कितीही नोटा टाका, शिवसेना गोव्यात…, संजय राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात आगामी निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपमधून अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. या दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गोव्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी या ठिकाणी शिवसेनेने एका जागेवरचे डिपॉझिट जप्त होऊ नये हे पाहिले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “मी फडणवीस यांना सांगेन की तुम्ही कितीही नोटा टाका. शिवसेना गोव्यात नक्की लढणार आहे,” असा इशारा राऊतांनी फडणवीसांना दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, भाजपचे लोक गोव्यात महाराष्ट्रात नोटांचा पाऊस पडत आहेत. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा जात आहेत. शिवसेना गोव्यात या नोटांशी नक्की लढली. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा, हिंदुत्ववाद्यांचा पक्ष आहे. मी फडणवीस यांना सांगेन की तुम्ही कितीही नोटा टाका. शिवसेना गोव्यात नक्की लढणार आहे.

शिवसेनेकडून गोव्यातील निवडणुकीकडे लक्ष दिले जात आहे. नुकताच फडणवीसांनी गोव्याचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्यानंतर गोव्यात शिवसेनेने काल एक मंत्री यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. फडणवीसांनी शिवसेनेबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असा सल्ला यावेळी राऊतांनी दिला आहे.

Budget 2022 : सर्वसामान्य ग्राहकांना सरकार देणार धक्का ! स्मार्टफोनसह ‘या’ वस्तू होऊ शकतात महाग

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या काळात केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे एकीकडे लोकं दिलासा मिळण्याच्या आशेवर बसले आहेत तर दुसरीकडे, सरकार त्यांना धक्का देऊ शकेल. आगामी बजटमध्ये सरकार स्मार्टफोनसह जवळपास 50 वस्तूंच्या किमतीत वाढ करू शकते. अर्थव्यवस्था आणि सध्याची आर्थिक स्थिती पाहता सरकार हे पाऊल उचलू शकते, असे उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

देशांतर्गत उद्योगांना दिलासा देण्यासाठी सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात परदेशातून आयात होणाऱ्या सुमारे 50 वस्तूंवर आयात शुल्क वाढवू शकते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल गुड्स, केमिकल आणि हँडक्राफ्ट सारख्या उत्पादनांचा समावेश आहे. आयात शुल्क वाढवल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आयात शुल्क 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकते
सूत्रांचे म्हणणे आहे की,” चीन आणि इतर देशांकडून $ 56 अब्ज किमतीच्या उत्पादनांच्या आयातीवर आयात शुल्क लागू केले जाऊ शकते. ज्या वस्तूंवर आयात शुल्क 5 ते 10 टक्क्यांनी वाढवता येईल अशा वस्तूंची निवड केली गेली आहे. सरकारच्या या पाऊलामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबतच देशात उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे रोजगाराच्या आघाडीवरही दिलासा मिळू शकतो.”

‘या’ वस्तू महाग होऊ शकतात
मोबाइल फोन चार्जर, इंडस्ट्रियल केमिकल्स, दिवे, लाकडी फर्निचर, मेणबत्त्या, दागिने आणि हॅण्डक्राफ्ट यांसारखी उत्पादने जास्त सीमाशुल्क आकारल्यानंतर महाग होऊ शकतात. याशिवाय, स्मार्टफोन उत्पादकांना चार्जर्स, व्हायब्रेटर मोटर्स आणि रिंगर्ससारखे भाग आयात करणे महाग होईल.

‘या’ विदेशी कंपन्यांना बसू शकतो फटका
सरकारच्या ‘या’ निर्णयाचा टेस्ला आणि स्वीडिश फर्निचर कंपनी IKEA सारख्या कंपन्यांवरही परिणाम होऊ शकतो. दोन्ही कंपन्यांनी आधीच सांगितले आहे की, त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान भारतातील जास्त असलेले सीमा शुल्क आहे.

खाद्यतेलाच्या किंमती 20 टक्क्यांपर्यंत घसरल्याने जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

edible oil

नवी दिल्ली । सतत वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की,”देशभरातील किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या दरात किलोमागे 20 रुपयांपर्यंत मोठी घसरण झाली आहे.” सरकारचे म्हणणे आहे की,”आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या किमती जास्त असूनही, त्यांच्या हस्तक्षेपामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. वर्षभरापूर्वीच्या किमती जास्त असल्या तरी ऑक्टोबर 2021 पासून किमती सातत्याने कमी होत आहेत.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की,”167 कलेक्‍शन सेंटर्सच्या ट्रेंडनुसार, देशभरातील प्रमुख किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती 5-20 रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत. आकडेवारीनुसार, शेंगदाणा तेलाची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 180 रुपये प्रति किलो, मोहरीचे तेल 184.59 रुपये प्रति किलो, सोया तेल 148.85 रुपये प्रति किलो, सूर्यफूल तेल 162.4 रुपये प्रति किलो आणि पाम तेल 128.5 रुपये प्रति किलो आहे.

‘या’ कंपन्यांनी किंमत केली कमी
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अदानी विल्मर आणि रुची इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्य तेल कंपन्यांनी प्रति लिटर 15-20 रुपयांपर्यंत किमती कमी केल्या आहेत. याशिवाय जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, हैदराबाद, मोदी नॅचरल्स, दिल्ली, गोकुळ री-फॉइल अँड सॉल्व्हेंट, विजय सॉल्व्हेक्स, गोकुळ एग्रो रिसोर्सेस आणि एनके प्रोटीन्स या कंपन्यांनीही किमती कमी केल्या आहेत.

आयात शुल्कात कपात आणि स्टॉक लिमिट लादण्यापासून दिलासा
सरकारचे म्हणणे आहे की, आयात शुल्कात कपात करणे आणि साठेबाजी रोखण्यासाठी स्टॉक लिमिट लादणे यासारख्या इतर उपायांमुळे सर्व खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमती खाली आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व असल्याने देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भारत वापराच्या 60 टक्क्यांपर्यंत आयात करतो
भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. देशातील सुमारे 56-60 टक्के वापर आयात केला जातो. मंत्रालयाने सांगितले की,”जागतिक उत्पादनात घट आणि निर्यातदार देशांच्या निर्यात करात वाढ झाल्यामुळे खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती दबावाखाली आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमती आयात तेलाच्या किमतींवर ठरतात.