Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2971

किरीट सोमय्या नेहमी शेणंच पाहतात; नवाब मलिकांचा घणाघात

Malik Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कोव्हिड सेंटर्सच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांना दूध देणारी म्हैस दिसत नाही कारण ते कायम शेणच पाहतात अशी घणाघाती टिका नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबईतील कोव्हिड सेंटरमुळे अनेकांचे जीव वाचत आहेत. एकही रुग्णाचा उपचाराशिवाय किंवा ऑक्सिजनशिवाय मृत्यू होत नाही. याउलट गुजरातमध्ये करोनाबाधितांचे खरे आकडे लपवून ठेवले जात आहे. पण किरीट सोमय्या महाराष्ट्रातील परिस्थितीवर टीका करत आहेत. खर तर त्यांना दूध देणारी म्हैस दिसत नाही कारण ते कायम शेणच पाहतात असे मलिक यांनी म्हंटल.

यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांचाही समाचार घेतला. शाळा बंद केल्याने सदाभाऊ खोत टीका करत आहेत, पण केंद्रानेच शाळा बंद करायला सांगितल्या आहेत असे नवाब मलिक यांनी म्हंटल. तसेच देशात पहिल्या लॉकडाऊनंतर केंद्रानेच सर्वप्रथम दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यांनी शाळा बंद ठेवून बार सुरु का ठेवले जातात, याचा जाबही सदाभाऊ यांनी मोदींना विचारावा, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

‘या’ शहरातील कबड्डी आयोजकांवर गुन्हा दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका

सांगली । प्रथमेश गोंधळे ।

सांगलीवाडीतील चिंचबाग मैदानावर कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असतानाही आदेशाचे उल्लंघन करत कबड्डीचे सामने भरविल्या प्रकरणी आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत 700 ते 800 जणांचा जमाव जमवून स्पर्धा घेतल्या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. शशिकांत गणपती फल्ले आणि लक्ष्मण बसाप्पा माळगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. अशातच 25 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, सामने, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लावले आहेत. असे असतानाही सांगलीवाडी मधील चिंचबाग मैदानावर मोठ्या प्रमाणात कबड्डीचे सामने भरविण्यात आले होते. या सामन्यांमध्ये कोणतेही नियम पाळले जात नव्हते.

प्रेक्षकांची मोठी गर्दी सामना पाहण्यासाठी उसळली होती. याठिकाणी येणाऱ्या एकही व्यक्तीच्या तोंडावर मास्क लावलेला नव्हता. अखेर चार दिवसानंतर पोलिसांना जाग आली आणि त्यांनी संयोजकांवर आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची फिर्याद सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेश गुरव यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फल्ले आणि माळगे या संयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

आठवडी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, पोलीस ठाण्यासमोरच करण्यात आली नियमांची पायमल्ली

सांगली । प्रथमेश गोंधळे ।

सांगलीसह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होतानाचे चित्र आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. मात्र हे आदेश कागदावरच असल्याचं चित्र शनिवारी पाहायला मिळालं. सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच भरलेल्या शनिवार आठवडी बाजारात अक्षरशः ग्राहक आणि खरेदीदारांच्या गर्दीचा महापूर उठला होता. यावेळी विक्री करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यांच्या तोंडावर मास्क लावलेला नव्हता.

खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने दुपारी मोठी वाहतूक कोंडी याठिकाणी झाली होती. ऐनवेळी नाकाबंदी करून दंड करणारे पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी मात्र यावेळी गायब झाल्याचे चित्र होते. आठवडी बाजारातील गर्दी लक्षात घेता पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतेय कि काय अशीच परिस्थिती होती. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

सांगली जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत असून तिसर्‍या लाटेकडे वाटचाल सुरु झाले आहे. दररोज ५० च्या घरात जिल्ह्यामध्ये रुग्ण आढळत आहेत. सांगली शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. अशातच आठवडी बाजारांमध्ये अशी गर्दी उसळली तर कोरोनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीला स्पष्टीकरण का द्यावे लागले?? जाणून घ्या यामागील कारणे

सांगली । ओला इलेक्ट्रिकने S1 आणि S1 प्रो स्कूटरवर क्रूझ कंट्रोल आणि हिल होल्ड फीचर्सचे आश्वासन दिले होते. मात्र, अलीकडेच ग्राहकांना देण्यात आलेल्या स्कूटरमध्ये हे दोन्ही फीचर्स गायब होते. यानंतर ग्राहकांनी सोशल मीडियाद्वारे कंपनीवर टीका करण्यास सुरुवात केली. याशिवाय कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार रेंज न मिळाल्याने ग्राहकांनी कंपनीला घेराव घातला. ईव्ही निर्मात्याने अलीकडेच स्पष्ट केले की, सॉफ्टवेअर अपडेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तीन ते सहा महिने लागू शकतात.

ओला इलेक्ट्रिकचे चीफ मार्केटिंग ऑफिसर वरुण दुबे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की,” शक्य तितक्या लवकर आपल्या ग्राहकांना स्कूटर पोहोचवणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मिसिंग फीचर्सची कंपनी त्यांना लवकरच अपडेट करेल.

याबाबत, वरुण दुबे यांनी सांगितले की,”पुढील काही महिन्यांत क्रुझ कंट्रोल, हिल होल्ड, नेव्हिगेशन आदी फीचर्स स्कूटरमध्ये येणार आहेत. हे सॉफ्टवेअर अपडेटद्वारे केले जाईल. ग्राहकांच्या फीडबॅकद्वारे कंपनी स्कूटरमध्ये आणखी फीचर्स जोडत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पहिल्या लॉटमध्ये सर्व फीचर्स आढळली नाहीत

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी घेण्यात आली तेव्हा ओलाने आश्वासन दिले होते की, ग्राहकांना ऑफर केलेल्या स्कूटरमध्ये सॉफ्टवेअरचे बीटा व्हर्जन नसेल. मात्र, कंपनीने असेही म्हटले होते की, पहिल्या लॉटमध्ये काही फीचर्स जोडता येणार नाहीत. ते नंतर OTA सॉफ्टवेअर अपडेटमध्ये जोडले जातील.

कंपनीला द्यावे लागले स्पष्टीकरण
या टीकेनंतर, ओलाने शुक्रवारी इलेक्ट्रिक इंडस्ट्री तसेच ग्राहकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ओलाच्या 4,000 युनिट्सच्या दाव्याच्या विरोधात सरकारी पोर्टलने 500 पेक्षा कमी स्कूटर दिल्याने कंपनीवर टीका केली जात होती. कंपनीने ARAI श्रेणी आणि त्याच्या S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरच्या अचूक श्रेणीबद्दलचा गोंधळ देखील दूर केला आहे.

बाजारात लुटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेला पोलिसांकडून अटक, आणखी दोघी पसार

सांगली |  प्रथमेश गोंधळे ।

सांगली शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच बस स्थानकावर महिलांचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या टोळीचा सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी सांगलीतील एका महिलेस अटक करण्यात आली असून तिच्या अन्य दोन महिला साथीदार पसार झाल्या आहेत. सोनू हरी काळे असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून एकूण 5 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. तिच्याकडून चोरीतील 1 लाख 27 हजार 200 रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. गुन्हयाचा तपास करीत असताना रेकॉर्डवरील आरोपीं बाबत माहिती घेण्यात आली.

त्यावेळी पथकातील कर्मचारी विक्रम होत यांना माहिती मिळाली कि, रेकॉर्डवरील महिला सोनू हरी काळे हिने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यांनतर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पथकाने सदर महिलेवर वॉच ठेवून तिची माहिती घेवून तीला ताब्यात घेतले. सदर महिलेकडे तपास केला असता तीने आपल्या दोन महिला साथीदार यांच्या मदतीने सांगली एस. टी. स्टॅण्ड परिसर तसेच बाजारपेठ येथे गर्दिच्या ठिकाणी महिलांवर पाळत ठेवून त्यांची अडवणूक करून आणि लक्ष विचलीत करून पिडीत महिला गोंधळल्या नंतर त्यांची पर्समधून मुद्देमाल चोरी करीत असल्याचे सांगीतले.

त्याप्रमाणे तिच्याकडे अधिक कसून तपास केला असता सदर गुन्हयाची तिने कबुली दिली असून त्याच प्रमाणे आणखी पाच गुन्हे केल्याची कबुलीही पोलिसांकडे केली. यावेळी या महिलेकडून 1 लाख 27 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सदर महिलेवर यापूर्वी सांगली शहर, विश्रामबाग आणि शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित तीनशेपार : पॉझिटिव्हिटी रेट 7.26 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये ३४० जण बाधित आढळले आहेत. गेल्या चार दिवसापूर्वी शंभर ते दोनशेच्यावर कोरोना बाधितांचा आकडा येऊ लागला आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 340 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 7. 26 टक्के आला आहे. कोरोना सोबत ओमिक्राॅनचे प्रमाण वाढलेले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान सामोरे उभे राहताना दिसत आहे. कोरोना चाचणी बरोबर बाधितांचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा इशारा –

दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने साध्या आजारांवर रुग्णांकडून उपचार न घेता औषध दुकानदारांकडून औषधे घेत उपचार केले जात आहेत. त्यामुळे औषध दुकानदारांनी नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

रेल्वे प्रवास महागणार; आता तिकिटात जोडणार ‘हे’ विशेष शुल्क

Railway

नवी दिल्ली । नवीन वर्षात तुमचा रेल्वे प्रवास आणखी महागणार आहे. आता प्रवाशांना विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांवर डेव्हलपमेंट चार्ज भरावा लागणार आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हे शुल्क रेल्वेच्या वेगवेगळ्या श्रेणीनुसार प्रवाशांकडून वसूल केले जाईल. याबाबत रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनला पत्र लिहिले आहे. SDF म्हणून 10-50 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. मात्र, हे शुल्क रिडेव्हलपमेंट होत असलेल्या रेल्वे स्थानकावरच लागू होईल.

शुल्काच्या विविध श्रेणी

अनारक्षित श्रेणीतील तिकिटासाठी 10 रुपये, तर आरक्षित श्रेणीतील प्रवाशांना 25 रुपये मोजावे लागतील. एसी क्लासच्या सर्व प्रवाशांना 50 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर 10 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. अधिका-यांनी सांगितले की,” बुकिंग दरम्यानच हे शुल्क रेल्वे तिकिटात जोडले जाऊ शकते. मात्र, अशी स्थानके सुरू झाल्यानंतरच हे शुल्क आकारण्यात येणार आहे.”

सर्व स्थानकांवर एकसारखेच SDF
अशा स्थानकांवर चढताना आणि उतरताना प्रवाशांकडून स्टेशन विकास शुल्क (SDF) आकारले जाईल. अशा स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी स्टेशन डेव्हलपमेंट फीस ही वरील नमूद केलेल्या दरांच्या 50 टक्के असेल. दुसरीकडे, जर प्रवाशांनी अशा स्थानकांवर बोर्डिंग/एलिव्हेटिंग दोन्ही केले, तर त्या बाबतीत हे शुल्क लागू दराच्या 1.5 पट असेल.

चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केलेले पैसे ‘अशा’ प्रकारे मिळवा परत

Internet

नवी दिल्ली । डिजिटल ट्रान्सझॅक्शन सुरू झाल्यामुळे आता बँकेशी संबंधित सर्व कामे घरबसल्या केली जातात. आता पैसे जमा करायचे असो की दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवायचे असो, मोबाईल किंवा लॅपटॉपवर आपण हे काम क्षणात करतो. नेट बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. आपण डिजिटल वॉलेट, UPI, Google Pay किंवा BHIM App वापरून घरबसल्या तुम्ही कोणाच्याही बँक खात्यात ऑनलाइन पैसे पाठवू शकता.

खर्‍या अर्थाने ऑनलाइन ट्रान्सझॅक्शन अतिशय सोपे आणि सोयीस्कर आहे. मात्र अनेक वेळा आपल्याकडून मोठ्या चुका होतात. अनेकदा अशी प्रकरणे असतात जेव्हा तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता. कधी कधी चुकीचा बँक खाते क्रमांक टाइप केल्याने पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातात. अशा वेळी ते पैसे परत कसे मिळवायचे असा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो. आज आम्ही आपणास चुकीच्या खात्यात पाठवलेले पैसे परत कसे मिळवायचे ? हे सांगणार आहोत.

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत, तर लगेच तुमच्या बँकेला याबाबत कळवा. बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करा आणि कळवा की तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत. ज्या ट्रान्सझॅक्शन द्वारे पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत त्याचे डिटेल्स जसे की खाते क्रमांक, खातेदाराचे नाव, वेळ, तारीख इत्यादी तुमच्या बँकेला कळवा.

तसेच तुमच्या बँकेच्या शाखेत चुकीच्या ट्रान्सझॅक्शनसाठी लेखी अर्ज सबमिट करा. यासोबतच तुम्ही त्या बँकेतही जा, ज्यांच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत. या ट्रान्सझॅक्शनची संपूर्ण माहिती त्या बँकेच्या शाखेलाही द्या. लक्षात ठेवा की, हे काम जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बँक पैसे काढण्याची कारवाई करेल. जर तुमच्या स्वतःच्या बँकेच्या इतर कोणत्याही खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले असतील तर तुम्ही अर्ज लिहून पैसे परत मागू शकता.

खराब क्रेडिट स्कोअरमुळे विमा खरेदी करण्यात येईल अडचण; कसे ते जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । चांगल्या आर्थिक कमाईसाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे खूप महत्वाचे आहे. खराब क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळणे अवघड तर होईलच, मात्र त्याबरोबरच आगामी काळात विमा कंपन्या तुम्हाला विमा पॉलिसी देण्यासही नकार देऊ शकतात. स्टॉक ब्रोकर तुमचे डीमॅट खाते उघडण्यास नकार देऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार नाही.

वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच बदललेल्या नियमांनंतर अनेक कंपन्यांना क्रेडिट ब्युरोच्या डेटामध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. या नियमांचा फायदा त्या फिनटेक कंपन्यांना होईल, ज्यांच्याकडे NBFC लायसन्स नाही. नवीन नियमांनुसार या कंपन्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे ग्राहकांना कर्ज देऊ शकतील. याचा अर्थ असा की, जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तरच कंपन्या तुम्हाला स्वस्त दरात आणि सहजपणे कर्ज देतील. क्रेडिट स्कोअर खराब असल्यास कर्ज मिळणे अवघड होईल. साधारणपणे 750 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो.

कर्ज घेण्याचे अनेक पर्याय खुले होतील

RBI च्या नवीन नियमांनुसार, या कंपन्या ई-कॉमर्स कंपन्यांशी साइन अप करून त्यांच्या ग्राहकांना आता खरेदी करा यासारख्या जास्त योजना देऊ शकतात. फिनटेक कंपन्यांना ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरशी संबंधित डेटामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर, प्रामाणिक कर्जदारांना कर्ज घेण्यासाठी आणखी बरेच पर्याय खुले होतील. त्यामुळे या कंपन्यांमध्ये कर्ज देण्यासाठी स्पर्धा वाढेल, त्याचा फायदा ग्राहकांना होईल.

फसवणुकीला बसेल आळा

नवीन नियमांनुसार फसवणुकीला आळा बसेल कारण फिनटेक कंपन्यांना तुमच्या कर्जाची आणि क्रेडिट स्कोअरची संपूर्ण माहिती घेण्याची परवानगी असेल. यासाठी RBI ने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी रेग्युलेशन-2006 मध्ये बदल केले आहेत. सेंट्रल बँकेने या संदर्भात नुकतीच काढलेली अधिसूचना दोन वर्षांपूर्वीच्या भूमिकेच्या विरुद्ध आहे. त्या वेळी RBI ने म्हटले होते की, क्रेडिट माहिती थेट फिनटेक कंपन्यांशी शेअर केली जाऊ शकत नाही कारण बँक या कंपन्यांना एजंट म्हणून नियुक्त करत आहेत, जे नियमांच्या विरुद्ध आहे.

फिनटेक कंपन्यांसाठीही काही अटी आहेत

ग्राहकांचे सुरक्षित हित लक्षात घेऊन RBI ने या कंपन्यांसाठी सूट देण्याबरोबरच काही अटीही निश्चित केल्या आहेत.
क्रेडिट संबंधित माहिती मिळविण्यासाठी, या कंपन्यांची एकूण संपत्ती 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी.
त्यांच्याकडे सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सीचे प्रमाणित ऑडिटरचे सर्टिफिकेट असावे, जे कंपनीकडे चांगली आणि सुरक्षित इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सिस्टीम असल्याचे दर्शवते.
यामध्ये फिनटेक कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली आहे.

सातारा शहरातील तामजाई नगरमधील अपार्टमेंटच्या फ्लॅटला भीषण आग

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

सातारा शहरातील तामजाई नगर मधील श्री नगरी येथील शिवामृत अपार्टमेंट मध्ये रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब परगावी गेले आहे. यामध्ये फ्लॅट मधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील तामजाई नगर मधील श्री नगरी येथील शिवामृत अपार्टमेंट मध्ये विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीच्या असलेल्या फ्लॅटला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीनंतर धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान फ्लॅटच्या शेजारी असलेल्या रहिवाशानी तत्काळ सातारा पालिकेच्या अग्निशामक दलास तसेच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाचे कर्मचारी तत्काळ या ठिकाणी दाखल झाले.

सकाळी सात वाजण्याच्या सुमार लागलेली आग चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी विझवली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी फ्लॅट मधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही.