Monday, December 29, 2025
Home Blog Page 5729

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ३० नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४५२ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ३० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडिकर यांनी दिली आहे.

आज संध्याकाळी ४ आणि रात्री उशीराने पुन्हा २६ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने नागरिकांत कोरोनाची दहशत पसरली आहे. तसेच आज कराड तालुक्यातील म्हासोली येथील ८ कोरोना रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ४५२ वर पोहोचली आहे. पुण्या मुंबईहून सध्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक आलेले असून नवे कोरोनाग्रस्त हे अशांपैकीच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाहेरुन प्रवास करुन आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये राहून नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना बचावासाठी मंचरचा छत्री पॅटर्न; मुख्यमंत्रांनीही घेतली दखल

पुणे । कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे हे त्यांच्या घरी राहत नाहीत. त्यांनी त्यांचा मुक्काम ग्रामपंचायत कार्यालयातच हलविला आहे. संचारबंदीची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनी आता मंचरमधील नागरिकांना कोरोना बचावासाठी एक नवीन युक्ती सुचविली आहे तसेच ती अंमलातही आणली आहे. त्यांनी लोकांना छत्री वापरण्यास सांगितले आहे. ज्यामुळे सामाजिक अलगाव राखला जाईल आणि उन्हापासून संरक्षण पण होईल. ते स्वतः हे करत आहेतच पण सोबत त्यांनी गावकऱ्यांनाही ते करण्यास उद्युक्त केले आहे. अनेकांना भेट म्हणून छत्री वाटपही सुरु केले आहे. त्यांच्या या युक्तीची चर्चा राज्यभरात छत्री पॅटर्न म्हणून होत आहे.

आजपर्यँत जनता कर्फ्यू मध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी सर्व जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा दिली आहे. तसेच गावात प्रतिबंधक औषधांची ३ वेळा फवारणी, कोरोना युद्धात काम करणाऱ्या योद्ध्यांचे गौरवीकरण, इन्फ्रारेड थर्मामीटर गणद्वारे नागरिकांची तपासणी केली आहे. गावातील साधन कुटुंबांनी या काळात रेशन धान्य न घेता ते गरजू कुटुंबाला पोहचावे अशी विनंती केली आहे. परप्रांतीय मजुरांना बॅटरी तसेच रिफ्लेक्टिव्ह जॅकेटचे,  रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले आहे.

मंचर पॅटर्न म्हणून राबविलेल्या या उपक्रमाची खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. त्यांनी फोनद्वारे त्यांचे अभिनंदन ही केले आहेत. सरपंच गांजाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या उपक्रमामुळे गावातील छत्री व्यावसायिकांनाही चांगले दिवस आले आहेत. गावात छोटे-मोठे २० छत्री व्यावसायिक आहेत. प्रत्येक दुकानातून सरासरी १०० ते १२५ छत्र्या खरेदी झाल्या आहेत. संचारबंदीच्या काळात या व्यावसायिकांनाही थोडा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मृत आईला उठवतानाचा चिमुकल्याच्या व्हिडिओ व्हायरल; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात एक मृत महिला आणि तिच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश संजय करोल आणि न्यायमूर्ती एस. कुमार यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने या व्हिडीओचे वेदनादायक असे वर्णन केले आहे. खंडपीठाने सांगितले की, ‘ही धक्कादायक बातमीही मीडियामध्ये आली आहे. त्यात असे म्हटले आहे की,’एका दीड वर्षाच्या निरागस मुलाची आई प्लॅटफाॅर्मवर मृत अवस्थेत पडली होती. या निष्पाप मुलाला हे देखील माहित नव्हते की त्याची आई हयात नाही आणि ते मुल त्याच्या आईच्या अंगावर झाकलेल्या चादरीला पदर समझून खेळत होते. खंडपीठाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका याचिकेत ३ जूनपर्यंत पक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

खंडपीठाने म्हटले आहे की,’आम्हांला हे जाणून घ्यायचे आहे, ती महिला खरोखरच अहमदाबादहून कटिहारकडे जात होती आणि ट्रेनमध्ये भूकबळीमुळे तिचा मृत्यू झाला ? या महिलेचे पोस्टमॉर्टम केले की नाही याबाबतची माहिती खंडपीठाने राज्य सरकारकडेही मागितली आहे. जर पोस्टमॉर्टम केले असेल तर तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते ? ती महिला आपल्या भावंडांसह ट्रेनमध्ये प्रवास करत होती ? जर हे सर्व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घडले असेल तर ते अत्यंत चिंताजनक आहे, जे कोणत्याही परिस्थितीत कोर्ट याकडे दुर्लक्ष करणार नाही. पाटणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने वकील आशिष गिरी यांना यासंदर्भात सहकार्य करण्यास सांगितले आहे.

२५ मे रोजी कटीहार येथे राहणाऱ्या एका महिलेचा मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात मृत्यू झाला. ती लेबर ट्रेनने येत होती. ही मृत महिला आणि तिच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुरुवारी पाटणा उच्च न्यायालयानेही याबाबत स्वतःहून दखल घेतली आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ट्रम्प यांच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला भारताने दिला नकार, म्हटले की,’हा सीमावाद ते शांततेने निकाली काढला जाईल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केल्यानंतर या दोन देशांमधील सुरु झालेला तणाव कायम आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि चीनमधील हा सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, चीनबरोबरील हा प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला मान्य नाही आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की,’भारत आणि चीन न्यायालयीन पद्धतीने नवी दिल्ली आणि बीजिंगमध्ये वाटाघाटी करत आहेत जेणेकरून हे प्रकरण शांततेने सुटू शकेल.

त्यांनी सांगितले की १९९३ पासून भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी ५ करार केले गेले आहेत. हे प्रकरण सोडविण्यासाठी दोन्ही देश यावर काम करत आहेत.

 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत नुकतेच एक ट्विट केले होते की, “आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही माहिती देऊ इच्छितो की अमेरिका या दोघांमधील सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार आहे. धन्यवाद.”

लडाखमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये तणाव
५ मे रोजी सुमारे २५०चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्यावर लडाखमधील परिस्थिती अधिक तणावग्रस्त बनली आणि त्यानंतर स्थानिक कमांडर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी माघार घेतली गेली. या घटनेत भारतीय आणि चिनी बाजूचे १०० सैनिक जखमी झाले. उत्तर सिक्कीममध्येही ९ मे रोजी अशीच एक चकमक झाल्याचे उघडकीस आले.

पंतप्रधान मोदी यांची बैठक झाली
पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चिनी सैन्यांदरम्यान तणाव वाढल्याने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ संरक्षण जनरल बिपिन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांशी बैठक घेतली. बाहेरील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताच्या लष्करी सज्जतेला बळ देण्यावर यामध्ये भर देण्यात आला.

मंगळवारी पंतप्रधान मोदींशी झालेल्या बैठकीपूर्वी या तिन्ही सैन्य प्रमुखांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पॅनयांग सो तलाव, गॅलवान व्हॅली, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथील सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली. जेथे गेल्या २० दिवसांपासून भारत आणि चीनचे सैनिक आक्रमक भूमिका घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

गरिबांना प्रत्येकी १७ हजार ५०० रु द्या; अशोक चव्हाणांची रुग्णालयातून मागणी

मुंबई |  काँग्रेस पक्षाने मजूर तसेच गरीब यांच्या व्यथा मांडण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारला घेरण्याचा क्रम सरकारने सुरु केला आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेसमधील नेत्यांनी व्हिडिओद्वारे आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाला बाली पडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनीदेखील या मोहिमेत रुग्णालयातूनच सहभाग घेतला आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाने उपाययोजनांसाठी जो मार्ग काढला आहे त्यामध्ये माझाही सहभाग असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यांनी केंद्र सरकारला गरिबांना प्रत्येकी १७ हजार ५०० रु द्या अशी मागणी केली आहे.

मुंबईच्या एका रुग्णालयात चव्हाण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. सध्या देशात सुरु असलेल्या साथीच्या आजारामुळे देशातील गरीब जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. मात्र केंद्र सरकारकडून भरीव मदत आली नसल्यामुळे, जनतेत निराशेचे वातावरण आहे. यासाठीच देशाची अर्थव्यवस्था लवकर सुधारावी म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी गरीब कुटुंबांच्या बँक खात्यात एकरकमी १० हजार रुपये जमा करण्याची तसेच काँग्रेस पक्षाच्या ‘न्याय’ योजनेनुसार पुढील सहा महिने दरमहा ७ हजार ५००रु द्यावेत अशी मागणी केली आहे. या मागणीला चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.

 

सर्वात जास्त नुकसान हे गरीब, कामगार तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योजकांचे झाले असून या काळात त्यांना मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. सरकारने यासाठी जी कर्ज योजना जाहीर केली आहे त्यासोबतच जर नागरिकांना रोख आर्थिक मदत केली गेली तर त्यांना दिलासा मिळेल असे ते म्हणाले. त्याचबरोबर लोकांच्या हातात पैसा उपलब्ध असेल तर बाजारातील मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होण्यास मदत होईल. यासोबतच परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी त्यांचा प्रवासखर्च सरकारने करून त्यांना २०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. व्हिडिओतील त्यांच्या आवजावरून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सत्यशील शेरकर यांनी बंदूक दाखवून माती चाटायला लावली; तरुणाचा गंभीर आरोप

पुणे । जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना माझे काम बोचत असून ते बंद करण्यासाठी यांनी मला बंगल्यावर बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे मनोरुग्णांसाठी संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या अक्षय मोहन बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काहीतरी चांगले काम करता यावे म्हणून मी गेली ३ वर्षे कुटुंबासोबत समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो आहे. हे काम बंद करावे म्हणून सत्यशील शेरकर यांनी मला घरी बोलावले. बंदूक ताणून माफी मागायला सांगितली, माती चाटायला सांगितली.” असा आरोप या तरुणाने केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी शरीरावर झालेली मारहाण दाखविली आहे. मी कुणाकडे तक्रार करण्यास जाणार नाही कारण पैशाच्या जोरावर त्यांनी सर्वाना विकत घेतले आहे. आणि मला न्याय मिळणार नाही हे मला माहित आहे असेही त्यांनी म्हंटले आहे.

तरुणाच्या या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले आहे की, ” बंदुकीचा धाक दाखवून मला ज्या गोष्टी करायला लावल्या आणि त्याचा व्हिडीओ केला आहे, आणि जर मी काही आगाऊ कृती केली तर मारून टाकण्याची धमकी दिली आहे.” या व्हिडिओमध्ये या तरुणाने सत्यशील शेरकर यांनी याआधी खूप लोकांना मारहाण केली असून काहींना जीवे मारल्याचाही आरोप केला आहे. त्याने सर्व माहितीसाठी त्याचा स्वतःचा आणि सत्यशील शेरकर यांचाही मोबाईल नंबर शेअर केला आहे. त्यांना शिरोली गावाम्हणणे चा आमदार व्हायचे आहे. त्यासाठी ते सर्व काही करत आहेत. असे या तरुणाचे म्हणणे आहे. माझे काम मी बंद केले आणि वाईट मार्गाला लागलो तर त्याला तेच जबाबदार असतील असे तरुणाने म्हण्टले आहे.

बोऱ्हाडे यांनी मंचरहून एक मनोरुग्ण आणला होता अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली होती. संस्थेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास गावाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून केवळ त्याला समज देण्यासाठी घरी बोलावले होते. पण काहीच समजून न घेता तो अरेरावीची उत्तरे देत निघून गेला आणि मारहाण केल्याचे लाईव्ह केले. असे म्हणत शेरकर यांनी हे आरोप नाकारले आहेत. या व्हिडिओमध्ये हे रुग्णाचे पण एक राजकारण आहे आणि पुढे जाऊन ते वापरणार हे मला माहित आहे. असे बोऱ्हाडे म्हणाले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून विविध माध्यमातून मला त्रास दिला जात आहे. मात्र आज त्याचे टोक गाठण्यात आले असे अक्षय बोऱ्हाडे यांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सातारा जिल्ह्यात आज ४ नवे कोरोनाग्रस्त; 54 वर्षीय मृत व्यक्तीचा रिपोर्टही निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारा कराड तालुक्यातील विंग येथील 50 वर्षीय पुरुष व तामिणी ता. पाटण येथील 7 वर्षीय मुलगी कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला आहे. तसेच सातारा येथील खासगी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या परळी ता. सातारा येथील 21 व 48 वर्षीय पुरुषांचे रिपोर्टही बाधित आले असून असे आज एकूण 4 बाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 26 मे रोजी जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मृत्यु झालेल्या 54 वर्षीय पुरुषाचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविले आहे.

214 जणांच्या घातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 64, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 61, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 24, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 6 व शिरवळ येथे कोविड केअर सेंटरमधील 30 असे एकूण 214 जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

आजपासुन क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे Truenat Machine द्वारे कोविड-19 ची चाचणी करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आत्तापर्यंत जिल्ह्यात 426 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 134 रुग्ण बरे झाले आहेत. तर 277 रुग्णांवर उपचार सुरु असून 15 जणांचा मृत्यु झालेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशातील लॉकडाऊन वाढण्या आधी बच्चू कडूंकडून अकोल्यात संचारबंदी जाहीर

अकोला । देशव्यापी संचारबंदीचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. आता राज्यात संचारबंदी चालू राहणार की नियम शिथिल केले जाणार? असे काही प्रश्न असतानाच विदर्भातील अकोला जिल्ह्यात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील वाढते रुग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहे.

राज्यसरकारने अद्याप ३१ मे नंतरच्या संचारबंदीचे काही निर्णय घेतले नाहीत. राज्यात संचारबंदीचे नियम शिथिल होण्याची शक्यता आहे. मात्र अकोल्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन सरकारच्या निर्णयाची वाट न बघता जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ ते ६ जूनदरम्यान संचारबंदी चालू राहील असे जाहीर केले आहे. अकोला हा विदर्भातील हॉटस्पॉट बनला आहे. आतापर्यंत इथे सर्वाधिक ५०८ रुग्ण सापडले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

या काळात जिल्ह्यात रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी, विलगीकरण करून घेण्यापासून बचाव करण्यासाठी कोणतीच मुभा दिली जाणार नाही आहे. सर्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विलगीकरणाची तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाचे मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये काही चूक आढळली तर त्यांच्यावर कारवाईही केली जाणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. १ ते ६ जूनदरम्यान जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून केवळ औषध दुकाने आणि शेतीच्या काही कामांना सवलती दिल्या जाणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारत-चीन सीमा प्रश्नावर UN घेतली ‘ही’ भूमिका

वृत्तसंस्था । भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. अमेरिकेच्या या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी सांगितले की, सीमा प्रश्नाबाबत मध्यस्थाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नसून त्या संबंधित दोन देशांना याचा निर्णय घ्यायचा आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती आणखी तणावपूर्ण होईल असे कोणतेही पाऊल कोणत्याही देशांनी उचलू नये, असे आवाहन आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत आणि चीनमध्ये मागील काही दिवसांमध्ये सीमा प्रश्नावरून तणाव निर्माण झाला होता. तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर संयुक्त राष्ट्र संघाने मध्यस्थाबाबत निर्णय भारत आणि चीनने घ्यायचा असल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भारत-चीन सीमेवर भारतासोबतची परिस्थिती एकंदरित स्थिर आणि नियंत्रणात असल्याची माहिती चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारत आणि चीनमध्ये संवाद आणि सल्लामसलतीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्त साधने आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांच्या सैन्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर चीनकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

म्हणून ‘त्या’ डॉक्टर आणि नर्सने हॉस्पिटलमध्येच केले लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनाच्या या संकटकाळात मोठमोठे कार्यक्रम रद्द झाले आहेत. काहींचे लग्न ठरायचे राहिले आहे तर काहींचे ठरलेले लग्नच थांबले आहे. आणि अद्यापही पूर्णतः संचारबंदी हटण्याची लक्षणे दिसत नाहीत आहेत. त्यामुळे पुढचे काही महिने सार्वजनिक सोहळे, लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करण्यास संमती नसणार आहे. इतक्यात आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु होण्याच्या काहीच शक्यता नाहीत. त्यामुळे ऑगस्ट मध्ये ठरलेले लग्न आताच एका जोडप्याने उरकून टाकले आहे. लंडनमधील एका हॉस्पिटलमधील एक डॉक्टर आणि नर्स यांनी हॉस्पिटलमध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

३४ वर्षीय जैन टिपिंग आणि ३० वर्षीय अनालन नवरत्नम असे या जोडप्याचे नाव आहे. हे दोघेही ऑगस्टमध्ये विवाहबद्ध होणार होते. पण श्रीलंका आणि उत्तर आयर्लंडमध्ये राहणारे त्यांचे कुटुंबीय लंडनमध्ये लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत. या भीतीमुळे त्यांनी हॉस्पिटलमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यात त्यांनी लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयातच लग्न केले आहे. त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी या लग्नाला व्हर्च्युअली उपस्थिती लावली होती.

” सगळे ठणठणीत असताना आम्हाला लग्न करायचे होते, मग त्यांनी आम्हाला स्क्रिनवर पहिले तरी काही हरकत नाही” असे टिपिंग यांनी म्हण्टल्याचे हॉस्पिटलने त्यांच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून सांगितले आहे. २४ एप्रिल ला झालेल्या या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत. या फोटोना जवळपास २० हजार लोकांनी लाईक केले आहे तर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.