Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5754

भारत-चीन सीमेवरील तणावाच्या स्थितीत लष्करप्रमुख मनोज नरवणे थेट लेहमध्ये दाखल

नवी दिल्ली । भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. लडाखमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेजवळ नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा त्यांनी फिल्ड कमांडर्सकडून समजून घेतला. लष्करप्रमुखांच्या कुठल्याही दौऱ्याची लष्कराकडून आधी माहिती दिली जाते. पण यावेळी कुठलीही माहिती किंवा फोटो सार्वजनिक करण्यात आले नाहीत.

लष्करप्रमुख नरवणे यांनी फॉरवर्ड भागांना भेट दिली नाही. पण १४ कॉर्प्सच्या मुख्यालयामध्ये त्यांनी फिल्ड कमांडर्सबरोबर प्रदीर्घ तास चर्चा केली. यावेळी उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी त्यांच्यासोबत होते. लडाखमधील ४ भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये प्रामुख्याने संघर्ष आहे. कुठल्याही परिस्थितीची चीनची दादागिरी सहन न करण्याची भारताची रणनिती आहे. त्यानुसार चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जात आहे.

दोन आठवडयांपूर्वी पूर्व लडाखच्या पॅनगॉंग टीएसओ तलावाच्या भागात भारतीय आणि चिनी सैनिक परस्परांना भिडले होते. त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. लडाखमध्ये भारतीय सैनिकांच्या गस्त घालण्यावर तसेच रस्ता बांधणीवरही चीनने आक्षेप घेतला आहे. पूर्व लडाखच्या पॅनगॉंग टीएसओ तलावाच्या भागात चीनने गस्त वाढवली असून नौकांची संख्या देखील वाढवली आहे. तर भारतानेही अतिरिक्त सैन्य तुकड्या या भागात तैनात केल्या आहेत. या तणावाच्या परिस्थितीत लष्करप्रमुखांचे लेहमध्ये दाखल झाल्याचे म्हटलं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आता 3D न्यूज अँकर सांगणार टीव्हीवर बातम्या; चीन मध्ये पहिला प्रयोग यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील पहिली थ्रीडी न्यूज अँकर चीनमध्ये नुकतीच लाँच करण्यात आली आहे. चीनमधील एका सरकारी वृत्त संस्थेने या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामगिरी केली आहे. थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेली ही जगातील पहिली न्यूज अँकर बनली आहे.

चिनी सरकारी न्यूज एजन्सीने सिन्हुआमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या एका 3D न्यूज अँकरचा नुकताच समावेश केला आहे. व्हर्च्युअल प्रेझेंटर्सच्या जगतामध्ये ही 3D न्यूज अँकर एक अनोखा प्रयोग ठरली आहे. ही अँकर मोकळेपणाने फिरू शकते तसेच चेहर्‍यावरील हावभावही करू शकते. ती आपल्या केसांची तसेच पेहरावाची स्टाईल देखील बदलू शकते. मिळालेल्या रिपोर्टसनुसार भविष्यात बातम्या सादर करण्यासाठी याचा उपयोग केला जाईल.

 

या 3D न्यूज अँकरला बनवणारी कंपनी असे म्हणते की,” ती मानवी आवाजाची नक्कल करू शकते. चेहरा तसेच ओठांचे हाव-भाव ओळखू शकते. आपली स्टाईल देखील बदलू शकते. यापूर्वी २०१८ मध्ये सिन्हुआने ‘क्यू हाव’ या नावाने न्यूज वर्ल्डमध्ये डिजिटल अँकर आणले होते. आवाज, चेहर्‍याची हालचाल आणि वास्तविक न्यूज अँकरच्या हावभावाची नक्कल करण्यासाठी त्यांनी मशीन लर्निंग टेक्निकचा उपयोग केला. येत्या काही दिवसांतच ही 3D न्यूज अँकर अनेक प्रसंगी स्टुडिओबाहेरच्या ताज्या बातम्या वाचताना दिसू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

खुशखबर! राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांना थकबाकीदार असूनही मिळणार नवं कर्ज

मुंबई । कोरोनाच्या संकटात निधी अभावी राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही. कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच कर्जाचा बोजा असल्याने त्यांना नवं कर्ज मिळणं अवघड झालं आहे. अशावेळी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत या थकीतदार ११.१२ लाख शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी नवं कर्ज देण्याच्या सूचना राज्य सरकारने बँकांना दिल्या आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना देखील खरीपाचे नवं कर्ज मिळणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. यांच्या थकीत कर्जाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. या शेतकर्‍यांच्या कर्जाची थकीत रक्कम राज्य सरकारच्या नावे करून शेतकऱ्यांना नवं कर्ज देण्याचा यामध्य स्पष्ट उल्लेख आहे. यामुळे ११.१२ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यातील ८१०० कोटी रुपये राज्य सरकार व्याजासह बँकांना देणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. राज्यातील ३२ लाख शेतकर्‍यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या ३२ लाखांपैकी मार्च २०२० अखेरीस १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपये सरकारने भरले आहेत. मात्र निधी अभावी ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती. या खातेदारांना ८१०० कोटी लाभ देणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आता सरकारने दिलासा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत – संजय राऊत

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून ताणले गेल्याचे बोलले जात होते. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील संबंध पिता पुत्राप्रमाणे आहेत असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात दरी वगैरे असे काही नाही. त्यांच्यातील संबंध मधुर आहेत. राज्यपाल हे नेहमी प्रिय आहेत. असे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच आजची भेट हि सदिच्छा भेट होती. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये. मी बरेच दिवस झाले राज्यपालांना भेटलो नव्हतो म्हणून आज मी त्यांची भेट घेतली असाही राऊत यांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे शुक्रवारी सुचवले होते. यावर कोश्यारी आणि मुख्यमंत्री पुन्हा आमने सामने आले असल्याचे बोलले जात होते. मात्र राज्यपाल हे कुलपती आहेत. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली असं राऊत यांनी म्हटले आहे.

मासिक पाळीमुळे ओढवलेल्या बिकट प्रसंगाविषयी बिनधास्त लिहा; समाजबंध संस्थेची मोहीम

पुणे । मासिक पाळीविषयी समाजात रूढ असलेले गैरसमज, अंधश्रद्धा यामुळे स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकीकडे अशी परिस्थिती असताना ऐनवेळी आलेल्या पाळीमुळे महिलांची, मुलींची खूप अडचण होते. कधी प्रवासामध्ये पाळी येते तर कधी परीक्षा चालू असताना. अशावेळी पॅड जवळ नसेल, बाथरूमची व्यवस्था नसेल तर खूपच अडचण होते. प्रत्येक मुलीच्या किंवा महिलेच्या जीवनात मासिक पाळीमुळे असा बिकट प्रसंग ओढवतोच. अशाच प्रसंगाविषयी बिंधास्त व्यक्त व्हावं, अशा प्रसंगावर कशा पद्धतीने तुम्ही मात केली हे इतरांना समजावं याकरिता ‘समाजबंध’ संस्थेनं ‘ते पाच दिवस’ ही मोहीम सुरू केली आहे. ही अनुभव लेखन स्पर्धा नसली तरी या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महिलेला समाजबंधतर्फे सन्मानपत्र घरपोच दिले जाणार आहे.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी काही नियम –
लेखनासाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही, मुक्तपणे लिहा आणि लिखाणाला योग्य शिर्षक द्या.
एकपेक्षा अधिक अनुभव तुम्ही लिहू शकता.
तुमचा अनुभव टाईप करून 7709488286 या whatsapp क्रमांकावर पाठवा.
टाईप करणं शक्यच नसेल तर कागदावर लिहून त्याचा फोटो पाठवलात तरी चालेल.
सोबत आपलं नाव, नंबर, पत्ता, email व फोटो पाठवावा. १५ जून पर्यंत तुम्ही तुमचे अनुभव पाठवू शकता.

तुम्ही लिहून पाठवलेले अनुभव वाचून त्या परिस्थितीत कुठे काही सुधारणा करता येऊ शकतील यावर समाजबंध टीम एक अहवाल बनवेल. सर्व अनुभवांना एकत्रित करून त्याचं एक ई-बुक बनवलं जाईल आणि सोबतच निवडक अनुभवांना विविध माध्यमात/ समाज माध्यमात प्रकाशित केलं जाईल. आपला हा वाईट अनुभव इतर मुली-महिलांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरू शकतो! समाजबंध ही सामाजिक संस्था ग्रामीण व आदिवासी भागात मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशन, पाळीविषयक अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करते. तसेच कापडी आशा पॅड निर्मितीच्या प्रशिक्षणाचे काम करते.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! राज्यात २ दिवसांत २८८ पोलिसांना लागण; कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या १६६६

मुंबई । राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असणाऱ्या पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. पोलिस दलातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १,६६६ पर्यंत पोहोचला असून २ दिवसांत तब्बल २८८ पोलिसांनी कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत १६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनच्या काळात पोलीस खूप महत्वाची भूमिका बजावत. स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न, बंदोबस्त, तपासणी यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १४८३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांना कोरोनाची लागण होत असली तरीही यामधून बऱ्या होणाऱ्या पोलिसांचा आकडा देखील सर्वाधिक आहे. ४७८ पोलिसांनी कोरोनाच्या विषाणूशी यशस्वी लढा दिला. यामध्ये ३५ पोलीस अधिकारी आणि ४३८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणाऱ्या पोस्ट खपवून घेणार नाही- अनिल देशमुख

मुंबई । सोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल करणे खपवून घेणार नाही. अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच सायबर क्राइम विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. देशमुख यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या अशा कृत्यांची गंभीर दखल घेतली असून अशा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरून महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. अफवा पसरविल्या जात असून धार्मित तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टही टाकण्यात येत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

सायबर गुन्ह्यांप्रकरणी आतापर्यंत ४१० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून २१३ जणांना अटक करण्यात आली आहे, असं सांगतानाच सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि अफवा पसरविणाऱ्या पोस्ट टाकू नका. तुमच्या प्रत्येक कृतीकडे महाराष्ट्र सायबर क्राइम विभाग लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी सांगितलं. टिकटॉकवर ऍसिड अटॅक आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ व्हायरल केले गेले. त्याचीही गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

महिला पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, तो क्षण पाहून संपूर्ण वसाहतीतील डोळे पाणावले…

औरंगाबाद प्रतिनिधी । त्या महिलापोलिस कर्मचारिस जेंव्हा वैधकीय पथक रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस वसाहतीत आले तो क्षण वसाहतीतील सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणाराच होता. पोलीस उपायुक्त मीना मकवणा यांनी स्वतः अर्धातास उन्हात उभे राहत धीर देत त्या महिला कर्मचारिस रुग्णालयात रवाना केले. त्यावेळी उपयुक्तांचा देखील उर भरून आला होता. यामुळे वरून कणखर, रागीट, कठीण वाटणारा पोलीसांचा हृदय आतून किती हावळा असतो याचे प्रत्यय आले.

शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालयातिल पोलिस वसाहतीत राहणाऱ्या व क्रांतिचौक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका 32 वर्षीय महिला पोलीस कर्मचऱ्याचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निदान झाले. मात्र याची कल्पना वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना न्हवती. सकाळी साडे अकराच्या सुमारास पोलीस उपायुक्त मीना मकवणा या वसाहतीतील एका बिल्डिंग समोर आल्या आणि कर्मचऱ्याना सूचना करीत बराच वेळ निरीक्षण करीत होत्या. दरम्यान औषधी फवारणी व इतर सोपस्काराला सुरुवात झाली. परिसरात कुणाला तरी कोरोनाची बाधा झाली याची कुणकुण सुरू झाली आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच दरम्यान वैधकीय पथक देखील दाखल झाले आणि आता मात्र रहिवाशांच्या मनात निश्चित झाले होते की आपल्या वसाहतीत कोरोना बाधित रुग्ण आहे. आणि काही वेळात दुजोरा देखील मिळाला.

दुपारची दीड वाजायची वेळ बाहेर कडक ऊन कडक उन्हात 108 रुग्णवाहिका बिल्डिंग समोर येऊन उभी राहिली. वसाहतीत राहणारे शेकडो कुटुंबातील हजारो लोक आपापल्या घरातील खिडकी मधून त्या रुग्णवाहिकेतून बाहेर पडणाऱ्या वैधकीय पथकाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. दरम्यान उपयुक्त मकवणा या त्या महिला कर्मचारि खाली येण्याची वाट पाहत होत्या. काही वेळातच कोरोनाचे निदान झालेली 32 वर्षीय महिला कर्मचारी आपले कपडे व इतर साहित्याची बॅग घेऊन पती, एक चिमुकली, सह खाली आली. 5 ते 6 वर्ष वय असलेली चिमुकली आपल्या योध्या आईच्या कुशीत खेळायची तिला सवय होती. मात्र काल पासून आई का जवळ घेत नाही? बाबा मला आई जवळ का जाऊ देत नाही? आणि कपडे व सर्व सामानाची बॅग घेऊन आई कुठे निघाली? डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखा पर्यंत विचित्र कपडे परिधान केलेली ही माणसे आहेत तरी कोण? असे अनेक प्रश्न त्या चिमुकलीच्या मनात होते. बाहेर येताच खिडकी मधून डोकावणाऱ्या हजारो नजरा आपल्या आई कडे असे काय पाहत आहेत. हे सर्व पाहून त्या चिमुकलीला रडू कोसळले ती जोर-जोरात हंबरडा फोडायला लागली. त्यावेळी रणांगणात अट्टल गुन्हेगारांना घाम फोडणारी रणरागिणी मात्र रस्त्यावर एकटी दूर उभे राहत जणू असहाय्य झाल्यासारखी आपल्या पोटच्या गोळ्याकडे बघत होती.

मला शिंका जरी अली तरी आई दिवसरात्र एक करीत असे मात्र मी इतके रडत आहे तरी देखील आई मला कडेवर घेत नाही हे पाहून ती चिमुकली बाबांच्या अनेक आलिंगणानंतर ही काही करे गप्प बसेना. एकी कडे किंचाळून रडणारी निरागस चिमुकली तर त्यासमोर उभी असलेली असह्यय आई. हे दृश्य पाहून साऱ्यांचेच डोळे पाणावले होते. पोलीस उपायुक्त मकवणा यांनी त्या कर्मचऱ्यास धीर दिला. घाबरून जाऊ नका आम्ही सर्व तुमच्या सोबतीला आहोत. तापत्या उन्हात उपयुक्त मकवणा यांनी कोरोना बाधित महिला यांची आपल्या घरातील सदस्य सारखी आपुलकीने विचारपूस करीत धीर दिला.त्या नंतर रुग्णवाहिका सुरू झाली आणि नागरिकांसाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्य बजावत कोरोनाची लागण झालेली ती महिला कर्मचारी रुग्णवाहिकेतून गेली. हे दृश्य एवढे भावनिक होते की पोलीस उपायुक्त मीना मकवणा सह वसाहतीत राहणाऱ्या लहान पासून मोठ्या पर्यंत सर्वांचेच डोळे पाणावले होते. यामुळे वरून टणक, रागीट वाटणाऱ्या पोलिसांचे हृदय आतून किती हळवे असते सर्वांनी पाहिले…

देशात मागील २४ तासांत 6 हजार 654 कोरोनाग्रस्त, 137 मृत्यू

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाची परिस्थिती अजून चिंताजनकच आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील वाढ कमी होताना दिसत नाही आहे. देशभरात मागील २४ तासांत 6 हजार 654 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, 137 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशभरातील तब्बल 1 लाख 25 हजार 101 कोरोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 69 हजार 597 जणांचा व आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 720 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यता आलेली आहे. तर, लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या महासाथीचा प्रादुर्भावाचा वेग कमी करण्यात मोठे यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

लॉकडाऊन लागू केल्यामुळे १४ ते २९ लाख रुग्ण आणि ३७ ते ७८ हजार मृत्यू टाळण्यात यश आल्याचे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचे सचिव प्रवीण श्रीवास्तव व कोरोनासंदर्भातील उच्चाधिकार गट-१चे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी सांगितले आहे. बॉस्टन कन्स्लटंट ग्रुपच्या अंदाजानुसार आत्ता देशात असलेल्या करोनाबाधितांपेक्षा रुग्णांची संख्या ३६ लाख ते ७० लाखांनी जास्त झाली असती. रुग्णांचे मृत्यूही १.२ लाखांनी वाढले असते.

कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने शहरांमध्ये झालेला आहे. करोनाचे ८० टक्के रुग्ण आणि मृत्यू फक्त पाच राज्यांमध्ये आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही करोनाचे ६० टक्के रुग्ण आणि मृत्यू फक्त मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि ठाणे पाच शहरांमध्ये असल्याचेही सांगितले गेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोलापूरमध्ये आज पुन्हा 32 नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 548 वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काल एकाच दिवशी सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर काल शुक्रवारी सायंकाळी पाच ते आज शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल 32 नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 548 झाली आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत नव्याने आढळलेल्या 32 कोरोना बाधित रुग्णांमध्ये 21 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे.  आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 135 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 103 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 32 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आत्तापर्यंत पाच हजार 329 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यातील चार हजार 781 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, कोरोना मुळे आत्तापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून 224 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. सोलापूर शहर आणि परिसरात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आणि कोरोना मुळे मृत पावणार्‍या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सोलापूरकर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Solapur