Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5853

आता लॉकडाऊनसुद्धा म्हणतंय..तारीख पें तारीख..!! देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला

नवी दिल्ली । तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा सनी देओलचा डायलॉग आता भारतीयांना चांगलाच लक्षात राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगभरातील लोकांना आपल्या तालावर नाचायला लावलेलं असताना भारतात सव्वा महिने वाढलेला लॉकडाऊन आणखी २ आठवडे वाढला आहे. ३ मे रोजी संपणारा दुसरा लॉकडाऊन आता १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असून याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आली आहे.

दुसरा लॉकडाऊन संपायच्या आधीच २ दिवस ही घोषणा करण्यात आली असून आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी एक चान्स मात्र यावेळी देण्यात आला आहे. परप्रांतीय नागरिक तसेच राज्यांतर्गत अडकलेल्या नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी वाहनांची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून ३ मे ते ७ मे या कालावधीपर्यंत ही वाहतूक व्यवस्था कार्यान्वित राहील असा प्राथमिक अंदाज आहे.

कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन्सचं नियोजन करण्यात आलं असून कामगारांना इच्छित ठिकाणी पोहचवल्यानंतर त्या राज्यातील सरकारकडून त्यांची जबाबदारी घेण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनला प्रवासी उतरल्यानंतर त्यांना सॅनिटायझ आणि क्वारंटाईन करनं गरजेचं असल्याचं या तरतुदीत नमूद करण्यात आलं आहे.

चीन व्हिलन असल्याचे सांगून निवडणुका जिंकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या वर्षाअखेरीस होणाऱ्या निवडणुकीत चीन त्यांना विजयी होताना पाहू शकत नाही, असा आरोप ट्रम्प यांनी गुरुवारी केला.चीनच्या या कथित हेतूमागील कारणेही त्यांनी उघड केली आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “चीन मला पुन्हा निवडून येताना पाहू इच्छित नाही. त्याचे कारण म्हणजे चीनला टेरिफनुसार आम्हांला कोट्यवधी डॉलर्स द्यावे लागतील.” ट्रम्प यांनी अमेरिकेत चिनी उत्पादनांच्या आयातीवर टेरिफ शुल्क लादले आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील नात्यात तणाव निर्माण झाला आहे.

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुका जिंकण्यासाठी चीन माजी उपराष्ट्रपती जो बिडेन यांना मदत करत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.असं मानलं जात आहे की बिडेन यांना विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभे केले जाऊ शकते.

‘चीनने अमेरिकेला कधीही काहीही दिलेले नाहीये’असाही आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार जो बिडेन तसेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधत म्हंटले कि त्यांनी चीन बरोबर गाठ जुळवण्याचा प्रयत्न केलाय.ट्रम्प यांनी कोरोना विषाणूचा प्रसार केल्याचा आरोप करून अनेकदा चीनला फटकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की जगातील १४४ देश चीनमुळे सध्या ‘नरकसदृश परिस्थिती’ मधून जात आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात अ‍ॅरिझोनाला जात आहेत. कोरोना व्हायरसव्हा ग्लोबल साथीच्या रोगामुळे अमेरिकेतील शटडाउननंतरची त्यांची ही पहिलीच भेट आहे. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे पत्रकारांना सांगितले की ते लवकरच नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीतील महत्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या ओहायोला भेट देतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘याठिकाणी असं..केल्यानं’ बारामती कोरोनामुक्त झालं- अजित पवार

पुणे । काल पुण्याच्या ससुन हॉस्पिटलमधून कोरोनाची लागण झालेल्या ७५ वर्षीय बारामतीतील अखेरच्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्याने बारामती शहर सध्या करोनामुक्त झालं आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय कोरोनाविरोधातील लढ्यात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाला दिलं. “बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यामुळेच हे शक्य झालं” असं अजित पवार यांनी नमूद केलं. याशिवाय, अशाचप्रकारे महाराष्ट्रही लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला.”

“कोरोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद,सर्व नगरसेवक,ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जातं. अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला. तमाम बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे. त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो! अशाच पद्धतीनं महाराष्ट्रसुद्धा लवकरच करोनामुक्त होईल, असा मला विश्वास आहे”,अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी ट्विटरवर दिली आहे.

बारामती शहर व तालुक्यात मिळून एकूण ८ करोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. त्यापैकी २ रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. दरम्यान, उर्वरित ६ कोरोनाबाधित रुग्णानापैकी अखेरच्या रुग्णाला बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. आता बारामतीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून हे शहर आता कोरोनमुक्त झालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

कोरोनावरील वॅक्सिनबाबात बिल गेट्स म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स म्हणाले की आपल्याला येत्या ९ महिन्यांत कोरोना विषाणूची लस मिळू शकेल.विशेष म्हणजे बिल गेट्सचे बिल आणि मिलिंदा फाउंडेशन कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.अमेरिकेच्या अव्वल संसर्गजन्य रोग अधिका-याच्या संदर्भात एका ब्लॉग पोस्टमध्ये बिल गेट्स यांनी म्हटले आहे की डॉ. अँथोनी फोसे यांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या लसीच्या विकासास १८ महिने लागतील.मी त्यांच्याशी सहमत आहे,ही वेळ किमान ९ महिने तर जास्तीत जास्त २ वर्षांची असू शकेल.

या पोस्टमध्ये बिल गेट्स पुढे म्हणाले की,हि लस तयार होण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागला तरीही शास्त्रज्ञांच्या दृष्टीने तो एक विक्रमच ठरणार आहे. ते पुढे म्हणाले की कोविड -१९ साठी सध्या तयार करण्यात आलेल्या ११ पैकी १० लसींवर जास्त आशा आहेत.ते पुढे म्हणाले की, काही संशोधक आरएनए आणि डीएनए लसी बनवण्यावर काम करत आहेत याबद्दल मला खूप आनंद होत आहे. हे आत्ता खूप अवघड दिसत आहे पण त्यामध्ये आशेचे काही किरणही आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की जगातील कोरोना उद्रेका दरम्यान बिल गेट्सचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले जात आहेत.यापूर्वी त्यांनी संपूर्ण अमेरिकेत बंद पुकारण्याची मागणी केली होती आणि ते म्हणाले होते की अमेरिकेमध्ये या साथीच्या रोगामुळे झालेल्या मृत्यूची संख्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंदाजापेक्षा कमी असेल.अमेरिकेतील कोरोनामुळे १ लाख ते २ लाख ४० हजार लोक मरण पावण्याची शक्यता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चीनच्या वुहान लॅबमधूनच कोरोनाव्हायरस पसरला, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटावर अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनच्या बहाण्याने जागतिक आरोग्य संघटनेवर जोर धरला आहे.ट्रम्प यांना एका पत्रकाराने विचारले की त्यांना असे वाटते का चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचा कोरोना विषाणूशी काही संबंध आहे ? यावर ट्रम्प म्हणाले की, होय ते असा विचार करतात आणि तसे विचारण्यासाठी त्यांच्याकडे काही पुरावेही आहेत.कोरोनाबद्दल बरेच दावे केले जात आहेत आणि प्रत्येक दाव्याचे स्वतःचे सिद्धांत आहे.

कोरोना विषाणूचा उगम हा चीनमधील एका प्रयोगशाळेत झालेल्या संशोधनाच्या दरम्यान झाला होता आणि तेथे चालू असलेल्या संशोधनाला अमेरिकेने फंडिंग केला होता. या संशोधनासाठी अमेरिकेने २८ कोटी रुपयांचा निधी दिलेला होता. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा केला गेला आहे. या अहवालानुसार कोरोना विषाणूपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेली चीनची वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी हि वटवाघळांवर संशोधन करत होती. यासाठी वुहानपासून सुमारे दीड हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या युन्नान प्रांतातून वटवाघळांना पकडून वुहान येथे आणले गेले.हि वटवाघळे गुहां मधून पकडण्यात आले.

Vampire Bats Know Sharing Blood With Friends Is Good Manners - The ...

अहवालानुसार वुहान इन्स्टिट्यूटमध्ये वटवाघळांवर संशोधन एप्रिल २०११ ते ऑक्टोबर २०१५ या काळात चालले. यावेळी,युनान प्रातांतील एका गुहेतून या वटवाघळांना पकडण्यात आले आणि त्यांचे नमुने घेण्यात आले आणि त्याला अमेरिकेने फंडिंग केला होता.आतापर्यंत असे म्हटले जात आहे की वुहानच्या बाजारातून कोरोना विषाणूचा जन्म झाला होता जेथे वटवाघळांसह अनेक प्राण्यांचे मांस विकले जाते, परंतु वुहानच्या प्रयोगशाळेत अपघात होण्याच्या शक्यतेला दुर्लक्षित करता येणार नाही.

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालात बर्‍याच गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.याची पुष्टी झालेली नाही परंतु असे म्हटले जात आहे की वुहान लॅबमधील एका वैज्ञानिकाला प्रथम या विषाणूची लागण झाली होती आणि एका दुर्घटनेदरम्यान त्याचे शरीर हा विषाणू असलेल्या रक्ताच्या संपर्कात आले आणि हे असे घडले. वुहान लोकसंख्येच्या प्रसाराचे हे विषाणू सर्वात मोठे कारण बनले.

आश्चर्याची बाब म्हणजे वुहान लॅबला अमेरिकेतून फ़ंडींग दिले जाते.चीनमध्ये अद्यापही या विषाणूविषयीची चौकशी सुरू आहे. प्रयोगशाळेतील वैज्ञानिक सुरुवातीला विषाणूचा प्रसार कसा झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. वुहानच्या जिनायन हॉस्पिटलमधील डॉक्टर काओ बिन म्हणतात की प्राण्यांच्या बाजारात कोरोना विषाणू वाढला नाही. त्यांच्या संशोधनात असे लक्षात आलेले आहे की चीनमधील कोरोनामधील पहिल्या ४१ रुग्णांपैकी १३ जणांना झालेल्या संसर्गाचेकारण हि जनावरांची बाजारपेठ नव्हती.

Coronavirus renamed 'Covid-19' | EnviroNews Nigeria -

यावरून हे दिसते की या विषाणूच्या प्रसाराचे कारण केवळ ही जनावरांची बाजारपेठच नाही तर त्याची लिंक आता थेट वुहान लॅबशी जोडली गेली आहे. हे बाजार वुहान लॅबपासून काही किलोमीटर अंतरावरच आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार करण्याचा आणखी एक सिद्धांत असा आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. व्हाइट कोट वेस्ट या अमेरिकन संस्थेच्या अध्यक्ष अँटनी बेलोट्टी यांनी एक सिद्धांत मांडला आहे. ते म्हणतात की वुहान लॅबमध्ये ज्या वटवाघळांची तपासणी चालू होती त्यांना संशोधनानंतर वुहानच्या बाजारात विकले गेले आणि त्यामुळे लोकांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला.

कोरोना कसा पसरला. याबद्दल बरेच आंतरराष्ट्रीय सिद्धांत समोर आले आहेत.चीन आणि अमेरिका या दोहोंनीएकमेकांवर असे आरोप केले आहेत की त्यांनी कोरोना व्हायरस विकसित केला आहे जेणेकरून ते एकमेकांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करु शकतील.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक ट्विट करून कोरोना विषाणूला चिनी व्हायरस म्हंटले.१७ मार्च रोजी जेव्हा त्यांना यावर प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी हा व्हायरस चीनमधून आला असल्याचा दावा करत आपला बचाव केला.

हे एक जैविक शस्त्र आहे की नाही याबद्दलही चर्चा होते आहे आणि हे नाकारताही येत नाही.जैविक शस्त्रे ही व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून बनवल्या जातात ज्यामुळे शत्रूच्या प्रदेशात रोगाचा प्रादुर्भाव होतो,ज्यामुळे साथीचा रोग पसरतो. यामुळे शत्रूची फौजही मरते आणि सर्वसामान्यही ठार होतात.यांमुळे लोकं अपंग होतात, पिके खराब होतात आणि पाणी दूषित होते.

How did the coronavirus outbreak start? It likely didn't come from ...

वुहानच्या सिक्रेट लॅबवरील सर्वात मोठी शंका तेव्हा आली जेव्हा त्याचे नियंत्रण पूर्णपणे लष्कराकडे देण्यात आले होते.चीनने जैविक शस्त्र तज्ज्ञ असलेल्या महिला जनरलला वुहानच्या गुप्त प्रयोगशाळेचे नवीन इंचार्ज केले आहे. चेन-वेई चिनी सैन्यात एक मेजर जनरल आहेत आणि आता वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या नव्या बॉस आहेत, त्यामुळे कोरोना कसा पसरला हे प्रश्न जेव्हा संपूर्ण जगाला विचारत आहे, तेव्हा सैन्याच्या अधिकाऱ्यास या लॅबची जबाबदारी सोपविणे अत्यंत संशयास्पद आहे.आता असा अंदाज वर्तविला जात आहे की ज्या वुहान लॅबमध्ये चिनी सैन्य हस्तक्षेप करीत आहे तिथे आता नूतनीकरण करून असे काही केले जात आहे कि जे चीनला जगाला जाणवू द्यायचे नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चिंता आणखी वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ३५ हजार पार..

नवी दिल्ली । दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरलेत. मात्र, आतापर्यंतच्या लॉकडाउनच्या कालावधीत देशभरात कोरोनावर अजूनही अपॆक्षित असं नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडतच आहे. ताज्या आकडेवारीनुसार आजपर्यंत देशातील करोनाबाधितांची संख्या ३५ हजार ०४३ वर पोहचली आहे. तर यातील ८ हजार ८८९ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरले आहेत. कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या १ हजार १४७ इतकी झाली असून सध्या देशात २५,००७ कोरोनाबाधित रुग्णांवर जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

गेल्या २४ तासांत १९९३ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत परंतु, याच दरम्यान तब्बल ६०० रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचं प्रमाण) २५.३७ वर आहे. तसेच देशातील जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आलंय, असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, दुसऱ्या राज्यांत अडकलेल्या मजूर, विद्यार्थी आणि इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी विशेष रेल्वेची परवानगी सरकारनं दिलेली आहे. यासाठी व्यवस्था रेल्वे बोर्डाकडून केली जाईल, असं आज गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

गृहमंत्रालयाचा आदेश म्हणजे तुघलकी फरमान; लोकांना बसने गावी पाठवायला लागतील ३ वर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे इतर राज्यात मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत.सध्या अस्तित्त्वात असलेल्या परिस्थितीचा विचार करता अडकलेल्या लोकांना घरी परत आणण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत केवळ बसच्या माध्यमातून लोकांना परत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाचे वर्णन काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी तुघलकी फरमान म्हणून केले आहे. सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार कामगार दिनाच्या निमित्ताने मोदी सरकार आपल्या कामगारांची काळजी घेत नाही. बसमधून लोकांना येण्यास तीन वर्षांचा कालावधी लागेल.

माध्यमांशी बोलताना सिंघवी म्हणाले की, बिहारमधले जवळपास २५ लाख लोकं महाराष्ट्र तसेच तमिळनाडूमध्ये अडकले आहेत तर दुसरीकडे राजस्थानातील अडीच लाख, केरळचे ४ लाख, पंजाबचे ४ लाख, ओडिशाचे ७ लाख, आसाममधील दीड लाख देशाच्या विविध भागात अडकले आहेत. या लोकांना बसमधून बाहेर काढण्यास तीन वर्षांचा कालावधी लागेल. त्यांनी केंद्र सरकारच्या या आदेशास मनमानी आणि तुघलकी फर्मान असे म्हटले आहे. लोकांना परत आणण्यासाठी ट्रेन हाच एक उत्तम पर्याय आहे. ते पुढे म्हणाले की लॉकडाऊनचा आदेश देण्यापूर्वी केंद्र सरकार आपला गृहपाठ नीट करत नाहीयेत . त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारवर राज्यांना निधी न दिल्याचा आरोपही केला आहे. लॉकडाऊनसाठीही सिंघवी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की डोंगर पोखरून उंदीर निघाला ….या ४० दिवसांच्या लॉकडाउननंतरही देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या ही वाढतच आहे.

Coronavirus covid 19 ministry of home affairs on lockdown - गृह ...

 गृह मंत्रालयाचा आदेश काय आहे?
इतर राज्यातील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना माघारी आणणे ही सरकारची सर्वात मोठी समस्या आहे.यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना गुरुवारी गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केली. ज्याअंतर्गत राज्य सरकार इतर राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढू शकते. यासाठी कोणतीही विशेष ट्रेन चालविली जाणार नाही. त्यांना फक्त बसमधून आणले जाईल. यावेळी, बसेसमधील सोशल डिस्टेंसिंग हे पूर्णपणे पाळले जाईल. तसेच, आपापल्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन केले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

केंद्राची मोठी घोषणा! लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडणार

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजूर, विद्यार्थी, पर्यटकांच्या आंतरराज्यीय वाहतुकीसाठी बस सोबत आता स्पेशल ट्रेन सुरु करण्यालाही केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

तिकिटांच्या विक्रीसंबंधी रेल्वे मंत्रालय सविस्तर माहिती देईल असं आदेशात सांगण्यात आलं आहे. तसंच ट्रेन आणि स्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी तसंच सुरक्षेच्या इतर उपाययोजनांबद्दलही रेल्वे मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी राज्यात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडावी अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने परवानगी देत अडकलेल्या कामगारांना मूळ राज्यांत परत पाठवण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या नव्या निर्णयामुळे सुमारे ४० दिवस अडकून पडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला आहे. त्यामुळे आता आज पासून अनेक व्यवहारांच्या नियमांत महत्वाचे बदल झाले असून या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या खिशावर पडणार आहे. आजपासून SBI, बँकिंग, ATM, PNB, रेल्वे सेवांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत.

पीएनबी ग्राहकांसाठी बदलः अनेकदा ऑनलाईन पेमेंट सर्व्हिस वापरणार्‍या पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्यांसाठी एक मोठा बदल झाला आहे. ३० एप्रिलपर्यंत चालू असलेल्या पेमेंट वॉलेट सर्व्हिस पीएनबी किट्टी वॉलेटसह पीएनबीने १ मेपासून आपले डिजिटल वॉलेट बंद केले आहे. बँकेने डिसेंबर २०१६ मध्ये ही सेवा सुरू केली होती.

PNB to close this service, withdraw your money before April 30 ...

स्टेट बँक खातेधारकांसाठी बातमी – एसबीआयमध्येही आजपासून महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत. या बँकेचा व्याज दर आता बदलणार आहे. १ मेपासून बँक एक लाखाहून अधिक बचत खात्यांवरील व्याज दर कमी करीत आहे. त्याचबरोबर आता बँकेकडून नव्या कर्जदारांना पूर्वीपेक्षा कमी दराने कर्ज दिले जाईल. एक्‍सटर्नल बेंचमार्क नियमांची अंमलबजावणी करून एसबीआयने रेपो दरात बचत ठेव आणि अल्प मुदतीच्या कर्जाचे दर लागू केले आहेत.  आरबीआयने रेपो दर बदलल्यानंतर एसबीआयनेही त्यांत बदल केले आहेत.

रेल्वे नियम – सध्या रेल्वे आणि हवाई सेवांचे कामकाज बंद आहे. परंतु या सेवा सुरू होताच नवीन नियमांची अंमलबजावणी सुरु होईल. १ मे पासून, रेल्वेमध्ये प्रवास करणारे प्रवासी रिजर्वेशन चार्ट सुटण्यापूर्वी ४ तासांपर्यंत बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करू शकतात. सध्या, रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासी प्रवासाच्या तारखेच्या २४ तास आधी त्यांचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकत होते. परंतु आता ते ४ तासांपूर्वीही केले जाऊ शकते.

Indian Railways From 1850 | Complete history in 3 minutes or less ...

एटीएमशी संबंधितही नियमही बदलतील – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ATM संदर्भात एक नवीन नियम समोर आला आहे. वारंवार मशीन वापरुन त्यामुळे होणा-या संसर्गाचा धोका दूर करण्यासाठी प्रत्येक एटीएम उपयोगानंतर संसर्गमुक्त होण्यासाठी स्वच्छ केले जातील. हा नियम यूपीमधील गाझियाबाद आणि चेन्नई येथे सुरू झाला आहे आणि लवकरच इतर ठिकाणीही याची अंमलबजावणी सुरु होईल. जर हा नियम पाळला नाही तर एटीएम चेंबर सीलबंद होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गुजरात दिनानिमित्त पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचं खच्चीकरण? मुंबईचं IFSC सेंटर गांधीनगरला हलवणार

नवी दिल्ली । मुंबई शहरातील बीकेसीमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापना दिनीचं हा निर्णय घेऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे बोलले जात आहे. यापुढे सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा या गांधीनगरमधील आर्थिक सेवा केंद्रामार्फत चालणार आहेत. याचं मुख्यालय गांधीनगर, गुजरात येथे असणार आहे.

सध्या, आयएफएससीमधील बँकिंग, भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रांचे अनेक नियामक-आरबीआय, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Irdai) द्वारे नियमन केले जाते. अधिसूचनेनुसार “केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण स्थापना 27 एप्रिल 2020 ला केली आहे. या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय गांधीनगर, गुजरात येथे असेल, अशी माहिती येत आहे. आयआयएफसी प्राधिकरण मुख्यालय गांधीनगर येथे उभारण्याच्या सरकारच्या निर्णयाचे जीआयएफटी सिटीचे एमडी आणि ग्रुप सीईओ तपन रे यांनी स्वागत केले आहे.

या प्रकल्पामुळे एकाच ठिकाणाहून सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा मिळतील, ज्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल. अशी प्रतिक्रिया सीईओ तपन रे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा देणारी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही संस्था आयएफएससी व्यासपीठाचा उपयोग व्यवसायात सुलभतेने परदेशी आणि परदेशी गुंतवणूकीसाठी करतील आणि त्याद्वारे जीआयएफटी सीटी जागतिक आर्थिक केंद्र होईल. दरम्यान, हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र अगोदर मुंबईतील बीकेसी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्लेक्समध्ये होणार होते. मात्र, आता ते गुजरातला हलवले आहे. त्यामुळे केंद्रात बसलेल्या भाजप सरकारने महाराष्ट्र राज्यावर अन्याय केल्याची टीका होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.