Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5870

कोरोना नाही तर ‘यामुळे’ भारतात मागील ४ वर्षांत ५६ हजार २७१ जणांचा मृत्यू, रोज ४२ मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१६ ते २०१९ या काळात देशातील रेल्वे रुळांवर एकूण ५६,२७१ लोकांचा मृत्यू झाला आहे,तर या चार वर्षांच्या कालावधीत ५,९३८ लोक जखमी झाले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळाली आहे. परंतु, रेल्वे रुळावर हे लोक कसे मरण पावले याविषयी आरटीआयच्या उत्तरात काही विशिष्ट माहिती देण्यात आलेली नाहीये. मध्य प्रदेशातील नीमच येथील रहिवासी असलेले आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी मंगळवारी माहितीच्या अधिकाराखाली रेल्वे बोर्डाकडून माहिती प्राप्त केली आहे की २०१६ साली रेल्वेमार्गावर १४०३२, २०१७ मध्ये १२८३८, २०१८ मध्ये १४१९७ आणि २०१९ मध्ये १५२०४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

आकडेवारीचे विश्लेषण असे दर्शविते की गेल्या वर्षी २०१९ मध्ये दररोज सरासरी सुमारे ४२ लोकांचा मृत्यू रेल्वेच्या रुळावर झाला.आरटीआय उत्तरानुसार, २०१६ मध्ये १३४३,२०१७ मध्ये १३७६, २०१८ मध्ये १७०१ आणि २०१९ मध्ये १५१८ एवढे लोक रेल्वे रुळावर जखमी झालेत.

Turnaround man

गौर यांना माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये पाठविलेल्या पत्रात रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की राज्यांच्या राज्य रेल्वे पोलिसां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रेल्वे बोर्डाच्या सुरक्षा संचालनालयाला हा डेटा सादर करण्यात आला आहे.

रेल्वे रुळांवर पोलिसिंग करणे ही राज्य सरकारची बाब असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. म्हणूनच, रेल्वे आवारात आणि फिरत्या गाड्यांमधील गुन्हेगारी रोखणे आणि तपासणी करणे ही जीआरपीमार्फत सोडण्यात येणाऱ्या राज्यांचीही जबाबदारी आहे.

रेल्वे बोर्डाला उत्तर देताना आरटीआय कार्यकर्त्याने म्हटले आहे की देशातील रेल्वे रुळांवर दरवर्षी मोठ्या संख्येने लोक मरण पावलेल्या आणि जखमी झाल्याची सरकारी आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. रेल्वेने जीआरपी आणि राज्य सरकारच्या इतर विभागांच्या मदतीने रुळांवरील धोकादायक भागात ओळख पटवून देण्यासाठी अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले पाहिजेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

यूपीत साधूंच्या हत्येनंतर उद्धव ठाकरेंनी केला योगी आदित्यनाथांना फोन; म्हणाले..

मुंबई । उत्तर प्रदेशामधील बुलंदशहर येथे दोन साधूंच्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर संपर्क साधत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी साधूंच्या अमानुष हत्येवरुन चिंता व्यक्त करताना आम्ही तुमच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. सोबतच आमच्याप्रमाणे तुम्हीही कडक कायदेशीर कारवाई तसंच दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत”. “ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्याचं वृत्त आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला केला आहे. उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचं पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश कोरोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, असा उपरोधिक टोला राऊत यांनी ट्विटवरून भाजपला लगावला आहे. पालघरमध्ये चोर आल्याची अफवा उठल्याने जमावाने दोन साधूंची हत्या केली होती. त्यावरून भाजपने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून याबाबतची माहिती घेतली होती. आता उत्तर प्रदेशातच दोन साधूंची हत्या करण्यात आल्याने राऊत यांनी सूचक असं ट्विट करत भाजपवर उपरोधिक टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी लिहलं आहे, ”उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाली आहे. हे अत्यंत निघृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच,” असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

या जनावरांसाठी गोळ्याच! हेमंत ढोमे संतापला

मुंबई | बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात… या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!’ असा संताप अभिनेता हेमंत ढोमे याने ट्विट करून व्यक्त केला आहे. पिंपरीतील काळेाडी येथे पोलिसांना मारहाण करण्यात आली. यावर त्याने आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हेमंत चे वडील ही पोलिस दलात होते. मात्र ते काही दिवसापूर्वी निवृत्त झाले आहेत.

दरम्यान राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशानस, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी सारेच एकजुटीने काम करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या करोना योद्ध्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावरच प्राणघातक हल्ले होत आहेत. राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशानस, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी सारेच एकजुटीने काम करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या करोना योद्ध्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावरच प्राणघातक हल्ले होत आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत.त्यामुळे हेमंत ढोने संतापला आहे.

https://twitter.com/hemantdhome21/status/1254890291149991937

भाजी मार्केटमध्ये गर्दी झाल्याची माहिती समजल्याने तेथे जाऊन फळविक्रेत्याला आणि लोकांना हटकणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच्यावर हेमंत ढोने याने आपला संताप व्यक्त केला आहे.

कौतुकास्पद ! अभिनेता अक्षय कुमारने मुंबई पोलिसांसाठी केले मोठे मन, केली २ कोटी रुपयांची मदत

मुंबई | अभिनेता अक्षय कुमार केवळ बॉलिवुड स्टारच नाही. ते अनेक चांगल्या कामांसाठी ही ओळखला जातो. देश जेव्हा संकटात असतो. तेव्हा अक्षय कुमार मदतीसाठी अगोदर धावून येतो. गेल्या महिन्यात करोना व्हायरसशी लढण्यासाठी अक्षयने पंतप्रधान स्वायत्ता निधीसाठी तब्बल २५ कोटी रुपयांची मदत केली होती. यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी त्याने बीएमसीला ३ कोटी रुपये दिले होते. आता त्याने मुंबई पोलिसांसाठीही आपले मन मोठे केले आहे. तो मुंबई पोलिसांच्या मदतीला ही धावून आल्याच्या चर्चांना ही उधाण आलं आहे.

अक्षयने कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्या हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंडूरकर व सुर्वे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच चाहत्यांना पोलीस फाउंडेशनला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. अक्षयने एक ट्विट केल आहे. ट्वीटमध्ये त्याने लिहल आहे की, ‘मी मुंबई पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंडूरकर आणि संदीप सुर्वे यांना नमन करतो, ज्यांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले. मी माझं कर्तव्य केलं आणि अपेक्षा आहे तुम्हीही कराल. कारण आपल्याला हे विसरून चालणार नाही की याच लोकांमुळे आपण सुरक्षित आणि जीवंत आहोत. अस ट्विट अक्षय कुमार याने केल आहे.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली. सोमवारी त्यांनी ट्वीट करत म्हटले की, अक्षयने मुंबई पोलीस फाउंडेशनला २ कोटी रुपयांची मदत केली आहे. ‘मुंबई पोलीस फाउंडेशनमध्ये २ कोटी दिल्याबद्दल मुंबई पोलीस अक्षय कुमारची आभारी आहे. तुमची ही मदत मुंबई पोलिसमधील त्या महिला आणि पुरुषांच्या सुरक्षेला हातभार लावेल जे मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहेत. अस ट्विट पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलं आहे.

१२ ऑगस्ट पर्यंतची बुक झाली ४५ हजार रेल्वे तिकिटे; ३ मे नंतर ट्रेन सुरु होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेमध्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दिवशी म्हणजे १४ एप्रिलपासून तिकिटांचे बुकिंग थांबविण्यात आले आहे. त्यावेळी १२ ऑगस्टपर्यंत सुमारे ४५ लाख रिजर्वेशन तिकिटे बुक होती.रेल्वेचे एडव्हान्स रिजर्वेशन पीरियड एआरआरपी १२० दिवस आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज कोरोनाची सुमारे १५०० नवीन प्रकरणे समोर येत आहेत आणि देशभरात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या ३०,००० इतकी आहे. अशा परिस्थितीत ३ मेनंतर रेल्वे सेवा सुरू होईल अशी आशा आहे.

२२ मार्च रोजी जनता कर्फ्यूपासून रेल्वेने ३१ मार्च पर्यंत सर्व गाड्या रद्द केल्या होत्या, त्यावेळी संपूर्ण देशात कोरोनाची सुमारे ४०० प्रकरणे होती. त्यानंतर रेल्वेच्या प्रवासी गाड्या सतत बंद ठेवण्यात आल्या आहेत. तथापि, काही राज्ये अशी मागणी करीत आहेत की इतर राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी गाड्या पुन्हा सुरु कराव्यात. परंतु यासंदर्भात कोणताही निर्णय केंद्र सरकार घेईल आणि त्यांच्या निर्देशानंतरच रेल्वे काही पाऊलं उचलतील.

आकडेवारीनुसार, रेल्वेच्या तिकिटावर सरासरी १.८ प्रवाश्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच १२ ऑगस्टपर्यंत ८० लाखाहून अधिक लोक रिजर्वेशन तिकिटे घेऊन प्रवासाची वाट पहात आहेत. तथापि, रेल्वेमध्ये रिजर्वेशनच्या तिकिटावर सुमारे दहा टक्के प्रवासी प्रवास करतात. अशाप्रकारे, एका मतानुसार १२ मे पर्यंत एकूण १० कोटी प्रवासी प्रवासाची प्रतीक्षा करत आहेत. तथापि, ही आकडेवारी रेल्वेच्या सरासरीपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे आणि सरासरी दररोज २५ दशलक्ष प्रवासी रिजर्वेशन च्या तिकिटावरुन प्रवास करतात. परंतु रेल्वेच्या दृष्टीने या हंगाम लीन पीरियड असतो ज्यात लोकं होळी, दिवाळी, छठ हिवाळ्याच्या सुटीपेक्षा कमी प्रवास करतात. दुसरीकडे, कोरोनाच्या भीतीमुळे बहुतेक लोक या वेळी प्रवास करण्याच्या बाजूने नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना अपडेट: राज्यात आज २७ जणांचा कोरोनाने बळी तर ५२२ नवे रुग्ण

मुंबई । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना अजूनही नियंत्रणात आला नसून कमी-अधिक प्रमाणात नवीन रुग्णांची दरोरोज भर पडत आहे. दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण आढळले असून २७ जण कोरोनानारे दगावले आहेत. याचबरोबर आजच्या तारखेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ५९० झाली. तर ३६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 4.30 टक्के झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे देशात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, आज देशभरात कोरोनाचे 1 हजार 543 नवे रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांची भर पडल्यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 29 हजार 435 वर पोहचली आहे. तर करोनामुळे 62 नवे मृत्यू झाले असुन आतापर्यंत एकुण 934 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृत्यूदर हा आता 3.17 टक्क्यांवर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी घोषणा केली की,”कोरोनाविरूद्धची लढाई आम्ही जिंकली आहे”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांशी झगडत आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंडने घोषित केले आहे की त्यांनी कोरोना संसर्गाविरूद्धची लढाई पूर्णपणे जिंकलेली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी सोमवारी घोषणा केली की, “न्यूझीलंडमध्ये कोणतेही कम्युनिटी ट्रांसमिशन होत नाहीये … आम्ही ही लढाई जिंकली आहे.”त्या पुढे म्हणाल्या की,आता न्यूझीलंडमध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाउन कमी करू लागणार आहे आणि लवकरच सर्व काही सामान्य दिसेल.

कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांमधील सरकारं या विषाणूचे कम्युनिटी ट्रांसमिशन रोखण्यात अयशस्वी ठरले. दरम्यान, न्यूझीलंडने कोरोना विषाणूचे कम्युनिटी ट्रांसमिशन थांबविल्याची माहिती दिली आहे तसेच या व्हायरसला प्रभावीपणे दूर केल्याचा दावा केला आहे. देशाच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न म्हणाल्या की,अनेक दिवसांनंतरही एकच प्रकरण समोर आल्यानंतर सध्या हा विषाणू संपुष्टात आला आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी चेतावणी दिली की याचा अर्थ असा नाही की व्हायरसची नवीन प्रकरणे बाहेर येणार नाहीत.

Is Kiwi prime minister Jacinda Ardern the most effective leader in ...

न्यूझीलंडमध्ये मागील ५ आठवड्यांपासून कठोर लेव्हल ४ चे लॉकडाउन सुरू ठेवले होते त्यामध्ये केवळ आवश्यक सेवांनाच सुरु राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र,सोमवारी तो शिथिल करण्यात आला होता आणि आता लेव्हल ३ लॉकडाउन वरील निर्बंध कायम राहतील आणि काही व्यवसाय, टेकअवे फूड आउटलेट आणि शाळा उघडल्या जातील. तथापि, पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी इशारा देखील दिला आहे की सर्व प्रकारचे ट्रांसमिशन केव्हा संपेल आणि आयुष्य पूर्णपणे सामान्य केव्हा होईल याबद्दल निश्चितपणे सांगितले जाऊ शकत नाहीये.

पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न म्हणाल्या की, “न्यूझीलंडच्या आरोग्यासंबंधी गोष्टी आम्ही पुन्हा धोक्यात आणू शकत नाही आहोत.म्हणूनच आपल्याला पातळी ३ च्या लोककडाउन वर रहावं लागेल तरच आपण टिकून राहू.” सोमवारी गेल्या २४ तासांत कोविड -१९ चे फक्त एक नवीन रुग्ण दाखल झाला तेव्हा न्यूझीलंडमधील निर्बंध शिथिल करण्यात आले.यासह,५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील १९ मृत्यूसह एकूण प्रकरणांची संख्या १,१२२ झाली आहे.

Jacindamania' sweeps New Zealand as it embraces a new prime ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनो घरीच थांबा! मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रंदिवस ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या ३ दिवसात मुंबई पोलीस दलातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वयस्क पोलिसांना कोरोनाचा धोका लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी तातडीने पावलं उचलत 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांचं वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तात सहभागी होऊ नये, असं मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जे पोलीस कर्मचारी कोरोनामुळे दगावले त्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त होतं. त्यामुळे पोलीस कर्मचारी पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुक्त परमबीर सिंह यांनी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत आणि योग्य ती शासकीय नोकरी तसंच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. “पोलीस बांधवांचा मृत्यू ही अतिशय दु:खद आणि दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं आहे,” असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘या’ अमेरिकी महिला सैनिकेला समजलं जातंय कोरोनाचा पहिला रुग्ण; जीवे मारण्याच्या येतायत धमक्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगातील ३० लाख ६० हजारांहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे, तर २ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. कोरोना व्हायरससाठी औषध किंवा लस तयार करण्यादरम्यान,काही देश हे एकमेकांवर सतत आरोप करत आहेत.जगातील अनेक देश या विषाणूबद्दल चीनला दोषी मानतात.त्याच वेळी चीनने अमेरिकेवर पलटवार करताना त्यांच्या नागरिकामुळे झाले असल्याचे एक कारण पुढे केले आहे.त्यानंतर, पेशंट झिरो ठरलेल्या या महिलेस जगभरातून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत,तर आतापर्यंत ती खूपच निरोगी आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वुहानमध्ये झालेल्या लष्करी विश्व क्रीडा स्पर्धेदरम्यान अशा अफवांना वारा मिळाला,ही अधिकारी मत्जे बेनासी देखील सैन्याच्या वतीने सहभागी होते. व्हर्जिनियातील यूएस आर्मीच्या फोर्ट बेलव्हॉयरमध्ये काम करणारी मत्जे तेथील सुरक्षा अधिकारी म्हणून काम करते. त्याचबरोबर मत्जे यांचे पती हे हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. मत्जे चीनहून अमेरिकेत परत आल्यानंतर थियरी ऑफ कॉस्पिरसीची सुरुवात झाली. चिनी माध्यमांनी असा दावा केला की हा विषाणू यूएमचे प्रसारित जैविक शस्त्र आहे. अगदी चिनी सरकारच्या अधिकारी झाओ लिजियान यांनीही सार्वजनिकपणे हा दावा केला. एका व्हिडिओचा हवाला देत परराष्ट्र मंत्रालयाच्या या अधिका-याने सांगितले की, कोविड -१९ मधील मृत्यूची माहिती स्वतः रोग नियंत्रण व प्रतिबंधक (सीडीसी) यूएस सेंटरचे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी दिली.

 

यानंतर चीनने हवा देणे सुरू केले की कोरोना विषाणूचा पेशंट झिरो हा अमेरिकेतच आहे, ज्यामुळे हा आजार चीन आणि इतर देशांमध्ये पसरला. चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की रॉबर्ट रेडफिल्डने हे कबूल केले आहे की अमेरिकेत फ्लूच्या काही रूग्णांच्या शोधात काही चूक झाली असेल आणि ते कोरोना विषाणूमुळे पीडित होते. चीनचे परदेशी अधिकारी लीझियान असले तरी त्यांच्या दाव्यांची पुष्टी कोणीही केलेली नाही.

China says that Autoclave seized from Chinese ship going to ...

यूट्यूबरचा खोटे बोलण्याचा इतिहास आहे
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये वुहानमध्ये दाखल झालेल्या यूएम लष्करी अधिकारी मत्जे यांच्याकडे चिनची नजर आहे. जेव्हा मिलिटरी वर्ल्ड गेममध्ये प्रवेश केला तेव्हा स्पर्धेदरम्यान मत्जे यांना बरगडीची दुखापत झाली होती. अमेरिकेचा यूट्यूबर जॉर्ज वेब याने प्रथम मत्जे यांना कोरोना झाल्याचे सांगितले. १०,००,००० पेक्षा जास्त फॅन फॉलोइंग असलेल्या जॉर्ज याने यापूर्वीही अफवा पसरवल्या आहेत. सन २०१७ मध्ये त्याने म्हटले होते की एका जहाजामध्ये बॉम्ब होता, त्यानंतर तेथे अफरातफरी माजली.मात्र, नंतर त्याचा हा दावा खोटा ठरला. आता त्याच जॉर्जने मत्जे विषयी सांगितले की ती कोरोनाची रुग्ण होती, ज्यामुळे चीनमध्ये हा प्रकार पसरला. युट्यूबवर अफवा पसरल्यानंतर चिनी कम्युनिस्ट पक्षानेही ती गोष्ट स्वीकारली आणि या अमेरिकन नागरिकाला दोष देण्यास सुरवात केली.

कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत
ऑक्टोबरपासून मत्जे किंवा तिच्या पतीपैकी कोणामध्येही कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत किंवा कोणतीही तपासणी सकारात्मक आलेली नाही. पूर्णपणे निरोगी असलेल्या या जोडप्याबद्दल युट्यूब आणि प्रत्येक सोशल मीडियावर सतत चर्चा होत आहे.त्यांचे फोटो आणि घराचा पत्ताही सार्वजनिक झाला आहे. त्याचबरोबर चीनला जगाच्या नजरेत आणल्याच्या आरोपामुळे जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या आहेत.त्यांना सतत मेल, फोन आणि अगदी धमकी देणारी पत्रेही मिळत आहेत.

सीएनएनशी बोलताना मत्जे म्हणाल्या की, आता गोष्टी स्पष्ट झाल्या असल्या तरी आमची प्रतिमा खराब झाली आहे. जेव्हा जेव्हा लोक माझे नाव google करतील, कोरोनाच्या बाबतीत, मी पेशंट झिरो दाखविले जात आहे.हे एक भयानक स्वप्न आहे.

धमक्या टाळण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा वाचविण्यासाठी या अमेरिकन जोडप्याने अमेरिकन कायदा तज्ञांकडूनही मदत मागितली आहे, परंतु त्यांना अजूनही कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.

अफवा चीनपासून जगभर पसरल्या आहेत
येथे या प्रकारचा व्हिडिओ चीनमधील सर्व लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मवर येत आहे, ज्यात मत्जे कोरोनाची पेशंट झिरो असल्याचे सांगितले जात आहे. यात WeChat, Weibo आणि Xigua Video सारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. मत्जे आणि तिचा नवरा मॅट यांनीही यूट्यूबवर देखील तक्रार केली होती, परंतु त्यांनी व्हिडिओ काढे पर्यंत तो अन्य ठिकाणी व्हायरल झाला होता.

बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉचे प्रोफेसर डॅनियल सिट्रॉन यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत फेडरल कायद्यानुसार असे व्हिडिओ तयार करणार्‍यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही, म्हणून हे केले जात आहे. सायबर मॉबवरील अमेरिकन कायदा सहसा कोणतीही कारवाई करत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

अमरावती च्या येसुर्णा गावामधे खबरदारी म्हणूण गावबंदी

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्हा च्या येसुर्णा गावामधे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी ग्रामस्थांनी गावबंदीचा निर्णय घेतलेला आहे. तर अत्यावश्यक सेवा अँब्युलन्स ,पोलीस व्हॅन, शेतकरी, गरजूलोकांसाठी येजा करण्याकरीता रस्ता खूला ठेवलेला आहे.

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणूण गावामधे येणार्‍या कोणत्याही नागरीकांची आधी नोंद केल्या जाते व नंतरच अत्यावश्यक असल्यास त्याचा संपर्क गावातील त्या व्यक्तीसोबत करवुन दील्या जातोय. मात्र गावामधे कोणत्याही परीस्तीती मधे संबंधीत व्यक्तीला पाठवीन्यात येत नाही. त्यामूळे या गावात आता गावबंदी असुन कोनीही अनोळखी व्यक्ती पाहूणा विना परवानगी विना तपासणी गावामधे येऊ शकत नाही.

यासाठी पं. समीतीचे ऊपसभापती श्रीधर काळे , सरपंच भारती काळे, शिवसेनेचे नरेंद्र पडोळे,पोलीस पाटील जीवन काऴे,आदींनी अत्यावश्यक सेवेसाठी नागरीकांना सहकार्य सुद्धा केले जात असल्याने गावाने एक आदर्श निर्माण केलेला आहे. येसूर्णा गावाची तालूक्यातून प्रशंसा केली जात आहे.