धनगर समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला धडा शिकवा – मुख्यमंत्री सिध्दरामय्या

धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र पाच वर्षात त्यांनी आरक्षण दिले नाही. त्यामुळे भाजपबद्दल समाजबांधवांच्या मनात द्वेेष निर्माण झाला पाहिजे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री हे खोटारडे आहेत. ते समाजाला आरक्षण देणार नाहीत. समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला समाजबांधवांनी मतदान करू नये, देशाच्या एकात्मतेसाठी कॉंग्रेसला मतदान करावे, असे आवाहन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ धनगर मेळाव्याचे आयोजन वारणा मंगल कार्यालयात केले होते. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला रामहरी रूपनवर, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली !’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान भोवण्याची चिन्ह आता दिसत आहेत. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

‘यांच्या’ सल्ल्यानेच मी निवडणूक लढवत आहे!- आदित्य ठाकरे

‘मी निवडूक लढवावी अशी पहिली इच्छा आ.अनिल बाबर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आपण या ठिकाणी आमदार बाबर यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या प्रचारासाठी आलो आहोत. अनिल बाबर यांना मत म्हणजेच मला मत. आजची सभा ही प्रचाराची सभा नसून आमदार अनिल बाबर यांची विजयी सभा आहे. निवडणूकीनंतर तीन महिन्यात टेंभूपासून वंचित गावांना पाणी देणार असून मुख्यमंत्री, अथवा आमदार अशा पदापेक्षा नवा महाराष्ट्र घडवायचाय, पुर्वी महाराष्ट्रात निवडणूकीचे वातावरण तरी दिसायचे पण आता सर्वत्र भगवे वातावरण झाले आहे, यावेळी विरोधी पक्ष शिल्लक आहेच कुठे? अशी बोचरी टीका युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. विटा येथील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

भाजपचा जाहिरनामा नव्हे तर जुमलानामा आहे- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिध्द केला आहे. मात्र हा प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांनी सन २०१४ च्या निवडणुकीचा जाहिरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील अनेक आश्वासने ही २०१४ च्या निवडणुकीत दिलेली होती. मग ही आश्वासने पाच वर्षात का पूर्ण केली नाहीत? त्यांचे हे अपयश आहे, यावर्षीचा त्यांचा जाहिरमाना म्हणजे ‘जुमनलानामा’ असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

पालघरमध्ये निवडणुकी आधीच मोठी उलथापालथ !माजी मंत्री मनीषा निमकर यांचा भाजपात प्रवेश

शिवसेना पक्षातून पालघर मतदारसंघात हॅट्रिक साधलेल्या पालघरच्या माजी आमदार व राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जव्हार येथील प्रचारसभेत हा पक्षप्रवेश पार पडला.

मोदी-शहांच्या सभांचा चांगला परिणाम होतोय – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची आज सातारा येथे प्रचार सभा पार पडली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आलेल्या मोदी यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून टीका केलीय. मात्र आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मोदी, शहा यांच्या प्रचार सभांचा चागला परिणाम होत असल्याचं म्हणालेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि अमित शहा जितक्या सभा घेतील … Read more

साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी

‘साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.

धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वावडे असल्याच उघड झालं आहे. आदित्य ठाकरे ज्या मंचावरून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्या मंचावर लावलेल्या बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचा फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्याच टाळलं.

परळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.

‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ नाऱ्याचा आदित्य ठाकरेंना विसर, विडिओ वायरल

निवडणुकीच्या काळात मतदारांची मने जिकंण्यासाठी उमेदवार वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. मात्र, असाच काहीसा प्रयन्त करत असताना नातवाला आजोबांच्या विचारांचा विसर पडावा हे आश्चर्यच आहे. मुंबई स्थित दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी चक्क लुंगी घातल्याचा विडिओ वायरल झाला आहे. ७० च्या दशकात मराठी माणसांच्या हितासाठी दाक्षिणात्य विरोधी भूमिका घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ अशी ऐतिहासिक घोषणा दिली होती. परंतु आता वरळीतून निवडणूक लढवणारे लुंगीधारी आदित्य ठाकरे बहुभाषिक राजकारणाचा नारा देताना दिसत आहे.