आव्हाडांच्या अटकेनंतर पवारांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, ज्या प्रेक्षकाला मारहाण….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड याना पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना, जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या आव्हाड साहेबांना अटक करायची ही या नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का? असा थेट सवाल रोहित पवारांनी केलाय.

ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना, जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या आव्हाड साहेबांना अटक करायची ही या नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे.” असं ट्विट त्यांनी केल आहे. हर हर महादेव सिनेमामध्ये इतिहासाची मोडतोड करून दाखवण्याचं काम झालं त्याचा निषेध व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही छत्रपती शिवजी महारांजावर श्रद्धा असणाऱ्या माणसाला विचारलं, तर तो हे कधीच सहन करणार नाही असेही ते म्हणाले.