राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ असून त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे, ते आमच्या 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत.  राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते राज्यापाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत,” अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच “अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या स्पष्टवक्ता असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल,” असेही राऊतांनी यावेळी सांगितले.

“महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे लोकशाही मार्गाने, संपूर्ण घटनात्मक कायद्याचा आधार घेत सत्तेवर आलं आहे. ठाकरे सरकार हे घटनात्मक सरकार आहे. राज्यपाल हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपालांचं जे मत आहे, त्या मताचा आदर आम्ही नेहमी करतो. शेवटी कॅबिनेटचा निर्णयाचे पालन राज्यपालांना करावा लागतो.”

“राज्य सरकारने जी यादी पाठवली आहे, ती घटनेच्या आधारे पाठवली आहे. राज्य सरकारने कधीही घटनाबाह्य काम केले नाही आणि करणारही नाही. राज्य सरकारने ती यादी सर्व पक्षांचे एकमत झाल्यानंतर पाठवली आहे, त्यात काय सांगायचं आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

“राज्यपाल हे सुज्ञ आहे. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे आणि या प्रेमातून यापुढे सर्व कारभार सुरळीत होईल. आम्ही राज्यपालांचा नेहमी आदर करतो. राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत. ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत,” असे संजय राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment