शिवसेना बाळासाहेबांचं नाव जनाब असं लिहतात अन् महाराष्ट्रात टिपू सुलतान कि जय म्हणतात – फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  बेळगांवमध्ये संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाला विरोध करून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले आहेत. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उरली नाहीये. काँग्रेससोबत राहून शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की महाराष्ट्रात अजान नाही तर शिवगान स्पर्धा होईल. ही स्पर्धा छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत घेतली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना उर्दूमध्ये कँलेंडर छापत आहे. यामध्ये बाळासाहेबांचं नाव जनाब असं लिहलं जातंय. महाराष्ट्रात शिवसेना आता टिपू सुलतान जयंती साजरी करत आहे. म्हणूनच कर्नाटकात जी काँग्रेस टिपू सुलतान यांची जयंती साजरी करते. त्यांना निवडून देण्याकरिता शिवसेनेचे नेते बेळगावत आले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्र एकीकरण समितीला समोर ठेवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. छत्रपतींना माणनाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टिपू सुलतान की जय म्हणणाऱ्यांच्या गळ्यात हार टाकत असाल, तर मराठी खांदा तुम्हाला पाठिंबा देणार नाही. आम्ही जात पात धर्म मानत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजप मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे. माझा सवाल संजय राऊत ना आहे, मराठी मणुसला मुंबईत बेड नाही मरतो आहे त्याची चिंता का करीत नाही ,? त्यांचे प्रेम बेगडी आहे.

सध्या गजात कोरोना महामारी आहे. देशात सर्वात कमी मृत्यूदर आहे. मोदींनी सर्वांचा विचार केला. गरिबांपर्यंत अन्न पोहोचलं पाहिजं याचा मोदींनी विचार केला. मोदींनी मोठे आर्थिक पॅकेज देऊन त्यांनी सर्वांना आधार दिला. आज जगातले केवळ पाच दिवस फक्त कोरोनावर लस तयार करु शकले. यामध्ये भारत आहे.

Leave a Comment