व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

“केंद्र सरकारकडून लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न”; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच धडक छापेमारी करीत कारवाईही केली जात आहे. यावरून राष्ट्रवंडी काँग्रेस नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “केंद्रानं 7 वर्षात काय केलं? सध्या राज्यात आणि देशात ICE चा गैरवापर सुरु आहे, लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप करीत सुळे याणी हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या ज्या नोटिसा पाठविल्या जाताहेत. विरोधी पक्षातच नोटीशी कशा येतात, याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, विरोधात असल्या की नोटीस येतात? भाजपमध्ये गेल्या की नोटीस कशा विरघळतात हा प्रश्नच आहे.

या देशात कुठल्याही राज्यात घोटाळा असेल, तर त्यांची जबाबदारी केंद्राने घ्यावी, इतक्या वर्षाचा हिशोब नको का द्यायला? 7 वर्षाचा हिशोब सांगा, मग चेक्स आणि बँलन्से एकाच कंपनीत कशा राहून केल्या. त्याचे स्पष्टीकरण केंद्राने द्यावे, असे सुळे यांनी म्हंटले आहे.