हमी भावाने उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात – बाळासाहेब पाटील

Balasaheb patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला दि.१ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने उडीदसाठी हमी भाव प्रती क्विंटल ६ हजार रुपये जाहीर केला आहे. चालू हंगामात उडीद आवक बाजारात सुरु झाली आहे.

बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी दि. १५ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा. केंद्र शासनाकडे हमीभावाने उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव दि.३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला होता त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Read more

शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर मिळेल कमी व्याजदरात कर्ज

kisan credit card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकरी बांधवांनांसाठी सरकारने सुरु केलेली किसान क्रेडिट कार्डची सुविधा ही खूप लाभकारक आहे. शेतकऱ्यांना वेळेवरती पैसाची मदत व्हावी, शेती साहित्य घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्डचा उपयोग होत असतो. यासह किसान क्रेडिट कार्डवरुन कर्ज घेतल्यास बँक त्याला कमी व्याजदर आकारत असते. बँक साधरण ९ टक्के व्याज आकरत असते. परंतु सरकार यात २ टक्क्यांची … Read more

सर्वसामान्यांसाठी धक्का !! राज्यात पालेभाज्यांचे दर वाढले

leafy vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मार्च महिन्यापासून देशात लोकडाऊन सुरू होते, दरम्यान मागील दोन महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सगळे व्यवहार चालू करण्यात येत आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात पाणी तुंबल्याने बहुतांश पिके सडून खराब झाले आहेत. त्याला भाजीपालाही अपवाद नाही. याचमुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी लावलेल्या भाजीपाला … Read more

कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांदाचाळ उभारणीसाठी सरकारने मंजूर केले ६० कोटी अनुदान

Kanda Chal Anudan Yojana 2020

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा चाळ उभारणीसाठी राज्यसरकारने ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २७ व्या राज्यस्तरीय प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण रू. १५० कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात ६० कोटी रुपयांचा … Read more

अवघ्या चोविसाव्या वर्षी घेतले टेरेसगार्डनवर विविध भाज्या, मसाले आणि फुलांचे पीक 

anubhav sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या काळात अनेकजण टेरेस गार्डन, किचन गार्डन तसेच विविध प्रकारच्या गार्डनिंग कडे वळलेले पाहायला मिळतात. तरुण पिढीही मोठ्या प्रमाणात यात रस घेताना दिसून येते आहे. उत्तर प्रदेश मधील रायबरेली जिल्ह्यात राहणाऱ्या एका २४ वर्षाच्या मुलानेही आपली ही आवड जपत टेरेस गार्डन फुलविले आहे. अनुभव शर्मा असे त्याचे नाव आहे. तो सध्या पदवी … Read more

जमिनीच्या मशागतीसाठी उपयुक्त रोटावेटरची देखभाल कसे करायचे जाणून घेऊया 

Rotavater

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली सर्वच क्षेत्रात बऱ्याचशा कामांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचे बरीचशी कामे यंत्राच्या साह्याने केले जातात. काही यंत्र बैलचलीत काही स्वयंचलित आणि ट्रॅक्‍टरचलित यंत्रांचा यामध्ये समावेश आहे.  ट्रॅक्टर चलीत यंत्रांमध्ये रोटावेटर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. जमिनीची नांगरट केल्यानंतर निघालेली ढेकूळ फोडण्यासाठी रोटावेटरचा वापर होतो हे सर्वांनाच ज्ञात आहे. रोटावेटरचा वापर … Read more

जाणून घेऊया सीड्लेस इलॉगेटे्ड पर्पल सर्वोत्तम उत्पादन देणाऱ्या द्राक्षाच्या वाणाविषयी

seedless elongated grapes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। द्राक्षे हे मूळ आर्मेनियातील पीक आहे, पण भारतातही या पिकाची लोकप्रियता वाढू लागली असून लागवड क्षेत्रही वाढत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड केली जाते. नाशिक आणि सांगली हे द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे आहेत. राज्याच्या ५० टक्के द्राक्ष उत्पादन नाशिक मध्ये होते. भारतात द्राक्ष उत्पन्न करणाऱ्या राज्‍यांमध्‍ये आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्र … Read more

राज्यातील विविध ठिकाणच्या धरणक्षेत्रात पाणीसाठ्यांमध्ये वाढ 

Dams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील मध्यम आणि मोठ्या मिळून एकूण ३२६७ प्रकल्पांमध्ये ११११ टीएमसी म्हणजेच ७६.९८ पाणीसाठा झाला आहे.  जून जुलै अखेर पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा धरणे भरतील का नाही याची चिंता सतावत असताना धरणांचा पाणीसाठा वाढल्याने दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे  धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. … Read more

जाणून घेऊया सीताफळ लागवड आणि छाटणीचे तंत्र 

custard apple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतातील आंध्र प्रदेश कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सिताफळाची लागवड केली जाते. महाराष्ट्र सिताफळाच्या लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे.  महाराष्ट्रामध्ये  जळगाव, दौलताबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, यवतमाळ, वर्धा इत्यादी भागात सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सिताफळाचे औषधे आणि आयुर्वेदिक गुणधर्म मोलाचे आहेत. औषध कंपन्यांमध्ये कडवट औषध निर्माण करण्यासाठी सिताफळाच्या पानांचा वापर केला जातो. … Read more

जाणून घ्या डाळींब तडकण्याची कारणे 

pomegranate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील काही भागातील विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी डाळींब पीक तसे वरदान ठरले आहे. मात्र या शेतीतही  मर रोग,  तेलकट डाग रोग, फळ तडकणे  यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. फळ तडकणे हे केवळ एकाच कारणामुळे न होता त्याची अनेक कारणे आहेत. पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन, चुकीच्या जमिनीची निवड,  हमवामानातील बदल, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे तसेच … Read more