आता 50 कोटी कामगारांना मिळणार वेळेवर पगार आणि बोनस, यासंबंधीचे नवीन नियम सप्टेंबरमध्ये लागू होऊ शकतील

0
86
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार आता वेतनाशी संबंधित नवीन नियम आणणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा वेतन संहिता 2019 (वेतन कोड, 2019,) सप्टेंबरपर्यंत लागू होऊ शकेल. या वेतन संहितेत सेक्टर आणि पगाराची पर्वा न करता सर्व कर्मचार्‍यांना किमान वेतन आणि वेळेवर पगार देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पगाराला होणार विलंब आणि त्यासंबंधित समस्यांचे निराकरण करणे हा त्या मागचा हेतू आहे. यामध्ये हे देखील सुनिश्चित केले जाईल की पुरुष, महिला आणि ट्रान्सजेंडर यांच्या पगाराच्या पेमेंटमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही.

केंद्रीय कामगार मंत्रालयाने 7 जुलै रोजी जारी केलेल्या नियमांचा मसुदा आता अधिकृत गॅझेटमध्ये ठेवला आहे. हे 45 दिवस लोकांच्या अभिप्रायासाठी खुले असेल आणि त्यानंतर काही अडचणी नसल्यास याची अंमलबजावणी केली जाईल. या संहितेला गेल्या वर्षीच मान्यता देण्यात आली होती. देशातील सुमारे 50 कोटी कामगारांना या नवीन वेतन संहितेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

चला तर मग यासंबंधीच्या 5 मोठ्या गोष्टी जाणून घेऊयात.

१. या विधेयकात सुधारणा करण्यात आली आणि पगार, बोनस आणि संबंधित मुद्द्यांसह आणखी काही कायदे समाविष्ट करण्यात आले आहेत. हे अंमलात आल्यानंतर या कायद्यात किमान मजुरी कायदा, पेमेंट ऑफ वेतन कायदा, पेमेंट ऑफ बोनस कायदा आणि समान वेतन कायदा या चार कामगार कायद्यांचा समावेश असेल.

२. कामगारांना किमान पेमेंट आणि वेळेवर पगाराची हमी – या वेतन संहितेमध्ये सेक्टर आणि पगाराची पर्वा न करता सर्व कर्मचार्‍यांना किमान वेतन आणि ते वेळेवर देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

३. तसेच पगारास होत असलेला विलंब आणि त्यासंबंधित समस्यांचे निराकरण करणे हा त्या मागचा हेतू आहे. यामध्ये हे देखील सुनिश्चित केले जाईल की पुरुष, महिला आणि ट्रान्सजेंडर यांच्या पगाराच्या पेमेंटमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही.

४. साधी व्याख्या – या वेतन संहितेने श्रमाची व्याख्या खूपच सोपी केली आहे. यामुळे खटले कमी होणे आणि नियोक्तांसाठी अनुपालनाच खर्च कमी करणे हे देखील अपेक्षित आहे.

५. मसुद्याच्या नियमांनुसार या वेतन संहितेमध्ये आठ तासाचा कामकाजाचा दिवस अनिवार्य असेल. कारखाना कायद्यांतर्गत कामाचे तास बदलण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही. यापूर्वी अशी अपेक्षा होती की कोरोनाच्या अर्थव्यवस्थेच्या परिणामामुळे सरकार कामाचे तास वाढवू शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here