TATA- एअरबस प्रकरणात ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी; भाजपचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांता -फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि मागच्या काळातील ठाकरे सरकार एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच आता भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून एकामागून एक ट्विट करत हा प्रकल्प गुजरातला जाण्यास महाविकास आघाडीचं जबाबदार असल्याचे म्हंटल आहे तसेच. ‘एअरबस टाटा’ प्रकरणात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली आहे.

एअरबस टाटा’ प्रकरणात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. उद्धव ठाकरे अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच ‘एअरबस टाटा’ गुजरातमध्ये गेली. भारताने 126 C-295 Medium Combat Aircraft साठी विविध निविदा मागवल्या होत्या. त्यात एयरबसची निवड करण्यात आली. मोदीजींनी 2015 साली एयरबसच्या फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी या विमानांचा स्पेनमधून पुरवठा करण्याचा प्रस्ताव एयरबसने ठेवला.

2017 मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत यातील काही विमाने भारतात बनवायची मागणी भारत सरकारने केली. त्यानंतर टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने 2020 मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली. यावेळी महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रस्ताव दिल्याची नोंद नाही असा आरोप भाजपने केला.

सप्टेंबर 2021 मध्ये बंगळूरू, हैद्राबाद, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील प्रस्ताव तपासून ढोलेरा येथे प्रकल्प टाकायचा प्राथमिक निर्णय घेतला. या काळात महाराष्ट्र सरकारने कोणतीही प्रस्ताव व या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची नोंद सरकार दरबारी कुठेही आढळून आलेली नाही. फेब्रुवारी 2022 ला पुन्हा एकदा प्रकल्पाचा पुन्हा विश्लेषण करण्यात आले. यावेळी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून कोणीही एयरबसच्या अधिकाऱ्यांना भेटल्याची नोंद नाही.

सप्टेंबर 2022 मध्ये एयरबसच्या प्रकल्पासाठी (6 प्रस्तावित प्रकल्प आहेत) महाराष्ट्र सरकार उत्सुक असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना बोलल्याची नोंद आहे. एयरबसशी चर्चा न करता प्रकल्प महाराष्ट्रात कसा येऊ शकतो ? यावर महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे तब्बल अडीच वर्षात एकही प्रकल्प महाराष्ट्रात का आले नाहीत? याचा अभ्यास जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी केला आहे का? असा सवाल भाजपने केला .

कोणताही उद्योग राज्यात स्वतः हुन येत नाही, उद्योग धंद्याना वातावरण पोषक हवं. खंडणी उकळून, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवून, राज्यातील उद्योग धंदे बंद उद्धव ठाकरेनी करायला लावले. त्याला साथ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 4 महिन्यात कोणत्याही प्रकल्पाची पायाभरणी होत नाही. यासाठी वर्षे दोन वर्षे प्लॅनिंग, बिडिंग असतो. हे मविआच्या ‘त्या’ दोन – तीन पत्रकारांना कळू नये? असे म्हणत भाजपने महाविकास आघाडीच्या कारभारावर आरोप केले आहेत .