महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजपच्यावतीने राज्यसभा निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की आघाडीतील नेत्यांना कळालाच नाही. ते आमचा गुडग्यात आहे म्हणत होते, पण आता ते गुडघ्यावर बसले आहेत. आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा शिकून घ्यावे, अशी टीका त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल खुद्द शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. देवेंद्रजी प्रेमळ आहेत, त्यांनी एक विश्वास तयार केला आहे. ते खरे पैलवान आहेत. त्याच्याकडून राज्यसभेच्या निवडणुकीतून अनेक डाव टाकण्यात आले. ते यांना कधी कळलेच नाही.

आता राज्यसभेची निवडणूक झाली आहे. राज्यसभेप्रमाणेच आम्हाला विधान परिषदेसाठीही मतदान होईल. अर्ज माघारीसाठी दोन दिवस उरले आहेत, शहाणे आणि समजूतदार असाल तर आताच अर्ज मागे घ्या आणि निवडणूक बिनविरोध करा, अन्यथा आम्ही लढणारच आहोत आणि जिंकणारही आहोत, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी दिला.

शिवसेनेच्या धमकावण्याविरोध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने अपक्ष आमदारांना बोलावून धमक्या दिल्या. अजून अडीच वर्ष आमचं सरकार आहे, त्यामुळे विकास निधीसाठी आमच्याकडेच यावं लागेल. मत नाही दिलं तर याद राखा, अशा धमक्या शिवसेनेने दिल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. विकासनिधी काय तुमच्या घरचा आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच शिवसेनेनं अपक्ष आमदारांना कोट्यवधी रुपये देण्याचे आमिष दाखवले, असंही पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. आमच्याशी बेईमानी करून सत्ता मिळवली. पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली ती नीट चालवून दाखवावे. खरं तर भाजपला विजय मिळाला असल्यामुळे महाविकास आघाडीच्या तोंडच पाणी पळाले आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

Leave a Comment