राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ ४७ केसेसमधून निर्दोष मुक्तता; कराड सत्र न्यायालयाचा निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

२०१२ आणि २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर एकूण ४७ केस दाखल करण्यात आल्या होत्या. आज या सर्व केसमधून कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर आज रोजी एकूण २ केस मध्ये शेट्टी, खोत यांना दोषींमुक्त करण्यात आले आहे. एकूण ४७ केस होत्या. त्या सर्व ४७ केस निकाली निघाल्या. आणि त्यात माझी निर्दोष मुक्तता झाली आहे अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. कराड सत्र न्यायालयाने याबाबत आज निकाल दिला.

कराड सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्यावर घटले दाखल झाले तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या मातीतील पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले होईल अशा अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी या सर्व अपेक्षा धुळीला मिळाल्या. एखादा सभ्य व्यक्तीसुद्धा राजकारणाच्या पटलावर सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे हे आहे असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण - खोत

दरम्यान, इंदापूरात आंदोलन करत असताना आम्ही काही कारणांनी जेलमध्ये गेलो. त्यावेळी आम्ही जेलमध्ये असताना शेतकऱ्याकडून बाहेर काही कृती सुरु होत्या. मात्र सदर कृत्यांत आम्ही जेलमध्ये असूनही आमचा सहभाग होता असे समजून त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment