“महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालतंय” ; मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र पाठवून काँग्रेसने ज्या किमान समान कार्यक्रमासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्या कार्यक्रमाची आठवण करुन दिली आहे. याबाबत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून “किमान समान कार्यक्रमावरच खरंतर महाविकास आघाडी सरकार चालत आहे आणि आम्ही पुढे चालत राहील, अशी प्रतिक्रिया कायंदे यांनी दिली आहे.

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, खरंतर महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावरच चालत आहे याची अनेक उदाहरणे देता येतील. गरिबांकडे, महिलांकडे, दलित आदिवासी ओबीसी वर्गातील लोकांना कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने चांगली मदत केली आहे.

आतापर्यंत शिवभोजन थाळीचे आठ कोटीच्या वर वाटप करण्यात आले आहे. गरीब मजूर विद्यार्थ्यांनाही मदत हे सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पुढेही करत राहणार आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रम आपला असून हे सरकार कुठेही मागे राहणार नाही, असेही यावेळी कायंदे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment