Friday, December 26, 2025
Home Blog Page 2732

Russia-Ukraine Crisis: पेट्रोल-डिझेलच्या किंमती 15 रुपयांनी वाढणार ? तज्ञांचे मत जाणून घ्या

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा चटका आपल्या खिशालाही बसेल. रशिया-युक्रेनमधील तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती वाढत होत्या आणि गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 103 डॉलर्सवर पोहोचल्या. गेल्या अडीच महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमती 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

गेल्या अडीच महिन्यांत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. अशा परिस्थितीत आता उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 103 डॉलर्सवर पोहोचली आहे. यापूर्वी 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत $100 च्या वर गेली होती.

दर इतके वाढू शकतात
3 नोव्हेंबरपासून देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र तेव्हापासून कच्चे तेल प्रति बॅरल $20 पेक्षा महाग झाले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 120 पर्यंत जाऊ शकते.

अशा परिस्थितीत देशांतर्गत तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रति लिटर 15 रुपयांनी वाढवू शकतात. ही वाढ एकाच वेळी न करता दोन-तीन टप्प्यांत केली जाण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत एलपीजी आणि सीएनजीच्या दरातही 10 ते 15 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

किंमती कधी वाढतील
उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर तेल कंपन्या दर वाढवतील, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. निवडणुकीच्या काळात तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत नाहीत, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. भाव वाढल्याने सरकारचे राजकीय नुकसान होते.

3 नोव्हेंबर रोजी सरकारने कमी केला होता टॅक्स
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्सही कमी केला. त्यामुळे दर कमी झाले. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. तेव्हापासून कच्च्या तेलात लक्षणीय वाढ झाली आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $80 होती, जी आता प्रति बॅरल $103 च्या वर पोहोचली आहे.

आज सेन्सेक्सच्या इतिहासातील 5वी सर्वात मोठी घसरण, बाकीच्या घसरणीबाबत जाणून घ्या

Share Market

नवी दिल्ली । युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याने भारतीय शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स 2702.15 अंकांनी म्हणजेच 4.72 टक्क्यांनी घसरून 54,529.91 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 815.30 अंकांनी किंवा 4.78 टक्क्यांनी घसरून 16247.95 वर बंद झाला. 23 मार्च 2020 नंतर सेन्सेक्समध्ये इतकी मोठी घसरण दिसून आली आहे. 23 मार्च 2020 रोजी सेन्सेक्स 4,035.13 अंकांनी घसरला होता.

आज सेन्सेक्सच्या इतिहासातील पाचवी मोठी घसरण पाहायला मिळाली. यापूर्वी 23 मार्च 2020 रोजी 4,035.13 अंकांची, 13 मार्च 2020 रोजी 3,389.17, 12 मार्च 2020 रोजी 3,204.30 आणि 16 मार्च 2020 रोजी 2,827.18 अंकांची घट झाली होती आणि ही सर्व मोठी घसरण कोरोनाच्या काळातील आहे.

आज बीएसईच्या सर्व सेक्टरल इंडेक्सवर जोरदार विक्रीचे वर्चस्व आहे. निफ्टीच्या सर्व 50 शेअर्सवर विक्रीचे वर्चस्व राहिले, तर सेन्सेक्सच्या सर्व 30 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

Sensex Worst Fall Ever, Sensex ki sabse badi girawat, Russian military operations impact on share market, BSE Sensex biggest fall ever, BSE market capitalization, सेंसेक्स की बड़ी गिरावट, सेंसेक्स इतिहास की बड़ी गिरावटें

फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत 28 लाख कोटी बुडाले आहेत
आज, गुरुवारी सलग सातव्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आजच्या ट्रेडिंगनंतर बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 242.28 लाख कोटी रुपये झाली. याच्या एक दिवस आधी हे मूल्य 255.68 लाख कोटी रुपये होते. या संदर्भात, केवळ एका दिवसाच्या व्यवसायात गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जर आपण फक्त फेब्रुवारी 2022 बद्दल बोललो तर आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 28 लाख कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे. BSE ची मार्केट कॅप 2 फेब्रुवारी रोजी 2,70,64,905.75 कोटी रुपये होते, जे आता 2,42,31,379.20 कोटी रुपये आहे.

रेल्वेच्या ‘या’ सौरऊर्जा प्रकल्पातून दरवर्षी होणार 1.8 मिलियन युनिट वीजनिर्मिती

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने पश्चिम मध्य रेल्वेच्या बिना येथे सोलर प्लांट सिस्टीम उभारली आहे. भारतीय रेल्वेच्या या पहिल्या सोलर पॉवर प्लांटचे वैशिष्ट्य म्हणजे ते थेट भारतीय रेल्वेच्या ट्रॅक्शन सिस्टीमला वीज पुरवठा करेल. या संयंत्रातून वर्षाला 1.8 मिलियन युनिट वीजनिर्मिती होणार आहे. अंदाजानुसार, यामुळे रेल्वेला दरवर्षी सुमारे 1.37 कोटी रुपयांची बचत होईल.

भारतीय रेल्वेने हाती घेतलेला हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे, ज्यामध्ये डायरेक्ट करंट (DC) सिंगल फेज अल्टरनेटिंग करंट (AC) मध्ये कन्व्हर्ट करण्याचा एक अभिनव दृष्टीकोन थेट रेल्वेच्या ओव्हरहेड ट्रॅक्शन सिस्टीमला पुरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे समाविष्ट आहे. बीना ट्रॅक्शन सब स्टेशन (TSS) जवळ सोलर प्लांट सिस्टीम स्थापित करण्यात आला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने हा सोलर फोटोव्होल्टेइक प्लांट यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे.

खरेतर, हा सोलर प्लांट सिस्टीम उभारण्याचे पाऊल भारतीय रेल्वेने तेव्हा उचलले जेव्हा त्यांनी रिन्यूएबल एनर्जी (RE) प्रकल्पांसाठी आपल्या मोकळ्या जमिनीचा वापर करण्याचे ठरवले जेणेकरुन त्यांच्या उर्जेच्या गरजांसाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि रेल्वे स्थानकांना सोलराइज करता येईल. या अंतर्गत, रेल्वे मंत्रालयाने आपल्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणावर सोलर प्लांट सिस्टीम उभारण्याचा निर्णय घेतला. सौर ऊर्जेचा वापर ‘नेट झिरो’ कार्बन उत्सर्जन रेल्वेमध्ये रूपांतरित करण्याच्या भारतीय रेल्वेच्या मोहिमेला गती देईल.

या अंतर्गत, भारतीय रेल्वेची सध्याच्या ऊर्जेची मागणी चालू असलेल्या सोलर प्लांटद्वारे पूर्ण केली जाईल, ज्यामुळे ती ऊर्जा स्वयंपूर्ण होणारी पहिली वाहतूक संस्था बनली आहे. यामुळे भारतीय रेल्वे हरित होण्यासोबतच ‘आत्मनिर्भर’ होण्यास मदत होईल. यापूर्वी, भारतीय रेल्वेच्या अनेक स्थानकांवर आणि इमारतींवर सुमारे 100 मेगावॅटची रूफटॉप सोलर सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर

HSC studant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परीक्षा तोंडावर असताना बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडलाच्यावतीने हा बदल करण्यात आला आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 5 मार्च रोजी होणारा पेपर आता 5 एप्रिल रोजी होणार आहेत. तर, 7 मार्चचा पेपर आता 7 एप्रिल रोजी होणार आहे.

पेपरच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अपरिहार्य कारणास्तव पेपर पुढे ढकलण्यात आल्याची बोर्डाने माहिती दिली आहे. येत्या चार मार्चपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. 5 मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. दरम्यान 7 मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, अरेबिक, मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. मात्र, आता अवेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

बदलण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 5 मार्च रोजी होणारे पेपर आता 5 एप्रिल रोजी होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत. 5 मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. हे पेपर आता 5 एप्रिलला होतील. तर, 7 मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. ते आता 7 एप्रिल रोजी होतील.

या दिवशी होणार प्रात्याक्षिक, श्रेणी परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुले अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

तिने प्रेमाला नकार देताच माथेफिरूने केले ‘हे’ कृत्य ते पाहून गोंदिया हादरले

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये अशी एक घटना उघडकीस आली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रेयसीची हातोड्याने वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिरामणटोला या ठिकाणी हि संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धनश्री हरिणखेडे असे मृत तरुणीचे नाव आहे तर दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

आरोपी गणेश हा धनश्री हरिणखेडे या तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. घटनेच्या दिवशी धनश्री दुपारी ट्युशनवरून परत येत होती. पण घरी येत असताना मृत्यू आपली वाट पाहत आहे याची किंचितसुद्धा कल्पना धनश्रीला नव्हती. यादरम्यान आरोपी गणेशने मध्येच तिचा रस्ता अडवला. आणि तिच्याशी वाद घालू लागला. काही कळायच्या आता गणेशने सोबत आणलेल्या हातोडीने धनश्रीच्या डोक्यावर सपासप वार केले. हा हल्ला एवढा भयंकर होता कि धनश्रीचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी गणेश हा कित्येक वर्षांपासून धनश्रीकडे प्रेमासाठी तगादा लावत होता. मात्र धनश्रीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या या माथेफिरू गणेशने हा हल्ला केला. यानंतर गावकऱ्यांनी आरोपी गणेशला घेरले. गावकऱ्यांचा जमाव बघितल्यानंतर गणेशने स्वतःला हातोडीने वार करत जखमी करून घेतले. यानंतर गावकऱ्यांनी आरोपी गणेशला पोलिसांच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी आरोपी गणेशवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, Moody’s ने GDP वाढीचा अंदाज 9.5 टक्क्यांपर्यंत वाढवला

नवी दिल्ली । रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने कॅलेंडर वर्ष 2022 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज 9.5% पर्यंत वाढवला आहे. मूडीजने यापूर्वी 7 टक्के विकास दराचा अंदाज दिला होता. 2023 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 5.5 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

मूडीजने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोना महामारी आणि दुसऱ्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे. मूडीजचा अंदाज RBI च्या अंदाजापेक्षा 60 बेसिस पॉइंट्सने जास्त आहे. 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज RBI ने व्यक्त केला आहे.

कॅलेंडर वर्षासाठी जारी केलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 23 मध्ये 8.4 टक्के आणि आर्थिक वर्ष 24 मध्ये 6.5 टक्के वाढ होऊ शकते. मात्र , केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण, 2021-22 मध्ये, पुढील आर्थिक वर्षासाठी 8-8.5 टक्के वास्तविक जीडीपी वाढीचा दर अंदाज वर्तवण्यात आला होता, तर अर्थसंकल्पात नॉमिनल जीडीपी वाढीचा दर 11.1 टक्के अंदाजित करण्यात आला होता.

मूडीजने 23 फेब्रुवारी रोजी आपल्या ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2022-23 रिपोर्टमध्ये म्हटले आहे, “भारतातील सेल्स टॅक्स कलेक्शन, रिटेल एक्टिव्हिटी आणि PMI ताकद दर्शवते. मात्र, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि पुरवठ्यातील अडचणींचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.”

मूडीजने म्हटले आहे की, “इतर अनेक देशांमधील कॉन्टॅक्ट बहुल सर्विसेज सेक्टर्स मधील रिकव्हरी मंद आहे, मात्र ओमिक्रॉनचा प्रभाव कमी झाल्यामुळे वेग वाढला पाहिजे,”. कोविडच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे, शाळा आणि महाविद्यालये उघडण्यासह बहुतांश निर्बंध हटवून देश सामान्य स्थितीकडे वाटचाल करत आहे.

“तेरी भी चूप, मेरी भी चूप” असे महाविकास आघाडी सरकारचे सुरु; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या प्रकरणी महाविकास आघाडीने मलिक याचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला आहार. यावरून भाजपचे नेते विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “उद्या मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला. आणि जर राष्ट्रवादीने सरकारचे पाठबळ काढायचे ठरवले तर आपणच राहिलो नाही तर राजीनामा घेऊन करायचे काय? या उद्देशाने “तेरी भी चूप, मेरी भी चूप” असे महाविकासआघाडी सरकारचे सुरु आहे,” अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

आज प्रवीण दरेकर यांनी ईडीच्या मलिकांवरील होत असलेल्या कारवाईवरून भाजपवर होत असलेल्या आरोपा प्रकरणी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, उद्या मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला आणि जर राष्ट्रवादीने सरकारचे पाठबळ काढायचे ठरवले तर आपणच राहिलो नाही तर राजीनामा घेऊन करायचे काय? या उद्देशाने “तेरी भी चूप, मेरी भी चूप” असे महाविकासआघाडी सरकारचे सुरु आहे.

नवाब मलिक यांनी नैतिकदृष्टया राजीनामा देणे आणि मुख्यमंत्र्यांनी तो घेणे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रवादीचा राजीनामा ते घेऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या पाठिंब्यावर सरकार आहे. त्यामुळे सरकार टिकवणे ही सर्वांची प्राथमिकता झाली आहे. ईडीची मलिक यांच्यावरील कारवाई कायद्याच्या चौकटीतच आहे. ईडी ही केंद्राची एक महत्वाची तपास यंत्रणा आहे. त्यामुळे ती अधिकार चाचपून कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करत असते, असे दरेकर यांनी म्हंटले.

Russia Ukraine Crisis : कच्च्या तेलावरच नाही तर सोयाबीन, गहू आणि मक्यावरही घोंगावतेय दरवाढीचे वादळ

नवी दिल्ली । रशियाने युक्रेनविरुद्ध केलेल्या युद्धाच्या घोषणेमुळे कच्चे तेल आणि सोन्याचे भाव तर वाढलेच आहे मात्र त्याबरोबरच गहू, सोयाबीन आणि मका यांच्या किंमतीतही मोठी उसळी आली आहे. रशिया हा गव्हाचा मोठा उत्पादक देश असून आता युद्धामुळे जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर देखील परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

त्याचप्रमाणे सोयाबीन आणि मक्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधील हे युद्ध पुढे काय स्वरूप घेईल याची कोणालाच कल्पना नाही. म्हणूनच गुंतवणूकदार इक्विटीमधून बाहेर पडत असताना आणि सेफ हेवन ऍसेट्समुळे सोने खरेदी करत असतानाच खाद्यपदार्थांची मागणीही वाढली आहे.

रशिया आणि युक्रेन हे जगातील सर्वात मोठे गहू निर्यातदार आहेत
मक्यानंतर गहू हे जगातील दुसरे सर्वात मोठे धान्य आहे. या धान्याच्या उत्पादनात रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश आघाडीवर आहेत. रशिया 18% पेक्षा जास्त गहू निर्यात करतो. युक्रेन या बाबतीत 5 व्या स्थानावर आहे. जगभरात केवळ हे दोनच देश 25.4% गव्हाची निर्यात करतात. 2019 मध्ये रशियाने जगभरात 60.64 हजार कोटी रुपयांचा गहू निर्यात केला. त्याचबरोबर युक्रेनने 2019 मध्ये 23.16 हजार कोटी रुपयांचा गहू इतर देशांना निर्यात केला आहे.

कृषी मालाची तेजी
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम अनेक वस्तूंवर झाला आहे. रबराची किंमत 38 आठवड्यांच्या उच्चांकावर गेली आहे. त्याचवेळी सोयाबीनच्या दरात मोठी झेप घेतली असून ते दीड वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर ट्रेड करत आहेत. गव्हाच्या किंमतीत मोठी झेप घेतली असून गेल्या 9 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर गव्हाची विक्री होत आहे. आणखी एका कृषी कमोडिटी मका (कॉर्न रेट) मध्ये देखील तेजीचे वातावरण आहे आणि किंमती 33 आठवड्यांच्या उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.

निकेल आणि अ‍ॅल्युमिनियममध्येही झाली विक्रमी वाढ
प्लॅटिनमच्या दरातही मोठी उसळी आली आहे. सध्या त्याचा दर 14 आठवड्यांच्या उच्चांकावर $1100 प्रति टन असल्याचे सांगितले जात आहे. पॅलेडियमचा दर 24 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे आणि $2400 oz वर ट्रेड करत आहे. अ‍ॅल्युमिनियमचे दरही आता विक्रमी पातळीवर आहेत, त्यामुळे निकेलच्या किंमती 10 वर्षांच्या उच्चांकावर आहेत.

सोने 13 महिन्यांच्या उच्चांकावर
सोन्याची चमक वाढली आहे. भू-राजकीय जोखीम वाढल्यामुळे, MCX वर सोने 2.15 टक्क्यांनी वाढून 51750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये सोन्यामध्ये सुमारे 1300 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने प्रति औंस 1950 डॉलरचा दर गाठला आहे. वाढत्या भू-राजकीय जोखमीमुळे नजीकच्या काळात सोन्याचा दृष्टीकोन खूप मजबूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोन्याचा भाव अल्पावधीतच 53000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. त्याचवेळी क्रूडच्या किंमती पेटल्या असून सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील नागरिक अडकले; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. भारतातील 20 हजार नागरिक युक्रेन मध्ये स्थायीक असून अनेक विद्यार्थ्यांचा देखील त्यात समावेश आहे. युक्रेन मधील एकूण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून मराठी नागरिकांच्या सुटकेसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरुप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत”, अशी माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे

दरम्यान, रशिया आणि युक्रेनच्या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता हस्तक्षेप करावा अशी मागणी भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ इगर पोलिखा यांनी केली आहे. नरेंद्र मोदी हे प्रभावशाली नेते आहेत. त्यांनी काहीही करून पुतीन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष जेनेंस्की यांच्यात चर्चा घडवून आणावी. मोदींनी या प्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Russia-Ukraine War : शेअर बाजारात खळबळ, गुंतवणूकदारांचे झाले 13.32 लाख कोटींचे नुकसान

Stock Market

नवी दिल्ली । रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये घबराट पसरली आहे. या देशांमधील संघर्षामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात गोंधळ उडाला. यामुळे भारतीय शेअर बाजार सलग सातव्या ट्रेडिंगचा दिवशी घसरणीसह बंद झाला आहे. फक्त आजच्याच घसरणीत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये BSE लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 242.28 लाख कोटी रुपये होती. याच्या एक दिवस आधी ही रक्कम 255.68 लाख कोटी रुपये होती. या संदर्भात, केवळ एका दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले
फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28 लाख कोटींहून जास्तीचे नुकसान झाले आहे. BSE ची मार्केट कॅप 2 फेब्रुवारी रोजी 2,70,64,905.75 कोटी रुपये होती, जी आता 2,42,31,379.20 कोटी रुपये झाली आहे. अशा प्रकारे फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेन्सेक्स 2700 अंकांनी घसरला, निफ्टी 16250 च्या खाली बंद झाला
गुरुवारी, 23 मार्च 2020 नंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 2702.15 अंक किंवा 4.72 टक्क्यांनी घसरून 54,529.91 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 815.30 अंकांनी म्हणजेच 4.78 टक्क्यांनी घसरून 16247.95 वर बंद झाला. गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, यूपीएल, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अदानी पोर्ट्सला निफ्टीचा सर्वाधिक फटका बसला. BSE मिड आणि इंडेक्स निर्देशांक 5 टक्क्यांनी घसरला आहे.