Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2788

टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची मार्केट कॅप 1.03 लाख कोटींनी घसरली, TCS ला बसला सर्वाधिक फटका

Recession

नवी दिल्ली ।सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांची मार्केटकॅप गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,03,532.08 कोटी रुपयांनी घसरली. मार्केट कॅपच्या बाबतीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ला सर्वाधिक फटका बसला.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये वाढ
गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 491.90 अंकांनी किंवा 0.83 टक्क्यांनी घसरला. टॉप 10 कंपन्यांमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप वाढले. रिपोर्टिंग वीकमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप 30,474.79 कोटी रुपयांनी वाढून 16,07,857.69 कोटी रुपयांवर पोहोचली. दुसरीकडे, TCS ची मार्केटकॅप 44,037.2 कोटी रुपयांनी घसरली आणि 13,67,021.43 कोटी रुपयांवर आली.

कोणत्या कंपनीचे किती नुकसान झाले?
HDFC ची मार्केटकॅप 13,772.72 कोटी रुपयांच्या तोट्यासह 4,39,459.25 कोटी रुपयांवर घसरली. हिंदुस्थान युनिलिव्हरची मार्केटकॅप 11,818.45 कोटींनी घसरून 5,30,443.72 कोटी तर ICICI बँकेची मार्केटकॅप 9,574.95 कोटींनी घसरून 5,49,434.46 कोटी झाली. बजाज फायनान्सची मार्केटकॅप 8,987.52 कोटी रुपयांनी घसरून 4,22,938.56 कोटी रुपये आणि इन्फोसिसची मार्केटकॅप 8,386.79 कोटी रुपयांनी घसरून 7,23,790.27 कोटी रुपये झाले.

भारती एअरटेलने रिपोर्टिंग वीकमध्ये 3,157.91 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आणि तिची मार्केटकॅप 3,92,377.89 कोटी होती. HDFC बँकेची मार्केटकॅप 2,993.33 कोटी रुपयांनी घसरून 8,41,929.20 कोटी रुपयांवर आली. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केटकॅप 803.21 कोटी रुपयांनी घसरून 4,72,379.69 कोटी रुपयांवर आली.

टॉप 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे
टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

राकेश झुनझुनवाला यांना ‘या’ शेअर्समुळे एकाच दिवसात झाला 426 कोटींचा तोटा

Rakesh Jhunjhunwala

नवी दिल्ली । शेअर बाजारात गुंतवणूक केल्यावर अनेक वेळा गुंतवणूकदारांना अनेक वेळा मोठे नुकसानही सहन करावे लागते. हे नुकसान कधीकधी खूप मोठे असते, ज्यामुळे गुंतवणूकदाराच्या निव्वळ मूल्यावरही परिणाम होतो. बिग बुल असलेले राकेश झुनझुनवाला यांनाही असाच एक झटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.

खरं तर, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या टायटन आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सला शुक्रवारी 426 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. जर तुमच्याही पोर्टफोलिओमध्ये या दोन कंपन्यांचे शेअर्स असतील तर त्याबाबत शहाणपणाने निर्णय घ्या.

महागाईने अमेरिकेचा खेळ बिघडवला
अमेरिकेत चलनवाढीचा दर 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर जागतिक बाजारात विक्रीचा जोर आला. त्यामुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारातही मोठी घसरण झाली.त्यामुळे टायटनचा शेअर एकाच दिवसात 53.20 रुपयांनी घसरला. त्याचप्रमाणे स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरच्या किमतीतही प्रति शेअर 18.55 रुपयांनी घसरण झाली. या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.

दोन्ही कंपन्यांची होल्डिंग किती आहे ते जाणून घ्या
टायटनच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीतील भागधारकांच्या पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांची कंपनीमध्ये होल्डिंग 3,57,10,395 इक्विटी शेअर्स (0.02 टक्के) आहे. रेखा झुनझुनवाला यांची होल्डिंग 95,40,575 (1.07 टक्के) आहे. अशा प्रकारे, दोघांची एकत्रित होल्डिंग 5.09 टक्के म्हणजेच 4,52,50,970 शेअर्स आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये दोघांचे मिळून 10,07,53,935 (17.50 टक्के) शेअर्स आहेत.

टायटनने दिला 240 कोटींचा धक्का
टायनेटॉनच्या शेअर्समध्ये 53.20 रुपयांची घसरण झाल्याने राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 240 कोटी रुपयांची घसरण झाली. त्याचप्रमाणे स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या घसरणीमुळे 186 कोटी रुपयांचे नुकसान झाले. दोघांना मिळून 426 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

उस्मानाबादच्या खेळाडूसाठी 3 संघात चुरस; अखेर चेन्नईने मारली बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सुरू असून आजच्या दुसऱ्या दिवशी अनेक खेळाडूंना लॉटरी लागली. त्यातच उस्मानाबाद चा अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर याला आपल्या संघात घेण्यासाठी 3 संघात जोरदार चुरस रंगली होती. अखेर त्यात चेन्नई सुपर किंग्स ने बाजी मारत त्याला आपल्या ताफ्यात सामील केलं.

राजवर्धन हंगरगेकरसाठी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये चढाओढ सुरू होती. अखेर चेन्नईने या बिडींग वॉरमध्ये बाजी मारली. चेन्नई ने राजवर्धन ला 1.50 कोटींना घेतले. विशेष म्हणजे राजवर्धनची बेस प्राईझ फक्त 20 लाख होती. यंदाच्या आयपीएल मध्ये राजवर्धन पिवळ्या जर्सी मध्ये दिसेल.

कोण आहे राजवर्धन हंगरगेकर-

राजवर्धन हंगरगेकर हा मूळचा उस्मानाबादचा खेळाडू आहे. राजवर्धन अष्टपैलू खेळाडू आहे. यावर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्यात राजवर्धन हंगरगेकरचा मोलाचा वाटा होता. राजवर्धन हंगरगेकर हा वेगवान गोलंदाज असून उच्च क्रमवारीत धावा काढण्यासाठी ओळखला जातो.

कंपनी अधिकाऱ्याच्या पत्नीचे बॅंक खाते साफ

औरंगाबाद – पैठण येथील औषधी कंपनीच्या उपमहाव्यवस्थापकाच्या पत्नीस ऑनलाइन भामट्याने एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगून 1 लाख 11 रुपयांना फसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सातारा ठाण्यात जिडू छायादेवी जे.व्ही.एस शंकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 12 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी ऑनलाईन किराणा व मेडिसिन खरेदी करण्यासाठी त्यांनी मोबाईल मधून ॲमेझॉन संकेतस्थळ उघडून आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्डची माहिती भरून पैसे अदा करण्याचा प्रयत्न केला. पैसे जात नसल्यामुळे फोन पे द्वारे पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला, तरी ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे गुगलच्या संकेतस्थळावरून फोन पे कस्टमर केअरचा नंबर शोधला. फोन केल्यानंतर संबंधितांने एनी डेक्स ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला. त्याने गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. तसेच बँकेची सर्व कागदपत्रे फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवण्यासही सांगितले.

छायादेवींनी बँकेची कागदपत्रे मोबाईल मध्ये फोटो काढून ठेवली. त्यानंतर काही वेळातच बँकेच्या खात्यातून दोन वेळा 50 हजार 5 रुपये वजा झाले. हा प्रकार शेजाऱ्यास सांगितल्यानंतर त्यांनी बँकेच्या कस्टमर केअर सोबत बोलून खाते गोठवले.

महागाईचे आकडे आणि कंपन्यांचे तिमाही निकालांचा शेअर बाजारांवर होईल परिणाम

Recession

नवी दिल्ली । या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात अस्थिरता राहील. यामागील मुख्य कारण म्हणजे भू-राजकीय चिंता आणि अमेरिकेतील व्याजदरात झालेली वाढ. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सध्या बाजारातील व्यवहार एका मर्यादेत राहील. ते म्हणतात की,” या आठवड्यात गुंतवणूकदारांच्या नजरा जागतिक कल, महागाईचा डेटा आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांवर असतील. आता तिमाही निकालांची अंतिम फेरी आहे.”

याशिवाय रुपयाची अस्थिरता, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कल आणि ब्रेंट क्रूडच्या किमती या गोष्टीही बाजाराची दिशा ठरवतील. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणतात की,”अमेरिकेत व्याजदरात मोठी वाढ होण्याची शक्यता असताना जगभरातील बाजारपेठा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भू-राजकीय तणावामुळे चिंता कायम आहे.”

निवडणूक निकाल आणि महागाईचे आकडे यावर लक्ष ठेवून
मीना सांगतात की,” देशांतर्गत आघाडीवर, घाऊक आणि किरकोळ महागाईचे आकडे या आठवड्यात येणार आहेत. कंपन्यांच्या तिमाही निकालांची ही अंतिम फेरी आहे. याचा परिणाम बाजाराच्या दिशेवर होईल. काही विशिष्ट शेअर्समध्ये घडामोडी पाहिल्या जाऊ शकतात. याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांशी संबंधित घडामोडींवरही गुंतवणूकदार लक्ष ठेवतील.” FII ची भूमिका देखील भारतीय बाजारांसाठी महत्त्वाची ठरेल, कारण ते सध्या जोरदार पैसे काढत आहेत. मात्र, शुक्रवारी FII ने भारतीय शेअर्समध्ये निव्वळ 108.53 कोटी रुपये ओतले. या महिन्यात, FII ने भारतीय भांडवली बाजारातून निव्वळ 14,930 कोटी रुपये काढले आहेत.

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांचाही परिणाम होईल
सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चच्या प्रमुख येशा शाह यांनी सांगितले की,”यूएसच्या चलनवाढीच्या आकडेवारीवर आलेल्या प्रतिक्रियेनंतर गुंतवणूकदार आता फेडरल रिझर्व्हची कारवाई समजून घेण्याचा प्रयत्न करतील. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा तपशील जाहीर होणार आहे. याशिवाय गुंतवणूकदार चीनच्या महागाईच्या आकडेवारीवरही लक्ष ठेवतील.” दलाल-स्ट्रीटचे गुंतवणूकदार देशांतर्गत चलनवाढीच्या आकडेवारीवरही लक्ष ठेवतील. एकूणच या घडामोडींमुळे बाजारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक बाजारावर आहे
रेलिगेअर ब्रोकिंगचे व्हाइस प्रेसिडेंट रिसर्च अजित मिश्रा यांच्या मते, महत्त्वाच्या घडामोडी मागे टाकल्यानंतर आता गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक बाजार आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांवर असेल. मॅक्रो आघाडीवर, बाजार सोमवारी औद्योगिक उत्पादन (IIP) डेटावर प्रतिक्रिया देईल. त्याचवेळी, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की,”जागतिक कल आणि देशांतर्गत आघाडीवरील मॅक्रो इकॉनॉमिक डेटावरून या आठवड्याच्या बाजाराची दिशा ठरवली जाईल.”

धारावीत दिवसाढवळ्या दबा धरून बसलेल्या दोघांकडून तरुणावर अंदाधुंद गोळीबार

firing

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील धारावी परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी एका तरुणावर अंदाधुंद गोळीबार केला. ज्या तरुणावर हा हल्ला करण्यात आला त्याला चार गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. या जखमी तरुणाला उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धारावी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. हा हल्ला करणाऱ्या दोन्ही मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात आली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आमिर आहे. तो धारावी परिसरातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी हा तरुण नैसर्गिक विधीसाठी पिला बंगलो परिसरालगत असणाऱ्या मोकळ्या मैदानात गेला होता. नैसर्गिक विधी उरकल्यानंतर तो परत आपल्या घराच्या दिशेनं येत होता. यावेळी दबा धरून बसलेल्या दोन जणांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. आपल्या अचानक हल्ला झाल्याचे समजताच आमिरने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी टॅक्सीच्या दिशेनं पळ काढला. पण आरोपींनी पाठलाग करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

या हल्ल्यामध्ये आमिरला चार गोळ्या लागल्या आहेत. घडलेल्या प्रकार जखमी आमिरच्या एका मित्राने पाहिल्यानंतर त्याने आमिरला उपचारासाठी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. हल्ला झालेला तरुण आणि आरोपी हे सगळे गुन्हेगारी प्रवृतीचे तरुण आहेत. हा हल्ला ड्रग्स तस्करीच्या वादातून झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. मात्र पोलिसांनी याला कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिलेला नाही. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीं विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

भाजपने सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा; शंभूराज देसाईंनी उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली

Shambhuraj desai chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील माहाविकास आघाडीचे सरकार १० मार्च नंतर पडेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर महाविकास आघाडी तील नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई याना विचारले असता त्यांनी एका वाक्यात चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली

शंभूराज देसाई म्हणाले भाजपाने महविकास आघाडी सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा. माहाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून दोन वर्षात भाजपाने अनेक मुहूर्त सांगितले. मात्र सरकार इंचभरही हलले नाही आणि येथून पुढेही हलणार नाही असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनीही चंद्रकांत दादांच्या विधानाची खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटील हे निष्पाप आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण सरकार पडत नाही. त्यातून नैराश्य येतं. मग पुढची तारीख देतात असा टोला त्यांनी लगावला

 

सैन्यदलातील सेवानिवृत्त जवानाचे अनोख्या पध्दतीने स्वागत

सातारा | गेली 22 वर्षे 7 महिने भारतीय सैन्यदलात देशसेवा बजावलेले देशमुखनगर (जावळवाडी) येथील विनोद सयाजी जगताप यांचा सेवानिवृत्तीने उत्साहात स्वागत करण्यात आले. तरूणांनी मोटार सायकल रॅली काढून मायभूमीत उत्साहात अनोख्या पध्दतीने मिरवणूक काढून जवान विनोद जगताप यांचा सत्कार केला.

जावळवाडी येथील गिरणी कामगार सयाजी जगताप यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या एकुलत्या एका मुलाला शिकवले. आई आक्काताई यांनी विनोद यांच्या शिक्षणावर जास्त केंद्रित करून सैनिक बनविण्यासाठी जास्त भर दिला. विनोद हे बाविस वर्षापूर्वी इंदोर येथे सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी वेस्ट बंगाल, जम्मू, पंजाब अमृतसर, काश्मीर कुपवाडा, संयूक्त राष्ट्र शांतीसेना, बांग्लादेश, गुजरात कच्छ, त्रिपूरा, याठीकानी येथे देशसेवा केली.

सेवानिवृत्त जवान विनोद जगताप म्हणाले की, बावीस वर्षे सेवा बजावत असताना जम्मू येथे ड्युटीवर असताना रात्री आठच्या दरम्यान आमच्या कंपनीवरती अफगानी, पाकिस्तानी अतिरेक्यांनी आर्धा तास गोळीबार चालवला होता. यावेळी आमच्या 70 जवानांनी त्या अतिरेक्यावरती प्रतीहल्ला करून पळविले होते. देशसेवा करण्याची मला चांगली संधी मिळाली. आजच्या तरूणांनी देशसेवेसाठी प्रयत्न करावेत. आजचा माझा सन्मान हा भारत मातेचा सन्मान आहे.

विनोद यांचे जन्मभूमीत ठिकठीकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. पुणे- बंगलोर महामार्गावरील निसराळे फाटा येथून तरूणांनी व ग्रामस्थांनी मोटार सायकल रॅली काढून सेवानिवृत्त जवानाचा सन्मान केला. यावेळी आजी- माजी सैनिकांचा, पोलीस सेवानिवृत्त यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक सतिश जाधव यांनी केले. आभार सतिश काटकर यांनी मानले.

अभिनेत्री आसावरी जोशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कलाकारांचे इनकमिंग जोरात सुरू आहे. त्यातच आता भर पडत असून मराठी अभिनेत्री आसावरी जोशी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी 15 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचा घड्याळ हातात बांधणार आहेत.

आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा सोहळा मुंबईत पार पडेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या पक्षप्रवेश सोहळ्यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान आसावरी यांनी याअगोदर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आपण चित्रपटसृष्टी, कला आणि कलाकार यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे आसावरी जोशी म्हणाल्यात. पुढच्या काळात पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आपल्या क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे आसावरी जोशी यांनी सांगितले.

विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकामुळे गावागावात राजकारण तापले

Election

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका लागल्या आहेत. विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकामुळे गावा- गावातील व भावकी- भावकीतील राजकारण चांगलेच तापलेले आहे. पाच वर्षांनी होणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र जिल्हा बॅंकेच्या ठरावासाठी व आपल्यालाच मत मिळावे, यासाठी नेत्यांनी चांगलीच कंबर कसलेली आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जिरवाजिरवीचे राजकारण पहायला मिळाले. त्यानंतर आता विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही जिरवाजिरवीचे राजकारण सुरू आहे. ज्या विकास सेवा सोसायट्या बिनविरोध होत होत्या, त्या सोसायटीमध्येही निवडणुका लागलेल्या आहेत. जिल्हा बॅंकेत आपला ठराव पक्का व्हावा, यासाठी संचालक होण्यासाठी सावधानता म्हणून प्रत्येक नेता आत्तापासूनच सोसायटी ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु या राजकीय खेळीमुळे जिल्ह्यातील गावा- गावात विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

विकास सेवा सोसायटी ठराविक मतदार असल्याने भावकी- भावकीतील राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. गावा- गावात मोठमोठे बॅंनर लागलेले असून गाडी फिरवून लाऊड स्पीकरवही प्रत्येकजण प्रचार यंत्रणा राबवत आहे. सोसायटीला इतके महत्व नव्हते, असे जुने जाणते सांगत आहेत. तर दुसरीकडे जाहीर सभाचे फड चांगलेच गाजत आहेत. सभांमध्ये एकमेकांची उणीधुणी काढण्या बरोबर अश्वासनाची खैरातही केली जात आहे.