Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2985

‘कृष्णा’च्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के वेतनवाढ : चेअरमन डॉ. सुरेश भोसले

कराड | य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार 1 डिसेंबर 2021 पासून 12 टक्के वेतनवाढ लागू केल्याची माहिती चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. कारखान्यात सन 2021-22 या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 5 लाख 1 व्या साखर पोतीपूजन समारंभात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून कृष्णा कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आपण करत आलो आहोत. ऊस नोंदणीसाठी मोबाईल ॲप, ई करार यासारखे नाविन्यपूर्ण प्रयोग पहिल्यांदा कृष्णा कारखान्यात करण्यात आले. त्याचपद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना जी.पी.एस. प्रणालीचा वापरही इथून पुढे करण्यात येत आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना व कारखान्यास होणार आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत ‘कृष्णा’च्या कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी पैलवान आनंदराव मोहिते, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल प्रसाद राक्षे यांच्यासह शेतकरी सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सन्मान दातृत्वाचा!

काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी मजुरांचे अतोनात नुकसान झाले होते. या मजुरांना जेवण व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणाऱ्या शेतकऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये हेमंत धर्मे, शंकर निकम, पांडुरंग निकम, दीपक पाटील, समीर पाटील, शिवाजी थोरात, पृथ्वीराज काकडे, महादेव मोहिते, दिलीप गोरे, सुनील पाटील, हर्षवर्धन मोहिते, सदाशिव भोसले, अभिजित पाटील, विजय पाटील, अरुण पाटील, सच्चिदानंद साटपे यांचा समावेश आहे.

कोरोना पसरतोय ! घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना कोरोनाची लागण

corona virus

औरंगाबाद – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर या कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, बुधवारी औरंगाबाद शहरात 103 नव्या रुग्णांची, तर ग्रामीण भागात 17 रुग्णांची वाढ झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. रुग्णांच्या उपचाराच्या सोयी सुविधा वाढवण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये घाटी रुग्णालयात एक हजार खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. उपचार सोयी-सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने डॉ. रोटे या गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रम घेत होत्या.

दोन दिवसापूर्वी घाटीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून आढावा घेतला होता.

अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या टीमबद्दलची माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. त्यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प, 2022-23 हे भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी दिशा देईल, जे अजूनही अभूतपूर्व महामारीशी झुंज देत आहे. हा अर्थसंकल्प बनवण्यात त्यांच्या टीमचा मोठा वाटा आहे. चला तर मग त्यांच्या टीममधील सदस्यांबद्दल जाणून घेऊयात.

निर्मला सीतारामन
अर्थमंत्र्यांचा हा चौथा अर्थसंकल्प कोविड 19 महामारीनंतर त्यांनी सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाइतकाच महत्त्वाचा आहे. कदाचित कोविड 19 च्या नवीन व्हेरिएन्टचा विचार करता हाच जास्त महत्त्वाचा होईल. महामारी आणि आर्थिक मंदीच्या काळात सरकारच्या आर्थिक प्रतिसादासाठी त्या मुख्य चेहरा आहेत. त्यांनी गरीब कल्याण आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या कार्यक्रमांची घोषणा केली. आगामी अर्थसंकल्पासारखा अर्थसंकल्प अजून आला नसेल, असे आश्वासन सीतारामन यांनी दिले आहे.

टीव्ही सोमनाथन
नियमानुसार, अर्थ मंत्रालयाच्या पाच सचिवांपैकी सर्वात ज्येष्ठांना वित्त सचिव बनवले जाते. सध्या खर्च सचिव टी.व्ही.सोमनाथन यांच्याकडे ही जबाबदारी आहे. त्यांनी जागतिक बँकेत काम केले आहे आणि पंतप्रधान कार्यालयात सहसचिव म्हणूनही काम केले आहे. सोमनाथन हे तामिळनाडू केडरचे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2015 मध्ये, सोमनाथन यांनी पंतप्रधान कार्यालयात सहसचिव म्हणून काम केले. त्यांनी जागतिक बँकेतही काम केले आहे. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. सोमनाथनवर खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान असेल.

तरुण बजाज
तरुण बजाज हे अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव आहेत. अर्थमंत्रालयात येण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयातही काम केले आहे. ते 1988 च्या हरियाणा बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अनेक मदत पॅकेजवर काम केले आहे. तीन आत्मनिर्भर भारत पॅकेजला आकार देण्यात बजाज यांची भूमिका महत्त्वाची आहे.

तुहीन कांत पांडे
तुहीन कांत पांडे यांच्या खात्यावर सर्वांच्या नजरा असतील. तुहिन कांत हे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव आहेत. पांडे हे 1987 च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची ऑक्टोबर 2019 मध्ये DIPAM चे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

अजय सेठ
अर्थमंत्र्यांचे सर्वात नवीन सदस्य असूनही, सर्वांच्या नजरा आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांच्यावर असतील कारण DEA भांडवली बाजार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित धोरणांसाठी नोडल विभाग आहे. अजय सेठ हे 1987 च्या बॅचचे कर्नाटक कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. भारताच्या जीडीपीची वाढ टिकवून ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेत खाजगी भांडवली खर्चाचे पुनरुज्जीवन करण्याचे कठीण कामही सेठ यांच्याकडे असेल.

देबाशिष पांडा
देबाशीष पांडा हे अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात सचिव आहेत. अर्थसंकल्पातील आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व घोषणा या त्यांच्याच जबाबदारीत येतात. ते 1987 च्या उत्तर प्रदेश बॅचचे IAS आहेत. आर्थिक व्यवस्थेची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी RBI सोबत जवळून काम करण्याची जबाबदारीही पांडा यांच्याकडे आहे.

कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी आर्थिक अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधील प्रोफेसर लुगी जिंगल्स आणि रघुराम राजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे साध्य केले. डिसेंबर 2018 मध्ये सुब्रमण्यम यांना मुख्य आर्थिक सल्लागार बनवण्यात आले होते. ते बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणातील तज्ञ मानले जातात.

तर ‘डान्सिंग डॉल’ची प्रतिमा झाली असती; भाजपच्या ट्विटवर विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आज भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने वादग्रस्त टिप्पणी केली. त्याने केलेल्या टिप्पणीनंतर त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं झालं. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असतीर तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, असे विधान चव्हाण यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आज भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने वादग्रस्त पोस्ट केल्याच्या घटनेचा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं.

बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी म्हणून ओळख असलेल्या रश्मी ठाकरे यांची समाजात वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपमधील लोकांना सांगायचे आहे, असे चव्हाण यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.

काय आहे प्रकरण?

जितेन गजारीया याने रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या पोलिसांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जितेन गजारीया हा भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख असल्याचे सांगितले जात आहे. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती.

नायलॉन मांजाने दुचाकीस्वार महिलेचा कापला गळा

औरंगाबाद – बाजारात खरेदी करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेचा पतंगाच्या नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याची घटना काल सायंकाळी गुलमंडी परिसरात घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेवर पदमपुरा परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुभांगी सुनील वारद (45, रा. क्रांती चौक परिसर) असे जखमी महिलेचे नाव आहे.

शुभांगी या काल सायंकाळच्या सुमारास गुलमंडी परिसरात खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी झाल्यानंतर त्यात दुचाकी घेऊन घरी निघाल्या असता गुलमंडी ते मेच्वेल्ल दरम्यान अचानक पतंगाचा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. कुणीतरी हा दोरा ओढल्यासारखे झाल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी थांबून गळ्यात अडकलेला दोर पकडला. मात्र तोपर्यंत त्यांचा गळा चिरला गेल्याने झालेल्या जखमेतून रक्त निघू लागले.

ही बाब त्यांनी त्यांच्या पतिला कळवली त्यानंतर ॲड. सुनील वारद यांनी जखमी पत्नीला खाजगी दवाखान्यात दाखल केले.

आता शेअर्स तारण ठेवून घेता येणार कर्ज, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । काहीवेळा अशी काही परिस्थिती येते ज्यावेळी आपल्याला तातडीने पैशांची गरज भासते. यासाठी अनेक प्रकारे पैशांची व्यवस्था करता येऊ शकते. जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर आता आपत्कालीन परिस्थितीत शेअर्स तारण ठेवूनही कर्ज घेता येऊ शकेल. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला ऑनलाइन कर्ज मिळेल. तुमच्या सोयीनुसार शेअर्स तारण ठेवून मिळालेले कर्ज तुम्ही वापरू शकाल.

ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसची एनबीएफसी आर्म जिओजित क्रेडिट्सने बुधवारी शेअर्स (LAS) वर कर्ज देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला. जिओजित नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (NSDL) कोणत्याही डिमॅट खातेधारकाला शेअर्सवर डिजिटल पद्धतीने कर्ज देणारी पहिलीच कंपनी ठरली आहे.

moneycontrol.com च्या मते, कोचीमधील NSDL च्या MD, पद्मजा चंद्रू यांनी सांगितले की,”गुंतवणूकदारांना त्वरित लिक्विडिटी देण्यासाठी ही डिजिटल LAS सुविधा तयार करण्यात आली आहे. त्याचा उद्देश गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी फंडस् देणे किंवा तत्काळ वैयक्तिक खर्च पूर्ण करण्यात मदत करणे हा आहे.”

कर्ज कोण घेऊ शकतो ?
जिओजित ग्रुपचे संस्थापक आणि एमडी सी.जे. जॉर्ज यांनी या सुविधेच्या लॉन्च समारंभात सांगितले की,”जे ग्राहक LAS डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे शेअर्स गहाण ठेवून कर्जासाठी अर्ज करू इच्छितात त्यांच्याकडे त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये पात्र असलेल्या शेअर्सची फ्री होल्डिंग असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांचा CIBIL स्कोअर समाधानकारक असावा. NSDL मध्ये डिमॅट खाते असलेले सर्वजण या सुविधेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात. यासाठी ब्रोकर कोण आहे याने काहीच फरक पडत नाही.

ऑनलाइन कर्ज मिळवा
सी.जे. जॉर्ज म्हणाले की,”तुम्ही तुमच्या आवडीची योजना निवडू शकाल आणि सर्व कागदपत्रे ऑनलाइन करू शकाल.” ते म्हणाले की,”कर्जाच्या अर्जावर डिजिटल सिग्नेचर झाल्यानंतर आणि मंजूर झाल्यानंतर, रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि वापरलेल्या रकमेवर व्याज आकारले जाईल.”

तलवारीने केक कापणे आले अंगलट ! वाढदिवसाची भेट म्हणून तरुणाला मिळाले ‘हे’ गिफ्ट

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एका तरुणाला आपल्या वाढदिवसाचे चांगलेच गिफ्ट मिळाले आहे. त्याला आपल्या वाढदिवसादिवशीच तुरुंगाची हवा खावी लागली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या बर्थडे बॉयने आपल्या वाढदिवसानिमित्त दोन मित्रांना गोळा करून त्याने भर रस्त्यात तलवारीने केक कापला. तलवारीनं केक कापण्याचा हा प्रकार त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मुंबईतील कांदिवली भागात राहणाऱ्या सिलम बर्षम सुब्रह्मण्यम या 22 वर्षांच्या तरुणाने त्याच्या मित्रासोबत आपल्या बर्थडेचा केक कापण्याचे ठरवले. यानंतर त्याने कांदिवलीतील रघुलीला मॉलसमोरच्या फुटपाथवरच अगदी थाटात तलवारीने केक कापला. यावेळी एक मित्र त्याच्या शेजारी उभा होता, तर दुसऱ्या मित्राने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये तरुण तलवारीने केक कापताना दिसतो, तर त्याच्या शेजारी उभा असलेला आणि रेकॉर्डिंग करणारा मित्र त्याच्या वाढदिवसा निमित्त गाणे गाताना दिसत आहे. यावेळी सिलमने त्याच्यासमोर ठेवलेले तीन केक एकामागून एक कापले आणि वाढदिवस उत्साहात साजरा केला.

पोलिसांनी केली अटक
स्वतःजवळ तलवार बाळगणे आणि रस्त्यावर ती परजणे हा एक प्रकारे गुन्हा आहे. त्यातच या मुलांनी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्यामुळे कापल्यामुळे अनेकांनी यावर आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकऱणी सिलम आणि त्याचा मित्र कौसर खान यांना अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.

पंतप्रधानांच्या सभेला सर्वच खुर्च्या रिकाम्या? म्हणुनच मोदींनी सुरक्षेचं कारण देत पळ काढला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत कोणतीही गोष्ट घडली कि त्याची जोरदार चरचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर होते. अशात पंजाब दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. या घटनेचीही चर्चा होऊ लागली आहे. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. या घटनेवरून काँग्रेसनेही मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने इंट्राग्रामवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी इंट्राग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यावर “सुरक्षा मी चूक तो बहाणा है, कुर्सिया खाली है इज्जत तो भी बचानी है”, असे लिहले आहे. त्या फोटोमध्ये एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या गाडी आणि सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह अडकलेले दिसत आहेत.

तर दुसऱ्या फोटोत पंतप्रधान मोदी हे ज्या सभेला जाणार होते. त्या ठिकाणी असलेल्या खुर्च्या रिकाम्या होत्या. या रिकाम्या खुर्च्या असल्याचे समजल्यावर कदाचित मोदींनी आपली इज्जत वाचवण्यासाठी हा दौरा रद्द केला असावा, असे काँग्रेसने या दोन्ही फोटोतून सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CYWgkieJLZe/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला पंजाब दौरा अचानक रद्द केल्याने या प्रकारानंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तर नड्डा यांच्या टीकेला काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिले. काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

 

पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?

पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावे लागले. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Share Market Today : नवीन वर्षात बाजार पहिल्यांदाच घसरणीने बंद, कोणता शेअर जास्त पडला जाणून घ्या

Stock Market Timing

नवी दिल्ली । 6 जानेवारी 2022 रोजी, गुरुवारी भारतीय शेअर बाजार रेड मार्कवर बंद होताना दिसला. गेल्या तीन दिवसांपासून सतत बाजारात प्रचंड रॅली दिसत होती. मात्र गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी गुंतवणूकदारांना निराश व्हावे लागले. निफ्टी 50 0.99% ने घसरून 17748.30 वर बंद झाला.

BSE सेन्सेक्स 1.01% किंवा 609.61 अंकांनी घसरून 59613.54 वर बंद झाला. निफ्टी बँक इंडेक्स 0.56% किंवा 210.60 अंकांनी घसरून 37485.30 वर बंद झाला.

कोणते शेअर पडले आणि कोणते वाढले ?
गुरुवारी, निफ्टी 50 च्या टॉप गेनर्समध्ये UPL, IndusInd Bank, Bajaj Auto, Bharti Airtel आणि Maruti चा समावेश होता. जर आपण टॉप लूझर्सबद्दल बोललो तर JSW Steel, Ultratech Cement, Shri Cement, Tech Mahindra आणि Reliance Inds.ने सर्वात मोठी घसरण दर्शविली.

NSE मध्ये टॉप गेनर्स आणि टॉप लूझर्स

वर जाणारे टॉप 5 घसरणारे टॉप 5
UPL +2.39 % JSW Steel -2.96 %
IndusInd Bank +1.96 % Tech Mahindra -2.62 %
Bajaj Auto Ltd. +1.78 % UltraTech Cement -2.62 %
Bharti Airtel +1.49 % Shree Cement -2.52 %
Eicher Motors +1.39 % Reliance Inds. -2.15 %

 

BSE मध्ये टॉप गेनर्स आणि टॉप लूझर्स

वर जाणारे टॉप 5 घसरणारे टॉप 5
Jain Irrigation + 9.94 % Tube Investments -4.92 %
Poonawalla Fincorp + 9.36 % India Tourism De -4.69 %
NBCC (India) + 7.73 % Paisalo Digital L -4.08 %
Maha. Seamless + 7.01 % Quess Corp -4.03 %
Elgi Equipments + 6.45 % Brigade Enterprises -3.93 %

किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ, मार्च 2019 नंतर डिमॅट खात्यांची संख्या दुपटीने वाढली

Stock Market

मुंबई । देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (SEBI) अध्यक्ष अजय त्यागी यांनी बुधवारी सांगितले की, “बाजार आणि ब्रोकरेज कंपन्यांनी गेल्या दोन दशकांत ज्या गोष्टी साध्य केल्या होत्या त्या आता केवळ दोन वर्षांत साध्य झाल्या आहेत. नोव्हेंबर 2021 पर्यंत 7.7 कोटींवर पोहोचलेल्या डिमॅट खात्यांच्या संख्येवरून हे स्पष्ट होते. मार्च 2019 मध्ये डिमॅट खात्यांची संख्या 3.6 कोटी होती.”

कोरोना विषाणूच्या साथीमुळे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे घरातून कामाची सुरुवात करून लाखो तरुण गुंतवणूकदार म्हणून बाजारात उतरले आहेत. तेव्हापासून ब्रोकरेज कंपन्यांनी सुमारे 10 लाख डिमॅट खाती उघडली आहेत. यामध्ये 75 टक्के गुंतवणूकदार 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

दर महिन्याला सरासरी 4 लाख नवीन डिमॅट खाती उघडली जातात
त्यागी म्हणाले, “जागतिक ट्रेंडच्या अनुषंगाने, आम्ही भांडवली बाजारात प्रवेश करणाऱ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ पाहिली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षापासून दर महिन्याला सरासरी 4 लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. 2021 मध्ये ते दरमहा 20 लाखांवर तिप्पट झाले आणि नोव्हेंबर 2021 मध्ये ते सुमारे 29 लाख प्रति महिना झाले. हे आर्थिक वर्ष 2019-20 मधील प्री-कोविड पातळीपेक्षा सात पटीने जास्त आहे.”

ते म्हणाले, “वास्तविक, कम्युलेटिव्ह डिमॅट खात्यांची संख्या मार्च, 2019 मध्ये 3.6 कोटींवरून नोव्हेंबर, 2021 मध्ये 7.7 कोटी झाली. खरे तर दोन दशकांहून जास्त काळात जे साध्य झाले ते सुमारे अडीच वर्षांत साध्य झाले.

निफ्टी इंडेक्सची 25 वर्षे आणि देशातील फ्युचर्स ट्रेडिंगची 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, NSE सीईओ विक्रम लिमये म्हणाले की,”निफ्टी 50 इंडेक्स 22 एप्रिल 1996 रोजी लॉन्च करण्यात आला होता. हा इंडेक्स 13 क्षेत्रांमधील 50 मोठ्या आणि मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग केलेल्या इंडेक्सचे प्रतिनिधित्व करतो. 25 वर्षांत त्यात 15 पटीने वाढ झाली आहे. याने वार्षिक 11.2 टक्के रिटर्न दिला आहे.