Monday, December 8, 2025
Home Blog Page 3718

शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला परवानगी द्या – खा. जलील

imtiaz jalil

औरंगाबाद | बुधवारी खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्ड अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांची भेट घेतली. राज्य शासनाने सोबतच भागीदारी तत्वावर मान्यता मिळालेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला
लवकर सुरुवात करण्यासाठी आणि प्रशासकीय मंजुरी देऊन काम सुरू करण्यासाठीचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली.

खासदार इम्तियाज जलील यांनी विकासाच्या दृष्टीने, नागरिकांची मागणी आणि गरज, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रेल्वे केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सतत पाठपुरावा केला होता. यानंतर रेल्वे प्रशासनाने आणि शासनाने शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या 38.7 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. यावेळी रेल्वे प्रशासनाने भागीदारी तत्त्वावर 16 पॉइंट 55 कोटी निधीची मंजुरी देऊन राज्य शासनाला 22.5 कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती केली होती. याच निमित्ताने खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या रास राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यशासनाच्या भागीदारी तत्वावरील 22.5 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी करून घेतली होती. खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनित शर्मा यांना रेल्वे रुळापलीकडील 2 लाख हुन जास्त नागरीकांना प्रवास करताना येणाऱ्या गंभीर समस्या व अडअडचणींची सविस्तर माहिती देऊन शासनस्तरावरुन काम सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी करुन नागरिकांचे प्रश्न मांडले.

यासोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा, पिटलाईन, विद्युतीकरण, मॉडर्न रेल्वेस्टेशन यासह मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी व रेल्वेविभागाची विकासात्मक प्रलंबित असलेल्या मागण्या, प्रकल्प, प्रस्ताव व कामाबाबत सविस्तर चर्चा करुन कामे त्वरीत मार्गी लावण्याची मागणी केली. मराठवाड्यातील रेल्वेविभागाची विकासात्मक प्रलंबित असलेली मागण्या व कामे पूर्ण होण्याकामी शासनस्तरावर मराठवाड्यातील सर्व खासदार व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्तरित्या बैठक घेण्यात यावी याकरिता पत्र देखील दिले. खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वेच्या राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेऊन मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यात आजतागायत प्रस्ताव, प्रकरणे, मागण्या व कामे केंद्र शासन स्तरावरच प्रलंबित असल्याची माहिती दिल

भारताला कुस्तीत राैप्य पदक : फायनलला रवी कुमार दहियाची चुरशीची लढत अपुरी

टोकयो | ऑलिम्पिकमध्ये 57 किलो वजन गटात भारतीय खेळाडू रवी कुमार दहिया यांच्याकडून देशाला सुवर्णपदकाची आशा होती. सुवर्ण पदकाच्या अंतिम सामन्यात दोन वेळचा रशियाचा विश्वविजेता जावूर युगुयेवशी यांच्याशी अत्यंत चुरशीची लढाई झाली. या लढतीत रवि कुमार दहिया यांचा पराभव झाल्याने राैप्य पदकावर समाधान मानावे लागले.

रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला होता. भारताला आतापर्यंत 5 पदके मिळाली होती. आता रविकुमारने राैप्य पदक मिळाल्याने 6 वे पदक मिळाले. मात्र अंतिम सामन्यात सुरूवातीपासून फाॅर्ममध्ये असणाऱ्या रविचा पराभव झाल्याने देशवासियांच्या सुवर्ण पदकाच्या आशा संपुष्टात आल्या.

भारताची कुस्तीत आजपर्यंत 6 पदके पुढीप्रमाणे

1952 साली हेलसिंकी येथे खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पहिले पदक जिंकले होते. कराड तालुक्यातील खाशाबा जाधव यांनी भारतासाठी कुस्तीत पदक जिंकणारे पहिले कुस्तीपटू होते.

2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने कांस्यपदक

2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने रौप्यपदक जिंकले तर योगेश्वर दत्तने 2012 मध्ये कांस्य पदक,

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्य जिंकले.

2021 च्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये रवी कुमार दहियाने राैप्यपदक जिंकले

मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; उच्च न्यायालयात जनहित याचिका

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेले असणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकातील सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. याचिकेवरील पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे.

मध्यवर्ती बसस्थानकावर काही दिवसांपूर्वी शहरात बॅंकींगच्या परिक्षेसाठी अपंग विद्यार्थी आला होता. त्यावेळी एका खासगी ट्रॅव्हल्स एजन्टाने त्याचे अपहरण करुन केवळ ५०० रुपयासाठी त्याचा खून केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या अनुषंगाने बसस्थानकावर पुरेशी सुरक्षा वाढवण्याची विनंती मुकेश भट्ट यांनी विभाग नियंत्रकांकडे केली होती. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे या विरोधात आता ॲड. अक्षय लोहाडे व ॲड. संदेश हांगे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली.

याचिकाकर्त्यांनी याचिकेत राज्यभरातील बसस्थानकांमधे सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आहे. बसस्थानकांमध्ये अनाधिकृत खाजगी एजन्टांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. अनधिकृत खाजगी ट्रॅव्हल्सचे एजन्ट प्रवाशांना बसमध्ये जाण्यापासून रोखतात, बसस्थानकात सुरक्षा रक्षक किंवा पोलिस दिसत नाहीत. एका सर्व्हेक्षणात ७५ टक्के प्रवाशांना बसस्थानकात सुरक्षीत वाटत नाही. बसस्थानकात स्वच्छ पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृहाची दुरावस्था आहे. कॅन्टीमधील अन्नाची गुणवत्ता नाही. वैद्यकीय सुविधा नाही, डॉक्टर उपलब्ध नसतात आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले आहे. याचिकेवर ९ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

सहा किलोमीटर रस्त्यासाठी खर्च करणार 19 कोटी

Mhaismal road

औरंगाबाद | मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळख असणारे म्हैसमाळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक पावसाळ्यामध्ये महेश माळाकडे वळतात. परंतु रस्ता खराब असल्यामुळे पर्यटकांची चांगलीच फजिती होते. आता या रस्त्याचा मुहूर्त लागला असून खुलताबाद कमान ते महेश माळ घाटाच्या पुढे या सहा किलोमीटर अंतरावरच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर 19 कोटी रुपयांची नवी निविदा काढली आहे.

रस्ता अर्धवट ठेवणाऱ्या नाशिक येथील एटीआर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीस यापूर्वीच प्रतिदिन दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. खुलताबाद ते म्हैसमाळ या रस्त्याचे कंत्राट नाशिकच्या कंपनीला 21 जुलै 2018 रोजी देण्यात आले होते. दोन वर्षात हे काम होणे अपेक्षित होते. मात्र या कामाची मुदत 20 जुलै 2020 रोजी संपली होती.

त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंत्राटदारास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. 20 जुलै 2019 रोजी दुसरी मुदतवाढ संपली तरीही कंत्राटदाराने तीन वर्षात दहा कोटी रुपयांचे 30 टक्केच काम केले. त्यापैकी 9 कोटी रुपये अदा करण्यात आली असून 1 कोटी रुपयांची देयक शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. आता नव्याने 19 कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदा दाखल करण्याची मुदत 26 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. आता 10 मीटरचा सिमेंट रस्ता केला जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकार कुमकुवत; सरकार पडलं तर भाजपा चांगला पर्याय : अमृता फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आघाडी सरकार पडण्याबाबत व युतीबाबत विधान केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुमकुवत असून, ते केव्हा पडेल हे काही सांगता येत नाही. जर हे सरकार पडले तर भाजपा चांगला पर्याय देईल, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

पुणे येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. याला राजकीय भुकंपाचे संकेत मानायचे का? असेल प्रश्न विचारता त्या म्हणाल्या की, ते अगोदरपासून भेटत आले आहेत. अचानक भेटले नाहीत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार खूप कुमकुवत आहे. हे सरकार केव्हा पडेल, असे प्रत्येकाला वाटते. जर हे सरकार पडले, तर भाजपा एक चांगला पर्याय देईल.

यावेळी अमृता फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्याबाबतही मत व्यक्त केले. राज्यपाल यांच्या दौऱ्याला जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा आहे,” अमृता असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी मुंबईवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ; फडणवीसांचा आघाडीला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौरा करत आढावा घेत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठाकरे सरकारने केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले, राज्यपालांना दौरे करू नका असं कोणीच सांगू शकत नाही. पीसी अलेक्झांडर आणि एस. सी. जमीर या माजी राज्यपालांनी त्यावेळी एकूण एक जिल्ह्याचा दौरा केला होता, असं सांगतानाच राज्यपालांच्या दौऱ्यामुळे काही लोकांना मळमळ होत आहे. ही मळमळच बाहेर येत आहे, अशी टीका त्यांनी केली.

राज्यपाल हे प्रमुख आहेत आणि संविधानाने त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला सल्ला देण्यासाठी त्याठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामुळे राज्यपालांना दौरे करु नका असं कोणी सांगू शकत नाही. राज्यपालांच्या दौऱ्यावरून ज्यांना मळमळ होते त्यांनी भारतीय संविधानाचं वाचन करावं आणि त्यानंतर अशी वक्तव्य करावी,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जास्त दुडूदुडू धावू नका, दम लागून पडाल; राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौरा करत आढावा घेत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दरम्यान राज्यपाल ज्या पद्धतीने दुडूदुडू धावत आहेत, पण तुम्ही दम लागून पडाल असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारं नाहीत. त्या राज्यांमध्ये भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करु इच्छिते. तुम्ही पाहा दिल्लीमध्ये सध्या काय सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्रामध्येही असेच सुरु आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल दुडुदुडू धावत आहेत. धावू द्यात. दम लागू पडाल एकेदिवशी, असा टोला संजय राऊत यांनी राज्यपालांना लगावला.

यावेळी त्यांनी केंद्र सरकार वर देखील निशाणा साधलाय. पेगाससवर चर्चा व्हावी अशी आमची साधी मागणी आहे. या देशात जे काही हेरगिरीचं कांड झालंय ते जाणून घ्यायचा देशाला अधिकार नाही का? सरकार अधिकार नाकारत असेल तर या देशातील लोकशाही आम्ही मोडीत काढली आहे. या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत हे त्यांनी सांगावं, असा हल्ला त्यांनी चढवला

विजेच्या तारेला पकडून तरुणाने केली आत्महत्या

death
death

औरंगाबाद | खुलताबाद तालुक्यातील येथील तरुणाने विजेच्या तारेला धरून आत्महत्या केल्याचा घटना समोर आली आहे. पवन मनोहर निळ (वय 26) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पवन याने गट नंबर 96 मधील सुखदेव चव्हाण यांच्या शेतातील विहिरी वर असलेले विद्युत चार हातात धरून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बाजार सावंगी पोलीस चौकीचे पोलीस नाईक विनोद बिघोत, योगेश नाडे, संतोष पुंड, पोलीस पाटील सुलभा सचिन गिरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला बाजार सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

धोकादायक बस चालविणारा ‘तो’ चालक निलंबित

unruly 'vehicles'

 

औरंगाबाद – औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून धुळे कडे निघालेल्या एका बसचा चेसिसचा सेंट्रल बोल्ट तुटल्यामुळे बसची चाके एकीकडे आणि उर्वरित बसची बॉडी दुसरीकडे सरकली. याच अवस्थेत धोकायदायकरित्या वेगाने बस पळवत २९ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बसच्या चालकाला सध्या सेवेतून निलंबित केले असल्याची माहिती औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार प्रमुख शिंदे यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून धुळ्याला निघालेली धुळे आगाराची बस (एमएच १४ डीटी २११९) मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास निघाली. या बसमध्ये २९ प्रवासी होते. बस धावत असताना बसचे तोंड रस्त्याच्या मध्यभागी दिसत होते, तर पाठीमागील डाव्या बाजूस दिसत होते. ही बस शरणापूर फाट्याजवळ एका दुचाकीस्वाराला उडविणार असे दिसतबी असताना तो बालंबाल बचावला. मात्र काही अंतरावर बसने धुळेकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला उडविले. यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत देखील झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

हा सर्व प्रकार एसटी महामंडळाच्या निर्दशनास येताच संबंधित बस तात्काळ औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात परत आणण्यात आली आणि त्या बसमधील २९ प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या बसच्या चालकाने प्रसंगावधान न दाखिविल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर त्या चालकाला सध्या कामावरून निलंबित केले असून, प्रकरणाची पूर्ण चौकशी करून चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे अगरप्रमुखानी सांगितले. सध्या मात्र त्या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

औरंगाबाद | दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरांना एमायडीसी वाळूज पोलिसांनी मंगळवारी रात्री पंढरपूर येथील कामगार चौकातून अटक केली आहे. त्याबरोबरच बजाज नगरातून कमळापूर येथील मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यालाही अटक केली आहे.

अजय गजानन ढोके (20, रा. हारुसिद्धी मंगल कार्यालाजवळ, कमळापूर), अनिल गौतम म्हस्के (30, रा. फुलेनगर, वडगाव), राहुल शिवप्रसाद सिंग (22, रा. शिवराणा चौक, बजाजनगर) अशी या आरोपींची नावे असून पोलिसांनी हा त्यांच्या जवळून चोरीची दुचाकी तसेच कमळापूर मंदिरातून चोरी गेलेला पितळी मुकुट निरंजन आदी साहित्य असा साडे चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बजाज नगर येथील शुभम बागल यांची दुचाकी (एमएच 20, एक्स 2068) दोन ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्याच दिवशी रात्री कमळापूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अज्ञात चोरट्याने पितळी, मुकुट, निरंजन, दिवा आदी साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी तपास करत असताना एमायडीसी वाळूज येथे चोरटे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी कामगार चौकात सापळा रचून संशयित चोरटे दुचाकीवरुन जात असताना त्यांची चौकशी केली आणि त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीची दुचाकी तसेच कमळापूर येथील मंदिरातून चोरी केलेली साहित्य जप्त केले.