Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 5242

 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले ?? ; शरद पवारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूतप्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विचारला आहे. शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सुशांतप्रकरणी सीबीआयवर निशाणा साधला आहे. सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे अन्य ठिकाणी वळत आहे, असे पवार म्हणाले

‘सुशांतच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत होते. पण मुंबई पोलीस हे काम करतील, यावर केंद्र सरकारला विश्वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी नेमली. मात्र या एजन्सीने काय दिवे लावले, ते आम्हाला दिसले नाहीत. त्याचा प्रकाश काही बघायला मिळाला नाही. आता ते सगळं भलतीकडेच चाललं आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी सीबीआय तपासावर टीका केली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी राहिली बाजूला आणि दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या संस्था दुसरीकडे लक्ष वळवत आहे की काय? अशी शंका निर्माण होत आहे’, असंही पवार म्हणाले.जवळपास तीन महिने होत आले तरी या प्रकरणात सीबीआयला अजून काहीच सापडले नाही. या उलट हा तपास आत वेगळ्याच दिशेत जात असल्याचे, शरद पवार यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

अवघ्या चोविसाव्या वर्षी घेतले टेरेसगार्डनवर विविध भाज्या, मसाले आणि फुलांचे पीक 

anubhav sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या काळात अनेकजण टेरेस गार्डन, किचन गार्डन तसेच विविध प्रकारच्या गार्डनिंग कडे वळलेले पाहायला मिळतात. तरुण पिढीही मोठ्या प्रमाणात यात रस घेताना दिसून येते आहे. उत्तर प्रदेश मधील रायबरेली जिल्ह्यात राहणाऱ्या एका २४ वर्षाच्या मुलानेही आपली ही आवड जपत टेरेस गार्डन फुलविले आहे. अनुभव शर्मा असे त्याचे नाव आहे. तो सध्या पदवी घेऊन बँकेच्या परीक्षांची तयारी करतो आहे. आणि गार्डनिंगची आवडही जपतो आहे. लहान पणापासूनच झाडे लावण्याकडे त्यांचा कल चांगला असल्या कारणाने त्यांनी टेरेसवर विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली.

२०१५ सालापासून त्यांनी आपल्या टेरेसवर आपली छोटी शेती फुलवायला सुरुवात केली होती. आज या शेतीत जवळपास ३०० हुन अधिक झाडे आहेत. सुरुवातीला साध्या गार्डनिंग पासून त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू शेतीत रूपांतर केले. आता त्यांच्या या शेतीत भाज्या, औषधी वनस्पती, फळे आणि मसाले उगविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांना एक मिश्र बाग बनवायची आहे असेही ते सांगतात.

अनुभव म्हणतात, “गार्डनिंग करण्यासाठी कोणताही ऋतू उपयुक्त असतो. फक्त त्याची सुरुवात होणे गरजेचे असते.” ते आपला सकाळ आणि संध्याकाळ असा दोन्ही वेळ त्यांच्या गार्डन मध्ये घालवितात. आपल्या अभ्यासातही यामुळे फायदा होत असल्याचे सांगत असताना यामुळे मानसिक तणाव ही दूर होतो असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

आठवलेंचा एक आमदार, एक खासदार तरी आहे का? NDAमध्ये सामील होणाच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला

पंढरपूर । केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना NDA मध्ये सहभागी  होण्याची ऑफर दिली होती. जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांनी राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं असा सल्ला आठवले यांनी पवारांना दिला होता. त्यावर ”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एक आमदार किंवा एक खासदार तरी आहे का? त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही असं सांगत पवारांनी आठवलेंच्या ऑफरची खिल्ली उडवली. आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर पवार पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक आबा साळुंखे उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना एनडीएत सामील होण्याच्या सल्ल्यावर पवार म्हणाले,”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एक आमदार नाही किंवा एकही खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही.” असं टोला त्यांनी यावेळी लगावला. याशिवाय फडणवीस-राऊत भेटीबाबत पवार यांनी सांगितलं कि, ”खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आठवलेंची पवारांना ऑफर तरी काय होती?
”राजकीय वर्तुळातील आरोप- प्रत्यारोप आणि भूमिका पाहता आमची दोस्ती अशी आहे की त्यांना तिकडे आणि मला इकडे करमत नाही, तर पवारांनीच इथं यावं.तसं झाल्यास पवारांना पुढे मोठं पद मिळू शकतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला मित्र मिळू शकतो,” असं वक्तव्य करत आठवलेंनी सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. ”जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांना राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं. शिवसेनेसोबत राहण्यात काहीच फायदा नाहीये” असं आठवले यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

सातारा जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु – जिल्हाधिकारी शेखर सिंह

shekhar singh

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात उद्या पासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु होईल अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. यामुळे आता कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत याची माहिती रुग्णांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. रेमडीसीव्हर इंजेक्शन आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महत्वपूर्ण निवेदन केले यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यात रेमडेसिवीर औषधाची असलेली टंचाई दूर होणार असून हे औषध सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांना उपचारासाठी वेळेत बेड मिळावा यासाठी मंगळवार दि.29 पासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेबसाईट सुरू करण्यात येत आहे. बेडची उपलब्धता आणि बेडचे व्यवस्थापन एका क्लिकवर कळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1079601739165588/

सातारा जिल्ह्यात बेडची उपलब्धता व त्याच्या व्यवस्थापनाबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना होत्या. बेड व्यवस्थापनाची माहिती प्रशासनाच्या 1077 या हेल्पलाईनवरूनही माहिती देण्याचा प्रयत्न सुरू होता.ही माहिती मिळावी यासाठी लिंक व वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून या covid19satara.in लिंक द्वारे रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होणार आहे. काही अडचण आली तर टोल फ्री क्रमांक 1077 हा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडूनचं सोडवून घ्यावा – शरद पवार (Video)

पंढरपूर । छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयन राजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजानी मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न भाजपा कडूनच सोडवून घ्यावा असे कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक आबा साळुंखे उपस्थित होते.

मराठा आरक्षांवर विचारलेल्या विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, ”दोन्ही छत्रपती हे राज्यसभेत आहेत. हे दोघेही भाजपच्या मदतीने राज्यसभेत आले. उदयनराजेंची निवड भाजपने केली. आणि संभाजीराजेंनी निवड राष्ट्रपतींनी केली. ती ही पंतप्रधानांच्या सांगण्यावरून म्हणजेच नरेंद्र मोदींच्या. त्यामुळं आमच्या दृष्टीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्या पाठीशी केंद्रातील सत्ताधारी पक्ष आहे. त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवून घेण्यास मदत होईल. त्यामुळं दोन्ही छत्रपतींनी यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना एनडीएत सामील होण्याच्या सल्ल्यावर पवार म्हणाले,”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही.” असं टोला त्यांनी यावेळी लगावला. याशिवाय फडणवीस-राऊत भेटीबाबत पवार यांनी सांगितलं कि, ”खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्था अभिनेता सुशांतसिंग रजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या. मात्र, त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. कृषी विधेयक येण्यापूर्वीही शेतकऱ्यांना त्यांचा मालक इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहे मात्र याचा नेतृत्व कोणी एकटा न करता शेतकरी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

कराडकरांसाठी अभिमानाची गोष्ट! कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 2 हजार कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

krushna hospital

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 2000 हून अधिक कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्ज देण्यात आला असून, येथे कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 32 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 2006 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे 18 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आज कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण करत 2006 इतका टप्पा गाठला.

आज 32 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्च देण्यात आला. कोरोनामुक्तीची ही लढाई जिंकलेल्या रूग्णांचा सत्कार कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, योगेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

कृष्णा हॉस्पिटलने केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्रात कुठल्याही खाजगी रूग्णालयात कोरोनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोफत उपचार कुठेही दिले गेलेले नाहीत. शिवाय इथे मृत्यूचे प्रमाणदेखील खूप कमी आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सातारा जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे, अशी प्रतिक्रिया कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये रेठरे बुद्रुक येथील 73 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 25 पुरुष, रेठरे हरणाक्ष वाळवा येथील 58 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटल येथील 25 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 36 वर्षीय पुरुष, वाठार येथील 49 वर्षीय पुरुष, 85 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 35 वर्षीय महिला, महारूगडेवाडी येथील 28 वर्षीय महिला, आगशिवनगर येथील 56 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 55 वर्षीय पुरुष, कराड येथील 71 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 81 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 23 वर्षीय महिला, नेर्ले वाळवा येथील 60 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, विरवडे येथील 67 वर्षीय पुरुष, आसू फलटण येथील 43 वर्षीय पुरुष, आटके येथील 58 वर्षीय महिला, सैदापूर येथील 54 वर्षीय पुरुष, बोरगाव वाळवा येथील 75 वर्षीय महिला, विद्यानगर येथील 18 वर्षीय मुलगा, शिरवडे येथील 63 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

E-Challan संदर्भात केंद्राने बदलले नियम! आता रस्त्यावर थांबून कागदपत्रांची केली जाणार नाही तपासणी, नवीन नियम जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) अलीकडेच केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये अनेक बदल केले. केंद्राद्वारे अधिसूचित केलेले हे नवीन मोटार वाहन नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात येत आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, आयटी सर्व्हिसेस आणि इलेक्ट्रॉनिक मॉनिटरींग (E-Monitoring) च्या माध्यमातून देशभरात वाहतुकीचे नियम चांगल्या प्रकारे लागू करता येतील. या नवीन नियमांनुसार, आता फक्त कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कोणतेही वाहन रस्त्यावर थांबवता येणार नाही. याद्वारे, लोकांना आता रस्त्यावर थांबवून कागदपत्रे तपासायचा त्रास आणि पेचातून मुक्त होतील.

आता तपासणीसाठी फिजिकल डॉक्‍युमेंट्सची मागणी केली जाणार नाही
या नवीन नियमांनुसार, कोणत्याही वाहनाचे डॉक्‍युमेंट्स कमी किंवा अपूर्ण असतील तर डॉक्‍युमेंट्स त्याच्या रजिस्‍ट्रेशन नंबरद्वारे ई-व्हेरिफिकेशन केली जातील आणि ई-चलान (E-Challan) पाठविले जाईल. म्हणजेच आता वाहने तपासण्यासाठी फिजिकल डॉक्‍युमेंट्सची मागणी केली जाणार नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की जर वाहनांच्या डॉक्‍युमेंट्सची फिजिकल तपासणी केली गेली नाही तर मग वाहनाचे कोणतेही डॉक्‍युमेंट्स एक्‍सपायर झाले आहे कि नाही हे आपल्याला कसे समजेल?

ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल पोर्टलवर नोंदविली जाईल
मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की लाइसेंसिंग अथॉरिटीकडून अपात्र किंवा निरस्त ड्रायव्हिंग लायसन्सची (Driving License) डिटेल पोर्टलमध्ये नोंदविली जाईल, जो वेळोवेळी अपडेट केले जाईल. हे अपडेट केले गेलेल्या डेटा पोर्टलवर दिसून येईल. डॉक्‍युमेंट्सची माहिती अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे वैध असल्याचे आढळल्यास फिजिकल डॉक्‍युमेंट्सची तपासणी करण्याची मागणी केली जाणार नाही. यात ड्रायव्हरने उल्लंघन केल्याची प्रकरणे देखील समाविष्ट असतील ज्यामध्ये डॉक्‍युमेंट्स ताब्यात घ्यावे लागते.

आपल्या वाहनांच्या डॉक्‍युमेंट्स इलेक्‍ट्रॉनिकली मेंटेन करा
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, आता वाहन मालकांना रस्त्यावर थांबण्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपली डॉक्‍युमेंट्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवणे आवश्यक असेल. जर आपल्याला सोप्या भाषेत समजायचे असेल तर वाहन संबंधित लायसन्स, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट्स यासारख्या आवश्यक डॉक्‍युमेंट्सची पूर्तता सरकारी वेब पोर्टलवर करता येईल. कंपाऊंडिंग, इंम्पाउंडिंग, एन्डोर्समेंट, लायसन्स सस्पेंशन आणि रिव्होकेशन, रजिस्ट्रेशन आणि ई-चलान जारी करणे देखील इलेक्ट्रॉनिक पोर्टलद्वारे शक्य होईल.

अशा वाहनचालकांच्या वागण्यावर वाहतूक विभाग नजर ठेवेल
वाहतूक विभाग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंद ठेवेल. याद्वारे ड्रायव्हरच्या वागण्यावरही नजर ठेवता येईल. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, पोर्टलवरील रद्द केलेला किंवा अपात्र वाहन चालविण्याचा लायसन्सची नोंद वेळोवेळी अपडेट केली जाईल. यामुळे अधिकाऱ्यांना ड्रायव्हरच्या वागण्यावर लक्ष ठेवण्यास मदत होईल. नियमांनुसार, वाहनाशी संबंधित कोणत्याही डॉक्‍युमेंट्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफाय केले गेले असेल तर पोलिस अधिकारी त्याची फिजिकल कॉपी विचारू शकत नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

जगविख्यात ‘अ‍ॅमनेस्टी’स्वयंसेवी संस्थेनं भारतातील काम केलं बंद; मोदी सरकार सूडबुद्धीने मागे लागल्याचा केला आरोप

नवी दिल्ली । ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या जगविख्यात स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी भारतामधील आपले कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एका करावाईच्या नावाखाली केंद्रातील मोदी सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला संस्थेची काही बँक अकाऊंट फ्रीज केली. त्यानंतर संस्थेना नाईलाजाने अनेक कर्मचाऱ्यांना कमावरुन काढावं लागलं होतं. भारत सरकारकडून मानवाधिकारासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांच्या विरोधात चालवण्यात येणाऱ्या विच हंट (हात धुवून मागे लागण्याचा प्रकार) मोहिमेतील हा पुढचा टप्पा असल्याचे अ‍ॅम्नेस्टीने जरी केलेल्या पत्रकांत म्हटलं आहे.

अ‍ॅम्नेस्टीने पत्रकात म्हटलं कि, “भारत सरकारकडून अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे बँक खाती पूर्णपणे गोठवण्यात (फ्रीज करण्यात) आली आहेत. ज्यासंदर्भातील माहिती संस्थेला १० सप्टेंबर रोजी मिळाली. यामुळे संस्थेचे काम पूर्णपणे ठप्प झालं आहे,” असं अ‍ॅम्नेस्टीने पत्रकात म्हटलं आहे. संस्थेला नाइलाजास्तव आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढावं लागलं असून देशामध्ये सुरु असणारे संस्थेची सर्व कामं आणि संसोधन थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचेही पत्रकात नमूद केलं आहे.

“संस्थेवर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. अशाप्रकारची कारवाई म्हणजे, भारत सरकारकडून मानवाधिकारासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांच्या विरोधात चालवण्यात येणाऱ्या विच हंट (हात धुवून मागे लागण्याचा प्रकार) मोहिमेतील हा पुढचा टप्पा आहे,” असा गंभीर आरोप या पत्रकामध्ये अ‍ॅम्नेस्टीने केला आहे. संस्थेने सर्व भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करुनच देशात काम केल्याचंही अ‍ॅम्नेस्टीने म्हटलं आहे.

अ‍ॅम्नेस्टीने सरकारविरोधात आवाज उठवल्यानेचं हे सारं घडलं
अ‍ॅम्नेस्टीचे कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मागील दोन वर्षांपासून सरकार अ‍ॅम्नेस्टीवर कारवाई करत आहे. प्रवर्तन निर्देशालयापासून ते इतर सरकारी संस्थांकडून होणारे शोषण, केंद्र सरकारच्या पारदर्शक कामाची मागणी, दिल्ली दंगलींमध्ये दिल्ली पोलीस आणि भारत सरकारची जबाबदारी काय आहे यासंदर्भातील आणि दिल्ली तसेच जम्मू-काश्मीमध्ये मानवाधिकारांचे होणारे उल्लंघनाविरोधात अ‍ॅम्नेस्टीने आवाज उठवल्याने हे सारं घडत आहे. ज्या ज्या मोहिमेने अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे त्याविरोधातील ही कारवाई आहे. संस्थेच्या कामाला विरोध करण्यासाठी ही करवाई करण्यात आली आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई! मुंबईहून विक्रीसाठी आणले व जात असलेले चरस आणि एम.डी ड्रग्स जप्त

auranagabad crime

औरंगाबाद प्रतिनिधी | मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एम.डी. नावाचा ड्रग्स आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी आज पंचवटी चौकातून जप्त केले आहे.हा ड्रग्स शहरात विक्रीसाठी आणला जात असावा अशी शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केली आहे. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद , असिक अली मुसा कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी मुंबईचे असल्याचं पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितलं आहे.

याप्रकरणी अधिक माहिती सांगताना पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे म्हणाले,”आज सकाळी स्कॉर्पिओ वाहनातून अमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती आमचे सहकारी रोडे साहेब व पीएसआय भोसले साहेब यांना मिळताच पोलिसांनी पूर्ण स्टाफच्या मदतीने पंचवटी चौकात सापळा रचून ती चारचाकी वाहन महिंद्रा स्कॉर्पिओ (नंबर MH 20 AK 02 ) थांबवली व त्या गाडीची झडती घेतली असता त्या मध्ये (एम.डी.) मेफोड्रोन नावाचे ड्रग्स च्या 13 पुड्या व चरस नावाचे अमली पदार्थ 25 ग्रॅम च्या दहा पुड्या आढळून आल्या आहे.”

काळ्या बाजारात या ड्रग्स ची सुमारे 80 ते एक लाख रुपये किंमत असावी असा अंदाज आहे.या प्रकरणी दोन्ही आरोपी सहित एक वाहन पोलिसांनी जप्त केली आहे.वेदांत नगर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

WhatsApp तुमचे बँक खातेही रिकामे करू शकते, SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना व्हॉट्सअॅप फ्रॉडबाबत (WhatsApp Fraud) अलर्ट केले आहे. SBI ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार आता बनावट व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांची बँक अकाउंट रिकामे करीत आहेत. SBI च्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपवर केलेली ही छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यात अडथळा आणू शकते. वास्तविक, सायबर गुन्हेगार हे कॉल करून किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेज करून आपल्या बँक खात्यातून पैसे उडवू शकतात. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील पोस्टमध्ये WhatsApp Scam विषयी डीटेल्स शेअर केले आहे.

सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक कशी करतात?
SBI ने असा इशारा दिला आहे की, सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेजद्वारे ग्राहकांशी संपर्क साधतात. ही फसवणूक करण्यासाठी ते ग्राहकांना त्यांनी लॉटरी किंवा बक्षीसे जिंकली आहेत असे सांगतात. यानंतर, ते ग्राहकांना फेक SBI क्रमांकावर कॉल करण्यास सांगतात. हे सायबर गुन्हेगार ग्राहकांना सांगतात की, बक्षीसाचे पैसे मिळविण्यासाठी आपल्या बँकेची डीटेल्स शेअर करणे अनिवार्य आहे.

SBI लॉटरी योजना किंवा लकी ड्रॉ चालवित नाही
ते ग्राहकांना आश्वासन देतात की, केवळ या डीटेल्सच्या माध्यमातून पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. SBI ने आपल्या ग्राहकांना स्पष्टपणे सांगितले आहे की, बँक कोणतीही लॉटरी योजना किंवा लकी ड्रॉ चालवित नाही. किंवा बँक कोणत्याही प्रकारचे गिफ्ट देत नाही. म्हणूनच ग्राहकांना या बनावट कॉलवर किंवा व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर अवलंबून राहू नका.

बँक फोनवर डीटेल्स विचारत नाही
SBI ने आपल्या ग्राहकांना सांगितले की, बँक कधीही ग्राहकांना कॉल करत नाही आणि त्यांच्या बँक खात्याच्या पर्सनल डीटेल्स विचारत नाहीत. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती जर व्हॉट्सअॅप कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे तसेच फोन व ईमेलद्वारे अशी माहिती विचारत असतील तर तत्काळ सावध राहा. कदाचित आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असेल.

SBI ने सर्व ग्राहकांना अशा फसवणूकीपासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी लोकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला SBI ने ग्राहकांना ईमेल फिशिंगबाबत सावध राहण्यास सांगितले होते.

आपल्याला फसवणूक टाळायची असल्यास ‘या’ पद्धतींचे अवलंब करा

> कोणाबरोबरही तुमचे बँक डीटेल्स, पिन कोड किंवा पासवर्ड शेअर करू नका. कोणालाही आपला ID कार्ड फोटो, क्रेडिट कार्ड किंवा सेंसिटिव डॉक्यूमेंट देऊ नका.

> सार्वजनिक Wi-Fi वर आपले नेटबँकिंग अकाउंट लॉग इन करू नका. हॅकरने नेटवर्कला इनफेक्टेड केल्याची आणि आपली पर्सनल डिटेल्स हॅक होण्याची शक्यता आहे.

> अनावश्यक लिंक्स, इमेज, GIFs इत्यादीवर क्लिक करणे टाळा.

> जर कोणी तुमच्याकडून वैयक्तिक माहिती विचारत असेल आणि लॉटरी वगैरे बद्दल बोलत असेल तर बँकेशी संपर्क साधा. बँक कर्मचारी आपल्याला कधीही OTP किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.