Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5678

लॉकडाऊनमुळे अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध मशिदीत १००० कबूतरांचा मृत्यू; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे फक्त माणसांनाच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांना देखील त्रास होतो आहे. अशाच एका घटनेत, अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध मजार-शरीफ मशिदीत पाळलेल्या जवळपास हजारो पांढऱ्या कबूतरांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. हे कबूतर मशिदीत पाळले गेले होते आणि कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना खायला धान्य मिळाले नाही. लॉकडाऊनमध्ये मशिद उघडण्याची परवानगी नव्हती ज्याची शिक्षा या कबूतरांना मिळाली.

चॅनल न्यूज एशियाच्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे ही मशिद बरीच काळ बंद राहिली, ज्यामुळे या पक्ष्यांना धान्य मिळाले नाही आणि उपासमारीने त्यांचा मृत्यू झाला. मशिदीचे रखवालदार कय्यूम अन्सारी यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की कबुतरे सतत मरत होती कारण त्यांना धान्य घालायला कोणीही येत नव्हते. तो म्हणाला, ‘दररोज ३० पेक्षा जास्त कबुतरे मरत होती. आम्ही त्यांना या मशिदीबाहेरच दफन करायचो. कयूमच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत एक हजाराहून अधिक कबुतर मरण पावले आहेत.

१२ व्या शतकातील या मशिदीला ब्लू मस्जिद म्हणून देखील ओळखले जाते कारण त्याचे दगड निळ्या रंगाचे आहेत. लॉकडाऊन दरम्यान बंद असलेल्या अनेक धार्मिक इमारतींपैकी एक ही मशिद देखील आहे. अफगाणिस्तानात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या ही २१ हजारांपेक्षा जास्त आहे मात्र असे मानले जाते की वास्तविक ही आकडेवारी यापेक्षा खूप जास्त असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाला देवेंद्र फडणवीसांचा फुल सपोर्ट

मुंबई । मुंबईतील कोरोना साथीची स्थिती अजूनही गंभीर असल्याने त्याचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. पावसाळी अधिवेशनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत हे अधिवेशन लांबणीवर टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यंदाचं पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होणार होते मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हे अधिवेशन ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. हे अधिवेशन आता ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, पुरवणी मागण्यांवर एक दिवसाचं अधिवेशन होऊ शकतं, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला राज्यचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला आहे. शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखाद दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकारचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण ३० जूनपर्यंतचे सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येण्यासाठी आमदारांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय मुंबईतील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता गर्दी टाळावी लागणार आहे. त्यामुळेच अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होता आणि त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन घेण्याचा विचार आहे. तेव्हा कोरोना साथीची स्थिती नेमकी कशी असेल हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे तेव्हाची स्थिती पाहून अधिवेशनाचा कालावधी किती ठेवायचा याचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकांनी ही योजना राबविली आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक संकटात असाल तर तुम्हालाही हे कर्ज मिळू शकते.

एरवी पर्सनल लोन वर ८.७५ पासून २५ % पर्यंत व्याजदर असतो मात्र या कर्जासाठीचा व्याजदर हा ७.२० पासून १०.२५ %पर्यंतच असणार आहे. सध्याच्या संकटकाळात ग्राहकांसाठी या बँकांनी ही कर्ज योजना राबविली आहे. त्यामुळे इतर वेळी कर्जाच्या २% असणारी प्रोसेसिंग फी या कर्जासाठी केवळ ५०० रुपये आहे. तसेच संकटकाळातील कर्ज असल्याने याचा परतफेड कालावधीही मर्यादित आहे. हा कालावधी कमाल तीन वर्षे इतका आहे. ग्राहकांना २५ हजार पासून ५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.

ही योजना बहुतेक बँकांमध्ये ३० जूनपर्यंत सुरु असणार आहे. त्यामुळे ज्यांना गरज असेल त्यांनी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन चौकशी करण्यास हरकत नाही आहे. या कर्जासाठी कोणतेच प्रिपेमेंट शुल्क आकारले जाणार नाही आहे. जर तुम्ही कर्जाची परतफेड मुदतीच्या आधी केली तरी तुम्हाला त्यावर अधिक शुल्क द्यावे लागणार नाही. अशी माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘फडणवीस कोकण दौऱ्यावर येतायत ‘ही’ चांगली गोष्ट, त्यामुळं त्यांच्या ज्ञानात भर पडेल’, शरद पवारांचा टोला

रत्नागिरी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकणात आले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील कोकणाच्या उद्या दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीसांच्या या प्रस्तावित कोकण दौऱ्यावर पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावेळी आपल्या शैलीत उत्तर दिलं.

‘या वादळाची दाहकता सगळ्यांना समजली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी दौरे केले पाहिजेत. मी दुष्काळी भागातून येतो. फडणवीस विदर्भातून येतात, त्यामुळे त्यांचा आणि समुद्राचा संबंध नाही. फडणवीस येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांना इथली स्थिती समजेल,’ असं टोला शरद पवारांनी हाणला.

चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, अशी मागणी पवारांनी केली आहे. बागांच्या नुकसानीसाठी मदत देताना पुढील ६ ते ७ वर्षांचा विचार करुन द्यावा लागेल. कारण हे पिक एका दिवसात उभं राहत नाही, यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलणार असल्याचंही पवार म्हणाले.

कोकणात मत्स्य व्यवसायाची स्थितीही बिकट आहे, कोरोनामुळे २ महिने व्यवसाय थांबला होता. आता वादळात बोटी, जाळी, इंजिनाचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत करायला हवी, त्याबाबतही राज्य सरकारशी बोलणार असून, या संकटातून यातून आपण बाहेर पडू, सरकार मदत करेल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 1395 वर; आज 114 रुग्णांची वाढ

Jalgaon

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दहशत सुरूच असून आज नव्या 114 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1395 इतकी झाली आहे. आतापर्यंत 129 मृत्यू तर 567 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

कोरोना विषाणूचे देशभर थैमान चालू असताना जळगाव जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. काल मंगळवारी देखील एका दिवसात 115 रुग्ण यांचे अहवाल पोसिटीव्ह मिळाले होते. आज देखील 114 रुग्ण हे पोसिटीव्ह आढळून आले आहेत.

आज सर्वाधिक 39 रुग्ण हे अमळनेर येथे आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे पारोळा-21,भुसावळ -19, जामनेर-11, जळगाव -09 यावल व एरंडोल येथे प्रत्येकी 05 व इतर तालुक्यातील रुग्ण मिळून 114 रुग्णांची भर पडली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार हा जिल्ह्यात वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची वाढती आकडेवारी ही चिंताजनक बनत आहे. जळगाव , भुसावळ व अमळनेर शहरांनी 200 च्या वर रुग्ण संख्येचा आकडा पार केला आहे.


‘निसर्गग्रस्त’ कोकण वासियांच्या मदतीसाठी शरद पवारांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

रत्नागिरी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा दोन दिवसीय पाहाणी दौरा केला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, असं शरद पवार यांनी पाहाणी दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितलं आहे. यावेळी त्यांनी खालील सूचना केल्या

१)चक्रीवादळात अनेक झाडांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु असून ‘यंत्रणा अजून सगळीकडे पोहचली नाही, आताचा अंदाज प्राथमिक अंदाज आहे. कोकणात नारळ, सुपारीबरोबर मसाल्याची पिकंही घेतली जातात, त्यांचंही नुकसान झालं आहे, त्यांसाठी मदत करावी लागेल. सांगली, कोल्हापूर पुरावेळी सरकारने काही धोरणात बदल केले होते, त्यातही यावेळी बदल करावे लागतील. शेती, घरं, व्यवसाय याच्या मदतीच्या निकषात बदल करायला हवेत, तसं सरकारला सूचवणार आहोत.’ असं शरद पवार यांनी म्हटलं.

२)बागांच्या नुकसानीसाठी मदत देताना पुढील ६ ते ७ वर्षांचा विचार करुन द्यावा लागेल. कारण हे पिक एका दिवसात उभं राहत नाही, यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलणार असल्याचंही पवार म्हणाले.

४)रोजगार हमीतून फळबागा असा कार्यक्रम राबवला होता, आज बागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा जुनी रोजगार हमी योजना राबवता येऊ शकते. कारण बागा साफ करायलाही त्याच्याकडे पैसा नाही.

५)राष्ट्रीयीकृत बँकाचं कर्ज काढल्याचं अनेक लोकांनी सांगितलं आहे. अशा कर्ज काढलेल्या लोकांची, गावांनी यादी करावी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीकडे द्यावी, यानंतर केंद्राची मदत घेऊन बँकांसमोर हा विषय मांडता येऊ शकत, असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

६)मत्स्य व्यवसायाची स्थितीही बिकट आहे, कोरोनामुळे २ महिने व्यवसाय थांबला होता. आता वादळात बोटी, जाळी, इंजिनाचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत करायला हवी, त्याबाबतही राज्य सरकारशी बोलणार असून, या संकटातून यातून आपण बाहेर पडू, सरकार मदत करेल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

अन्यथा..पुन्हा एकदा लॉकडाऊन कठोरपणे लागू करावा लागेल; मुख्यमंत्री ठाकरेंचा कडक इशारा

मुंबई । लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर अचानक रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे निमय मोडून गर्दी केली जात असल्याचे चित्र मुंबईसह अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यावर चिंता व्यक्त करतानाच लोकांनी गर्दी टाळली नाही तर नाईलाजाने पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा कडक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. ३० जूनपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलेले आहे. त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता देताना सरकारने काही अटी घातलेल्या आहेत. त्या अर्थातच जनतेच्या हिताच्या आहेत. आपल्याला सर्वांनाच सावध राहून जगावं लागणार आहे, याचे भान सदैव असू द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले

कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, असे सांगत आपल्याला सर्वांनाच सावध राहून जगावं लागणार आहे, याचे भान सदैव असू द्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केलं. आपल्याला आता कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल. मी तुमच्याशी मास्क लावून बोलतोय. त्याचं कारण तेच आहे. सुरक्षित अंतर हे आपल्याला राखावंच लागेल. ते राखलं जाईल, हे गृहित धरून लॉकडाऊनमध्ये सवलती देण्यात आल्या आहेत या गोष्टीची आठवण मुख्यमंत्र्यांनी लोकांना खबरदारी बाळगण्याबाबत आवाहन केलं.

वादळाचा धोका टळल्यानंतर या सवलतींची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मैदानांत वा अन्य ठिकाणी वॉक घेण्यास मुभा दिली गेली आहे. मात्र पहिल्याच दिवशी वॉकसाठी झुंबड उडाल्याचे मला दिसले. साहजिकच त्याने धाकधूक वाढली आहे. तुम्हाला व्यायाम करता यावा. वॉक घेता यावा म्हणून तुमच्या आरोग्यासाठी सरकारने सवलत दिली आहे. आरोग्य बिघडवून घेण्यासाठी ही सवलत नाही, हे लक्षात असू द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

लॉकडाऊनमधून दिलेली उघडीप जीवघेणी ठरणार असेल तर नाईलाजाने पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. पण मला खात्री आहे, जनता ती वेळ येऊ देणार नाही. राज्यातील जनता सुज्ञ आहे, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. लोकलसेवा अद्याप सुरू झालेली नाही. बेस्ट सेवा पूर्ण क्षमतेने चालवली जात नाहीय. सरकार स्थितीचा अंदाज घेऊन पावले टाकत आहे. त्यामुळे कुणीही घाई करू नये, गर्दी टाळावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी मर्यादित लोकलसेवा सुरू करण्याची मागणी आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे करत आहोत. केंद्राने याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढं ढकलली; आता ‘या’ तारखेला होणार अधिवेशन

मुंबई । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखेची आज घोषणा करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ जूनला अधिवेशन घेणं शक्य नाही. त्यामुळं येत्या ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही माहिती दिली. यावेळी उमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांची सुद्धा उपस्थिती होती.

काही दिवसांपूर्वीच कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेल्याची बाब स्पष्ट झाली. रायगड, रत्नागिरी भागात वादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेल्या नागरिकांसाठी काही आर्थिक तरतूदी करण्यात आल्याच्या महत्त्वाच्या घोषणा यावेळी सरकारतर्फे करण्यात आल्या. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. नुकसान भरपाई, पंचनामे सुरु आहेत. रायगडला तात्काळ मदत केली आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या निकषात बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून प्रती कुटुंब ५ हजार रुपये कपड्यांसाठी आणि ५ हजार रुपये धान्यासाठी देण्याची तरतूद केली आहे. शिवाय वादळामुंळ पडझड झालेल्यांना प्रतिघर १५ हजार रुपये देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. याव्यतिरिक्त १० हजार रपये इतर नुकसानासाठी देण्यात येणार असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

सद्याच्या घडीला NDRF आणि SDRF यांचे विहीत निकष बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागत आहेत, असं म्हणत वादळग्रस्तांना अधिकची मदत मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. घरांसाठी आर्थिक मदत देण्यासोबतच वादळग्रस्त भागांमध्ये वीजेचे खांबही उन्मळून पडल्यामुळं त्या भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. परिणामी या भागात प्रति रेशन कार्ड ५ लीटर रॉकेल मोफत देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे.

याशिवाय मोफत धान्यवाटपही करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या वतीनं अजित पवार यांनी दिली. वादळाचं हे संकट पुन्हा येऊ शतं, त्यामुळं ज्यांच्याकडे कौलारू घरे आहेत त्यांना स्लॅब ही घरे उभारता येतील का यावरही यावेळी चर्चा झाली. ज्या आधारे स्लॅब असलेलं हक्काचं पक्कं घर देण्यासाठी सर्व्हे करायला सांगितलं गेल्याची माहिती सरकारडून मिळाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

खुशखबर! ‘या’ बँकेने ग्राहकांना दिलं गिफ्ट; बचत खात्यावर मिळणार अधिक व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोनाच्या संकटात, स्मॉल फायनान्स लेन्डर इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. डिपॉझिट आकर्षित करण्यासाठी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने मंगळवारी आपल्या बचत खात्यांवरील व्याज दर वाढविला आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ठेवींवरील व्याज दर हा १ लाख रुपयांवरून ५ कोटी रुपये केले असून ते वार्षिक ५.५ टक्क्यांवरून ७ टक्के केले आहेत. नवीन दर हे १० जूनपासून म्हणजेच बुधवारपासून लागू होतील. आपल्या देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयसह जवळजवळ सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी आपल्या बचत खात्याचे व्याज दर हे कमी केलेले आहेत.

बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांना वर्षाकाठी १ लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंतचे ७ टक्के व्याज दर देत आहोत. बँकेचे अध्यक्ष आणि कंट्री हेड (ब्रांच बँकिंग, लायबिलिटी, उत्पादन आणि संपत्ती) मुरली वैद्यनाथन म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की यामुळे विद्यमान ग्राहकांना आणि बँक बचत खातेधारकांना चांगल्या रिटर्नसह अधिक बचत करण्याची संधी मिळेल.”

बचत खात्यांसाठी बँकेकडे दोन स्लॅब आहेत – एक लाख रुपये आणि त्याहून अधिक बचत खात्यात १ लाख रुपयांपासून ते साडेतीन लाखापर्यंतच्या ठेवींवर बँकेने दर खाली केले आहेत. यात जवळपास ६ लाख बचत खाती आहेत.

या खासगी बँकेने ग्राहकांना देण्यापूर्वीच खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय या बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आयसीआयसीआय बँकेने आपल्या बचत ठेव खात्यातील व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी घट केली आहे. आजपासून हे नवीन दर लागू झालेले आहेत. आयसीआयसीआय बँकेने ५० लाखांखालील सर्व ठेवींवरील व्याज दर हे ३.२५ टक्के वरून ३ टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. त्याचवेळी ५० लाख किंवा त्याहून अधिक ठेवीवरील व्याजदर ३.७५ टक्क्यांवरून ३.५० टक्के करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मंत्री-मुख्य सचिव वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण, म्हणाले..

मुंबई । मंत्री व सचिवांमध्ये खडाजंगी झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. असा कोणताही वाद झालेला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत बाहेरचं कोणी येत नाही. मग वाद झाला म्हणता तर तो बघितला कुणी?, असा उलट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या विभागाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता आणला गेल्याचा आरोप केल्याचे सांगितले आहे. त्याचा उल्लेख करत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मंत्रिमंडळ हे राज्याच्या हिताचं काम करत असतं, तिथे कुणी मारामाऱ्या करायला येत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये झालेल्या अतिशय मह्त्तवाच्या बैठकीनंतर एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. यावेळी, उमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीसुद्धा उपस्थिती होती.

बैठकीत नेमकं काय घडलं?
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रब्बी हंगामातल्या गहू खरेदीचा प्रस्ताव आयत्यावेळी समोर आला. कोणत्याही खात्याचा प्रस्ताव आणताना त्या खात्याच्या मंत्र्यांना तो प्रस्ताव दाखवावा लागतो. मंत्र्याच्या मान्यतेनंतर तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येतो. मात्र, अन्नपुरवठा खात्याचा विषय मंत्री छगन भुजबळ यांच्या मान्यतेशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आला. त्यामुळे मुख्य सचिव अजोय मेहता यांची मंत्र्यांनी कानउघाडणी केली. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्य सचिवांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा अत्यंत चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचं म्हणलं. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनीही या प्रस्तावावर संबंधित मंत्र्यांची सही नसताना, हा विषय बैठकीसमोर आलाच कसा? असा सवाल केला. मुख्य सचिव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये हा वाद सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चटकन कोणतीही भूमिका न घेता सर्व प्रकरण ऐकून घेतलं. त्यामुळे मुख्य सचिवांबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, येत्या ३० जून रोजी मुख्य सचिवांची मुदत संपत आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुख्य सचिवांबाबत नाराजी आणि मुख्यमंत्र्यांचं मौन यामुळे अजोय मेहतांना मुदतवाढ मिळणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.

मुख्य सचिव अजोय मेहता यांची याआधीही मंत्रीनी केल्या आहेत तक्रारी
याआधीही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी मुख्य सचिवांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनसंदर्भात जिल्हा स्तरावर निर्णय होत असताना पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर जिल्हाधिकारी आणि मुख्य सचिव निर्णय घेतात, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. काही मंत्र्यांनी तर नागपूरवरून मुंबईत येऊन मुख्य सचिवांच्या कारभारावरून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. यासंबंधात पुढे काहीही न झाल्यामुळे आता मुख्य सचिव विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री हा संघर्ष वाढताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”