Monday, December 29, 2025
Home Blog Page 5737

‘SBI’च्या ‘या’ निर्णयाचा ठेवीदारांना बसणार आर्थिक फटका

मुंबई । कोरोनाचे संकटाचा बँकिंग व्यवसायावरही परिणाम झाल्यामुळे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) खर्च कमी करण्याचे उपाय सुरू केले आहेत. ‘एसबीआय’ने महिनाभरात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदर कमी करून ठेवीदारांना जोरदार झटका दिला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय बँकेने ठेवींच्या व्याजदरात ०.४० टक्क्याची कपात केली आहे. यामुळे बँकेच्या कोट्यवधी ठेवीदारांना फटका बसणार असून व्याजावर खर्च भागविणाऱ्या ठेवीदारांना झळ बसणार आहे. बँकेने सर्वच मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर कमी केला आहे. आजपासून नवे व्याजदर लागू झाले आहेत, असे बँकेनं म्हटलं आहे.

७ ते ४५ दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्के कपात करून तो २.९ टक्के केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता या कालावधीसाठी ३.४ टक्के व्याज मिळेल. याआधी ३.८ टक्के व्याज मिळत होते. तर १ वर्ष ते २ वर्ष कालावधीच्या मुदत ठेवीवर आता ठेवीदारांना ५. १ टक्के व्याज मिळेल. तर ३ वर्ष ते ५ वर्ष मुदतीच्या ठेवीवर ५.३ टक्के व्याज मिळेल. ५ वर्षांहून अधिक आणि १ वर्षांहून कमी कालावधीच्या ठेवींवर ५.४ टक्के व्याज मिळेल, असे बँकेनं म्हटलं आहे. याआधी १२ मे रोजी एसबीआयने तीन वर्ष मुदतीपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर ०.२० टक्क्याने कमी केला होता.

या कपातीचा सर्वाधिक फटका अल्पमुदतीच्या ठेवींना बसणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही ठेवींवर कमी व्याज मिळणार आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिकांचा ठेवीदरात देखील कपात केली आहे. ७ ते ४५ दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्का कपात करून तो ३. ४ टक्के केला आहे. यापूर्वी तो ३.८ टक्के होता. एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्के कपात करून तो ५.६ टक्के केला आहे. यापूर्वी तो ६ टक्के होता. ५ ते १० वर्ष मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा ठेवीदर ६.२ टक्के झाला आहे. याआधी तो ६.५ टक्के होता. २७ मेपासून नवे ठेवीदर लागू झाल्याचे बँकेने म्हटलं आहे. एसबीआयमध्ये निवृत्तीवेतनधारकांची जमापुंजी ठेवीस्वरूपात आहे. या ठेवीदारांचा दरमहा खर्च व्याजावर चालतो. मात्र आज व्याजदर कमी केल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भारत चीन सीमाभागात तणाव वाढला; युद्ध होण्याच्या शक्यतेवर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल म्हणतात

वृत्तसंस्था । भारत आणि चीनच्या सीमेवर या महिन्यात मोठ्या प्रमाणात तणाव दिसून येतो आहे. भारताने लडाख च्या सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यापासून चीनने सीमेवरील आपले सैन्य वाढविल्यामुळे भारतानेही आपले सैन्य वाढविले आहे. यावर गेले काही दिवस माध्यमातून तेथील हालचालींच्या बातम्या येत आहेत. गलबान घाटाच्या सीमावादावरून युद्ध होण्याच्या शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. या परिस्थितीत आता रिटायर्ड लेफ्टनंट जनरल एसएल नरसिम्हन यांनी एका मुलाखतीत ‘भारत आणि चीनला एकमत सीमा नाही त्यामुळे सीमेवर पेट्रोलिंग होते तेव्हा या गोष्टी होत राहतात.’ असे सांगितले आहे. त्यामुळे युद्धाच्या शक्यता वगैरे काही नाही आहेत असे दिसून येते आहे.

यापूर्वीही अनेकदा अशा गोष्टी झाल्या आहेत त्यामुळे आणि भारतीय सैन्य या गोष्टी हाताळण्यासाठी चांगलेच सक्षम आहे. असे ते म्हणाले आहेत. ते नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायजरी बोर्ड चे सभासद, तसेच समकालीन चीन अभ्यासकेंद्राचे, महासंचालक आहेत. ज्यापद्धतीने एका बाजूला इमारती बांधणे सुरु आहे. त्याचप्रमाणे या बाजूलाही सर्व यंत्रणा सज्ज आहे. बरेचजण लिहीत आहेत की मोठ्या प्रमाणात चीनी सैन्य सीमेवर आले आहे. ते थोडे अधिकच मसाला लावून सांगितले जात आहे. तसे पाहता काळजी करण्याचे काही कारण नाही.

 

गेल्या काही दिवसांपासून अनेक बातम्या येत आहेत. दररोज भारत-चीन सीमेवरील हालचाली भडक करून सांगितल्या जात आहेत. भारतीय सैन्य या सगळ्याला सामोरे जाण्यासही सज्ज आहे. चीन आणि भारताच्या उच्च स्तरीय कमांडर्स ची भेट झाली आहे. आणखी बैठका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युद्धाच्या शक्यता इतक्यात सांगता येत नाही. कुणीही काळजी करण्याचे काही कारण नाही. असे त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’. 

 

या बँकांचा बदलू शकतो अकाउंट नंबर, IFSC कोड; जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ एप्रिलपासून सरकारी बँका या देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन होणार आहेत, यासाठीची नोटिफिकेशन नुकतीच जारी केली गेली आहे. सरकारने हा अध्यादेश मंजूर केल्यानंतर, सुमारे १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. बँकांच्या विलीनीकरणानंतर त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्या बँकांमधील खातेदारांवर होईल कारण की, या सर्व खातेदारांचे अकाउंट नंबर, आणि IFSC कोड हे बदलले जातील.

मागील २ महिन्यांपासून बँकांच्या विलीनीकरणाचे काम सुरू आहे
सरकारी बँकांना देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन केल्यानंतर देशातील सरकारी बँकांची संख्या ही १२ वर येईल. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की,’ या १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण गेल्या २ महिन्यांपासून कोणत्याही नाराजीविना सुरळीतपणे सुरू आहे. यामुळे कुठल्याही कर्मचार्‍यांच्या नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही.

या बँका विलीन होतील
प्रत्यक्षात सरकारने गेल्या वर्षीच या १० बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक’ हे पंजाब नॅशनल बँकेत विलीन होणार असल्याचे सांगितले होते. कॅनरा बँकेचे सिंडीकेट बँकेचे विलीनीकरण होईल तर अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत विलीन होईल. याशिवाय आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक हे युनियन बँकेत विलीन होतील.

या बँकांच्या विलीनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब आणि सिंद बँक, यूको बँकच राहतील.

यापूर्वीही ५ बँका एसबीआयमध्ये विलीन झाल्या
यापूर्वी स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बीकानेर,तसेच जयपूर स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि भारतीय महिला बँकेचे स्टेट बँक ऑफ हैदराबाद या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये विलीन झाल्या आहेत.

कसा होईल खातेदारांवर बँकांच्या विलीनीकरणाचा परिणाम
बँकांच्या विलीनीकरणाचा थेट परिणाम खातेदारांवर होईल, ग्राहकांना यासाठी नवीन अकाउंट नंबर व कस्टमर आईडी देता येईल. असे झाल्यास ग्राहकांना टॅक्स डिपार्टमेंट, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड, राष्ट्रीय पेन्शन योजना या सर्व ठिकाणी आपला नवीन अकाउंट नंबर किंवा आयएफएससी कोड अपडेट करावा लागेल. याशिवाय SIP किंवा लोनच्या EMI साठी ग्राहकांना नवीन इंस्ट्रक्शन्स फॉलो कराव्या लागतील. तिथेच नवीन चेकबुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड इश्यू होऊ शकते.

या बदलांशिवाय फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट वरील व्याज दरात कोणताही बदल होणार नाही. पूर्वी होम लोन, पर्सनल लोन इत्यादींसाठी दिले गेलेल्या व्याजदरामध्येही बदल होणार नाही. अशा परिस्थितीत, बँकेच्या काही शाखा बंद केल्या जाऊ शकतात, त्यामुळे ग्राहकांना नवीन शाखांमध्ये जाण्याची आवश्यकता असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

… म्हणून विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा! भाजप आमदाराची मागणी

मुंबई । अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसीरिजमुळे अनुष्कावर भापप नेत्याची प्रतिमा खराब करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्काविरोधात तक्रार नोंदवली आहे. नंदकिशोर यांच्यामते, ‘पाताल लोक’ वेबसीरिजमधून अनुष्का पाकिस्तानची प्रतिमा सुधारू पाहत आहे. एका मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा असा सल्लाही दिला आहे. त्यांच्यामते, विराट देशभक्त आहे तो देशासाठी खेळतो. पण अनुष्का मात्र पाकिस्तानची प्रतिमाा सुधारण्यात व्यग्र आहे.

आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी आरोप केला की, वेब सीरिजमध्ये त्यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला. तसंच अशाप्रकारे अनुष्का सनातन धर्मातील सर्व जातींमध्ये वैर वाढवत आहे. गुर्जर म्हणाले की, ‘पाताललोक वेबसीरिजमध्ये बाळकृष्ण वाजपेयी नावाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा नेता एका रस्त्याचं उद्घाटन करत असताना माझा आणि इतर भाजप नेत्यांचा फोटो वापरण्यात आला आहे. मी भाजपचा आमदार आहे आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय माझ्या फोटोचा वापर केला गेला आहे. ही वेबसीरिज राष्ट्रविरोधी कार्य करत आहे.’ असं गुर्जर म्हणणं आहे. नंदकिशोर यांनी अनुष्काने तिच्या शोमधून भारतीय जनता पार्टीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या शोवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोना संकटात भाईजान सलमानने दिली ५ हजार कुटुंबांना ईदी

मुंबई । बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान कोरोना व्हायरसच्या संकटात गरजुंच्या मदतीला सतत धावून जाताना दिसत आहे. दरम्यान, या संकट काळात संपूर्ण देशात पवित्र रमजान ईद साजरी करण्यात आली. नेहमी पेक्षा यंदाच्या वर्षाची ईद वेगळी असली तरी सलमानने अनोख्या अंदाजात ईद साजरी केली. ईद या सणाचे औचित्य साधत सलमानने ५ हजार कुटुबांना ईद किटचं वाटप केलं आहे. अशा प्रकारे सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी यंदाची ईद देखील खास केली.

या संदर्भातील माहिती युवासेनेचे सदस्य राहुल एन कानल यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली. त्यांनी आपल्या ट्विटद्वारे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये लोक फूड किट तयार करताना दिसत आहेत. ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

फोटो पोस्ट करत राहुल एन कानल यांनी कॅप्शनमध्ये ‘सलमान तुझे आभार.. ईदच्या मुहूर्तावर तू तब्बल ५ हजार कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. केवळ आपल्यासारखे लोक समाजात संतुलन राखून ठेवतात.’ लिहिलं आहे. दरम्यान, देशभरात कोरोनामुळं उदभवलेल्या या परिस्थितीमुळं बॉलिवूड सुद्धा ठप्प पडलं आहे. शिवाय सलमानचा आगामी चित्रपट ‘राधे’ला देखील लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

काय सांगता! आता whatsappवरही गॅस सिलेंडर बुक करता येणार

नवी दिल्ली । भारत पेट्रोलियमने (BPCL) गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. आता भारत पेट्रोलियमच्या गॅस सिलेंडर ग्राहकांना व्हॉट्सऍपवरुनही गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. व्हॉट्सऍपवरुन गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे. भारत पेट्रोलियमचा भारत गॅस नावाने घरगुती गॅस सिलेंडर वितरणाचा व्यवसाय आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी, गॅस सिलेंडर बुकिंगसाठी व्हॉट्सऍप सेवा सुरु केली आहे.

भारत गॅसने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना व्हॉट्सऍप क्रमांक 1800224344वर आपला गॅस सिलेंडर बुक करता येऊ शकतो. गॅस एजेन्सीमध्ये ग्राहकाचा जो फोन नंबर रजिस्टर्ट आहे त्याच फोन नंबरवरुन, व्हॉट्सऍपवरुन गॅस बुक करता येऊ शकतो. गॅस बुकिंगसाठी व्हॉट्सअप नंबर लॉन्च करताना कंपनीचे विपणन संचालक अर्थात मार्केटिंग डायरेक्टर अरुण सिंह यांनी सांगितलं की, व्हॉट्सऍपच्या सोयीमुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर बुक करणं अधिक सोपं होईल. व्हॉट्सऍपचा वापर वाढता होत असल्याने, अनेकांना याच्या वापराबाबत माहित असल्याचंही ते म्हणाले.

व्हॉट्सऍपवर सिलेंडर बुक केल्यानंतर ग्राहकाला फोन नंबरवर एक बुकिंग मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये बुकिंग संख्या असेल. या मेसेजमध्ये गॅस सिलेंडरचं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीचीही एक लिंक असेल. या लिंकवर ग्राहक डेबिट, क्रेडिट, यूपीआय आणि इतर ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मवरुनही सिलेंडरची रक्कम भरु शकतात. भारत पेट्रोलियमचे (Bharat Petroleum) देशभरात 71 मिलियनहून अधिक गॅस सिलेंडर ग्राहक आहे. गॅस वितरणाच्या बाबतीत भारत पेट्रोलियम इंडियन ऑईलनंतर दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 500 पार, जिल्हावासीयांची चिंता वाढली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 25 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवालांपैकी 25 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

रावेर, पारोळा भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तींचे अहवाल आज दुपारी प्राप्त झालेत. त्यापैकी 09 पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील पाॅझिटिव्ह आढळलेल्या आठ व्यक्ती ह्या भडगावच्या असून एक व्यक्ती धरणगाव येथील आहे. आजच्या ह्या अहवालानंतर जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही 501 झाली आहे.

जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने आता जळगाव करांची चांगलीच चिंता वाढवली आहे. सततची वाढती संख्या बघता आता शहरवासी व जिल्ह्यातील पादुर्भाव झालेल्या ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.


ये भैय्या बताइयें वॅक्सीन कब आयेगी? राहुल गांधींचा आशिष झा यांना प्रश्न 

वृत्तसंस्था । कोरोना विषाणूच्या या वाढत्या प्रादुर्भावात माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सतत कर्यरत दिसत आहेत. ते ठिकठिकाणी लोकांना भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तसेच वेगवेगळ्या तज्ज्ञांशी ही ते व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बोलत आहेत. त्यांनी भारतीय वंशाचे अमेरिकेतील स्वास्थ्य विशेषतज्ञ आशिष झा यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी आशिष झा यांना विचारत आहेत. ‘ये भैय्या बताइयें वॅक्सीन कब आयेगी?’ त्यांच्या या प्रकारे प्रश्न विचारण्यावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आशिष झा यांनी पुढच्या वर्षीपर्यंत नक्की वॅक्सीन येईल असे सांगितले आहे. त्यांनी भारतीय, चीनी आणि अमेरिकी अशा तीन लसींची अपेक्षा असल्याचे सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आहे की या तीनपैकी एखादी किंवा तीनही लसी उपयुक्त आणि प्रभावी असू शकतील. मला नक्की कोणती लस ते सांगता येणार नाही पण पुढच्या वर्षीपर्यंत यावर एखादी लस नक्की येईल असे त्यांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणू पुढच्या वर्षीपर्यंत राहणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हळूहळू आर्थिक गोष्टींची सुरुवात करणे तसेच लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

आशिष झा हे अमेरिकेत जन स्वास्थ्य विशेषतज्ञ आहेत. तसेच नुकतीच त्यांची ‘ब्राऊन युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ पब्लिक हेल्थ’ येथे डीन म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी सांगितले की कोरोनाचा आर्थिक आणि स्वास्थ्यसंबंधी परिणाम आहेच पण मानसिक परिणाम ही झाला आहे. आणि सरकारला याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांना आता दैनंदिन जीवन बदलणार असल्याची कल्पना देणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. कारण अजून किमान १८ महिने हा विषाणू आपल्यासोबत राहणार आहे असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लडाखच्या पार्श्वभूमीवर सैन्याला दिले युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करत चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. आणि तशीच वेळ आली तर आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे ठामपणे रक्षण करण्यासही सांगितले. देशातील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी) चे सरचिटणीस आणि सुमारे २ दशलक्ष सैन्य असलेलय चीनचे सेनाप्रमुख असलेले ६६ वर्षीय शी जिनपिंग यांनी सैन्याला ही सूचना केली आहे. येथे चालू असलेल्या संसदीय अधिवेशनात पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि पीपल्स सशस्त्र पोलिस दलाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत त्यांनी भासहग घेतला आणि यावर भाष्य केले.

अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, शी जिनपिंग यांनी सैन्याने सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करण्याची, त्याबद्दल विचार करण्याची तयारी ठेवावी. तसेच युद्धासाठी तयारी वाढवण्याच्या दृष्टीने सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितींचा त्वरित व प्रभावीपणे सामना करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी, राष्ट्रीय सार्वभौमत्व,सुरक्षा तसेच विकासाचे हित याचे रक्षण करण्यासही त्यांनी आपल्या सैन्याला सांगितले.

भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) जवळपास गेले २० दिवस चाललेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. अलिकडच्या काळात, लडाख आणि उत्तर सिक्कीममध्ये भारत आणि चीनने आपल्या सैन्याची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे. दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान गेल्या दोन आठवड्यात दोनदा तणाव निर्माण झाला होता. सुमारे ३,५०० कि.मी.असलेली ही एलएसी दोन्ही देशांमधील सीमा म्हणून काम करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शाळा, कॉलेज उघडण्याबाबत गृह मंत्रालय म्हणते..

नवी दिल्ली । देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन वाढत जाऊन चौथ्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरम्यान चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शहरांमधील रुग्णांची संख्या लक्षात घेत नियमांमध्ये शिथिलता देखील दिली आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार का? याबाबत गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडण्यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे.

या आणीबाणीच्या काळात शाळा आणि कॉलेजांवरील बंदी कायम आसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान मंत्रालयाने शाळा आणि कॉलेज उघडण्यास परवानगी दिली आहे अशी चर्चा रंगत होती. त्यामुळे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी तुर्तास परिस्थिती पाहता यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार नसल्याचे स्पष्ट केले.

‘केंद्रीय गृहमंत्रालयाने अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. देशात सर्व शैक्षणिक संस्थानांवर घालण्यात आलेली बंदी कायम आहे.’ अशा आशयाचं ट्विट गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी मार्च महिन्यापासून सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. सांगायचं झालं तर, देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरात आणि तामिळनाडूमध्ये रुण्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”