Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5743

राज्यात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले..

मुंबई । भाजपकडून राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काहीही चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी कालपासून सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. ‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. तिन्ही पक्षांची भूमिका या बाबतीत एकच आहे,’ असं शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीबद्दलही पवार यांनी खुलासा केला. ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा होत असते. अनेकदा आम्ही दादरमध्ये भेटतो. काल मीच ‘मातोश्री’वर येतो असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. तिथं गेल्यावर आम्ही करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांची संख्या, आरोग्य सुविधा याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबद्दल चर्चा झाली. राजकाणाचा विषय नव्हता,’ असं पवार म्हणाले.

यावेळी त्यानी राज्यपालांची भेट घेण्याबाबतचाही खुलासा केला. ‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मला २ वेळा चहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळं काल भेटायला गेलो. मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत. तिन्ही पक्ष एकत्र काम करताहेत असं स्वत: राज्यपालांचं मत असल्याचं पवार यांनी सांगितलं

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पवारांच्याच सुरात सूर मिसळला आहे. ‘शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे हे काँग्रेसच्या सातत्यानं संपर्कात असतात. काँग्रेसमधील एखाद्या नेत्यानं काही मत व्यक्त केलं असेल तर ते त्याचं वैयक्तिक मत आहे. त्याचा सरकारशी संबंध नाही. राष्ट्रपती राजवटीच्या बातम्या या मीडियातील चर्चा आहेत. मुंबईत किंवा दिल्लीत कुठंही त्याबद्दल चर्चा नाही,’ असंही थोरात म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पाणी भरण्यासाठी विरीरीवर गेलेल्या माय-लेकीचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतातील विहिरीवर पाणी भरताना चिमुकली पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोन्ही मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील विटेकरवाडीत घडली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविता राजू विटेकर व 9 वर्षीय चिमुकली श्रद्धा राजू विटेकर अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.

या दुर्दैवी घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी नऊ वाजता घरातील स्वयंपाक करून दोन्ही माय-लेकीं त्यांच्या शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान नऊ वर्षीय श्रद्धाचे पाय घसरल्याने ती चिमुकली विहिरीत पाण्यात पडली. बाजूलाच असलेल्या आईने क्षणाचाही विलंब न करता चिमुकलीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही माय-लेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घरच्यांना माहिती होताच त्यांनी ही याबाबत पोलिसांना माहिती दिली.

फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी पथकासह धाव घेत विहिरीतील माय-लेकिना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटने प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार

मुंबई । गेल्या ३-४ दिवसात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु होती. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरविल्या गेल्या नाहीत असा आरोप करताना पाहण्यात आले. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्व प्रवाशांची सातत्याने मागणी केल्याचे दिसून आले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोयल यांना चांगलाच दम देखील भरला होता. शेवटी आज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र सरकारने पश्चिम बंगालसाठी विशेष ४१ श्रमिक रेल्वेची मागणी केली आहे. ज्या आज निघण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिम बंगाल मध्ये आलेल्या Amphan चक्रीवादळामुळे परिस्थिती बिघडलेली असल्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने या रेल्वे पश्चिम बंगाल मध्ये घेण्याची समस्या असल्याचे सांगितले आहे. ही  माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र सरकारला पश्चिम बंगाल सरकारसोबत हा मुद्दा सोडवावा अशी विनंती ही केली आहे. राज्यातून इतर ठिकाणीही रेल्वे आज जाणार आहेत.

 

या राजकीय टीका-टिपण्णी, दमदाटी असे सर्व प्रकार रेल्वेच्या मुद्द्यावरून झाल्याचे दिसून आले आहे. तसे महाराष्ट्रात दररोज एक नवा राजकीय मुद्दा समोर येतो आहे. आता या १४५ रेल्वेनंतर कोणता राजकीय मुद्दा समोर येतो हेही पाहण्यासारखे असेल. राज्याच्या विविध भागातून या रेल्वे सुटतील. पण जेव्हा त्या इप्सित स्थळी पोहोचतील तेव्हाच हे सफळ संपूर्ण होईल असे दिसते आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुढील ५ वर्ष सरकारला काही धोका नाही- संजय राऊत

मुंबई । भाजप राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याची प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील 5 वर्ष सरकार मजबूत आहे. २०२५ पर्यंत कोणताही धोका अजिबात नाही. १७० आमदार आघाडी सरकारच्या बाजूने आहेत. यात वाढ होऊन हा आकडा १८० पर्यंत जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. विरोधकांकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न असेल तो त्यांचा हा प्रयत्न भ्रम असेल, असे राऊत म्हणालेत.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काहीही चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, असा टोला राऊत यांनी ट्वीटरवरुन मारला आहे. सरकार मजबूत आहे चिंता नसावी, असं ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मातोश्रीवर चर्चा झाल्याची कबुली संजय राऊत यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दोन तरुणांसोबत प्रेयसी बोलते हे लक्षात आल्यावर प्रियकराने ९ लोकांचा खून करून मृतदेह टाकले विहिरीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेलंगणामधील वारंगलमध्ये झालेल्या ९ प्रवाश्यांच्या हत्येवरचा पडदा आता उठविला गेला आहे. सोमवारी वारंगलचे सीपी व्ही. रवींदर म्हणाले की, ‘येथे अवैध संबंधांमुळे दोन महिला आणि एका ३ वर्षाच्या मुलासह ९ जणांचा खून झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपीची ओळख पटली आहे.

सी.पी. व्ही. रविंदर म्हणाले की, मुख्य आरोपीची ओळख संजय कुमार झा च्या रूपात झाली आहे. त्याने अन्य तीन जणांच्या मदतीने ९ जणांचा बळी घेतला आणि त्यांचे मृतदेह शेतातील विहिरीत फेकले. बिहारच्या याकूब, मोहन आणि माणकोस यांच्या मदतीने संजयने या हत्या केल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने शेजारच्या बंगाली स्थलांतरित कुटुंबासह आणि इतर दोन बिहारी प्रवाशांची हत्या केली. गेल्या आठवड्यात, बुधवारी रात्री बंगाली कुटुंबप्रमुख मकसूद याने आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत प्रत्येकाला खाण्यामधून विष दिले गेले. नंतर हे सर्व ९ मृतदेह सुप्रिया कोल्ड स्टोरेजच्या आवारात असलेल्या विहीरीत टाकण्यात आले.

३ वर्षाच्या मुलाची आई तसेच घटस्फोटीत असलेली मकसूदची मुलगी बुशरा आणि संजय कुमार झा यांचे अवैध संबंध होते, परंतु अलिकडच्या काळात बुशराने मकसूदबरोबरच काम करणाऱ्या श्रीराम कुमार आणि श्याम कुमार या दोन अन्य बिहारी तरुणांशी संबंध ठेवले होते.

बुशराच्या या वागण्यामुळे चिडलेल्या संजय कुमार झा याने मकसूदचे संपूर्ण कुटूंब तसेच ते दोन्ही बिहारी तरुण यांना मारण्याचा कट रचला. सध्या या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

विरोधकांनी त्यांचे तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, मग कळेल; शिवसेनेची सामनातून टीका

मुंबई । कोरोना उपाययोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर असल्याचे ताशेरे एका सुनावणीत गुजरात उच्च न्यायालयाने तेथील भाजप सरकारवर ओढले. याचाच आधार घेत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राज्यातील भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन महिन्यांत जी रुग्णालये उभी केली आहेत, त्या रुग्णालयांत विरोधी पक्षनेत्यांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, म्हणजे त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येईल, असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून सुनावलं आहे.

उच्च न्यायालयाने गुजरातबाबत जे निष्कर्ष मांडले आहेत ते देशभरातील आरोग्य यंत्रणांचे डोळे उघडणारे आहेत. अहमदाबादमध्ये कोरोनावर उपचार करणाऱ्या मुख्य शासकीय रुग्णालयातच आतापर्यंत ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा धक्कादायक आहे. गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना न्यायालयानं बुडणार्‍या टायटॅनिक जहाजाशीच केली आहे. सरकारी रुग्णालयाची स्थिती ‘खतरनाक’ आहे. कोणत्याही सुविधा नाहीत. मनुष्यबळ नाही. रुग्ण तेथे मरायलाच दाखल होतात, असं न्यायालय म्हणत असल्याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे.

मग हे सर्व महाराष्ट्रातच का घडवले जात आहे?
गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणासारख्या राज्यांतही करोनाचा कहर आहे. गुजरातला तर न्यायालयानेच झापले, पण तेथील राज्यपालांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठका घेतल्याचे दिसत नाही. मग हे सर्व महाराष्ट्रातच का घडवले जात आहे? असा सवाल शिवसेनेनं भाजपाला केला आहे. ज्या राज्यात ऑक्सिजन सिलिंडर अभावी २०० अर्भक तडफडून मरतात त्या राज्यात सर्व आलबेल, पण महाराष्ट्रात १५ हजारावर रुग्ण कोरोनावर विजय मिळवून घरी गेले ते सरकार अपयशी ठरविण्याचे हे कुटील कारस्थान असून महाराष्ट्राचा विरोधी पक्ष या कारस्थानाचा सूत्रधार ठरत आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून राज्य सरकारची बदनामी करायची. त्यातून ‘ठाकरे सरकार’ कोलमडेल व आपला वनवास संपेल, असे दिवास्वप्न विरोधी पक्ष पाहात आहे. पण विरोधी पक्ष भ्रमात आहे. असे काही घडण्याची सुतराम शक्यता दिसत नाही असा टोला शिवसेननं भाजपाला लगावला.

विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळे आणीत आहे
राज्य सरकारनेही एक विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. राज्य सरकारने वेगळे पॅकेज जाहीर करावे याचा अर्थ केंद्र सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटींचे पॅकेज पोकळ आणि कुचकामी आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळे आणीत आहेत. या रिकाम्या खोक्यात रिकामी डोकी भरून त्यांना गुजरातच्या अंधारकोठड्या पाहायला पाठवायला हवे, असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘हा’ अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? राज ठाकरेंचा राज्यपालांना पत्रातून खणखणीत सवाल

मुंबई । राज्यातील महत्त्वाचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. मात्र, विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल आग्रही असून ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व भवितव्याच्या या प्रश्नात कुठल्याही राजकारणाला थारा देऊ नये,’ अशी विनंती राज यांनी राज्यपालांना केली आहे.

राज यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रातून राज्यपालांच्या परीक्षा घेण्याच्या आग्रही भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘कोरोनामुळं उद्भवलेल्या परिस्थितीमुळं संपूर्ण देश गेले दोन महिने टाळेबंदीत आहे. मुंबई आणि पुण्याची परिस्थिती पाहता टाळेबंदी किती दिवस राहील हे कोणीच सांगू शकत नाही. टाळेबंदी शिथिल झाली तरी कोरोना संपला असं होणार नाही. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी,’ असा थेट सवाल राज यांनी आपल्या पत्रातून राज्यपालांना केला आहे.

या पत्रात त्यांनी पुढे लिहलं आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव किती भयंकर आहे याची कल्पना आपल्याला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय?अर्थव्यवस्थेचं अपरिमित नुकसान होत असतानाही केवळ जीव वाचावे म्हणून संपूर्ण देशानं टाळेबंदी केली. मग याच न्यायानं विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे? परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट पास करणे असा याचा अर्थ होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या, विद्यापीठातील अंतर्गत गुणांच्या आधारावर किंवा विद्यार्थ्यांना काही प्रोजेक्ट्स देऊन किंवा अन्य मार्गानं अंतिम परीक्षेचा निकाल लावता येईल’ असं मत राज यांनी आपल्या पत्रात राज्यपालांकडे व्यक्त केलं.

दरम्यान, विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षावरून सध्या राज्यपाल व राज्य सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगानं करावा, असं मत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. तर, राज्यपाल परीक्षा घेण्याबाबत आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत सदर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाव्यात अशीच मागणी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

#VilasraoDeshmukh75 | रितेशने शेयर केला अतिशय भावनिक व्हिडीओ; वडिलांच्या कुर्त्यात हात घालून केले असे काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज ७५ वि जयंती आहे. यानिमित्त बॉलिवूड अभिनेता आणि देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख यांनी अतिशय भावनिक व्हिडीओ शेयर करत वडिलांची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. रितेशने एक भावनिक पोस्ट करीत वडिलांना अभिवादन केले आहे. वडिलांच्या एका कुर्त्यात स्वतःचा हात घालून आपल्याच डोक्यावरून हात फिरवत रितेशने वडिलांची आठवण काढली आहे.  त्याने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यासोबत दररोज तुमची खूप आठवण येते असे ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा पपा म्हंटले आहे. हा व्हिडीओ पाहून दिवंगत विलासराव देशमुख यांचे समर्थकही गहिवरले असून या संकटकाळात ते असायला हवे होते असेही म्हणत आहेत.

रितेश देशमुख पत्नी जेनेलिया सोबत नेहमीच व्हिडीओ शेअर करत असतात. पण आजचा त्यांचा व्हिडीओ खूप भावनिक आणि त्यांना त्यांच्या वडिलांप्रती असणारे प्रेम व आदर व्यक्त करणारा आहे. या व्हिडिओमध्ये  दिवंगत नेते विलासराव यांच्या कुर्त्यातून जणू तेच रितेशच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत आहेत. त्याची पाठ थोपट आहेत असा भास होतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे भरून आले आहेत. “अभि मुझमे खी बाकी थोडीसी हैं जिंदगी” हे गाणे बॅकग्राउंडला आहे. व्हिडिओमध्ये विलासराव देशमुख यांचा फोटो तसेच रितेश व त्याच्या वडिलांचा एक पाठमोरा फोटोही आहे.

https://twitter.com/Riteishd/status/1265145930212413441

राजकारणातील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व अशी विलासराव देशमुख यांची ओळख होती. आपल्या सर्वसामावेशक स्वभावामुळे ते जनतेत लोकप्रिय होते. त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द लक्षणीय होती. रितेश सोबत त्यांचे भाऊ मंत्री अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांनी ट्विटरवरून वडिलांना अभिवादन केले आहे. दरवर्षी हा दिवस विलासराव देशमुख यांच्या समाधीस्थळी बाभळगाव येथे त्यांच्या आठवणीत साजरा केला जातो मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे तो असा व्हर्च्युअली केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देवेंद्र फडणवीसांची तातडीची पत्रकार परिषद; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार?

मुंबई । देशभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या थैमानात महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्येमुळे हे सरकार कोरोनावर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा कडून बोलले जात आहे. नुकतेच आघाडी सरकारच्या विरोधात मेरा आंगण, मेरा रणांगण हे आंदोलन ही करण्यात आले. दरदिवशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन वळणे येत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. फडणवीस आज राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

फडणवीस या परिषदेत काय भूमिका मांडणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुण्यातील पत्रकारांसाठी ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्राचे हे सरकार रद्द करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी गेले काही दिवस सातत्याने भाजपाकडून केली जात आहे. भाजपा नेते सरकारविरुद्ध निदर्शने करताना दिसत आहेत. या सर्व राजकीय हालचाली पाहता फडणवीस पत्रकारांसोबत आपल्या पक्षाची कोणती भूमिका मांडणार आहेत. यावर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. याचे संपूर्ण खापर भाजपा ने आघाडी सरकारवर फोडले आहे. ते सातत्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु करण्याची मागणी करीत आहेत. सध्या भाजपा आणि आघाडी सरकार यांचे चांगलेच युद्ध जुंपले आहे. ट्विटर वरून दोन्हीकडचे नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस काय बोलतात ते ४ वाजता समजेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

केंद्राची गुजरातवर कृपादृष्टी; महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत किती श्रमिक ट्रेन धावल्या याबाबत एक माहिती समोर आली आहे. १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून धावल्या असल्याची बाब समोर आली आहे. गुजरातमधून आतापर्यंत ८५३ श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांक महाराष्ट्र, नंतर पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.

रेल्वे प्रशासनाकडून गुजरातला ८५३ ट्रेन मिळाल्या असून सर्वात जास्त मजुरांची संख्या असलेल्या महाराष्ट्रातून ५५० ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. तर पंजाबमधून ३३३, उत्तर प्रदेशातून २२१ आणि दिल्लीमधून १८१ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांसाठी सर्वाधिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश (१२४५) पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे बिहार (८४६), झारखंड (१२३), मध्य प्रदेश (११२) आणि ओडिशाचा (७३) क्रमांक आहे.

१ मे रोजी पहिली श्रमिक ट्रेन चालवली तेव्हा फक्त ४ ट्रेन चालवण्यात आल्या ज्यामध्ये चार हजार प्रवासी होते. २० मे रोजी सर्वात जास्त २७९ ट्रेन चालवण्यात आल्या. त्यावेळी ४ लाख लोकांनी प्रवास केला. १ मे पासून सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेनमधून प्रवास केलेल्यांमध्ये ८० टक्के प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी दिली आहे. राज्यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे रेल्वे मंत्रालयकडून श्रमिक ट्रेन पुरवल्या जात आहेत. या ट्रेनसाठी येणारा ८५ टक्के खर्च रेल्वे उचलत असून उर्वरित खर्च राज्य सरकारं उचलत आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ट्रेन आपल्या निर्धारित ठिकाणी न पोहोचता भरकटत असल्याचं समोर आलं आहे. त्यासंबंधी रेल्वेने सांगितलं आहे की, “बिहार आणि उत्तर प्रदेशच्या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे धावत आहेत. सोबतच वैद्यकीय तपासणी होत असल्याने टर्मिनलकडून हिरवा कंदील मिळण्यास उशीर होतो. ही सर्व जबाबदारी राज्य प्रशासनाची आहे. राज्य सरकारसोबत चर्चा करत ही समस्या सोडवण्यात आली आहे. सोबतच प्रवासासाठी इतर व्यवहार्य मार्गांचा शोध घेतला जात आहे”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”