Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5829

कराड तालुक्यात पुन्हा 12 नवे कोरोनाग्रस्त, साताऱ्यातील 6 कैदीही पॉजिटीव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या 113 वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नुकतेच कराड तालुक्यात पुन्हा 12 आणि सातारा येथे 6 अशा एकूण 12 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये सातारा येथील सहा कैद्यांचा समावेश असल्याचे समजत आहे. आज सकाळी कराड तालुक्यात 2 आणि सातारा येथे 1 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले होते. त्यानंतर आता दुपारी पुन्हा तब्बल 18 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे.

https://hellomaharashtra.in/maharashtra-news/how-karad-corona-patients-reached-upto-57-karad-corona-news/

ताज्या आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 113 वर पोहोचली आहे. तर कराड तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा 84 वर गेला आहे. सातारा जिल्ह्याने कोरोना रुग्णांच्या ऐकून आकडेवारीत शंभरी पार केल्याने आता जिल्हा प्रशासनाची झोप उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार तांबवे 1, गमेवाडी 1, गोटे 1, वनवासमाची 1, आगाशिवनगर 3, उंब्रज 1, कराड 2 शहर, बनवडी 1, खोडशी 1 तसेच सातारा येथील सहा कैद्यांचा समावेश आहे. आज सकाळी कराड तालुक्यातील 2 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले होते. आता पुन्हा वाढलेल्या रुग्णांमुळे आज एकाच दिवशी कराड तालुक्यात 14 रुग्ण सापडले तर सातारा येथे 7 रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Video ऑपरेशन ‘समुद्र सेतू’: भारतीयांच्या घरवापसीसाठी ‘INS जलाश्व’ मालदीवमध्ये

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ‘समुद्र सेतू’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका मालदीवमध्ये दाखल झाली आहे. मालदीवची राजधानी मालेमध्ये ही युद्धनौका पोहोचली आहे.

आयएनएस जलाश्व बरोबर ‘आयएनएस मगर’ ही युद्धनौका सुद्धा या मोहिमेमध्ये असणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिमेत मालदीवमधून १ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. मालदीवमधून भारतात येताना नागरिकांना COVID-19 संबंधित सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल. मायदेशी परतणाऱ्या भारतीयांना प्रवासादरम्यान मूलभूत आणि वैद्यकीय सुविधा देण्यात येतील. ‘COVID-19 शी संबंधित आव्हानांमुळे नागरिकांना कठोर नियमांचे पालन करावे लागेल’ असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. मालदीवहून निघाल्यानंतर या युद्धनौका केरळ कोचीमध्ये येतील. सर्व प्रवाशांना तिथेच उतरवण्यात येईल. त्यानंतर संबंधित राज्यांकडे सुपूर्द केले जाईल.

परराष्ट्र, संरक्षण, गृह, आरोग्य आणि अन्य मंत्रालयांशी समन्वय राखून ‘समुद्र सेतू’ मोहीम सुरु असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. भारताने आयएनएस शार्दुल ही युद्धनौका संयुक्त अरब अमिरातीला पाठवली आहे. याशिवाय १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

लॉकडाउनमध्ये कंडोमचा खप खरंच वाढला का? जाणून घ्या खरं काय ते..

वृत्तसंस्था । जगभरात लॉकडाउनमुळे नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे कंडोमच्या विक्रीत वाढ होत असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर जोरात सुरू होती. कंडोम विक्रीत वाढ झाल्याचा हा दावा खरा आहे का? याचा आढावा घेताना समोर आलेली माहिती नक्कीच या प्रश्नाचं खरं उत्तर देणारी आहे. जवळपास दिड  महिन्यांआधी जगभरात कोरोना लॉकडाउनची सुरुवात करण्यात आली. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतरच्या काही दिवसांत कंडोमची विक्री जोमात सुरू असून बाजारात तुटवडा निर्माण झाला असल्याचे वृत्त समोर आले होते. पण खरं तर या बातमीच्या खोलात पडताळणी केल्यास हा दावा चुकीचा असल्याचं दिसते. कारण कोरोनाला लॉकडाऊनचा फटका कंडोम विक्रीला सुद्धा बसला आहे.

या गोष्टीवर प्रकाश टाकत जगातील सर्वाधिक कंडोमचे विक्रमी उत्पादन करणाऱ्या कॉरेक्स बीएचडी कंपनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाउनमुळे निरोधच उत्पादन ठप्प झाले होते. लॉकडाउनमुळे मलेशियातील तीन कंपन्यांमधील निरोधचे उत्पादन थांबवावे लागले असल्याची माहिती कंपनीने दिली. जगभरात बाजारात विकला जाणारा प्रत्येक पाचवा कंडोम हा मलेशियन कंपनी कॉरेक्स बीएचडीचा असतो.

ब्रिटनची आघाडीची कंडोम उत्पादन कंपनी ड्युरेक्सने सांगितले की, जगभरातील सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कडक नियमांमुळे कंडोमच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट झाली. जगभरातील लोक आयसोलेशनमध्ये असून करोनाच्या भीतीमुळे सेक्स करण्याचे टाळत आहे. रेकिट बेनक्सिरचे सीईओ लक्ष्मण नरसिंहन यांनी सांगितले की, कंडोम विक्री मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरीक सोशल डिस्टेंसिंगचेही पालन करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सेक्स करण्याचे अनेकजण टाळत आहेत.

नरसिंहन यांनी पुढे सांगितले की, युरोपमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे केंद्र झालेल्या इटलीतही अनेकांनी एकमेकांपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. अनेकजणांनी सेक्स करण्याचे टाळल्यामुळे कंडोम विक्रीत घट झाली. लॉकडाउन नियमांच्या कठोर नियमांमुळे इटली आणि ब्रिटनमधील अनेकांनी कॅज्युअल सेक्स करण्यासही नकार दिला. स्वत: च्या घरातील व्यक्तींशिवाय इतर व्यक्तींना भेटणे हे लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा या दोन्ही देशांमध्ये नियम आहे. ब्रिटनमध्ये सेक्स करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. ब्रिटनमध्ये २३ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सेक्स करण्याचे अनेक जणांनी टाळले आहे.

मात्र, लैगिक भूक शमवण्यासाठी एक नवीन पर्याय याच काळात समोर आला आहे तो म्हणजे सायबर अफेअरचा. युरोप ते अमेरिकेपासून अनेक जणांनी सायबर अफेअरवर लक्ष केंद्रीत केले असल्याची बाब समोर आली आहे. अमेरिकेत लोकांना घरात राहण्याचे आदेश आहेत. त्यामुळे अनेकजणांनी ऑनलाइन डेटिंग साइटवर आपल्या पार्टनरशिवाय इतरांसह व्हर्चुअल सेक्सला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला? जाणून घ्या पहिल्या रुग्णापासून आज पर्यंतचा पूर्ण प्रवास

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्याने नेहमीच राज्याच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. या तालुक्याने आजपर्यंत महाराष्ट्राला दोन खंदे मुख्यमंत्री दिले आहेत. खाशाबा जाधवांसारखे ऑलंम्पिकवीर दिले आहेत. मात्र आज कराड तालुका राज्यभरात चर्चेत आहे तो वाढत्या कोरोना रुग्णांमुळे. कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र आपण कराड तालुक्यातील पहिल्या रुग्णापासूनचा प्रवास जर समजावून घेतला तर कोरोना कसा फोफावला याचे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. Karad Corona News

२ एप्रिल – कराड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि कराडकरांना हादरा बसला
आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वी कराड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. दिनांक 2 एप्रिल रोजी तांबवे येथील ३२ वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. दूर चीन देशात जन्माला आलेला हा आजार पाहता पाहता भारतात आणि कराड तालुक्यात आल्याने पहिल्यांदा अनेकांना यामुळे हादरा बसला. मात्र जिल्हा प्रशासनाने योग्य काळजी घेत आवश्यक सर्व उपाययोजना वेळेवर अंबलबजावणी केल्याने नागरिकांना धीर आला. तसेच सदर तरुण मुंबईहून प्रवास करून आलेने त्याला बाधा झाली होती. Karad Corona News

७ एप्रिल – तालुक्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला
पहिल्या रुग्णावर उपचार सुरु होते तोच ७ एप्रिल रोजी महारुगडेवाडी येथील एका ५४ वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. मुंबईहून गावी आलेला हा पुरुष अनेकांच्या संपर्कात आलेला असल्याने प्रशासनाला घाम फुटला. मात्र महारुगडेवाडीत केवळ एकाच ७५ वर्षीय वृद्धेला कोरोनाची बाधा झालेली असल्याचे तपासात दिसले. यामुळे कराडकरांनी मोकळा श्वास सोडल. Karad Corona News

११ एप्रिल – तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी
कोरोना कोणाच्यातरी जीवावर बेतू शकतो हे कराडकरांनी प्रत्यक्षात अनुभवलं आणि यानंतर तालुक्यातील नागरिकांनी खऱ्या अर्थाने कोरोनाची धाय खाल्ली. कोरोनाने कराड शहर नाही तर थेट ग्रामीण भागावरच हल्ला चढवला होता. ११ एप्रिल रोजी महारुगडेवाडी येथे सापडलेल्या ५४ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

१५ एप्रिल – संपर्कातून कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण सापडला
आत्तापर्यंत सापडलेले दोन्ही रुग्ण हे बाहेरुन प्रवास करुन आले होते. त्यांना ट्रेव्हल हिस्टरी होती. मात्र १५ एप्रिल रोजी तालुक्यात निकटवर्तीयाच्या संपर्कातून कोरोनाची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला. महारुंगडेवाडी येथील एका ७५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच याच दिवशी ओगलेवाडी येथे आणखी एक रुग्ण सापडला. यामुळे आता तालुक्यातील नागरिकाची चिंता वाढली. Karad Corona News

१८ एप्रिल – तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरा झाला
तांबवे येथील ३२ वर्षीय तरुणावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊन १८ एप्रिल रोजी या तरुणाला डिस्चार्ज देण्यात आला. तालुक्यातील पहिला रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण बनले.

१९ एप्रिल – चरेगाव येथे ३२ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह सापडला तर बाबरमाचीतील ३६ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. Karad Corona News

२२ एप्रिल – वनवसमाची येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला
वनवासमाची येथील एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या तरुणाने नागपूरला प्रवास केल्याने त्याला बाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या युवकाच्या निकटवर्तीयांनी कोरोना चाचणी घेतली गेली. आणि येथून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एक मोठी साखळी सुरु झाली

यानंतर ३० एप्रिल पर्यंत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत खालीलप्रमाणे लक्षणीय वाढ झाली.  Karad Corona News
२२ एप्रिल : आगाशिवनगरच्या युवकालाही कोरोनाची लागण
२३ एप्रिल : आगाशिवनगरमधील दोन युवकांना कोरोनााची बाधा
२३ एप्रिल : वनवासमाचीतील ५४ वर्षीय महिलाही पॉझिटीव्ह
२५ एप्रिल : वनवासमाचीतील कोरोना रूग्णाचे निकट सहवासीत चारजण पॉझिटीव्ह, आगाशिवनगरमधील एकजण पॉझिटीव्ह, मलकापुरमधील दोघे पॉझिटीव्ह, रेठरे, कापिल, येतगाव, कासेगाव, कामेरीतील प्रत्येकी एक असे एकाच दिवशी बाराजण पॉझिटीव्ह
२७ एप्रिल : दोन महिला कोरोनाबाधीत. त्यामध्ये आगाशिवनगर येथील चार दिवसांची बाळंतीण व वनवासमाचीतील एका महिलेचा समावेश.
२८ एप्रिल : मलकापुरातील दोघे तर वनवासमाचीतील तिघे असे एकुण पाच पॉझिटीव्ह
३० एप्रिल : वनवासमाचीतील दहा वर्षीय मुलगा कोरोनाबाधीत

१ मे – एका दिवसात तब्बल २४ रुग्ण सापडले
यंदाचा महाराष्ट्र दिन कराडवासीयांसाठी चिंता वाढवणारा ठरला. या एका दिवसात तालुक्यात तब्बल २४ रूग्ण पॉझिटीव्ह सापडले. धक्कादायक बाब म्हणजे कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालायातील ६ कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आल्याने तालुका हादरला. बाळंतपणासाठी आलेल्या कोरोनाबाधित गरोदर महिलेमुळे या ६ जणांना आणि एका निकटवर्तीयाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर दुपारी २ जण कोरोना बाधित सापडले. त्यानंतर पुन्हा रात्री उशिराने आणखी १४ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. या सर्व घटनांमुळे संपूर्ण कराड तालुकाच हादरून गेला. १ मी रोजी सापडलेल्या रुग्णामध्ये वनवासमाची १४, मलकापूर २, कºहाड ५, उंब्रज १, सातारा १, आगाशिवनगर १ आहेत.

२ मे – कराड तालुक्यात दिवसभरात एक रुग्ण सापडला. आत्तापर्यंत कराड तालुक्यात एकूण ५७ कोरोनाबाधित सापडले आहेत. तर सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. Karad Corona News

४ मे – वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या एका नागरिकाचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित

६ मे – वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 असे एकूण 10 नागरिकांचा अहवाल आज कारोना (कोविड-19) बाधित आला आहे.

कराड शहरात व तालुक्यात कोरोनाचे अतिसंवेदनशिल भाग पुढीलप्रमाणे
– मलकापुर आगाशिवनगर नगरपालिका हदद
– कराड वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय परिसर
– वनवासमाची
– हजारमाची
– बाबरमाची
– कापील
– रेठरे बुद्रूक
– महारुगडे वाडी
– ओगलेवाडी
वरील गावासह कराड शहराच्या तीन किलोमिटर अंतरातील ११ गावे कंटेनमेंट झोन म्हणून जाहिर केली असुन येथे निर्बंध आहेत प्रशासनाने येथे कडक उपाययोजना केल्या आहेत Karad Corona News

कराड तालुक्यात आजपर्यंत कोरोना रुग्ण सापडलेली गाव, व संख्या
तांबवे 1
महारुगडेवाडी 2
ओगलेवाडी 1
चरेगाव 1
बाबरमाची 1
कापिल 2
आगाशिवनगर मलकापुर नगरपालिका 15
वनवासमाची 26
कराड शहर 6
उंब्रज 1
डेरवण 1 पाटण तालुका
एकुण. 70

सातारा जिल्हा प्रशासन अतिशय सुव्यवस्थित पणे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील परिस्थिती हाताळत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी होत आहोत. जरी मागील काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असली तर बहुतेक रुग्ण हे कंटेनमेंट झोनमधील आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र सद्य परिस्थितीमध्ये सर्वांनी अतिशय खबरदारी घेऊन वागणे गरजेचे आहे. तसेच कराड तालुक्यात डॉक्टर आणि दवाखान्यांची पुरेपूर उपलब्धता आहे. कृष्णा हॉस्पिटल सारखे भव्य रुग्णायल कराड मध्ये असताना नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही. जिल्ह्यातील प्रशासन कोरोनावर मात करायला खंबीर असून आपण त्यांना पूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे. Karad Corona News

पोलीस दलावर कोरोनाचा हमला; राज्यातील 531 पोलीस कोरोनाबाधित, 5 जणांचा मृत्यू

मुंबई । कोरोनाविरुद्ध लढाईत आघाडीचा मोर्चा सांभाळत असलेल्या योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. यात पोलीस दलात कोरोनाचा झालेला शिरकाव म्हणजे कोरोनाची लढाई आणखी कठीण होत असल्याचं संकेत आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 51 अधिकारी आणि 480 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर कर्तव्य बजावणाऱ्या पाच पोलिसांनी प्राण गमावले आहेत.

सद्यस्थितीत 43 अधिकारी आणि 444 कर्मचारी कोरोनासंक्रमित आहेत. तर आतापर्यंत 39 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आठ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर मुंबईतील तीन तसंच पुणे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आज पहिली बस होणार रवाना

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे.

एमपीएससी स्टुडंट्स राईट्स चे समन्वयक महेश बडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे विभागिक कार्यालयाकडे आठ दिवसांपूर्वी आम्ही पुण्यात अडकलेल्या जवळपास २५०० विद्यार्थ्यांची यादी दिली होती. त्यानुसार आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांतून आता या विद्यर्थ्यांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज अहमदनगर साठी पहिली एस.टी. बस रवाना होणार आहे. पुण्य‍तील कंटेंनमंट झोन वगळता इतर भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांची आम्ही प्रशासनाला माहिती दिली आहे. त्यानुसार ज्या जिल्ह्यातून एमओसी येईल त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एस.टी. बस ची व्यवस्था करुन त्याची जाण्याची व्यवस्था करण्यात येत अाहे. विद्यार्थ्यांनी गोंधळ न करता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणाऱ्या फोनची वाट पहावी. जशी व्यवस्था होइल त्यानुसार सदर विद्यार्थ्यांना कळवण्यात येणार आहे अशी माहिती बडे यांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्यात सुमारे अडीच हजार विदयार्थी वास्तव्यास आहेत. राज्यात अडकलेल्यांना एसटीद्वारे त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे. यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च  देखील सरकार करणार असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. 10 हजार एसटी बसेसने राज्यात अडकलेल्या लोकांना घरी पोहोचवणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितलले आहे. तसेच या प्रवासाचा खर्च मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांच्या वर अपेक्षित खर्च आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरु होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

अखेर देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, म्हणाले..

मुंबई । छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीदेखील आक्षेप घेत ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, असं जाहीर केलं अखेर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटसंबंधी माफी मागितली आहे. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या ट्विटनंतर लगेचच माफी मागत ट्विट करत म्हटलं आहे की, “छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो”.

ट्विट, टीका आणि माफी
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन केलं होतं. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. त्याचबरोबर अनेकांनी माफीची मागणीही केली. या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर काही वेळातच संभाजीराजेंनी एक ट्विट केलं. ज्यात फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत,” असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं होतं.

‘त्या’ ट्विटमुळं काँग्रेसने डागली फडणवीसांवर तोफ
देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती शाहू महाराजांविषयीच्या ट्विटवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. “संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही. संघानं मनुवाद आणायचा असल्यानं महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!,” असं ट्विट करत सावंत यांनी टीका केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘या’ गोष्टींवर मंत्र्यांनी दर्शवली तीव्र नाराजी; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

मुंबई । आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासन बऱ्याच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासनाविरोधात तक्रार केली. ज्या पद्धतीने प्रशासनातील अधिकारीवर्ग परस्पर निर्णय घेत आहे आणि राबवताना घोळ घालत आहे, याबाबत मंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनात नसलेले समनव्य, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडून परस्पर निघत असलेले आदेश आणि निर्णय याबाबत मंत्र्यांनी आक्षेप नोंदवला अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन त्यांच्या स्तरावर वेगवेगळे निर्णय घेत आहेत आणि आदेश काढत आहेत. केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्सनुसारही राज्यात गोष्टी होत नसल्याची बाब अनेक मंत्र्यांनी बैठकीत समोर आणली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं सुरू ठेवण्याबाबत मुख्य सचिवांनी आदेश काढला, पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त परस्पर वेगळेच निर्णय घेत आहेत. कोणी काही तासांसाठी दुकानं सुरू ठेवतो, तर कोण एक दिवसाआड, यामुळे राज्यात गोंधळ उडत असल्याचं मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. या सर्व कारणांमुळं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचा प्रशासकीय यंत्रणाविषयी नाराजीचा सूर लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

तळीराम पावले! ३ दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल गोळा

मुंबई । केंद्र सरकारने ४ मेपासून कन्टेंन्मेंट झोन वगळता इतर भागात अटी-शर्तींसह दारु विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. महाराष्ट्रातही दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची एकच झुंबड उडाली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली. तळीरामांच्या या दारूवेडामुळे राज्यातील दारू विक्रीच्या आकड्यांनी उचांक गाठला आहे. त्यामुळं राज्याच्या तिजोरीत या तळीरामांनी मोठं आर्थिक योगदान दिल्याची माहिती आता समोर आली आहे.

मागील ३ दिवसांत १०० कोटी रुपयांहून अधिक महसूल दारूविक्रीच्या माध्यमातून मिळवला असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी सांगितलं. राज्यातील एकूण दारु दुकानांपैकी केवळ एक तृतीयांश दारुची दुकानं सुरु होती. त्यातून उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी रात्रीपर्यंत १०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवला असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात दारु, आयएमएफएल, वाइन आणि बिअरची विक्री करणारी १००० हून अधिक परवानाधारक दुकानं असून त्यापैकी केवळ २९६७ दुकानं बुधवारी सुरु असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

मंगळवारी जवळपास १६.१० लाख लिटर आयएमएफएल (इंडियन मेड फॉरेन लिकर), बिअर, वाइन आणि देशी दारुची विक्री झाली. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत महापालिका आयुक्तांनी दारुची विक्री स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही हा कल कायम असल्याचं सांगण्यात आलं आहे. . सोमवारपासून दारुची दुकानं सुरु झाल्यानंतर मद्यपींच्या दारु दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ग्राहाकांकडून कोणत्याही नियमांचं, सोशल डिस्टंन्सिंगचं पालन होत नसल्याचं चित्र होतं. ग्राहकांची गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. मात्र, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पोलिसांनी लाठीचार्ज करण्याच्या किंवा ग्राहकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या घटना कमी झाल्याचं एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दुर्दैवी! यूपीत महिला पोलीस कर्मचारी कोरोनाने दगावली, ४ दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म

लखनऊ । देशामध्ये कोरोना विषाणूच्या फैलाव झपाट्याने  होत आहे. कोरोनासोबतच्या लढाईत सर्व प्रशासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यात सर्वात आघाडीवर असणाऱ्यांपैकी पोलीस कोरोनाला रोखण्यासाठी रस्त्यावर पहारा देत आहेत. मात्र, या जीवघेण्या कोरोनानाने या पोलीसांवर सुद्धा झडप घातली आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या तैनात महिला पोलीस कर्मचारी कोरोना संक्रमित होऊन तिचा दुर्दैवानं मृत्यू झाला. दरम्यान, या महिला पोलीस कर्मचाऱ्याने ४ दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता.

नोएडा सेक्टर २चे एसीपी रजनीश यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ” माझ्या जवळ शब्द नाहीत, या कोरोना योद्धासाठी. एक लहान मुलगा आणि दुसरे बाळ पाच दिवसांचे आहे. कोरोनाची लढाई लढताना या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू होणे होणे एक दुखद घटना आहे. माझ्याजवळ शब्द नाही, मी निशब्द आहे.! ”

महिला पोलीस कर्मचारी कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर पोलीस ठाण्यात कार्यरत होती. ती गरोदर असल्याने तिने ५ एप्रिलपर्यंत सुट्टी घेतली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याची तब्बेत अचानक बिघडली. तिला रुग्णालदात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयाने उपचार करण्यात नकार दिला. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता तिचा मृत्यू झाला. महिला पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना तपासणीसाठी सॅम्पल घेतले होते. मात्र, रिपोर्ट येण्याआधीच या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूनंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”