Monday, December 22, 2025
Home Blog Page 5840

आम्ही कोरोनावर ‘लस’ शोधली! इस्राइलचा दावा

वृत्तसंस्था । संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटातून जात आहे. कोरोनामुळे जीवितहानी सोबत आर्थिकहानीचा सुद्धा फटका जगाला बसत आहे. यावर शेवटचा रामबाण इलाज एकच तो म्हणजे कोरोनाच्या संसर्गाला रोखणारी लस. अशावेळी इस्राइलने (Israel) कोरोना व्हायरसवर (Israel Developed Coronavirus Vaccine ) लसची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. इस्राइलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांचं म्हणणं आहे की इस्राइलने करोनावर लस (Israel Covid-19 Vaccine ) तयार केली आहे आणि लवकरच त्याच्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे.

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाअंतर्गत अत्यंत गोपनीय पद्धतीने कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या संशोधनाबाबत नफ्ताली यांनी लसीची घोषणा केली. नफ्ताली यांच्या दाव्यानुसार ही लस मोनोक्लोनल न्यूट्रॅलिटींगनुसार शरीरातील व्हायरसवर हल्ला करते आणि शरीरातच कोरोनाच्या विषाणूंचा नायनाट करते. नफ्ताली बेनेट यांच्यावतीने याबाबत एक अधिकृत पत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. यात त्यांनी करोनावर लस शोधल्याबद्दल त्यांच्या संशोधकांचं अभिनंदन देखील केलं आहे. शिवाय, याचे पेटंट मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्यासाठी संपर्क साधण्यात येईल, असंही म्हटलं आहे.

दरम्यान, या लसीचं मनुष्यप्राण्यावर चाचणी केली गेल्याचं पत्रकात कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही. इस्राइलने करोनाच्या जागतिक उद्रेकानंतर तातडीने आपल्या देशाच्या सीमा सील केल्या होत्या. शिवाय, नागरिकांच्या प्रवासावरही निर्बंध आणले होते. इस्राइलमध्ये सध्या १६,२४६ करोनाबाधित रुग्ण असून २३५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कोठडीतील आरोपीला कोरोनाची लागण

पुणे । पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढला असून कोरोनाने आता पोलीस कोठडीतील आरोपीपर्यंत मजल मारली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ही माहिती समोर येताच या आरोपीच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होत अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात बलात्कार प्रकरणी २५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायलायने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला शहरा बाहेरच्या कारागृहात पाठवून देण्यात आलं. मात्र, हा आरोपी आता कोरोनाबाधित असल्याचं आता समोर आलं आहे. दरम्यान, सदर आरोपी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बाधित झाला नसल्याचं सूत्रांच म्हणणं असून कारागृहात गेल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असं त्यांनी स्पष्ट केल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘यामुळेच’आशिष नेहराला पदार्पणाच्या सामन्यात फाटलेले शूज घालून गोलंदाजी करावी लागली होती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने पदार्पणाचा आपला कसोटी सामना आठवला तेव्हा त्याच्याकडे फक्त एक जोडी शूजच होते.जे त्याने रणजी ट्रॉफी पदार्पण आणि कसोटी पदार्पण या दोन्ही ठिकाणी वापरला.

आशिष नेहराने आपला दिल्लीचा माजी सहकारी आकाश चोप्रा याच्याशी त्याच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले की,“माझ्याकडे एकच शूजची जोडी होती जी मी रणजी करंडक स्पर्धेत घातली होती आणि तीच जोडी मी १९९९ मध्ये कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या माझ्या पहिल्या कसोटी सामन्यातही घातली होती.मला आठवत आहे की प्रत्येक इनिंगनंतर मी शूज शिवायचो.”

Ashish Nehra- India TV

विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू दिल्लीचे आहेत आणि या संभाषणादरम्यान दोघांनीही दिल्लीच्या रेसकोर्स मैदानावर आपल्या क्लब संघाकडून खेळलेला सामना आठवला.

आकाश म्हणाला, “तुला माहित आहे का आम्हाला वाऱ्यासह वाऱ्याच्या विरुद्ध गोलंदाजी करावी लागायची.एकदा कोच मला म्हणाले की,”मी तुला त्या टोकाकडून गोलंदाजी का दिली नाही मग त्यावर मी म्हणालो की,”तुम्ही त्या बाजूने गोलंदाजी करावी अशी तुमची इच्छा आहे.”

नेहरा भारताकडून १७ कसोटी सामने खेळला आहे. याशिवाय त्याने भारताकडून १२० एकदिवसीय सामने आणि २७ टी -२० सामने खेळले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रेड झोनमधून परभणीत येण्यास ‘नो एंट्री ‘;अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

मुंबई , पुणे , ठाणे , औरंगाबाद , सोलापूर आणि इतर “ रेड झोन ” जिल्ह्यातील व्यक्तींना परभणी जिल्ह्यात प्रवेशाची परवानगी दिली जाणार नाही, तसे याबाबत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले असुन रेड झोन जिल्ह्यातील व्यक्तींनी जिल्ह्यात अनाधिकृतपणे प्रवेश केल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करणार येणार आहे. जिल्ह्यात प्रवेशासाठी परवानगीचे अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत असे परभणी जिल्हा प्रशासनाकडून काल स्पष्ठ करण्यात आलयं.

लॉकडाऊनच्या कालावधीत विविध जिल्ह्यात अडकलेले कामगार,पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या स्वजिल्ह्यात पाठविण्याबाबत मार्गदर्शक सुचना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून प्राप्त झाल्याचे सांगत, बाहेरील जिल्ह्यात अथवा राज्यात परभणी जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास जिल्ह्यात प्रवेशासाठी परवानगीचे अर्ज https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

अर्जदारांनी अर्जाची स्थिती संकेतस्थळावरच पाहावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी येऊ नये सोबतच जिल्ह्यात व राज्यात अडकलेल्या व्यक्तींसाठी परभणी येथून वाहन पाठवून घेऊन येण्यासाठी अर्ज सादर करण्यात येऊ नये असे अर्ज आल्यास रद्द करण्यात येतील. असही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे .

परवानगी दिलेल्या इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आल्यानंतर संबंधितांना १४ दिवस निवारागृहात ठेवण्यात येईल व त्यानंतर वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लग्न सोहळे शक्यतो लॉकडाऊन नंतर आयोजित करण्यात यावेत.
असंही सांगण्यात आले आहे .

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे परभणी जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेश , बिहार , उत्तरप्रदेश , पश्चिम बंगाल , ओरीसा , राजस्थान , गुजरात , झारखंड , तेलंगाणा , आंध्रप्रदेश , तामिळनाडू आदी राज्यातील मुळ रहिवासी असलेले कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर नागरिकांनी त्यांच्या स्व-राज्यात जाण्यासाठी इच्छुक असल्यास परभणी जिल्ह्यात सध्या राहत असलेल्या ठिकाणापासूनच्या नजीकच्या पोलीस ठाणेमध्ये आपले संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक आणि जाण्यास इच्छुक असलेला जिल्हा व राज्य इत्यादी माहिती नोंदवावी. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

जागतिक व्यंगचित्रकार दिन: राज यांनी बाळासाहेबांना ‘गुरु’ म्हणून अशी दिली होती मानवंदना

मुंबई । व्यंगचित्रकार म्हटलं कि महाराष्ट्रात एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आपल्या ब्रशच्या फाटकाऱ्यातून कित्येकांना झोडपणारे बाळासाहेब अवघ्या महाराष्ट्रानं पहिले आहेत. बाळासाहेबांच्या याच कलागुणांचा प्रभाव ठाकरेंच्या पुढच्या पिढीतील राज ठाकरे यांच्यावर पडला. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे ह्यांच्या हाताखाली व्यंगचित्रकलेचे धडे गिरवणाऱ्या राज ठाकरेंचं १९९९ सालचं ‘चेहरे मोहरे’ हे पहिलं प्रदर्शन म्हणजे दोन्ही गुरूंना दिलेली मानवंदना होती. आज ‘जागतिक व्यंगचित्रकार दिन’. या निम्मितानं राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या प्रदर्शनाची झलक दाखवणारी चित्रफीत आपल्या ट्विटर अकॉउंटवर शेअर केली आहे. या चित्रफितीत अनेक दिग्गज मंडळींनी या प्रदर्शनाला हजेरी लावलेली दिसते. तसेच यात राज यांच्या अनेक व्यंगचित्रांची झलक पहायला मिळत आहे. आज जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त चला तर पाहूया.. महाराष्ट्रातील राज ठाकरे या उमद्या व्यंगचित्रकाराच्या या पहिल्या व्यंगचित्र प्रदर्शनाची झलक..

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कोविड -१९ दरम्यान टेनिस कोर्टवर जाऊन नोव्हाक जोकोविचने मोडला लॉकडाऊनचा नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोव्हाक जोकोविचने स्पेनमधील टेनिस कोर्टावर जाऊन लॉकडाऊनचा नियम तोडला.जोकोविचने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो मार्बेल्ला शहरातील टेनिस क्लबमध्ये दुसर्‍या माणसाबरोबर टेनिस खेळत आहे.सर्बियाचा जोकोविच सध्या या शहरात राहतो आहे.

स्पेनने सोमवारी काही भागात काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल केलेले आहे. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मार्चपासून हे लॉकडाउन सुरु आहे. आता व्यावसायिक खेळाडूंना परत सरावास जाण्याची परवानगी मिळालेली आहे परंतु पुढील आठवड्यापर्यंत सर्व स्पोर्ट्स क्लब आणि स्टेडियम बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

अद्यापही हे स्पष्ट झालेले नाही की त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास त्यांना दंड किंवा शिक्षा होईल की नाही.

2018 Novak Djokovic tennis season - Wikipedia

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘देशाला एका मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज’; राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिजीत बॅनर्जींचे उत्तर

नवी दिल्ली । देश सध्या कोरोनामुळं उदभवलेल्या अर्थसंकटात सापडला आहे. उद्योग ठप्प आहेत. लॉकडाऊनमुळं रोजंदारी पोट कोट्यवधी जनता बेरोजगार झाली आहे. अशा आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी संवाद साधत आहेत. आज मंगळवारी त्यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी खास बातचीत केली.

यावेळी, आज देशाला पैशाची चिंता भेडसावत आहे. बँकांसमोर अनेक आव्हानं आहेत तसंच नोकऱ्या वाचवणंही कठीण होऊन बसतं, असं राहुल गांधी यांनी प्रकाश टाकत बॅनर्जीना मत जाणून घेण्याचा प्रयन्त केला. यावर, ‘देशाला एका आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. अमेरिका-जपान सारख्या देशांनीही हेच केलं आहे. परंतु, आपल्याकडे मात्र असं घडलेलं नाही. छोट्या उद्योगांना मदतीची गरज आहे. या तिमाहीचं कर्ज माफ करण्याची गरज आहे.’ असं म्हणत अभिजीत बॅनर्जी यांनी या परिस्थितीच्या आकलनाला दुजोरा दिला. देशात सध्या मागणीचा अभाव आहे. कारण अनेकांकडे पैशांची चणचण असल्यानं ते काही विकत घेत नाहीत. अशावेळी लोकांकडे आर्थिक मदत पोहचण्यासाठी उशीर होणं परवडणार नाही. लॉकडाऊनमुळे उद्योग-धंदे ठप्प आहेत, त्यांनाही आर्थिक मदतीची अधिक आवश्यकता आहे, असंही अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटलं.

लॉकडाऊनमधून जेवढ्या लवकर बाहेर येता येईल, तेवढं चांगलं आहे परंतु, त्यानंतरही एक ठोस योजना असायला हवी अन्यथा सर्व काही फोल ठरेल, असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं. त्याला अभिजीत बॅनर्जी यांनी होकार देत, आपल्याला या फैलावाबद्दल माहीत आहे, केवळ लॉकडाऊन वाढवून काहीच साध्य होणार नाही असं मत मांडलं. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एका वातावरणाची आवश्यकता आहे. अशा वेळी राज्य सरकारला अधिक मदत करावी लागेल त्यामुळे सामान्यांपर्यंत पैसे पोहचू शकतील. गरीबांसाठी केंद्रानं नव्या योजना आणण्याची गरज नाही. ही जबाबदारी राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडे सोपवून गरीबांना थेट लाभ पोहचवायला हवा, असं म्हणत बॅनर्जी यांनी सत्तेच्या केंद्रीकरणावर टिप्पणी केलीय. ही वेळ धोका पत्करण्याची आहे, कारण ही वेळेची मागणी आहे, असंही अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटलं.

पुढचे सहा महिन्यांपर्यंत कोरोनाचा प्रभाव दिसू शकेल तेव्हा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, या राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अभिजीत बॅनर्जी यांनी लोकांचं कर्ज माफ करण्याचा तसंच लोकांना रोख रक्कम देण्याचा सल्ला दिला. याच पद्धतीनं लोकांना ताकद पुरविली जाऊ शकते. आज इंडोनेशियातही लोकांना रोख रक्कम पुरविली जातेय. त्यांनी हा निर्णय लोकांना सोडलाय की कुणाला कोणत्या वेळी पैशांची गरज आहे. सरकारपेक्षा हे लोकांना माहीत असतं की कुणाला सध्या पैशांची जास्त गरज आहे, असंही बॅनर्जी यांनी म्हटलं. ‘यूपीए सरकारनं चांगल्या अर्थनीती लागू केल्या होत्या. परंतु, आता मात्र त्या नीती सरकार लागू करताना दिसत नाही. यूपीए सरकारनं ज्या आधारावर या योजना लागू केल्या होत्या त्यांना सद्य सरकारनंही योग्य असल्याचं सांगितलंय आणि त्याच्यावरच काम केलंय’, असं म्हटलंय. ‘आजच्या घडीला या सुविधा योग्य ठरल्या असत्या परंतु, असं काही घडताना दिसत नाही. याचाच अर्थ या योजना देशव्यापी लागू होऊ शकलेल्या नाहीत’ असंही त्यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अमिताभ बच्चन यांचा मल्टीस्टारर चित्रपट ‘त्रिशूल’ ४२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता,या यातील काही न पाहिलेली छायाचित्रे पाहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मल्टीस्टारर सुपरहिट फिल्म त्रिशूलच्या रिलीजला आज ४२ वर्षे पूर्ण झाली आहेत.हा चित्रपट ५ मे १९७८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजीव कुमार, वहीदा रहमान, हेमा मालिनी, शशी कपूर, प्रेम चोप्रा, राखी, सचिन पिळगावकर आणि असे अजूनही बरेच स्टार्स आहेत. या चित्रपटाची काही न पाहिलेली छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखणार आहोत. या छायाचित्रांमध्ये आपण ऋषी कपूरला त्रिशूलच्या अन्य टीमसमवेत पहाल.

यश चोप्रा यांनी त्रिशूल दिग्दर्शित केला होता.१९७८ मध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

Trishul

Trishul

Trishul

त्रिशूलविषयी बोलताना अमिताभ बच्चन यांनी पूर्वी सांगितले होते की बऱ्याच वेळा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शूटिंग सुरू असायची.त्यानंतर आम्ही आमच्या खोलीत जायचो.यश जी रिसेप्शनजवळ उभे राहून माझे व शशी जी यांचे कौतुक करत असत.दिवसाच्या शूटिंगच्या वेळेच्या आधीच ते हजर असायचे.याची थोडीशी जाणीव असायची की आमची रात्र अजून बाकी होती.

 trishul

 trishul

trishul

trishul

त्रिशूल हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.ज्यामध्ये एक मुलगा आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी परत येतो. कारण त्याच्या वडिलांनी त्याच्या आईऐवजी दुसर्‍या कोणाशीतरी लग्न केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रस्त्यांवर उतरुन जनजागृती करणाऱ्या ममता बॅनर्जी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा खरा आकडा का लपवतात??

थर्ड अँगल | पश्चिम बंगालमध्ये सरकारविरोधात बंद आहे. ते सरकारशी संक्रमित आणि मृत रुग्णांच्या संख्येच्या माहितीवरून लढत आहेत. खूप कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. शिव सहाय सिंग यांनी covid -१९ ला थांबविण्याचा एक अहवाल केला होता. पण सरकार लक्षच देत नसल्याने तेव्हापासून तो निरुपयोगी झाला आहे. १७ मार्च रोजी, पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पहिल्या covid-१९ च्या प्रकरणाची नोंद झाली होती. हा १८ वर्षाचा विद्यार्थी लंडनवरून परत आला होता आणि त्याची विषाणूसाठीची चाचणी सकारात्मक आली होती. या विद्यार्थ्याला संक्रमित आजार असल्याने बेलीघाट जनरल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. जे कोलकत्तामध्ये पूर्वीय मेट्रोपॉलिटियन बायपासपासून काही अंतरावर स्थित आहे. प्रकाशझोतात येण्याऐवजी covid -१९ च्या संदर्भातील प्राथमिक दवाखान्यांनी या प्रकरणाची वाच्यता टाळली होती. लोक बाहेर पडत होते, सुरक्षा रक्षक त्यांना थांबवत नव्हते. त्या रात्रीनंतर त्या इमारतीकडे जाणाऱ्या दूरदर्शन कर्मचाऱ्यावरही त्यांनी आक्षेप घेतला नाही. 

दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे राज्य सचिवालयाच्या ठिकाणी मोठया प्रमाणावर गोंधळ पहायला मिळाला.  जेव्हा याचा सार्वजनिक खुलासा झाला, तेव्हा त्यामध्ये राज्यातील गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलगाही समाविष्ट असल्याचे समजले. तो विद्यार्थी भारतात परत आल्यानंतर १५ मार्चपर्यंत त्याच्या पालक आणि ड्राइव्हरच्या संपर्कात होता. त्याच्या आईने १७ मार्चपर्यंत कार्यालयात उपस्थिती लावली होती. त्या पश्चिम बंगालच्या गृह सचिवांसह त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटल्या होत्या. अहवाल असे सांगतो की या विद्यार्थ्याने सरकारने दिलेल्या आदेशानुसार १४ दिवस अलगावमध्ये राहण्याचे नियम पाळण्याऐवजी तपासणी केंद्रात जाण्यास उशीर केला, आणि शॉपिंग मॉलला भेट दिली. ज्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळलं. बऱ्याच अधिकाऱ्यांना या मुलाच्या या गंभीर आणि धोकादायक चुकीबद्दल राग आला.

बातमीपत्र कसं बदललं ? – जवळजवळ एका आठवड्यानंतर २३ मार्चला पश्चिम बंगालमध्ये covid-१९ मुळे ५७ वर्षाच्या एका व्यक्तीच्या मृत्यूची पहिली नोंद झाली. हे प्रकरण खूप काळजी करण्यासाखे होते कारण डमडममध्ये राहणाऱ्या आणि पश्चिम रेल्वेमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग कसा झाला हे स्पष्ट होत नव्हते. त्यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ‘त्यांनी परदेश प्रवास केल्याच्या’ विधानाला नाकारले होते. त्यांच्या प्रवासाच्या गोंधळाचे प्रतिबिंब आरोग्य विभागाच्या अधिकृत बातमीपत्रावरही उमटले होते. ते त्यांच्या प्रवास इतिहासाबद्दल काहीच बोलत नव्हते. खरं तर त्या दिवसापासून आरोग्य विभागाच्या बातमीपत्रातील संक्रमित आणि मृत व्यक्तींच्या प्रवास इतिहासाबद्दल काहीच तपशील सांगितले जात नाहीत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरु झालेले हे दैनिक बातमीपत्र लोकांना माहिती ठेवण्याचे खूप महत्वाचे साधन होते. तथापि राज्यात जसजशी प्रकरणे वाढत गेली तसतसे बातमीपत्रात सातत्याने बदल होत गेले. कधी कधी तपशील वगळले गेले तर कधी कधी तपशील जोडले गेले. याने केवळ भीती आणि गोंधळ निर्माण झाला नाही तर सरकारच्या या संकटाला हाताळण्याबद्दल भुवया उंचावल्या गेल्या. 

ज्या पद्धतीने बॅनर्जी या साथीच्या सुरुवातीच्या काळात योग्य गोष्टी करताना दिसून आल्या, ते पाहता हे आश्चर्यकारक आहे. Covid-१९ च्या पहिल्या प्रकरणाची नोंद आणि covid -१९ च्या मृत्यूच्या नोंदणीच्या दरम्यानच्या काळात सरकारने पश्चिम बंगालमध्ये डझनभर सूचना आणि आदेश जारी केले होते. अत्यंत लक्षणीय आदेश २२ मार्च रोजी संपूर्ण ‘सुरक्षा आणि संचार बंधने’ या नावाने जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये २३ मार्चला ५ वाजल्यापासून पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण संचारबंदीचा आदेश होता. जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रव्यापी संचारबंदीच्या घोषणेच्या एक दिवस आधी करण्यात आला होता. प्रमुख राजकीय पक्षांची या घातक विषाणूला लढण्यासाठी काय करता येईल यासाठी बैठक घेण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून विशेष पॅकेजची मागणी केली होती आणि बाजरपेठा तसेच रुग्णालयांनाही भेट दिली होती. सोशल मीडियावर एक छायाचित्र फिरत होते, ज्यामध्ये ममता रस्त्यावर वर्तुळ आखून कशा प्रकारे सामाजिक अलगाव पाळावा हे दाखवत होत्या. वरिष्ठ आरोग्य आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या नियमित बैठका स्थानिक वृत्तवाहिन्यांवर प्रसारित केल्या जात होत्या. राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी कोरोनाग्रस्तांसाठी घोषित केला होता. लोकांना राज्य आपत्कालीन मदत निधीमध्ये या संकटाशी सामना करण्यासाठी देणगी देण्याचे आवाहनही करण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अलगाव केंद्रे बनविण्यात आली होती. Covid -१९ साठी वेगळी रुग्णालये शोधून ती कार्यान्वित करण्यात आली होती. पोलीस केवळ कोलकत्तामध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 
शेकडो लोकांना अटक करून काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. 

टास्क फोर्स उभे करणे :- मार्चच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये हा विषाणू राज्याच्या विविध भागात पसरल्याचे स्पष्ट झाले. कलिंपोंगमधील एक रहिवासी उत्तर बंगालमध्ये मृत्यू पावला, हावडामध्ये अनेक जण संक्रमणास बळी पडले. पुर्बा मेदिनीपूर आणि नादिया जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ३१ मार्च ते २ एप्रिलच्या दरम्यान, मृतांच्या संख्येने २ वरून ७ वर उडी घेतली. ज्यांचा मृत्यू झाला, त्यांचा देशाबाहेरील प्रवासाचा कोणताच खात्रीशीर प्रवास इतिहास नव्हता. २ एप्रिल रोजी covid -१९ साठी राज्य सरकारने डॉक्टरांची जी विशेष टास्क फोर्स केली होती ती राज्य सचिवालयात भेटली होती आणि त्यांनी मृत्यूंची संख्या ७ पर्यंत वाढल्याचेही घोषित केले होते. तथापि एका तासात सरकारने ही संख्या संशोधित केली. मुख्य सचिव रजीवा सिन्हा यांनी मृतांची संख्या ७ नसून ३ असल्याचे आणि उर्वरित चार मृत  हे “Co- morbidities” साठी (जुनाट व्याधींनी त्रस्त) ऍडमिट असल्याचे त्यांनी सांगितले. ३ एप्रिल रोजी पश्चिम बंगाल सरकारने एका सूचनेची घोषणा केली, ज्यामध्ये एक तज्ञ समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत संशयितांचे मृत्यू covid -१९ मुळे  झाले की Co- morbidities झाले याचे लेखा परीक्षण केले जाईल असे सांगण्यात आले. समितीचे काम विषाणू संक्रमण झालेले लोक नेमके कशाने मृत्यू पावले याचे परीक्षण करण्याचे होते. या दोन संज्ञा “लेखापरीक्षण समिती” आणि  “Co- morbidities” वरचढ झाल्या आणि पुढच्या काही आठवड्यात साथीच्या आजाराकडे दुर्लक्ष झाले. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे तपशील सोशल मीडियावर प्रसारित होत होते, पण अधिकृत मृतांची संख्या मात्र कमीच होती. याचे कारण लेखापरीक्षण समिती प्रत्येक प्रकरणाचं परीक्षण करत होते. आकडा हा त्यांच्या मान्यतेनंतरच सांगितला जाणार होता. समितीच्या प्रकरण शोधण्याच्या पद्धतीवर डॉक्टर, पत्रकार आणि क्रेंद्रिय समूह प्रश्न उभे करत होते. अचूक आकड्यांच्या संशयाबद्दल बातमीपत्र अधिक कारणीभूत आहे. २ आणि ३ एप्रिल ला सरकारने बातमीपत्र प्रसिद्ध केले नाही. ४ एप्रिलच्या बातमीपत्रात covid-१९ शी संबंधित मृत्यूचा कोणताच कॉलम नव्हता. ७ एप्रिल पर्यंत जेव्हा सरकारने पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये  SARS-Co-V2 चे किती मृत्यू झाले हा कॉलम वाढवला. त्यालाही आणखी दोन दिवस लागले. 

वाईट पासून अत्यंत वाईट पर्यंत :- भारतातील बऱ्याच ठिकाणापेक्षा विपरीत पश्चिम बंगालने संचारबंदीशी संबंधित निर्बंध कमी केले. लोकांना थोडा दिलासा देण्यासाठी मिठाईची दुकाने आणि फुलांच्या बाजारपेठा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. श्रम-केंद्रित जसे कि चहा आणि ताग क्षेत्रात सूट जारी करण्यात आली. ही  अलगावची उदाहरणे नव्हती पण, सरकारच्या मानवी चेहऱ्यांसहित संचारबंदीच्या धोरणांचा भाग होता. एप्रिलच्या शेवटी बॅनर्जी यांनी राज्यातील सुरक्षित परिसरातील चहाची दुकाने आणि पानाची दुकाने सुरु राहतील अशी घोषणा केली. अगदी राज्यातील ज्या ८ जिल्ह्यांमध्ये अद्याप covid -१९ ची प्रकरणे नोंदवली गेली नाहीत अशा ठिकाणी बस प्रवासालाही परवानगी होती. त्यांच्या शारीरिक अलगावाबद्दल पुढाकाराऐवजी कोलकत्ता आणि हावडा येथील चित्र खूप चिंताजनक होतं. ममता बनर्जींनी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने आणि बाजारपेठा खुल्या राहणार असल्याचे जाहीर केले. लोक रोज किराणा मालाच्या साठ्यासाठी आणि आवश्यक वस्तूंसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करू लागले. सरकारने नमूद केलेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष सुरु आहे. पोलीस लोकांना जमावापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात आरोपी बनत होते. २७ मार्च रोजी जेव्हा त्याचा परिणाम खूप वेगवान झाला होता तेव्हा बॅनर्जी यांनी पोलिसांची तारांबळ उडवली. पुढच्या २४ तासात कोलकत्तामध्ये संचारबंदीच्या उल्लंघनाबद्दलच्या खटल्याची संख्या ४५२ वरून १८२ पर्यंत घसरली. जेव्हा हावडा स्टेशनवर २५ मार्च रोजी देशव्यापी संचारबंदीमुळे हजारो लोक अडकले तेव्हा शारीरिक अलगावच्या अंमलबजावणीचे स्वप्न आणखी वाईट झाले. बॅनर्जी यांनी इतर राज्यांतून  आलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी ७११ शिबिरांमधून खाण्यापिण्याची सोय केली असल्याचा दावा केला होता. त्यांनी १८ राज्यांतील  मुख्यमंत्र्यांना पश्चिम बंगालमध्ये अडकलेल्या त्यांच्या राज्यांतील कामगारांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या  पुरवठयासंदर्भात आवाहन करणारे पत्रही लिहिले होते. परिस्थिती वाईटपासून खूप वाईट होत गेली. त्यामुळेच राज्यातील हॉटस्पॉटच्या ठिकाणांवर माध्यमांनी अत्यंत सावधपूर्वक प्रश्न विचारणे सुरुच ठेवले. ४ एप्रिल रोजी सिन्हा यांनी सांगितले, “प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहित असण्याची गरज नाही, आम्ही लोकांना हवी असणारी माहीती देत आहोत.”  एकूण संक्रमणाचा आकडा प्रसारित करण्याऐवजी सरकारने उदाहरणार्थ केवळ बाधित प्रकरणांचा आकडा प्रसारित केला. या आकड्यांमधून बरी झालेली आणि मृत्यू झालेली प्रकरणे वगळण्यात आली होती. ३० एप्रिल रोजी उपचारानंतर १३९ covid -१९ चे रुग्ण बरे झाल्यानंतर ही राज्यांतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७२ च होता. 

तपासणी समस्या :- दक्षिण बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये covid -१९ च्या प्रकरणांचा उदय होत असताना विशेषतः हावडा आणि कोलकत्ताने एक आव्हान उभे केले. २०११ च्या जनगणनेनुसार कोलकत्तामधील ३१% लोकसंख्या ही शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहते. व्यवस्थापनाला झोपडपट्टीतील राशन दुकानासमोरील गर्दी आवरताना खूप संघर्ष करावा लागला. २१ एप्रिल रोजीच्या आयोजनामध्ये पहिल्यांदा झोपडपट्टीमध्ये अँटीबॉडी चाचणी घेण्यात आली. संकलित केलेल्या १४ नमुन्यांमधून २ नमुने सकारात्मक आले. अधिकृत नोंद असे दर्शविते की या चाचण्या ३ मार्च रोजी म्हणजे पहिले प्रकरण सापडण्याच्या २ आठवडे आधी सुरु करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय कॉलरा आणि आतड्यांसंबंधीचे रोग संस्था (National Institute of Cholera and Enteric Diseases (NICED) ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची साथीच्या सुरुवातीच्या काळात चाचणीची एकमेव सुविधा होती. ‘एनआयसीईडी’ने इतर चाचणी केंद्रांना विशेषतः वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना प्रशिक्षण दिले. पण, चाचणी सुरु झाल्यापासून एक ते दीड महिन्यानंतर १५ एप्रिलपर्यंत देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारी चार राज्ये दिवसाला ४०० चाचण्या करण्यासाठी धडपडत होते.  सुरुवातीला राज्य सरकारने पुरेशी तपासणी किट्स नाहीत म्हणून केंद्र सरकारकडे अधिक तपासणी किट्ससाठी आग्रह केला.  एनआयसीईडी अधिकाऱ्यांनी किट्स कमी असल्याला नकार दिला, तथापि त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे पोहोचणाऱ्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यांचे हे विधान राज्य सरकार, केंद्र सरकारच्या संस्था, वैद्यकीय महाविद्यालये या स्वतःच्या केंद्रांना प्राधान्य देत असल्याचे संकेत देते. राज्य आरोग्य विभागाने आयसीएमआर-एनआयसीईडी कडून दिलेल्या आरटी-पीसीआरच्या किट्सने चाचणी केल्याचा निर्विवाद आरोप केला होता. ते म्हणाले, प्रत्येक नमुने दोन ते तीन वेळा तपासले जात होते ज्यामुळे उशीर होत होता. ‘एनआयसीईडी’च्या व्यवस्थापक शांता दत्ता म्हणाल्या, “आम्हाला ‘आयसीएमआर’कडून सूचना आल्या होत्या की सदोष किट्स वितरित करू नका. वैद्यकीय महाविद्यालयातील साठवणुकीच्या पातळीमुळे किंवा दळणवळणाच्या दरम्यान  किट्सने आपली उपयुक्तता गमावली होती.”  या गोष्टीने तृणमूल काँग्रेसच्या ‘केंद्राने या साथीच्या आजाराशी लढण्यासाठी पायाभूत संसाधने न पुरविण्याच्या’ आरोपाला चालना दिली होती. एप्रिलअखेर राज्याने १४ सुविधांच्या ठिकाणी चाचणी करण्यास सुरुवात केली. ते दिवसाला २,००० नमुन्यांची चाचणी करतात. एप्रिलच्या शेवटपर्यंत १६,५०० हुन अधिक नमुने तपासले गेले आहेत, तरीही चाचण्यांच्या बाबतीत मोठ्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल खालच्या क्रमांकावर आहे. ते दशलक्षांमागे १८३ चाचण्या करत होते तर राष्ट्रीय सरासरी दशलक्षामागे ६१३ इतकी होती. 

केंद्र – राज्य संघर्ष :-  ‘एनआयसीईडी’ची समस्या ही एकमेव नव्हती जिने राज्य आणि सरकारमधील संघर्ष आणि वेगळेपण दाखवून दिलं. केंद्रातर्फे राज्यांच्या कोरोना नियंत्रणाचं मूल्यमापन करण्यासाठी लोकांची टीम ((inter-ministerial central teams(IMCTs)) पाठविण्याचा निर्णय हा पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील सार्वजनिक भांडणाला चालना देतो. बॅनर्जी यांनी स्प्ष्ट केले होते की त्यांना ‘आयएमसीटी’च्या भेटीत काहीच स्वारस्य नव्हतं आणि त्यांनी मोदींना त्याबद्दल कठोर शब्दांतील एक पत्रदेखील लिहिलं, ज्यात त्यांनी लिहिले होते, “केंद्र सरकारकडून कधीच अशा एकतर्फी कृतीची अपेक्षा नव्हती” मुख्य सचिव म्हणाले, राज्य सरकारशी कोणतीच सल्लामसलत न करता केंद्रीय संघ आला होता, म्हणूनच त्यांना पश्चिम बंगालमध्ये फिरण्याची परवानगी नाही. तथापि, केंद्रीय गृहसचिवांकडून मिळालेल्या पत्रानंतर राज्य सरकारने त्यांची भूमिका थोडी शिथिल केली. या पत्रात लिहिले होते की केंद्रीय समिती “विशेषतः कोणत्याही भेटीपासून प्रतिबंधित केली आहे” म्हणजे “केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत जारी केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा आणणे आहे जे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंधनकारक आहे.” 

पुढील काही दिवसांमध्ये आयएमसीटीने राज्यातील covid -१९ च्या व्यवस्थापनाच्या रुग्णालयातील व्हेन्टिलेटरची संख्या, अलगाव सुविधा, चाचण्यांमध्ये झालेला उशीर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक संरक्षक संसाधनांचा वापर या सर्वच बाजूंवर प्रश्न उपस्थित केले. मुख्य सचिवांना उद्देशून शहर आणि उत्तर बंगालमध्ये तैनात असलेल्या आयएमसीटीकडून लिहिलेले पत्र सार्वजनिक झाले आणि अनेक दिवस बातम्यांचे मथळे बनून गेले होते. दरम्यान केंद्रीय समिती राज्य दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री रस्त्यावर आल्या पण यावेळी लोकांशी थेट बोलणे आणि मास्क वाटण्याऐवजी त्या पोलीस गाडीत बसून लोकांना मायक्रोफोनवरून संबोधत होत्या. त्यांनी लोकांना संचारबंदीच्या दरम्यान घरात राहण्याचे आवाहन केले. बरेच दिवस बॅनर्जी विविध परिसरात लोकांना संचारबंदी पाळण्याचे आवाहन करण्यासाठी फिरत होत्या. २४ एप्रिल रोजी आयएमसीटी संघाने लेखापरीक्षण समितीकडून covid -१९ च्या मृतांची संख्या जाहीर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीचे तपशील जाणून घेतले. त्याच दिवशी पहिल्यांदा राज्यातील covid -१९ च्या मृतांची संख्या राज्य सरकारने सामायिक केली. लेखापरीक्षण समितीने एकूण ५७ मृत्यूंची तपासणी केली ज्यामध्ये १८ covid -१९ मुळे आणि उरलेले मृत्यू हे तीव्र co -morbidities (पूर्वीचा गंभीर आजार) मुळे झाले आहेत. ३० एप्रिल रोजी राज्य सरकारने साथीच्या आजाराच्या सुरुवातीपासून कोविड-१९ च्या सकारात्मक प्रकरणांमध्ये १०५ जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. यापैकी ३३ जणांचा मृत्यू covid -१९मुळे तर ७२ मृत्यू co -morbidities मुळे झाल्याचं सांगण्यात आलं. बॅनर्जी यांनी लेखापरीक्षण समिती बसवण्याचा निर्णय आरोग्य विभागाचा आहे आणि मला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही हे सांगितल्यानंतर एका दिवसाने हा साक्षात्कार झाला. बॅनर्जी यांनी सरकारमध्ये आरोग्य खात्याची कर्तव्ये पकडली आहेत. 

विषाणू जेव्हा आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना संक्रमित करतो :- जेव्हा केंद्र आणि राज्य एकमेकांना पत्र लिहिण्यात व्यस्त होते, तेव्हा सरकारी रुग्णालयात आरोग्य सेवा देणारे वेगाने संक्रमित होत होते. एप्रिल अखेरीस देशातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक असणाऱ्या कोलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयासोबत २० पेक्षा अधिक आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची चाचणी सकारात्मक आली होती. एक डॉक्टर म्हणाले रुग्णालयात उपलब्ध असणारे एन९५ मास्क आणि वैयक्तिक संरक्षक संसाधने पुरेशी नव्हती. ते केवळ अशासाठीच उपलब्ध होते ज्यांना संक्रमण होण्याचा खूप जास्त धोका आहे. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. राज्याच्या इतर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अशीच परिस्थिती आहे. अनामिक स्थितीवर बोलताना डॉक्टरांनी कशा पद्धतीने सरकार या परिस्थितीला गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट करणारे ८ एप्रिलचे एक उदाहरण दिले. एका covid -१९ ची लक्षणे असणाऱ्या गरोदर महिलेला स्त्रीरोगतज्ञ विभागात आणण्यात आले होते. त्यांना covid -१९ च्या सुविधा केंद्रात हलविण्यात आले नव्हते आणि त्या तीन वेगवेगळ्या सत्रातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि डॉक्टरांच्या संपर्कात आल्या होत्या. अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या एका डॉक्टरला रोगाची लक्षणे दिसून आली. नंतर त्यांना अलगावमध्ये ठेवण्यात आले. त्यांचे अनेक सहकारी त्यानंतर त्यांचे नमुने देण्यासाठी रांगेत उभे होते आणि अहवालाची वाट बघत होते. 

२६ एप्रिल रोजी, पश्चिम बंगाल सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण आरोग्य क्षेत्रात धोक्याची लाट पसरली. कोलकत्याच्या उच्च न्यायालयात covid -१९ च्या संक्रमणावर सुनावणी सुरु आहे. त्यांनाही जाणून घ्यायचे होते की अग्रभागी असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेसे वैयक्तिक संरक्षक संसाधने आहे की नाही. पश्चिम बंगालच्या डॉक्टर समूहाने आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी गहन चाचणीची आवश्यकता असण्यावर जोर दिला आहे. हे अधिकाधिक आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना विषाणूचे संक्रमण होत असण्यावर प्रकाश टाकते. कोलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरने त्यांची चाचणी नकारात्मक आल्यावर एक सुटकेचा निश्वास घेतला. “माझी चाचणी नकारात्मक आली होती, पण माझ्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची चाचणी सकारात्मक येत आहे.  अगदी आज एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थीची चाचणी सकारात्मक आली आहे. मला माहित नाही आमच्यासाठी भविष्यकाळात काय असणार आहे,” ते म्हणाले. 

‘लिपिक चुका’ होतातच कशा ? – पश्चिम बंगाल सरकारवर केवळ माहिती लपवण्याच्या आरोपावरून टीका होत नाही, तर त्यांच्या चाचणीच्या कमी दरावरूनही होत आहे. एप्रिलच्या शेवटी ७० वर्षाचा एक व्यक्ती जो दुसऱ्यांदा कोलकत्ताच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट झाला होता त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाने सुरुवातीला त्या व्यक्तीला त्यांची विषाणूची चाचणी नकारात्मक आल्याचे सांगून रुग्णालयातून घरी सोडले होते. त्याला घरी सोडल्यानंतर एका दिवसाने त्यांना पुन्हा ऍडमिट होण्यास सांगण्यात आले. रुग्णालयाने सांगितले की covid -१९ सकारात्मक रुग्ण होता आणि चुकून घरी सोडला गेला होता. सरकारने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, मुख्यमंत्री म्हणाले, ही एक छोटी लिपिक चूक होती, हिला प्रकाशझोतात आणण्याची गरज नव्हती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच राज्य सरकारने साथीच्या आजाराबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी राज्यातील संक्रमित परिसराची यादी जाहीर केली होती. (३० एप्रिल रोजी ४४४) त्यातला जवळपास ६०% परिसर( २६४) हा कोलकत्त्यामध्ये आहे, त्यानंतर हावडामध्ये ७२ आणि त्याला जोडून उत्तरमधील जिल्ह्यात २४ परगण्यांमध्ये आहेत. पश्चिम बंगालनेने केंद्रासोबत त्यांच्या १ मे च्या यादीसोबत स्पर्धा केली ज्यामध्ये राज्यातील १० जिल्हे रेड झोन मध्ये असल्याचे दाखवते. यातील केवळ चार जिल्ह्यांना रेड झोनमध्ये समाविष्ट करावे असा आग्रह करण्यात आला. राज्य सरकारचा केंद्र सरकारसोबत झालेला संवाद जाहीर झाला आहे ज्यामध्ये पश्चिम बंगाल मध्ये ३० एप्रिल रोजी covid-१९ चे ९३१ बाधित रुग्ण असल्याचं सांगण्यात आलं आहे. ४८९ नवीन प्रकरणांसहीत एकट्या कोलकत्त्यामध्येच ५२% प्रकरणांची नोंद झाली आहे.

‘द हिंदू’ मधील शिव सहाय सिंग यांनी रविवारच्या अंकात लिहिलेल्या या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 9146041816

चिंता वाढली! देशात २४ तासांत 195 बळी, 3 हजार 900 नवे कोरोना रुग्ण सापडले

नवी दिल्ली । लॉकडाऊन काळातही भारतातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा तेजीनं वाढताना दिसतोय. मे महिन्यात लॉकडाऊनच्या ४२ व्या (मंगळवार) दिवशीही दिसून आलेली ही वाढ लक्षणीय आहे. तर मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात करोनाने 195 जणांचा बळी घेतला असून तब्बल 3 हजार 900 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची रुग्ण संख्येतील ही सर्वाधिक वाढ नोंदवल्या गेली आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 46 हजार 433 वर पोहचली आहे. यामध्ये 32 हजार 134 जणांवार सध्या उपचार सुरू आहेत. तर 12 हजार 727 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 568 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

गेल्या २४ तासांत कोरोनाचे 1,074 रुग्ण बरे झाले असून एकदिवसात बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 27.52 टक्के झाले आहे. एकूण 11,706 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सोमवारी दिली. देशभरातील 20 शहरांमध्ये केंद्रीय पथके पाठवून करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती सहसचिव अगरवाल यांनी दिली. करोनाच्या महासाथीचे शिखर मे-जूनमध्ये गाठले जाईल, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. आणखी दोन आठवडे म्हणजेच 17 मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे. त्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”