Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 613

Pm Crop Insurance Yojana | शेतकऱ्यांनी 1 रुपयात लवकरात लवकर पीक विमा; कृषी मंत्र्यांनी केले आवाहन

Pm Crop Insurance Yojana

Pm Crop Insurance Yojana | प्रधानमंत्री पिक विमा योजना ही देशातील एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा काढायचा आहे. आणि आता विमा सगळ्यांनी लवकरात लवकर काढावा. अशी मागणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. जर अतिवृष्टी, वादळ, पूर, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर या विमा योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते. शेतकऱ्यांना कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये.यासाठी सरकारने हा एक रुपयाचा विमा योजना (Pm Crop Insurance Yojana) काढलेली आहे. चालू वर्षात आता या योजनेत जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले.

पंतप्रधान पिक विमा (Pm Crop Insurance Yojana) योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झालेल्या आहेत. आता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर जाऊन हे अर्ज करायचे आहेत. शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून या पिकाचा विमा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे पिक विमा काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आली, तर जिल्हास्तरावर पीक विमा प्रतिनिधी यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता.

योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? | Pm Crop Insurance Yojana

या योजनेमध्ये खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मका, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. या सर्व पिकांचा आपण प्रति अर्ज एक रुपया द्यायचा आहे. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, पीक पेरा घोषणापत्र इत्यादी कागदपत्रांची गरज आहे. तुम्ही स्वतः पोर्टलवर जाऊन किंवा सीएससी सेंटरवर जाऊन हा अर्ज करू शकता.

Monsoon Places : महाराष्ट्रातले आवर्जून पाहावे असे मान्सून स्पॉट्स ; ये नही देखा तो कुछ नही देखा

Monsoon Places : महाराष्ट्र म्हणजे डोंगर , दऱ्यांचा प्रदेश. पावसाळ्यात येथील निसर्गाचं रुपडं म्हणजे क्या बात है ! पावसाळयात महाराष्ट्रातली काही ठिकाणं म्हणजे स्वर्गा समान… सुंदर हिरव्या डोंगर रांगा, धबधब्यांचे कोसळणारे पाणी, अधून मधून ऊन सावल्यांचा खेळ आणि जमिनीला स्पर्श करणारे ढग असं सुंदर पावसाळी वातावरण तुमचं आनंदित करून जातील यात शंका नाही. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातली (Monsoon Places) काही अप्रतिम ठिकाणं जिथे पावसाळ्यात आवर्जून भेट दिली पाहिजे.

भंडारदरा (Monsoon Places)

महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोला तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात हे सुंदर असं ठिकाण आहे पावसाळ्यात भंडारदरा मधलं निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून येतं तुम्ही या ठिकाणी पावसाळ्यात आवर्जून भेट दिली पाहिजे.

आंबोली

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भेट देण्यासारखं अतिशय सुंदर असं ठिकाण म्हणजे (Monsoon Places) आंबोली. उंच उंच डोंगरदऱ्या, घाट रस्ते, धबधबे हे इथलं सौंदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं हे ठिकाण पावसाळी पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे.

गगनबावडा (Monsoon Places)

गगनबावडा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं हिल स्टेशन असं आपण म्हणू शकतो. येथील थंडगार आणि अल्हाददायक वातावरण तुमचं मन प्रसन्न करून टाकेल. येथे वाहणारा जोरदार वारा तुम्ही क्वचितच अनुभवला असेल. येथे गगनगिरी महाराजांचा (Monsoon Places) मठ देखील पाहण्यासारखा आहे.

लोणावळा खंडाळा

पुणे आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचं पावसाळ्यात फिरण्यासाठीचं (Monsoon Places) आवडतं डेस्टिनेशन म्हणजे लोणावळा आणि खंडाळा. पावसाळ्यात इथं आवर्जून पर्यटक भेट देत असतात. मात्र इथे भेट देणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनानं घातलेल्या अटी आणि नियमांचे पालन आवर्जून केलं पाहिजे.

महाबळेश्वर (Monsoon Places)

सातारा जिल्ह्यातलं कुलेस्ट प्लेस म्हणजे महाबळेश्वर… इथे पाहण्यासारखी बरीच ठिकाण आहेत. येथील हवामान आणि निसर्गरम्य परिसर पाहून तुम्ही नक्कीच आनंदून जाल. पावसाळ्यात इथे धबधबे प्रवाहित होतात शिवाय सर्वत्र धुक्याची चादर पसरते. हिवाळ्याच्या (Monsoon Places) दिवसात कास पठार सुद्धा अगदी पाहण्यासारखे ठिकाण आहे.

Redmi 13 5G : 108MP कॅमेरा, 8GB RAM सह Redmi 13 5G भारतात लॉन्च, किंमत किती पहा

Redmi 13 5 Glaunched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Xiaomi कंपनीचे मोबाईल भारतात खुपच लोकप्रिय आहेत. कमी किमतीत भन्नाट फीचर्स मिळत असल्याने ग्राहकांची मोठी पसंती Xiaomi च्या मोबाईलला पाहायला मिळते. ग्राहकांची वाढती मागणी पाहून कंपनी सुद्धा सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असे मोबाईल लाँच करत असते. त्याच पार्श्वभूमीवर आता Xiaomi ने Redmi 13 5G मोबाईल भारतीय बाजारात आणला आहे. 108MP कॅमेरा, 8GB RAM सह अनेक दमदार फीचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. चाल तर मग रेडमीच्या या मोबाईलचे खास स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

6.79 इंचाचा डिस्प्ले –

Redmi 13 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2460 x 1080 पिक्सल रेझोल्यूशन सह येत असून यामध्ये 550 nits पीक ब्राइटनेस आणि 91% स्क्रीन ते बॉडी रेशो मिळतो. फोनच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आलं आहे. कंपनीने मोबाईल मध्ये Snapdragon 4 Gen 2 AE प्रोसेसर वापरला असून Xiaomi हा स्मार्टफोन Android 14 OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यामध्ये 8GB आणि SD कार्डद्वारे 1 TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळतेय.

कॅमेरा – Redmi 13 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi 13 5G मध्ये पाठीमागील बाजूला 108 MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा देण्यात आलाय तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5030 mAh बॅटरी देण्यात आली आली हि बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतीचा, तर Redmi 13 5G च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे तर 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन काळ्या, निळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध असून तुम्ही 12 जुलैपासून Amazon.in, mi.com आणि Xiaomi रिटेल वरून खरेदी करू शकता.

Miyazaki Mango | ‘या’ आंब्याची जगभर चर्चा ! 1 किलो आंब्याची किंमत तब्बल 3.50 लाख रुपये

Miyazaki Mango

Miyazaki Mango | बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध असतात. सध्या अनेक आंब्याच्या जाती आहेत. परंतु एका आंब्याच्या जातीची जरा जास्त चर्चा चालू आहे. सध्या उत्तर प्रदेशातील एका शेतकरी संदीप चौधरी यांनी त्यांच्या शेतात आंब्याची दोन झाडे लावलेली आहेत. आणि त्या दोन झाडांची सर्वत्र चर्चा होत आहे त्यांनी आंब्याची झाडे लावलेली आहेत. त्यांनी मीयाझाकी (Miyazaki Mango) या वाणाची आंब्याची झाडे लावलेली आहेत. यातील आंब्याची किंमत हे 2.70 लाख रुपयांपासून 3.50 लाख रुपये प्रति किलो एवढी आहे. आंब्याचे हे वाण जपानच्या विद्यापीठात तयार केलेले आहे.

संदीप चौधरी यांनी त्यांच्या या आंब्याच्या झाडांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार या दोन्ही झाडांवर फक्त तीन आंबे लागलेले आहेत. या एका आंब्याची किंमत लाखो रुपये आहे. हे आंबे विकायला काढल्यास ते एका झटक्यातच लखपती होऊ शकतात. परंतु संदीप चौधरी यांना देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्य मुख्यमंत्री यांना हे तीन आंबे द्यायचे आहे. हा आंबा खायला अत्यंत गोड असतो. आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट , व्हिटा केरोटीन आणि फॉलिक ऍसिड यांसारखे घटक असतात. त्याचप्रमाणे कर्करोगाशी सामना करण्यासाठी हा आंबा अत्यंत फायदेशीर आहे.

7500 रुपयांना खरेदी केले झाड | Miyazaki Mango

संदीप चौधरी यांनी 9 महिन्यांपूर्वी या आंब्याची दोन झाडे कोलकत्यावरून आणली होती. त्यांना एका झाडासाठी 7500 मोजावे लागले होते. जैविक पद्धतीने त्यांनी या झाडांची लागवड केलेली आहे. या एका झाडाची उंची ही फक्त 3 फूट एवढी आहे. त्याचप्रमाणे एका झाडाच्या आंब्याचे वजन 300 ते 350 ग्रॅम एवढे आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, हे आंबे विकत घेण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणाहून कॉल देखील येत आहे. सुरतचे व्यावसायिक प्रवीण गुप्ता यांचा देखील त्यांना फोन आला होता. मात्र त्यांना हे आंबे विकायचे नाहीत. आंब्याची चोरी होऊ नये, म्हणून त्यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावलेला आहे. हा कॅमेरा 360 डिग्रीमध्ये फिरतो. त्यामुळे बागेत जर कोणी जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे नोटिफिकेशन संदीप यांना त्यांच्या मोबाईलवर समजते.

PNB Recruitment 2024 | पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 2700 पदांसाठी भरती सुरु

PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नोकरीची एक अतिशय भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना सरकारी बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता पंजाब नॅशनल बँकेने (PNB Recruitment 2024) एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. या भारती अंतर्गत शिकाऊ या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या तब्बल 2700 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 30 जून 2024 पासून ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 14 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता | PNB Recruitment 2024

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्रदान करणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 20 तर कमाल वय 28 वर्षे असणे गरजेचे आहे.

अर्ज

  • सामान्य – 944 रुपये
  • ओबीसी – 944 रुपये
  • महिला – 708 रुपये
  • एसी – 708 रुपये
  • एसटी – 708 रुपये
  • असक्षम – 472 रुपये.

अर्ज कसा करावा? | PNB Recruitment 2024

  • तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेची भरती वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर त्या फॉर्ममधील सगळी माहिती काळजीपूर्वक भरा.
  • विचारलेल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा.
  • त्यानंतर परीक्षा शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

BOI FD Rate Hike : Bank Of India च्या ग्राहकांना खुशखबर!! FD वरील व्याजदरात वाढ

BOI FD Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक ऑफ इंडिया (Bank Of India) हि देशातील सर्वात लोकप्रिय आणि कानाकोपऱ्यात पोचलेली राष्ट्रीय बँक असून या बँकेचे मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्ग आहेत. तुम्ही सुद्धा बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीच्या अशा या बँकेने आपल्या FD वरील म्हणजेच मुदत ठेवी वरील व्याजदर वाढवले (BOI FD Rate Hike) आहेत. त्यामुळे पैशाची बचत आणि गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी हि मोठी फायदेशीर गोष्ट आहे. बँक ऑफ इंडिया ३ टक्के ते ८.३० टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर ३ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर उपलब्ध आहेत. आज आपण बँक ऑफ इंडियाचे नवे व्याजदर जाणून घेणार आहोत.

नवे व्याजदर खालीलप्रमाणे- BOI FD Rate Hike

7 दिवस ते 14 दिवस- 3 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
15 दिवस ते 30 दिवस- 3 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
31 दिवस ते 45 दिवस – 3 टक्के: ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के
४६ दिवस ते ९० दिवस- ४.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५ टक्के
91 दिवस ते 179 दिवस – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५टक्के
180 दिवस ते 210 दिवस – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के

180 दिवस ते 210 दिवस – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
211 दिवस ते 269 दिवस – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
270 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के

1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी- 6.80 टक्के ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
666 दिवस – 7.30 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ८.३० टक्के (BOI FD Rate Hike)
2 वर्षे – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२५ टक्के
3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी:- 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के

Bus Accident: ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात!! 18 जणांचा जागीच मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी

Bus accident

Bus Accident| देशभरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ होत चालली आहे. कारण की, बुधवारी आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचा तांडव पाहिला मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी ओव्हरटेकच्या नादात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तब्बल 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या वेळी डबल डेकर बस बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाले होती. प्रवासावेळी ही बस उन्नावच्या सीमाभागात येताच तीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नमध्ये दूध टँकरला जाऊन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बस थेट टँकरला कापत पुढे गेली. यामुळे ट्रॅक्टरचे आणि बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये तब्बल 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधानांकडून मदत जाहीर (Bus Accident)

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी ताबडतोब प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सोशल मीडियावर देखील या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

होय, मीच गाडी चालवत होतो; आरोपी मिहीर शाहची पोलिसांसमोर कबुली

Mihir shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वरळी हिट अँड रन (Mumbai Hit And Run) प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मीच गाडी चालवत होतो, मात्र मी कोणतीही नशा केली नव्हती. मी घाबरलो होतो त्यामुळे वडिल राजेश शहा हे घटनास्थळावर पोहोचण्याआधीच फरार झालो होतो अशी कबुली मिहीर शाह (Mihir Shah) याने पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिली. पोलिस सूत्रांनुसार, या प्रकरणी पोलिसांनी Culpable homicideचा केस दाखल केली आहे.

मंगळवारी मिहीर शाहला पोलिसांनी तब्बल 60 तासांनंतर विरारमधील एका हॉटेलमधून अटक केली. आरोपी मिहिरच्या मित्राने त्याचा फोन ऑन केल्यानंतर पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. आज दुपारी मिहीरला कोर्टात सादर करण्यात येणार आहेत. पोलिस पुढील तपासासाठी आरोपीची कस्टडीची मागणी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मिहीरचे वडील शिवसेना नेते राजेश शहा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यांना दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला आहे.

दरम्यान, या एकूण सर्व प्रकारानंतर शिंदे गटाला उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं आहे. शिंदे गटाने मिहीर शाहचे वडील राजेश शहा यांच्यावर कारवाई केली आहे. राजेश शहा यांची उपनेतेपदी पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेश शहा हे पालघर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. राजेश शाह यांच्यावर आरोपीला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रविवारी सकाळी वरळी परिसरातील अट्रिया मॉलजवळ एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवर असलेल्या मच्छिमार दाम्पत्याला उडवले. दोघेही कारच्या बोनेटवर पडले. यावेळी नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. त्यातच भर म्हणजे अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार न थांबवता तशीच पुढे चालवत महिलेला फरफटत नेलं. यात महिलेचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपी मिहीरनं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं गोरेगावला राहत असलेल्या गर्लफ्रेंडचं घर गाठल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अपघातावेळी मिहीर कार चालवत असल्याचा जबाब जखमीनं दिला होता.

शास्त्रज्ञांनी समुद्राखालील नकाशासह उलगडले राम सेतूचे रहस्य, जाणून घ्या सविस्तर

Ramsetu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रामसेतू हा शतकानुशतकापासून प्रचलित आहे. आता या रामसेतूबाबत एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थांनी ॲडम्स ब्रिजच्या बुडलेल्या संरचनेचे मॅप तयार केलेले आहे. हा ॲडम्स ब्रिज म्हणजेच रामसेतू आहे. हा पूल भारतश्रीलंका यांना जोडला जातो. हा प्राचीन पूल भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये देखील खूप प्रचलित आहे.

संशोधकांनी नकाशा तयार केला

संशोधकांनी ऑक्टोबर 2018 ते 2023 या कालावधीत बुडलेल्या संपूर्ण लांबीचा दहा मीटर रिझर्वेशनचा नकाशा तयार केलेला आहे. त्यानंतर त्याचे तपशील देखील केलेले आहे. तपशिलावर पाण्याखालील नकाशावर वरून धनुष्य कोडी ते तलाई मन्यारपर्यंत पूल दिसत आहे. त्यातील तब्बल 99.98% भाग हा उथळ पाण्यात बुडालेला आहे. इस्रोमधील शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या उपग्रहातून लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून हा नकाशा तयार केलेला आहे.

या ब्रिजच्या बुडालेला संरचनाला ईस्ट इंडिया कंपनीने ॲडम्स ब्रीज असे नाव दिलेले आहे. हा रामसेतू म्हणून भारतीयांनी वर्णन केलेल्या रचनेचा उल्लेख रामायणात केलेला आहे. रामाच्या सैन्याने रावणाच्या राज्यात म्हणजे श्रीलंकेत सीतेला वाचवायला जाण्यासाठी हा पूल बांधला गेल्याचे म्हटले जात आहे.

इसवी सनाच्या नवव्या शतकातील या पुलाला सेतू बांधाई किंवा समुद्रावरील पूल असे म्हटले जात होते. रामेश्वर मधील मंदिराच्या नोंदीनुसार 1480 पर्यंत हा पूल समुद्रसपाटीपासून उंच होता.