राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु; पहिल्याच दिवशी ११,४१७ जणांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद
महाविकास आघाडी सरकारच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून केवळ १० रुपयात मिळणाऱ्या शिवथाळीचा राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी आस्वाद घेतला. याबाबतची माहिती माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.