शिंदे-फडणवीस सरकारच्या FRP च्या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी केली Facebook पोस्ट; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उसाला एकरकमी एफआरपीची निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच घेतला. सरकारच्या या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नुकतीच फेसबुक पोस्ट टाकत आभार मानले आहेत.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे केले. मागच्या सरकारमधील कारखानदार नेत्यांचा तो डाव होता. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचे राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही कुणासोबतही जाणार नाही, आम्ही स्वतंत्रपणे वाटचाल करत राहणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.

https://www.facebook.com/Rajushetti27/posts/675333927288022

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्वाची घोषणा

राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून एक रक्कमी एफ. आर. पी चा कायदा राज्य सरकार पुर्ववत करून दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली. त्याबरोबरच वजनकाटे ॲानलाईन करणे , वाहतूकदारांना महामंडळामार्फत मजूर पुरवठा करणे यासह केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाबाबत तातडीने पाठपुरावा करून शेतकरी हिताचे सर्व धोरण राबविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांचे आभार, अशी फेसबुक पोस्ट राजू शेट्टी यांनी लिहिली आहे