विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; मुंबईतील शाळा आता ‘या’ तारखेपासून पूर्णवेळ भरणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्यावतीने आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शाळा अणे महाविद्यालये सुरु करण्यात आलेली आहेत. दरम्यान, आता पूर्णवेळ शाळा सुरु करण्यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. आता मुंबईतील शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ भरणार असल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईतील कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पूर्णवेळ शाळा सुरु करण्याचा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी निर्णय घेतला आहे.

नुक्त्याच घेतलेल्या या निर्णयामुळे आता विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा व मैदानी खेळ, विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक मुंबई महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी मुंबईत पुन्हा एकदा शाळा भरणार आहेत.

Leave a Comment