ऐन सणासुदीच्या काळात कमी होणार साखरेची गोडी, किती रुपये महाग होऊ शकेल जाणून घ्या

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीचा हंगाम आता सुरू झाला आहे, त्यासोबतच खाण्यापिण्याची वस्तूही महागणार आहेत. या भागामध्ये आता साखरेच्या किंमतीत लवकरच वाढ होणार असल्याचे वृत्त येते आहे. त्यामुळे साखरेच्या गोडव्यासाठी आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील. कारण, साखरेची किमान विक्री दर दोन रुपये प्रति किलोने वाढविण्याची तयारी सरकार करीत आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने साखरेची किंमत वाढवण्यासाठी एक कॅबिनेट नोट कॅबिनेट सचिवालयात पाठविली आहे. या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत साखरेच्या किमती बाबत सरकार निर्णय घेऊ शकेल.

साखर कारखानदारांचे सुमारे 20 हजार कोटींचे कर्ज थकीत आहे
साखरेच्या किंमतीतील या वाढीचे उद्दीष्ट हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी लवकरात लवकर भरणे हे आहे. साखर कारखानदारांवर सुमारे 20 हजार कोटी ऊस उत्पादक शेतकरी थकबाकीदार आहेत. 15 जुलै रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या गटाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी लवकर देण्याकरिता साखर कारखान्यांची किमान विक्री किंमत 31 रुपये वरून 33 रुपये प्रति किलो करण्याची शिफारस केली. यापूर्वी नीति आयोगाच्या ऊस आणि साखर उद्योगाचा अभ्यास करणार्‍या टास्क फोर्सनेही साखरेच्या दरात वाढ करण्याची शिफारस केलेली होती.

यंदा साखरेचे उत्पादन सुमारे 270 लाख टन होण्याची शक्यता आहे. कोरोनापूर्वी, देशातील वार्षिक खप देखील जवळजवळ अशाच प्रकारचे होते. कोरोना साथीच्या आजारामुळे खपाची 40 लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, नवीन हंगामात साखरेचा अधिक साठा होईल. साखर कारखान्यांना निर्यातीचे लक्ष्य सरकारने दिले आहे, परंतु साथीचा निर्यातीवरही परिणाम झालेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here