कोरोना पोहोचला संसदेत? कोरोनाग्रस्त कनिका कपूरच्या संपर्कात आला होता ‘हा’ खासदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. कनिकाने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याची कबुली दिली आहे. कनिका लंडनहून लखनऊला आली होती. त्यानंतर लखनऊमध्ये एका हाय प्रोफाइल पार्टीमध्ये तिने हजेरी लावली होती. माजी खासदार अकबर अहमद डंपी यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी ही हाय प्रोफाइल पार्टी झाली होती. अनेक बडे … Read more

देशभरात NRC लागू करण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाची संसदेत माहिती

संसदेत सुधारित नागरिकत्व विधेयक मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वारंवार सरकार आधी नागरिकत्व कायदा आणणार आणि त्यानंतर एनआरसी असं सांगितलं होतं. यानंतर देशभरात तसंच अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरु झालं होतं. दिल्ली आणि इतर काही भागांमध्ये गेल्या महिन्यापासून सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरु आहे. देशभर एनआरसी लागू करण्याबाबत अनिश्चितता असतांना आज लोकसभेत गृहमंत्रायाने याबाबत लेखी उत्तर दिलं आहे.

संसदेत पुन्हा खडाजंगी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडणार

मागील सहा दशकांपासून लागू असलेल्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यासाठीचे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी लोकसभेत मांडतील आणि ते संमत करण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करण्यात येईल, असे लोकसभेच्या सोमवारच्या कामकाजपत्रिकेत म्हटले आहे.

ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

कौटुंबिक कलहामधून वृद्ध आई वडिलांना वृध्दाश्रमामध्ये जाऊन राहावे लागत असल्याची बरीच प्रकरणे सर्वांना माहीतच असतील. आपल्या उतरत्या वयामध्ये जेष्ठांना अश्या प्रकारे वागणूक मिळाल्यामुळे त्यांना पुढील आयुष्य अत्यंत हलाखीचे जगावे लागते. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि देखभाल कायदा २००७ हा कायदा आला होता. त्याच्या परिभाषेमध्ये बदल करत आता केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार कायदाबदल करत घरातल्या बुजुर्गांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांबरोबरच जावई आणि सुनांवरही असेल, असा प्रस्ताव आहे. सरकार Maintenance and Welfare Senior Citizens Act 2007 मध्ये असलेल्या ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या परिभाषेत बदल करणार आहे. ही परिभाषा अधिक विस्तारित करायचा सरकारचा विचार आहे.

या शहराला बाण नाही खान पाहिजे :इम्तियाज जलील

Untitled design

औरंगाबाद प्रतिनिधी |काल किराडपुरा भागात आमदार इम्तियाज जलील यांची तुफानी सभा झाली. मुस्लिमेतर मतांचा जोगवा मागताना विकासाचा विषय पुढे करणारे जलील या सभेत केवळ ‘कॉम’ या एका विषयाला धरून 35 मिनिट 52 सेकंद बोलले. या शहरातील निवडणुका ‘खान की बाण’ या विषयावर गेली वीस वर्षे लढली गेली, असे सांगत त्यांनी किराडपुऱ्याच्या जनतेच्या साक्षीने ‘बाण तुटणार, … Read more