जयवंत शुगर्सचा 2021- 2022 च्या गळीत हंगामासाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते रोलर पूजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात 2021- 2022 च्या गळीत हंगामासाठी ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, श्री. विनायक भोसले, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. … Read more

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली प्रतिनिधी : हिंगोली वसमत तालुक्यात जिल्हाभरात आज सकाळी अंदाजे 8-30 ते 8-36 या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळ सकाळी भुकंपाचे धक्के जाणवल्याने काही वेळासाठी नागरिकांत संभ्रमाचे वातावरण पसरले होते. आज गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा , इंजनगाव , म्हातारगाव, महागाव … Read more

शिरपेचात मानाचा तुरा : कृष्णा कारखान्याने GST नियमित भरणा केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सन्मान

Krishna Factry Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने  सन 2020-21 या आर्थिक वर्षात दि. 31 मार्च अखेर जी.एस.टी कर प्रणाली नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही केल्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला ‘सर्टिफिकेट ऑफ ॲप्रीसिएशन प्रमाणपत्र’  प्रदान करून सन्मान केला आहे. चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली … Read more

संबधितावर गुन्हा दाखल : शर्यतीच्या बैलाची हत्या नाही, अपघातात मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न

crime

सातारा | जावली तालुक्यातील सरताळे येथे एका शर्यतीच्या बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत होते. कारण या बैलाचे पाय मोडले होते. मात्र, या प्रकरणाच्या तपासात या बैलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा बैल पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावचा आहे. काही दिवसांपूर्वी सरताळे येथे एका बैलाचा मृतदेह … Read more

शर्यतीच्या बैलाची अमानुष हत्या : अज्ञाताकडून फास लावून कुऱ्हाडीचे घाव घातले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून क्रूरतेने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री घडला आहे. या घटनेची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून … Read more

औरंगाबादेतील शेतकऱ्यांचा शेतीमाल रेल्वेद्वारे होणार निर्यात; पहिली किसान रेल्वे कोलकत्त्याकडे रवाना

kisan train

औरंगाबाद |  येथून शनिवारी शेतकऱ्यांसाठी पहिली किसान रेल्वे धावली. शेतकऱ्याचा मालवाहतूक करणारी औरंगाबाद येथून ही पहिलीच रेल्वे असून 246 टन कांदा घेऊन ही रेल्वे कोलकत्ताकडे रवाना झाली. रेल्वेद्वारे शेतकऱ्यांचा शेतीमाल विविध ठिकाणी पोहोचत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत देशातील विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सुरू … Read more

पीक विम्यासाठी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

crop insurance

उस्मानाबाद | शेतकऱ्याच्या हक्काचे खरीप हंगाम 2020 पिक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी कृषी व महसूल मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर कृषी आयुक्तांनी तीन दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा नोटिसा विमा कंपन्यांना दिल्या. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही अखेर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार ज्ञानराज चौगुले … Read more

कृषी विभागाची मोठी कारवाई : विनापरवाना 21 लाखांचा खतांचा मुद्देमाल जप्त

सांगली | खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांना खते रास्त दरात व गुणवत्ता पूर्ण उपलब्ध करुन देण्याकरिता तसेच विक्रेत्यांनी या निविष्ठांची शेतकऱ्यांना जादा दराने खते विक्री करू नये. खतांचा काळाबाजार करू नये तथा भेसळ युक्त खते शेतकऱ्यांना विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने 11 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी सांगली येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल … Read more

72 वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; चाऱ्याच्या गंजीला लागली होती आग

fire

औरंगाबाद | जिल्ह्यातील आडुळ या गावांमधील एका शेतकऱ्याच्या चाऱ्याची गंजी व कपाशीच्या फसाटीला आग लागली होती. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीत बहात्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. औरंगाबाद तालुक्यातील खोडेगाव शिवारात गुरुवारी (दि. 10) सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंढरीनाथ अश्रुबा खाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. खोडेगाव येथील शेतकरी पंढरीनाथ खाडे यांची बेंबळ्याचीवाडी … Read more

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कृषी दुकानांवर कारवाई न झाल्यास कृषी अधिकाऱ्यांना बळीराजा संघटनेचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बोगस बियाणे आणि चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कृषी दुकानांवर भरारी पथकांद्वारे कारवाई करावी. या प्रकाराकडे सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना … Read more