“चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी टरबूज गोड लागणार नाही”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी अधिकच आक्रमक आहे. जळगाव मध्ये मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी भाजप आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. “चंपाने समोय्यांना हाताशी धरून टरबूजाच्या कितीही खापा केल्या तरी राज्यातील जनतेला टरबूज गोड लागणार नाही, अशी टीका अनिल पाटील यांनी केली आहे.

आमदार अनिल पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपमधील अनेक नेत्यांकडून सध्या राजकारण केले जात आहे. चंद्रकांत पाटील यांचे हे षडयंत्र आहे. किरीट सोमय्यांना हाताशी धरून हे सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे कि नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकारमधील सर्व आमदार खंबीरपणे उभे आहेत, असे पाटील यांनी म्हंटले.

Leave a Comment