रात्रीची संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची कारवाई…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात रात्री आठनंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी वाहने थांबवून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाई करत दंड वसूल केला.

कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी रात्री आठनंतर विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

अत्यावश्यक सेवा व रुग्णालयात किंवा औषधीसाठीच बाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या असताना जिल्हाधिकारी कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौकात चारचाकी व दुचाकी वाहने थांबवून बेधडक मोहीम प्रशासनाने हाती घेवून दंडात्मक कारवाई केली व काही वाहनधारकांवर गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या फौजफाट्यासहीत चौकाचौकात संयुक्त कारवाई करत वाहनांची कसून तपासणी पोलिसांनी केली. संचारबंदी यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. परंतु काही जणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने कारवाईचा बडगा उगारावा लागत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment