छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मार्गदर्शक सूचना जारी, साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. या … Read more

बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या महिलेसह 4 जणांच्या टोळीचा पर्दाफाश, एकाच महिलेचे अनेकांशी विवाह लावून अनेकांना गंडा

औरंगाबाद | बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या टोळीचा देवगाव रंगारी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, मुख्य सूत्रधार महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, पैसे घेऊन लग्न लावणा-या व फसवणूक करणा-या सक्रीय टोळीची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना  खब-याकडून मिळाली. त्यानुसार अहिरे यांनी बनावट नवरदेव तयार करून … Read more

औरंगाबाद शहरात ३७ केंद्रांवर महापालिकेकडून लसीकरण अभियान

औरंगाबाद | राज्य सरकारच्या निर्देशानुसार ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना एक एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाची तयारी महापालिकेने केली असून शहरात ३७ केंद्रे यासाठी तयार केले जाणार आहेत. लस घेण्यासाठी येताना नागरिकांना मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड या पैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी … Read more

पेट्रोल पंपांवर लागल्या रांगा, विविध पेट्रोलपंपांवर नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच रात्री ८ वाजेपर्यंतच पेट्रोल पंप सुरू असल्याने आज दिवसभर शहरातील विविध पेट्रोलपंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली. एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच आता लॉकडाऊनची चिंता देखील अनेकांना लागून आहे. त्यातच सध्या शहरात कोरोनाचा आकडा पाहता अंशतः लॉकडाऊन आणि … Read more

समृद्धी महामार्गावरील बोगद्याचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करा; ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांना सूचना

औरंगाबाद | समृद्धी महामार्गावर पोखरी शिवारातील डोंगरात बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून १५ एप्रिलपर्यंत एका बाजूच्या बोगद्याचे काम पूर्ण करून त्यातून १ मेपासून वाहतूक सुरू करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) प्रयत्न आहेत. सध्या डोंगराच्या दोन्ही बाजूंनी बोगद्याचे काम सुरू असून १३० मीटर लांबीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. या संदर्भात ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता … Read more

महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला, सरकारकडून आज दहा हजार लसींचे डोस मिळण्याची शक्यता

औरंगाबाद | महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला आहे. पालिका आता नवीन साठ्याच्या प्रतीक्षेत आहे. आज दहा हजार लशींचे डोस प्राप्त होतील, असे मानले जात आहे. सरकारच्या निर्देशानुसार शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणीची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ८५ हजार व्यक्तींचे लसीकरण महापालिकेच्या माध्यमातून झाले आहे. सरकारकडून महापालिकेला लस पुरविली जाते. पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्रे … Read more

नागरिकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी साधला फेसबूक लाइव्हद्वारे संवाद

औरंगाबाद | मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबाद जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे, ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनावर कसा अटकाव आणता येईल, काय उपाययोजना कराव्या लागतील, नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, अशा अनेक मुद्द्यावर आज फेसबूक लाइव्हमध्ये माहिती दिली. … Read more

यंदा होळी सणावर कोरोनाचे सावट, साखर गाठींच्या विक्रीवर होणार परिणाम…

औरंगाबाद | होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत आहे. यंदा संपूर्ण राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गाठींच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शहरातील दुकाने सध्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गाठ्यांनी सजली आहेत. होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही … Read more

नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवांनाच परवानगी

औरंगाबाद | कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेत बाहेर निघण्यास बंदी आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. मात्र या काळात नियम मोडणाऱ्या अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले … Read more

जि.प.च्या भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प, वैज्ञानिकच नसल्याने टंचाईग्रस्त गावांची पंचाईत

औरंगाबाद | जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात वैज्ञानिकांची तीन पदे मंजूर असून त्यापैकी एक पद भरण्यात आले आहे. तेसुद्धा वैद्यकीय रजेवर गेल्याने भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी सध्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे भूवैज्ञानिकच नसल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची पंचाईत … Read more