“उद्धवजी, तुम्हाला एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल”; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनामा मागणीसाठी आज मुंबईतीलआझाद मैदानावर भाजपकडून विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतो. शरद पवारसाहेब म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल जमत तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवत आहात. पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावे लागेल. मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं? असं बाळासाहेब विचारतील तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? असा सवाल फडणवीस यांनी केला.

मुंबईतील आझाद मैदानावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. यावेळी फडणवीस म्हणाले कि, या राज्यातील सरकारमधील अनेक मंत्र्यानी घोटाळे केले. त्यामध्ये अनिल देशमुख, संजय राठोड याचा समावेश आहे. राज्य सरकारने अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला. संजय राठोडांचाही राजीनामा घेतला. मग आता दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते आहे का? तुम्ही कुणाच्या दाढ्या कुरवाळताय हे आम्हाला समजले पाहिजे.

नवाबचा राजीनामा का घेत नाही हे समजले पाहिजे. तुम्ही राजीनामा घेतला नाही तर आम्ही संसंघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. आज मोर्चाची सुरुवात आहे, संघर्ष सुरूच राहील. मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवया आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Leave a Comment