‘…तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल’, एकनाथ खडसे यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी आता शिवसेनेमधील अंतर्गत वादावर जोरदार टीका केली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भानगडीमध्ये बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली, अशी टीका त्यांनी केली. तर दुसरीकडे आपला मित्रपक्ष मजबूत असला, तर आपणसुद्धा मजबूत असू शकतो. महाविकासआघाडीमधला घटक मजबूत असला पाहिजे, असे वक्तव्य केले.

कार्यकर्त्यांना केले आवाहन
तीन पक्ष मिळून सरकार स्थापन होऊ शकतं हे शरद पवार यांनी दाखवून दिलं. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यावर भर द्या, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. 2019 मध्ये राष्ट्रवादीचे 54 आमदार होते, तर शिवसेनेचे 56 आमदार होते. राष्ट्रवादीचे (NCP) एक-दोन आमदार जास्त असते तर आपला मुख्यमंत्री झाला असता. दोन-तीन आमदारांमुळे किती फरक पडू शकतो, हे यावरून समजते. राष्ट्रवादी (NCP) मजबूत करून पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असे एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

2019 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत भाजपने 105, शिवसेनेने 56, राष्ट्रवादीने (NCP) 54 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युतीमध्ये निवडणुका लढून बहुमत मिळवले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले, यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी (NCP)आणि काँग्रेस यांनी मिळून महाविकासआघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर या सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांसह बंड केले आणि हे सरकार कोसळले.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…