वाहनांच्या नव्याने नोंदणीसाठी सरकार बनवणार सुलभ नियम, याचा लाभ कसा घ्यावा ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या नव्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुलभ नियमांची अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये सरकारने सर्वसामान्यांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यानंतर नवीन राज्यात वाहन नोंदणीसाठी शासन आराखडा तयार करेल. त्याचबरोबर हा मसुदा तयार झाल्यानंतर नवीन नियम बनविण्यात येतील ज्यामुळे आपल्याला अनेक बरेच फायदे मिळतील. उदाहरणार्थ, जर आपल्याला आता नोकरी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी दुसर्‍या राज्यात जायचे असेल तर आपले वाहन तेथे सहज रजिस्टर्ड होईल. ज्यासाठी मंत्रालयाने IN सीरीज सुरू केली आहे. ज्यामध्ये दुसर्‍या राज्यात रजिस्टर्ड असलेल्या वाहनांचे पुन्हा रजिस्ट्रेशन होईल.  सरकारच्या अधिसूचनेनुसार संरक्षण नियम, केंद्र सरकार, राज्य सरकार, पीएसयू आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी या नियमाचा लाभ घेऊ शकतात. या नियमांचा आपल्याला कसा फायदा होईल हे जाणून घेऊयात.

कोणाला फायदा होईल?
सरकारच्या अधिसूचनेनुसार या नियमाचा लाभ अशा कंपनीत काम करणाऱ्यांनाच मिळणार आहे ज्यांचे ऑफिस 5 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात असेल. यासह केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांनाच याचा लाभ मिळणार आहे.

हे फायदे नवीन मार्गदर्शकतत्त्वामध्ये आढळतील
परिवहन मंत्रालयाच्या मते, जी लोकं आपली वाहने दुसर्‍या राज्यात नेतात. त्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशनसाठी 12 महिने दिले जातील. यासह नवीन राज्यात रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला NOC आणि रोड टॅक्सची पावती द्यावी लागेल.

प्रो-राटाची परतावा कसे असेल
मूळ राज्यातील Pro Rata चे पैसे परत करणे खूप कठीण आहे. यासाठी मंत्रालयाने वेबसाइटवरील नियमांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर या नियमांच्या मसुद्यासाठी लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. पुढील 30 दिवसांच्या आत द्यायच्या आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment