१५ ऑक्टोंबरपर्यंत बंद राहणार हाॅटेल, रॅस्टोरंट? पहा काय म्हणतंय सरकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाव्हायरसचे वाढते संकट पाहता सरकारने २१ दिवसांचे लॉकडाउन केले. परंतु राज्यांत वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन वाढवण्यात येण्याच्या बातम्या वेगाने येऊ लागल्या आहेत. याचा प्रारंभ करून ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविला आहे. लॉकडाऊनबाबत सोशल मीडियावरही अनेक अफवा पसरल्या आहेत. सरकार त्यांना रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.

अशीच एक बातमी सध्या पसरली आहे की पर्यटन मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत रेस्टॉरंट्स आणि हॉटेल बंद ठेवण्यास सांगितले आहे. या बातमीबद्दल प्रसार भारती यांनी स्पष्टीकरण दिले आहे की ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.फक्त होम डिलिव्हरी चालू आहे.

 

या बातमीत १५ ऑक्टोबरपर्यंत हॉटेल्स बंद ठेवण्यात यावीत, असे सांगण्यात आले आहे. असे म्हटले आहे की लॉकडाऊनमुळे अडकलेल्या अतिथींसाठीच हे खुले असेल. सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन मध्ये सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद केली आहेत. फक्त होम डिलीव्हरी चालू आहे, कारण ते आवश्यक सेवांच्या यादीमध्ये येतात.

प्रसार भारती यांनी ट्विट केले की, ‘१५ ऑक्टोबरपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवणार असंल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या बातम्या बनावट आहेत, अशी कोणतीही माहिती पर्यटन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली नाही.

देशात आतापर्यंत जवळपास ६००० संसर्गाच्या घटना घडल्या आहे, तर कोरोनामधून देशात झालेल्या मृत्यूची संख्या १८४ वर पोहोचली आहे. आज गुजरातमध्ये ५५ तर कर्नाटकात १० नवीन प्रकरणे आढळली आहेत. संसर्ग झालेल्यांमध्ये ७१ विदेशी नागरिकही आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment