Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 2685

धक्कादायक ! बाईक अपघातात बालमित्रांचा दुर्दैवी अंत

Jaipur crime

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील जयपूरमधील अजमेर रोडवर झालेल्या अपघातात भरधाव वाहनाने धडक दिल्याने दोघा दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले तरुण हे एकमेकांचे लहानपानापासूनचे मित्र होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी अपघातानंतर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कोणालाही वाचवता आले नाही. यानंतर या दोघां मित्रांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. यामधील एका तरुणाचे दोन महिन्यांनी लग्न होणार होते. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. बापलेकांच्या मृत्यूनंतर या तरुणाच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?
कपिल खटाणा आणि मोहित शर्मा अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही जयपूरमधील पुरानी बस्ती या ठिकाणचे रहिवाशी आहेत. घटनेच्या दिवशी मोहित कपिलसोबत स्कूटीवरुन घरातून निघाला होता. कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत, असे सांगून हे दोघे घरातून निघाले होते. त्यानंतर अजमेर रोडवरील पुलावर अज्ञात वाहनाने या दोघांच्या स्कूटीला धडक दिली आणि कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.

एकामागून एक दोघांचाही मृत्यू
या अपघातात दोघांच्याही डोक्याला मार लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघेही बराच वेळ रस्त्यावर पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. या परिसरात गस्त घालणारे पोलीस अधिकारी पृथ्वीपाल सिंग घटनास्थळावर गर्दी पाहून पोहोचले. तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक दोन्ही तरुणांना मदत करत होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही रुग्णवाहिकेतून सवाई मानसिंग रुग्णालयात पाठवले. मात्र त्यागोदरच दोघांचा मृत्यू झाला होता.

कपिलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या अपघातातील कपिलचे 24 एप्रिलला लग्न होणार होते. मात्र त्या अगोदरच काळाने त्याच्यवर घाला घातला. कपिलच्या घरातून लग्नाची वरात निघण्याऐवजी त्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. तसेच मोहितच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मोहितच्या खांद्यावर येऊन ठेपली होती. कपिल आणि मोहित या जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

वृद्ध दाम्पत्याची 5 लाखांची रोकड लुटून आरोपी फरार

nagpur crime

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये वृद्ध दाम्पत्याबाबत एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला चोरांनी लुटले आहे. एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेतून 5 लाख रुपयांची रोकड पिशवीत भरून नेताना पार्किंग रस्त्यावरच दोन बाईकस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून हिंगणा मार्गाकडे पळ काढला. हि घटना गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
मीना आणि शिवप्रसाद सुखदेव विश्वकर्मा हे दाम्पत्य नागपुरातील यशोदा नगर, हिंगणा रोड परिसरात राहतात. शिवप्रसाद हे राज्य राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त सहा. पोलीस उपनिरीक्षक आहेत. घटनेच्या दिवशी हे वृद्ध दांपत्य घराच्या बांधकामासाठी स्कुटरने एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून 5 लाख रुपये काढल्यानंतर शिवप्रसाद यांनी ती पिशवी आपल्या पत्नीच्या हातात दिली. यानंतर शिवप्रसाद हे बँकेच्या बाहेर रस्त्यावर ठेवलेली स्कुटर सुरू करीत असताना मागून बाईकवर दोन आरोपी आले आणि त्यांनी मीना यांच्या हातातील ती पिशवी हिसकावून पळून गेले. त्या पिशवीमध्ये एकूण पाच लाख रुपये, बँकेचे पासबूक आणि मोबाइल फोन होता.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपी हे घटनास्थळावरून हिंगणा मार्गाकडे गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, सहा पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे यांनी सुद्धा घटनास्थळा ची पाहणी केली. आरोपी हे बँकेमधूनच या वृद्ध दांपत्यावर पाळत ठेवून होते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.त्या वृद्ध दांपत्याने केलेल्या वर्णनानुसार तसेच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

राज्यातील आश्रमशाळांमध्ये तब्बल 19 लाख बोगस विद्यार्थी

school student

औरंगाबाद – राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, आश्रमशाळांमध्ये तब्बल 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी याचिका ब्रीजमोहन मिश्रा यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यानंतर खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. या आकडेवारीनुसार तब्बल 19 लाख विद्यार्थी बोगस असल्याचे आढळले.

राज्यातील 36 जिल्ह्यांतील एक लाख 10 हजार 315 शाळांमध्ये सुमारे दोन कोटी 25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या दाखविण्यात आली आहे. ‘आधार’ला जोडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक कोटी 83 लाख विद्यार्थी आहे. त्यात 29 लाख 72 हजार 636 विद्यार्थ्यांची आधार जोडणी न झाल्याचे आढळले. राज्य सरकारतर्फे पोषण आहार, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके इतर आनुषंगिक योजनांचा लाभ दिला जातो. लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध नसेल तर गैरप्रकार होण्याची शक्यता असते. विविध कारणामुळे शाळांनी विद्यार्थिसंख्या जास्त दाखल्याची शक्यता आहे.

सर्वाधिक बोगस विद्यार्थी –
2,43,582 – पुणे
1,84,262 – नागपूर
1,72,534 – जळगाव
1,52,723 – नांदेड
1,17,519 – यवतमाळ

यवतमाळ हादरलं ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृणपणे हत्या

yawatmaal crime

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:वर देखील धारदार शस्त्राने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारांसाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या
आरोपी तरुणाचे मृत तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. आरोपी तरुणाचे नाव शुभम असे आहे. आरोपी शुभमने घटनेच्या दिवशी मृत तरुणीला एमआयडीसी परिसरात भेटण्यासाठी बोलावले. यानंतर आरोपीने त्या तरुणीची दगडाने ठेचून हत्या केली. या हल्ल्यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी शुभम याचे मृत तरुणीवर जीवापाड प्रेम होते. हा तरुण तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. मात्र त्याचे एकतर्फी प्रेम होते.

या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपी शुभमला होता. यानंतर शुभमने त्या तरुणीला एमआयडीसी परिसरात भेटायला बोलावले आणि मग तिच्यावर हल्ला केला. या तरुणीची हत्या केल्यावर आरोपी शुभम याने देखील स्वत:वर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना त्या परिसरातील नागरिकांनी एक तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पहिले तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्या तरुणीचा मृत्यू झाला होता तर आरोपी तरुण मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

आता कायमचे Work From Home!! ‘या’ टेक कंपनीने केली घोषणा

नवी दिल्ली । ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. ट्विटरचे प्रमुख पराग अग्रवाल यांनी शुक्रवारी अनेक ट्वीट्स करत जाहीर केले की, सोशल नेटवर्किंग कंपनी या महिन्यात त्यांचे जागतिक कार्यालय पुन्हा सुरू करणार आहे. जर लोकांना ऑफिसमधून काम करायचे असेल तर ते करू शकतात, मात्र जर त्यांना Work From Home किंवा Work From Anywhere करायचे असेल तर हे पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असेल.

मात्र, पराग अग्रवाल यांनी कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये परतण्याचे आवाहन करताना सांगितले की, ऑफिसमध्ये काम करण्याची जोमदार संस्कृती निर्माण होईल आणि बिझनेस ट्रॅव्हलही तातडीने सुरू होईल. ते म्हणाले की,” 15 मार्चपासून सर्व जागतिक ट्विटर ऑफिस उघडतील.” ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “कुठे काम करायचे, तुम्हाला व्यवसायासाठी सुरक्षितपणे प्रवास करायचा आहे की नाही, किंवा कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.”

तुम्हाला जिथून बरे वाटेल तिथून काम करा
Twitter CEO कर्मचार्‍यांना जिथे जास्त प्रोडक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह वाटत असेल तिथे काम करायला सांगतात. ते पुढे म्हणाले की,” यामध्ये फुलली “वर्क फ्रॉम होम (WFH) ” पर्यायाचा देखील समावेश आहे.” पराग अग्रवाल यांनी जोर दिला की, ज्यांना रिमोटली काम करणे सुरू ठेवायचे आहे त्यांनी “Learn and Adapt”शी जुळवून घेणे आवश्यक आहे, कारण “वेगवेगळ्या ठिकाणांहून काम करणे जास्त अवघड होईल.”

जग COVID-19 साथीच्या आजाराशी झुंजत असताना, ऑफिसमध्ये परत येण्याची शक्यता कमी होती. मात्र, परिस्थिती आता पूर्वपदावर आल्याने, Google एप्रिलच्या सुरुवातीस आपले सिलिकॉन व्हॅली ऑफिस कर्मचार्‍यांसाठी उघडण्याच्या तयारीत आहे. Google ला अपेक्षा आहे की, त्यांचे कर्मचारी आठवड्यातून फक्त 2 दिवस घरून आणि उर्वरित दिवस ऑफिसमधून काम करतील.

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुक करून मिळवा भरपूर नफा; कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सतत घसरणाऱ्या व्याजदरांमध्ये तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही किसान विकास पत्र (KVP) योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये केवळ तुमचे पैसेच सुरक्षितच राहणार नाहीत तर मॅच्युरिटीवर तुम्हाला दुप्पट पैसेही मिळतात, म्हणजे 124 महिने (10 वर्षे 2 महिने). या योजनेसाठी 6.9 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

किसान विकास पत्र ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, जी भारत सरकारद्वारे चालवली जाते. हे प्रामुख्याने शेतकरी आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी आहे, जेणेकरून ते त्यांचे पैसे दीर्घकाळ वाचवू शकतील. यामध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक सुरू करणे आवश्यक नाही.

तुम्ही 1000 पासून गुंतवणूक सुरू करू शकता
तुम्ही देशभरातील पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांद्वारे या योजनेत गुंतवणूक करू शकता. यामध्ये किमान 1,000 रुपयांनी गुंतवणूक सुरू करता येते. जर तुम्ही या योजनेत 50,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एक लाख रुपये मिळतील.

2.5 वर्षांनंतर पैसे काढण्याची सुविधा
किसान विकास पत्र सर्टिफिकेटच्या स्वरूपात उपलब्ध आहे. यामध्ये 1,000, 2,000, 5,000, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतचे सर्टिफिकेट दिले जाते, ज्याचा व्याजदर जारी करताना निश्चित केला जातो. मात्र, सरकारी नियमांनुसार त्यात बदल होऊ शकतात. KVP मध्ये मॅच्युरिटी कालावधी 124 महिने असला तरी आवश्यक असल्यास तुम्ही 2.5 वर्षांनी पैसे काढू शकता.

‘ही’ कागदपत्रे आवश्यक आहेत
KVP च्या नियमांनुसार, ते अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने प्रौढ व्यक्ती आणि कमकुवत मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक खरेदी करू शकतात. KVP खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यासारखे ओळखपत्र आवश्यक आहे.

लॉकइन पिरियडनंतर पैसे काढल्यावर मिळणार रिटर्न
वेळ (वर्षांमध्ये) – रिटर्न (रु. मध्ये)
2.5 वर्षांनंतर आणि 3 वर्षापूर्वी – 1,154
5 वर्षांनंतर आणि 5.5 वर्षापूर्वी – 1,332
7.5 वर्षांनंतर आणि 8 वर्षापूर्वी – 1,537
10 वर्षांनंतर आणि मॅच्युरिटीपूर्वी – 1,774
मॅच्युरिटीवर (12 महिने) – 2,000
(कॅल्क्युलेशन 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे)

जर गरज नसेल तर फक्त मॅच्युरिटीवरच पैसे काढा
गुंतवणूक सल्लागार स्वीटी मनोज जैन सांगतात की,”ही भारत सरकारची योजना आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नाही. तसेच मॅच्युरिटीवर पैसे दुप्पट होतात. जर तुम्हाला 124 महिन्यांपूर्वी हवे असेल तर तुम्ही अडीच वर्षानंतरही पैसे काढू शकता. अशा स्थितीत तुम्हाला कमी व्याज मिळते. त्यामुळे जर गरज नसेल तर केवळ मॅच्युरिटीवरच पैसे काढा.

बनावट आधार कार्ड कसे ओळखावे ते जाणून घ्या

Aadhaar Card

नवी दिल्ली । आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आता ते सगळीकडे अनिवार्य देखील झाले आहे. त्याशिवाय अनेक गोष्टी होऊ शकत नाहीत. जसजशी त्याची गरज वाढली आहे, त्याच प्रकारे त्याचा गैरवापराची प्रकरणेही वाढत आहेत. ऑनलाइन फसवणुकीत सायबर गुन्हेगार कोणाच्या तरी आधारचा गैरवापर करून गुन्हे करत आहेत.

म्हणूनच, आता तुम्ही तुमच्या आधार कार्डाबाबत जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. यासोबतच आधार कार्डची हिस्ट्री वेळोवेळी जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून कोणी त्याचा गैरवापर तर करत नाही ना हे कळू शकेल. बनावट आधार कार्ड बनवून अनेकांना बनावट आधार कार्डही देण्यात आली आहेत. त्यामुळेच आपले आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे.

तुमच्याकडे असलेले आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घेणे खूप सोपे आहे. UIDAI आधारची माहिती ऑनलाइन मिळवण्याची सुविधा देते. तुमचे आधार खरे आहे की बनावट हे तुम्ही घरबसल्या आरामात ऑनलाइन तपासू शकता.

अशा प्रकारे आहे संपूर्ण प्रक्रिया
सर्व प्रथम UIDAI आधारित वेबसाइट https://uidai.gov.in वर जा.
आता My Aadhar सेक्शनमधील Aadhar Services वर जा.
येथे Aadhar Verification टॅबवर क्लिक करा.
हे तुम्हाला वेगळ्या पेजवर घेऊन जाईल.
या पेजवर तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यात तुमचा आधार क्रमांक टाका. तसेच, कॅप्चा देखील या पेजवर दिसेल, तो बॉक्समध्ये एंटर करा.
हे दोन टाकल्यानंतर Proceed आणि Verify Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक बरोबर असल्यास एक नवीन पेज उघडेल. यामध्ये तुमचा आधार क्रमांक दिसेल. यासह, तुम्हाला काही डिटेल्स देखील दिसतील.
जर तुमचा आधार क्रमांक खोटा असेल तर हे पेज उघडणार नाही आणि इनव्हॅलिड आधार क्रमांक लिहिलेला दाखवला जाईल.
जर तुमचे आधार कार्ड बनावट निघाले तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता.
आधारशी लिंक केलेला कोणताही टोल फ्री क्रमांक 1947 या क्रमांकावर करता येतो.

IOC च्या भागीदारीत कोटक महिंद्रा बँकेने लाँच केले को-ब्रँडेड इंधन क्रेडिट कार्ड

Kotak Mahindra Bank

नवी दिल्ली । देशभरात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सर्वांनाच हैराण केले आहे, मात्र तुम्हाला काही लिटर पेट्रोल आणि डिझेल फ्री मध्ये दिले गेले किंवा तुम्हाला कॅशबॅक दिला गेला तर तुम्ही काय म्हणाल? होय, हे खरे आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदी करताना तुम्ही फ्युएल क्रेडिट कार्ड्स द्वारे तुमचे पैसे वाचवू शकता. बाजारात अनेक फ्युएल क्रेडिट कार्ड्स उपलब्ध आहेत. यामध्ये, खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी शुक्रवारी इंडियन ऑइल कोटक को-ब्रँडेड इंधन क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा केली.

या टाय-अपमुळे, ग्राहकांना एक चांगला रिवॉर्ड प्रोग्रॅम बघायला मिळेल. यामध्ये ग्राहकांना इंधनाचा वापर आणि गैर-इंधन आणि वारंवार खर्च करणार्‍या श्रेणींवर, जसे की जेवण आणि किराणा सामानावर चांगले रिवॉर्ड मिळतील.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक (रिटेल ट्रान्सफॉर्मेशन) संदीप मक्कर म्हणाले, “आम्ही कोटक महिंद्रा बँकेसोबतच्या सहकार्याबद्दल खूप उत्सुक आहोत. इंडियन ऑइलचा आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य देऊन इंधन भरण्याचा अनुभव बदलण्यावर ठाम विश्वास आहे.”

मक्कर म्हणाले की,”ही पार्टनरशिप इंडियन ऑइल आणि कोटक महिंद्रा बँकेला आपल्या ब्रँडची पोहोच आणखी मजबूत करण्यास आणि ग्राहकांशी जोडण्यास मदत करेल. इंडियन ऑइलच्या 33,000 हून अधिक इंधन केंद्रांपैकी 98 टक्क्यांहून जास्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि वॉलेट पेमेंट स्वीकारतात.”

नवरा-बायकोने केले एकत्र मद्यपान, यानंतर मद्यधुंद पत्नीने केले ‘हे’ कृत्य

jaipur crime

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एक धक्क्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी पत्नीने मद्यधुंद अवस्थेत आपल्या पतीची हत्या केली आहे. संबंधित दाम्प्त्याने आधी एकत्र मद्यपान केलं. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. यानंतर हा वाद वाढल्याने आरोपी पत्नीने मद्यधुंद अवस्थेत आपल्या पतीची हत्या केली. बाडमेरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या आरोपी पत्नीने गळा आवळून आपल्या पतीची हत्या केली आहे. मृत तरुणाच्या आईने आपल्या सुनेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी विरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे

काय आहे प्रकरण?
मृत व्यक्तीचे नाव अनिल कुमार आहे. आपली सुन मंजूने आपल्या मुलाची हत्या केल्याची तक्रार कुंती यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला.

दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन
संबंधित पती-पत्नी दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन होते. मंगळवारी रात्रीही दोघं मद्यधुंद अवस्थेत होते. यावेळी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. या वादातून आरोपी मंजूने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. यानंतर तिने आपल्या पतीची बेल्टने गळा आवळून हत्या केली. यानंतर मृत अनिलच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मंजुची चौकशी केली. तेव्हा तिने आपणच हत्या केली असल्याचे कबुल केले.

आता अशाप्रकारे कमी करा होम लोनवरील EMI, संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घ्या

home

नवी दिल्ली ।  तुम्ही जर होम लोनवर जास्त व्याज देत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि माहिती घेऊन आलो आहोत. जी वाचून तुम्ही तुमचा EMI 5,000 रुपयांनी कमी करू शकाल. बहुतांश बँका 8 ते 9 टक्के लोन देत होत्या मात्र आता बहुतांश बँका 7 टक्के दराने लोन देत आहेत. यासोबतच होम लोन ग्राहकांना अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे होम लोन ट्रान्सफर करू शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा पर्याय निवडून तुमचा फक्त EMI च कमी होणार नाही तर परतफेडीचा कालावधीही वाढवता येऊ शकेल.

EMI 5000 रुपयांपर्यंत कमी होईल
जर तुम्हाला तुमच्या होम लोनचा EMI 5000 रुपयांनी कमी करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही नियोजन करावे लागेल. स्वस्त व्याजदरात बँक लोन ट्रान्सफर केल्याने तुमच्या EMI वर मोठा फरक पडेल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये होमलोन घेतले असेल, तर त्या बँकेच्या होमलोनवरील व्याजदर 9.25 टक्के होता. आता तुम्ही होमलोन नवीन बँकेत शिफ्ट केल्यास ते 7 टक्के दराने घेऊ शकता, तर तुमचा मंथली EMI आपोआप कमी होईल.

संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घ्या:-
वर्ष                     2016
कर्जाची रक्कम      30 लाख
व्याज दर                9.25%
कर्जाचा कालावधी   20 वर्षे
EMI                       27,476

आता समजा 2022 मध्ये तुम्ही तुमचे होम लोन नवीन बँकेत शिफ्ट केले. त्यामुळे तुमच्या थकीत कर्जात 24 लाख रुपयांची बचत होईल. म्हणजेच, जर तुम्ही तुमचे होम लोन अशा प्रकारे शिफ्ट केले तर तुमचा EMI दरमहा सुमारे 5000 रुपयांनी कमी होऊ शकतो.

नवीन बँक EMI कॅल्क्युलेशन
वर्ष                           2022
कर्जाची रक्कम             25 लाख
व्याज दर                      6.90%
कर्जाचा कालावधी         14 वर्षे
EMI                            22,000 (अंदाजे)

सुविधेसाठी आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला होमलोन बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल, तर यासाठी KYC डॉक्युमेंट्स जसे की, आयडेंटिटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ आवश्यक असेल. याशिवाय, स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाची मागील दोन वर्षांची आर्थिक स्टेटमेंट आणि पाच वर्षांच्या व्यवसायातील सातत्य डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. पगारदार अर्जदारांनी चालू वेतन स्लिप आणि सहा महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट देणे आवश्यक आहे.