Friday, December 26, 2025
Home Blog Page 2888

भरदिवसा रस्त्यावर गाडी अडवून वसुलीचा प्रकार; पैसे देण्यास नकार दिल्याने दुचाकीस्वारावर प्राणघातक हल्ला

औरंगाबाद – भररस्त्यावर गाडी अडवून 300 रुपयांची मागणी केली. ड्युटीवरून घरी परतत असलेल्या दुचाकीस्वाराने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर पोस्ट ऑफिस रस्त्यावर घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, तुकाराम बाजीराव देशमुख (वय-59 वर्षे, रा. शिवाजी नगर, औरंगाबाद) हे 23 जानेवारी रोजी सायंकाळी 05.15 वाजेच्या सुमारास ड्युटीवरून मोटरसायकलने घरी परतत असताना पोस्ट ऑफीस शिवाजीनगर येथे चार अनोळखी 16 ते 20 वर्षे वयोयगटातिल मुले थांबलेले होते. त्या मुलांनी तुकाराम बाजीराव देशमुख येत असल्याचे पाहिले. त्या मुलांनी तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या गाडीच्या समोर येऊन गाडी अडवली. ते अनोळखी मुले गाडीसमोर आल्याने तुकाराम बाजीराव देशमुख यांनी गाडी.उभी केली. त्यापैकी एक अनोळखी मुलगा तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या समोर आला व मला म्हणाला 300 रु द्या. पैसे देण्यास तुकाराम बाजीराव देशमुख यांनी नकार दिला. तो मुलगा तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या पाठीमागे गेला तेथील दगड उचलुन तुकाराम बाजीराव देशमुख यांना फेकून मारला. त्यामुळे तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या डोक्याच्या उजव्या बाजुला लागून डोके फुटले. तितक्यात तुकाराम बाजीराव देशमुख गाडीवरुन खाली उतरत असताना त्या मुलाने पुन्हा दुसरा दगड उचलला व त्यांना फेकून मारला. त्यामुळे तुकाराम बाजीराव देशमुख यांचे डोके फुटले व कानाला मार लागला. रक्तस्राव वाढल्याने तुकाराम बाजीराव देशमुख यांनी गाडी घटनास्थळावरच सोडून जवळच असलेले घर धावत पळत गाठले.

घडलेला प्रकार मोठा मुलगा अमोल तुकाराम देशमुख यास सांगितला. त्यानंतर मुलाने तुकाराम बाजीराव देशमुख यांना हेडगेवार हॉस्पिटलमध्ये उपचारकामी घेऊन गेला. तेथे तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या डोक्यातील जखमेवर उपचार करून 11 टाके दिले. उपचारानंतर तुकाराम बाजीराव देशमुख यांनी पुंडलीक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अनोळखी युवकावर पुंडलीक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत.

Budget 2022 : निर्मला सीतारामन ग्रामीण भारतासाठी करू शकतात मोठ्या घोषणा

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यावेळी सरकारचे लक्ष गाव आणि गावातील नागरिकांवर राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आघाडी घेण्यासाठी आणि शेतकरी आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा स्थान मिळवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात ग्रामीण भारतासाठी काही मोठ्या घोषणा करू शकतात.

उत्तर प्रदेश हे भाजपसाठी महत्त्वाचे राज्य आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा मोठा प्रभाव पडेल, ही वस्तुस्थिती भारतीय जनता पक्षाला माहीत आहे. शेतकरी आंदोलनानंतर शेतकऱ्यांमध्ये विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांमध्ये पक्षाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. आता अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांना खुश करण्याची चांगली संधी केंद्राकडे आहे.

भरपूर आश्वासने
अर्थतज्ज्ञ आणि प्रणव सेन म्हणतात की,”या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात आश्वासने असतील, यात शंका नाही. यूपीमध्ये भाजपचा नारा डबल इंजिन आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात अशा काही केंद्रीय योजनांच्या घोषणा होऊ शकतात, ज्यांचा फायदा यूपीसारख्या निवडणूक राज्यात सत्ताधारी सरकारला होईल.”

वाढत्या मागणीवर भर
“मागणी निर्मितीची गरज लक्षात घेता, सरकार रोजगार निर्मितीवर आणि कर्मचार्‍यांचे कौशल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करू शकते,” असे डेलॉइट इंडियाच्या अर्थशास्त्रज्ञ रुम्की मुझुमदार म्हणतात. अर्थसंकल्प विकासाला चालना देण्यासाठी आणि स्थिरता राखण्यासाठी प्रयत्न करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता, सीतारामन ग्रामीण तरुणांसाठी नोकरी योजना जाहीर करतील किंवा आधीच सुरू असलेल्या योजनांसाठी अनुदान वाढवतील ​​असे गृहीत धरले, तर आदर्श आचारसंहितेमुळे त्या जास्त तपशील देणार नाहीत. याचा फायदा यूपी आणि उत्तराखंडच्या तरुणांना होणार आहे.

तिसऱ्या लाटेचा प्रभाव मर्यादित राहू शकतो.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले की,”कोरोनाची तिसरी लाट वेगाने वाढत आहे. त्यातही झपाट्याने घट होईल. यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये त्याचा आर्थिक प्रभाव मर्यादित असू शकतो.” यावेळी शक्यता खूपच कमी असल्याचे राजीव कुमार यांचे मत आहे. 2021-22 साठी जीडीपी वाढ 9-9.2 टक्के असेल, जी अपेक्षेपेक्षा थोडी कमी आहे.

अनैतिक संबंधातुन तरुणाची दगडाने ठेचून हत्या

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी याठिकाणी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपीविरोधात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
सचिन धुळबाजी धवसे असे मृत तरुणाचे नाव असून तो औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी येथील रहिवासी आहे. घटनेच्या आधल्या दिवशी मृत सचिन आपल्या घरातून गायब झाला होता. घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिग्रस कऱ्हाळे शिवारातील एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाने घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरापर्यंत मारेकऱ्यांचा माग काढला. पण मारेकरी काही सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि मृत सचिनच्या जवळच्या मित्रांची चौकशी केली. यावेळी पोलिसांना सचिनच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता पोलिसांना दोन आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. औंढा नागनाथ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मनपा रंगमंदिर चालवू शकत नाही तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी

औरंगाबाद – शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहासमोर आज सोमवारी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेने या नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवला असून सुरुवातीपासूनच मनसेने याला विरोध केला आहे. मात्र महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने पुन्हा एकदा निदर्शनं करण्यात आली.

शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाला विरोध दर्शवला आहे. गेल्या काही वर्षांपासून नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेसाठी हे नाट्यगृह बंद आहे. मागील वर्षात याचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. एवढा खर्च झाल्यानंतर आता मनसेने हे नाट्यगृह खासगी कंत्राटदाराला चालवण्यासाठी देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यावर मनसेने आक्षेप घेतला आहे. खासगीकरण करायचंच होतं तर जनतेचा 10 कोटी रुपयांचा निधी त्यासाठी का वापरला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे.

आंदोलनानंतर भूमिका मांडताना मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले, संत एकनाथ रंगमंदिराचं खासगीरकरण करण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वी झाला होता. आम्ही यास विरोध दर्शवला होता. तरीही महापालिका त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. 10 कोटी खऱ्च करूनही खासगीकरण फक्त कंत्राटदारांच्या चिरीमिरी करण्यासाठी घेण्यात आला असल्याचा आरोप सुमित खांबेकर यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘एकवनाथ रंगमंदिराचं खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तम रितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे. तरीही महापालिका जर रंगमंदिर चालवू शकत नाही तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी. अशा मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो असून खासगीकरणाला आमचा विरोधच राहणार असल्याचंही यावेळी खांबेकर म्हणाले.

कराडात पटोलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचुअवतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे. दरम्यान, पटोलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने कराड येथील दत्त चौकात जोडोमारो आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काल पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असे आक्षेपार्ह वक्तव्य पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. दरम्यान आज कराडातही याचे पडसाद उमटले.

दरम्यान कराड येथील भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने जोडो मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकत्यांच्यावतिने नाना पटोले यांना गाढवाची उपमा देत घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटस्कर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

Ola वाढवणार इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन; जमा केला 1,490 कोटी रुपयांचा फंड

नवी दिल्ली । भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपल्या कंपनीचे मूल्यांकन 37 हजार कोटींवर गेले आहे. कंपनीने याद्वारे 1,490.5 कोटी उभारल्याचे जाहीर केले आहे. ओला इलेक्ट्रिकने सांगितले की.”त्यांनी हा फंड टेकने प्रायव्हेट व्हेंचर्स, अल्पाइन अपॉर्च्युनिटी फंड, एडलवाइज यासारख्या कंपन्यांकडून उभारला आहे.”

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि सह-संस्थापक भाविश अग्रवाल म्हणाले की,”ओला इलेक्ट्रिक भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. कंपनी संपूर्ण जगासाठी भारतातून अत्याधुनिक उत्पादन चालवत आहे.”

अग्रवाल यांनी सांगितले की,”Ola S1 च्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटर इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झाला आहे. आम्ही आता आमची नाविन्यपूर्ण उत्पादने बाइक आणि कारसह जास्त दुचाकी श्रेणींमध्ये आणण्यासाठी उत्सुक आहोत.” ते पुढे म्हणाले की,”गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि EV क्रांती भारतातून जगभर नेण्यासाठी त्यांच्यासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे.”

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Ola ने Falcon Edge, SoftBank आणि इतरांकडून $20 कोटी जमा केले होते. त्यावेळी ओला इलेक्ट्रिकचे मूल्यांकन सुमारे $3 अब्ज होते. ओला इलेक्ट्रिकने यापूर्वी टायगर ग्लोबल आणि मॅट्रिक्स इंडिया सारख्या इतर गुंतवणूकदारांकडून फंड उभारला होता. ओला इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी जुलैमध्ये बँक ऑफ बडोदासोबत 10 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज वित्तपुरवठा कराराची घोषणा केली होती.

हा फंड अशा वेळी आला आहे जेव्हा ओला इलेक्ट्रिक आपल्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन वाढवण्याचे टार्गेट ठेवले आहे. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे, तर जास्त शक्तिशाली S1 Pro ची किंमत 1.30 लाख रुपये आहे. या फंडींगमुळे ओलाच्या ‘फ्यूचरफॅक्टरी’ची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे, ज्याचे उद्दिष्ट जगातील सर्वात मोठे दुचाकी उत्पादन प्रकल्प बनण्याचे आहे. या प्लांटमध्ये 10,000 पेक्षा जास्त महिला कार्यरत आहेत आणि जागतिक स्तरावर महिलांच्या सर्वात मोठ्या कारखान्यांपैकी एक आहे.

कॉलेजमध्ये जात असताना मृत्यूने गाठले ! रस्ते अपघातात तिघा भावांचा मृत्यू

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणीमध्ये सोमवारी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दोन सख्या भावांचा तर एका चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही कॉलेजला जात असताना हि दुर्घटना घडली आहे. जिंतूर शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर ट्रक आणि दुचाकीचा हा भीषण अपघात घडला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात हा अपघात घडला आहे.

या अपघातात मृत्यू झालेली तिघंही भावंड ही जिंतूरच्या मालेगाव या ठिकाणचे रहिवाशी आहेत. अकोली शिवारातील रस्त्यावर हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांवर मोठा डोंगर कोसळला आहे. अभिषेक म्हेत्रे, योगेश म्हेत्रे आणि रामप्रसाद म्हेत्रे अशी मृत भावंडाची नावे आहेत. परभणी जिल्ह्यात आजपासून महाविद्यालयं सुरु झाली आहेत. त्यामुळे अभिषेक म्हेत्रे हा रामप्रसाद म्हेत्रे याच्याबरोबर आपला छोटा भाऊ योगेश म्हेत्रे महाविद्यालयात सोडण्याकरिता जात होते.

यादरम्यान जिंतूर शहरापासून 3 किमीच्या अंतरावर असलेल्या अकोली शिवारातील रस्त्यावर असलेले खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकी- ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात या तिन्ही भावांचा जाग्यावरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी पासूनचे वर्ग उद्यापासून सुरु

औरंगाबाद – विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता उद्या मंगळवार दि.25 जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला प्राधान्य देऊन कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साप्ताहिक कोविड आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस उपायुक्त उज्वला बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, मनापा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात पहिला डोस जवळजवळ सर्वांनाच देण्यात आला असून दुसऱ्या डोससाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे असून घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात पाठपुरावा सबंधितानी करण्याच्या सूचना देत चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद हद्दीतील सर्व सोईसुविधेने युक्त असे कोरोना केअर सेंटर सुरु करावे तसेच तात्काळ चार बालरोग तज्ञ डॉक्टारांची तेथे नेमणूक करावी.महानगरपालिकेच्या धर्तीवर ग्रामीण भागात देखील गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांची वेळावेळी तब्येतीची फोनद्वारे चौकशी करावी.

माजी सैनिक, 42 वर्षे सरपंच असणारे गोविंदराव चव्हाण यांचे निधन

कराड । आरेवाडी (ता. कराड) गावचे माजी सरपंच गोविंदराव विठोबा चव्हाण (आण्णा) (वय 100) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आरेवाडीचे सरपंच म्हणून 42 वर्षे काम पाहणारे गोविंदराव चव्हाण हे एक माजी सैनिक होते.

गोविंदराव चव्हाण यांनी कराड तालुका पंचायत समिती 11 वर्षे सदस्य, कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक, भाग्यलक्ष्मी पाणी पुरवठा संस्था आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडीचे चेअरमन आदी पदे भूषविली.

माजीमंत्री तथा ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव पाटील (उंडाळकर), दिवंगत पी. डी. पाटील, भिमराव पाटील (दादा) यांच्यासोबत जिविद्राव चव्हाण यांनी विकासकार्य केले.

चांगुलपणा नडला! मध्यस्थी करायला गेला अन्…

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाला मध्यस्थी करणे त्याच्या जीवावर बेतले आहे. भाच्याच्या हॉटेलात जेवण केल्यानंतर काही तरुणांनी बिल देण्यावरून भाच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी या भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या मामाला आपला जीव गमवावा लागला आहे. आरोपी तरुणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करून हॉटेल चालकाच्या मामाचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
किशोर नंदलाल गुरखुदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बीड शहरातील जव्हेरी गल्ली येथील रहिवासी होते. मृत गुरखुदे हे पानटपरीचालक असून बसस्थानक परिसरात त्यांचे छोटेसे दुकान आहे. याच परिसरात त्यांच्या भाच्याचं हॉटेल आहे. घटनेच्या दिवशी आरोपी मृत व्यक्तीच्या भाच्याच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. यादरम्यान आरोपींचा आणि हॉटेल चालकाचा जेवणाच्या बिलावरून वाद झाला. यावेळी मृत किशोर गुरखुदे हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले.

यावेळी संतापलेल्या आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याच्या सहाय्याने किशोर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यानंतर ते जखमी अवस्थेत खाली कोसळले. यानंतर आसपासच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. अखेर उपचारादरम्यान किशोर नंदलाल गुरखुदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.