Friday, December 26, 2025
Home Blog Page 2896

‘या’ जिल्ह्यात 101 एस.टी. कर्मचारी करण्यात आले बडतर्फ, आणखी 500 कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीवर सुनावणी सुरू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी. संपातील कर्मचाऱ्यांवर आता सांगलीत बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी २०१ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. दि. १५ फेब्रुवारीपर्यंत १ हजार ६०० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एस.टी. महामंडळाचे कर्मचाऱ्यांसह शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा घेतला आहे.

कर्मचाऱ्यांकडून विलिनीकरणासाठी एकाकी झुंज सुरू आहे. जिल्ह्यात विलिनीकरणासाठी अडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ६०० च्या घरात आहे. तर कारवाईच्या बडगा उगारल्यानंतर २ हजार २०० कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. विलिनीकरण केल्याशिवाय सेवेत येणार नसल्याच्या भूमिकेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर आता महामंडळाकडून कारवाई करण्यात आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसात जिल्ह्यातील १०१ कर्मचारांना बडतर्फ करण्यात आले. यामध्ये चालक, वाहक, वर्कशॉप कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सध्या आणखीन ५०० कर्मचाऱ्यांची सुनावणी सुरू असून त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत बडतर्फ केले जाणार आहे. उर्वरित १ हजार २०० गैरहजरकर्मचाऱ्यांवर १५ फेब्रुवारीपर्यंत बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. चालक, वाहक, वर्कशॉप आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. शिस्त व आवेदन कार्य पद्धतीनुसार ही कारवाई केली जाणार आहे.

रोहित पाटलांकडे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी?? चर्चाना उधाण

Rohit Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या सर्व विरोधकांना अस्मान दाखवत एकहाती राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणणारे आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना आता पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे समजत आहेत. रोहित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चानी सध्या जोर धरला आहे.

अवघ्या तेवीस वर्षाच्या रोहित पाटील यांनी कवठेमंकाळ नगर पंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत तब्बल 10 जागा जिंकत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आणली. त्यानंतर रोहित पाटील यांना आणखी बळ देण्यासाठी तसेच रोहितवर  राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच  युवक अध्यक्षपदाची जबाबदार लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

रोहित यांचे वडील दिवंगत आर. आर.पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा पाच ते सहा वर्षे यशस्वी पणे सांभाळलेली होती. तसेच राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिले होते. आबांच्या नंतर आता तासगाव, कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात आता रोहित पाटील यांच्याकडे  उद्योन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.

‘…म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात राहतील’; मोदींनी जागवल्या आठवणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. तसेच “सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारा उत्कृष्ट नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील,” असे गौरवोद्गार मोदींनी काढले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मी श्री बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारा उत्कृष्ट नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील,”

दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 96 वा जन्मदिन असून यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी सकाळपासूनच शिवसेना नेते व शिवसैनिक दाखल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. पंतप्रधानांनी आपल्या वैयक्तिक ट्वीटर हँडलवरून ट्वीट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गुजरातच्या दंगलीवेळी बाळासाहेब ठाकरेंनी केली होती मोदींची पाठराखण

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सांगायचे झाले तर दोघांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते राहिले होते. गुजरातमध्ये जेव्हा दंगली उसळल्या तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मोदींच्या मुख्यमंत्रिपदावर टांगती तलवार होती. मोदींना हटवण्याची तयारी पक्षनेतृत्वाने केली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे मोदींच्या पाठीशी उभे राहिले होते. मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल, असे ठाकरेंनी सांगितले होते. मातोश्री निवासस्थानीही मोदी बाळासाहेबांच्या भेटीला आले होते.

परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतप्त जमावाकडून रस्तारोको

परभणी प्रतिनिधी |

परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाला अचानक आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने खांबावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात असणाऱ्या एकता नगर मध्ये घडली. याप्रकरणी सदरील युवकाच्या कुटुंबीयांना महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी यामागणीसाठी रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृत युवकाचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर पाथरी पोलीस स्टेशन समोर ठेवण्यात आल्याने शहरातील सेंट्रल नाका परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .

अखिल अब्दुल रहमान अन्सारी उर्फ बडेमिया वय 25 असे विद्युत प्रवाहाचा धक्का बसून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरील मृत युवक मागील अनेक महिन्यांपासून पाथरी महावितरण कार्यालयांतर्गत शहरात विद्युत खांबावरील जोडणी दुरुस्ती अशा प्रकारचे कंत्राटी काम करत होता. शनिवारी संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महावितरणचा लाईनमन व अखिल अन्सारी हे एकता नगर परिसरामध्ये परमिट घेऊन विद्युत खांबावर चढला होता. परंतु यावेळी अचानक सदरील विद्युत खांबावरील तारांमध्ये विद्युत प्रवाह आल्याने हा युवक खांबावरून फेकला गेला. यावेळी त्याला ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेले असता मृत घोषित करण्यात आले. दरम्यान रविवार 23 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदरील युवकाचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर सेंट्रल नाका येथे ठेवण्यात आला. यावेळी मृत युवकाच्या कुटुंबाला महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी अशी जमावाची मागणी होती. घटनास्थळी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनीही भेट देत महावितरणने मृत युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोमवंशी ,पोउनि गणेश कराड , सपोउनि गौस ,पोना . सुरेश कदम ,पोना पिंपळपल्ले , पोना.सुरेश वाघ आधी पोलीस कर्मचारी जमावाची समजूत घालत होते. दरम्यान यावेळी महावितरणचे अभियंता शेंबाळे यांनी नुकसानभरपाई देण्यासंदर्भात शब्द दिल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली होती .

दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये महावितरण नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सदरील युवक हा त्यांच्याकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कामावर नव्हता .परंतु असे असेल तर मागील अनेक महिन्यापासून तो महावितरण मधील दुरुस्तीचे काम कसे करत होता ? हा प्रश्न निर्माण होतो. .मिळालेल्या माहितीनुसार पाथरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण कडून नियुक्त करण्यात आलेले लाईनमन हे प्रत्यक्ष गावात विद्युत पुरवठा दुरुस्ती करताना कुशल असणाऱ्या व्यक्तींना हाताशी धरून कामे करून घेतात.तर बऱ्याच ठिकाणी आयटीआय कोर्स केलेल्या व्यक्तीचे कागदपत्रे महावितरण कडे जमा करत दुसराच व्यक्ती ही कुशल कामे करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. त्यामुळे भविष्यातही अशी घटना घडली तर महावितरण तो आमचा कर्मचारी नव्हता असे म्हणून अंग झटकणार आहे .परंतु यामध्ये अखिल सारख्या युवकाचा नाहक जीव जाणार आहे. त्यामुळे तालुक्यात आणखी असे किती युवक महावितरण कडून राबविले जातात ही माहिती उघड होणे महत्त्वाचे आहे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

सागरेश्वर अभयारण्यासमोर शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन, वनविभागाच्या लेखी आश्वासन नंतर आंदोलन केले स्थगित

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सागरेश्वर अभयारण्यातील वन्यजीव अभयारण्या बाहेर पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहेत. यातच या अभयारण्या परिसरात बिबट्याचा वावर देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करन्यासाठी वन विभागाला वारंवार तोंडी आणि लेखी तक्रार देऊनही यावर काहीही उपाय करण्यात आला नाही म्हणून शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचे आंदोलन केले. मात्र जि.प गटनेते मा.शरद लाड यांच्या शिष्टाईने आणि वन विभागाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

सागरेश्वर अभयारण्यामधील हरणे, सांबर, तरस, काळवीट यासारखे प्राणी कुंपणाबाहेर पडत आहेत आणि येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहेत. याबाबत वारंवार वनविभागाला तक्रार देऊन यावर कोणतीच ठोस उपाय करण्यात आला नाही यातच या ठिकाणी बिबट्याचेही आगमन झाले आहे. या बिबट्याचे अभयारण्याबाहेर शेतकऱ्यांना वारंवार दर्शन होत आहे ज्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर काही शेतकऱ्यांनी बिबट्याच्या भीतीने शेती करणे सोडून दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान देखील होते आहे.

याबाबत वनविभागाला वारंवार कळवण्यात आले आहे. मात्र असे असूनही वन विभागाकडून कोणतीच ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही. ज्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. आज मोठ्या प्रमाणात शेतकरी तयारीने आंदोलन स्थळी दाखल झाले. शरद लाड यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत वन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. यांनतर वन अधिकाऱ्यांनी कुंपन करण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगत त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल असे म्हंटले. त्यावर शरद लाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा मी स्वतः शेतकऱ्यांसोबत हजर राहील. त्यानुसार २७ जानेवारीला या ठीकाणी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बैठक घेऊन यावर कायमचा तोडगा काढण्याचे ठरले.

रस्त्याच्या उद्घाटनासाठी नगरसेवकांमध्ये खडाजंगी, तीन तासांच्या नाट्यमय घडामोडी नंतर आमदारांनी फोडला नारळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कुपवाड शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या उद्घाटन कामाच्या श्रेय वादावरून राष्ट्रवादी भाजप नगरसेवक यांच्यात सुमारे दोन तास चांगलीच खडाजंगी झाली. या रस्त्याच्या उद्घाटनाचे भाजपने चार वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्याचे ठरवले .तर त्या आधीच राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णु माने ,शेठजी मोहिते,पदाधिकर्यांच्या समवेत विरोधीपक्ष नेते संजय मेंढे यांच्या हस्ते नारळ फोडण्यासाठी मुख्य रस्त्यावर आले.

त्याचवेळी भाजपचे नगरसेवक प्रकाश ढंग, कल्पना कोळेकर भाजपच्या पदाधिकारी यांनी कामाचे श्रेय कोणीही घ्यायचे नाही अन्यथा नारळ फोडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. कुपवाडमध्ये मुख्य रस्ता होण्यासाठी नगरसेवकांसह, अनेक संघटनांनी प्रयत्न केले होते. भारतीय जनता पार्टीने महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शंभर कोटींचा निधी दिला होता. त्यामधून कुपवाड मुख्य रस्त्याचे काम धरले होते. अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीने सत्ता घेतल्यानंतर कामाचा प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते, सविता मोहिते, विष्णू माने, मुस्ताक रंगरेज व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भाजपचे नगरसेवक प्रकाश ढंग, कल्पना कोळेकर,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागेवर जाऊन सदर रस्ता हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या फंडातून होत आहे त्यामुळे या कामाचे उद्घाटन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होईल असे म्हणताच भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली.

“बाळासाहेबांनी दिलेला ‘तो’ ताईत आजही माझ्या देव्हाऱ्यात”; गुलाबराव पाटलांकडून आठवणींना उजाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. 1999 सालची गोष्ट आहे. या काळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर माझ्या कपाळाला गुलाल लावून गळ्यात ताईत घातला. त्यानंतर मी आमदार म्हणून निवडून आलो. ही आठवण मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. बाळासाहेबांनी दिलेला तो ताईत आजही माझ्या घराच्या देव्हाऱ्यात आहे, असे पाटील यांनी म्हंटले.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आज राहिली नाही, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. त्यांना मी सवगु इच्छितो की, आम्हाला विरोधकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या पाठीशी आणि देशात हिंदुत्वासाठी शिवसेना सातत्याने उभी राहते.

मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी शिवसैनिक सतत लढा देत आले आहेत. सरकार स्थापनेपासून विरोधकांचे फाटले आहे. त्यांच्याकडे आज कोणताही मुद्दा नसल्याने ते शिवसेनेवर मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करत असतात. त्यांनी सरकार स्थापनेवेळी जर पहल केली असती तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

निळे आधार कार्ड कोणाकोणाला मिळते ? काय आहे त्याची वैधता? चला जाणून घेऊया

aadhar card

नवी दिल्ली । आधार कार्ड ही आता प्रत्येक भारतीयाची ओळख बनली आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो किंवा पासपोर्ट वगैरे घ्यायचा असो यासारखी अनेक कामे आता आधार कार्डाशिवाय शक्य होणार नाही. त्यावर लिहिलेला 12 अंकांचा विशेष क्रमांक वगळता सर्वांचे आधार कार्ड एकसारखेच असते. मात्र, UIDAI मुलांसाठी जारी केलेल्या आधार कार्डचा रंग निळाच ठेवते.

UIDAI 5 वर्षाखालील मुलांसाठी बाल आधार कार्ड जारी करते. ते इतर आधार प्रमाणेच असते मात्र आता त्याचा रंग बदलून निळा झाला आहे. कोणतेही पालक व्हॅलिड कागदपत्रे देऊन आपल्या मुलांचे आधार कार्ड मिळवू शकतात. UIDAI आधार बनवण्यासाठी 31 प्रकारचे आयडेंटिटी प्रूफ, 44 प्रकारचे एड्रेस प्रूफ, 14 प्रकारचे रिलेशनशिप प्रूफ आणि 14 प्रकारचे बर्थ सर्टिफिकेट स्वीकारते. जर तुम्हालाही आपल्या मुलांसाठी आधार कार्ड बनवायचे असेल, तर तुम्ही या कागदपत्रांसह UIDAI च्या व्हॅलिड सेंटरवर अर्ज करू शकता.

मुलांसाठीच्या आधार कार्डची विशेष वैशिष्ट्ये
> मुलाचे वय पाच वर्षे पूर्ण होताच हे आधार कार्ड इनव्हॅलिड होईल.
> आधार तयार करण्यासाठी मुलाचा शाळेचा आयडी देखील वापरला जाऊ शकतो.
> मुलाचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्याचा biometric Aadhaar data अपडेट करा, तो 15 वर्षांचा झाल्यावर पुन्हा अपडेट करणे आवश्यक आहे.
> मुलाचे आधार बनवण्यासाठी हॉस्पिटलमधून बर्थ सर्टिफिकेट किंवा डिस्चार्ज स्लिप पुरेसे आहे.
> पाच वर्षापर्यंत बनलेल्या आधारमध्ये मुलाचे बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन केले जात नाहीत.
> UIDAI द्वारे ज्येष्ठांसाठी जारी केलेल्या आधार कार्डचा रंग लहान मुलांपेक्षा वेगळा असतो. पाच वर्षांनंतर ते अपडेट करणे आवश्यक आहे, कारण पाच वर्षांनंतर मुलांचे आधार कार्ड इनव्हॅलिड ठरणार आहे.

अन् डाॅ. एन. डी. पाटीलांनी रयतच्या शाळेत गणपती न बसवण्याचे परिपत्रक काढले…

N D Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेकापचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. एन डी पाटील हे आपल्या दमदार आणि कृतिशील कार्यासाठी ओळखले जात होते. पुरोगामी विचाराचे एन डी पाटील हे किती कृतिशील होते आणि त्यांना विद्यार्थी चळवळीची किती जाण होती याचे एक उदाहरण आणि तो खास प्रसंग आम्ही आज आपणांस सांगणार आहोत.

रयत शिक्षण संस्थेवर पूर्वीपासूनच पुरोगामी विचारांचा प्रभाव आहे. रयतेच्या शाळेत घडणारा प्रत्तेक विद्यार्थी शाहू, फुले, आंबेडकर विचारांनी प्रेरित झालेला असतो असा इतिहास आहे. राष्ट्रीयतेच्या भावनेसोबतच सर्वधर्मभावाची भावनाही रयतेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागण्याकरता रयतसेवक नेहमीच प्रयत्नशील असतात. रयत शिक्षण संस्थेच्या आजवरच्या पदाधिकार्‍यांनी याकरता विशेष लक्ष दिलं आहे. डाॅ. एन. डी. पाटील यांचा असाच एक किस्सा आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत.

पूर्वीच्या काळात रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेत गणेशोत्सव उत्साहात साजरा होत होता. मात्र 1995 रोजी वडगाव येथील शाळेचे तत्कालीन शिक्षक डॉ. सुधीर कुंभार यांनी त्यावेळी रयत शिक्षण संस्थेत चेअरमन असलेल्या डाॅ. एन. डी. पाटील यांना एक पत्र लिहिले. या पत्रातून त्यांनी रयतेच्या शाळांत गणेशोत्सव साजरा न करण्याचं आवाहन एन. डी. पाटील यांना केलं.

सुधीर कुंभार यांनी लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे :

रयत शिक्षण संस्थेचा इतिहास पहाता आपली संस्था धर्मनिरपेक्षता माननारी आहे. म. फुले, रा. शाहू महाराज, गाडगे महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक पायावर चाललेली व कर्मवीरांच्या तत्वज्ञानावर प्रगती करणारी अशी आपल्या संस्थेची जनमानसात प्रतिमा आहे.

या संस्थेच्या अनेक शाळांत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. इतर धर्मियांचे सण त्याच महिन्यात असूनही लक्षात घेतले जात नाहीत. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीस हे पटेल की शाळांच्या आवारात धर्म, जात, भाषा, पंथ यात भेद नसावा. आोण एकतर इतर सर्व धर्माबाबत उदारमतवादी धोरणाचे पालन शाखांना व सेवकांना करावयास लावा अथवा ही अती उत्सव प्रियता थांबवा.

या उत्सवातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक रक्षण, धर्मनिरपेक्षाता समजेल / त्यांच्यातील धर्माधर्मांतील भेद कमी करण्याचा हा प्रयत्न शाळाद्वारे होतो असे आोले मत असल्यास त्यास दुर्दैव म्हणावे लागेल. असे म्हणतात की फॅसीसमची चाल एकेका पावलाची असते. मजबूत पाय रोवून पुढे सरकण्याची असते. त्यावर तेथल्या तेथेच लढले, विरोध केला तरच चाल रोखता येते. अशा प्रकारचे Slow Poisoning रयत कडून थांबेल अशी अपेक्षा. नवी पिढी विज्ञाननिष्ठ घडवूया. आपला आशावादी मानवतावादी सुधीर कुंभार.

सुधीर कुंभार यांचे पत्र एन. डी. पाटील यांना मिळाल्यानंतर त्यावर त्यांनी लगेच पाऊल उचलले. एन डी पाटील हे व्यक्तीच मुळात कृतिशील आणि गतिशील होते. त्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांची जाण होती. एन डी पाटील यांनी कायम कृतीला महत्त्व दिले. त्यांनी तात्काळ परिपत्रक काढत रयतच्या सर्व शाळांना पत्र पाठवले आणि इथून पुढे शाळेत गणपतीची मूर्ती बसवायची नाही असा आदेश दिला. त्याकाळापासून ते आजपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाळेत गणपतीची मूर्ती बसवली जात नाही.