Monday, December 29, 2025
Home Blog Page 2939

धक्कादायक : लाॅजमध्ये अल्पवयीन मुले नको त्या अवस्थेत सापडली

सातारा | सातारा तालुक्यातील कोंडवे गावात अल्पवयीन मुलांना गैरकृत्य करण्यास लॉज उपलब्ध करून देणाऱ्या लॉज मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर शिवाजी चोरगे (रा. कोंडवे ता. जि. सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लॉज मालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मौजे कोंढवे येथील शंकर शिवाजी चोरगे यांच्या मालकीचा लॉज आहे. येथील लाॅजमधील रुम अल्पवयीन मुलांना गैरकृत्यासाठी उपलब्ध करुन देत असल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दि. 12 रोजी दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत सापळा रचून दि. 14 जानेवारी 2022 रोजी अल्पवयीन मुलांना गैरकृत्य करताना रंगेहाथ लॉजमध्ये पकडले.

तसेच ता कृत्यासाठी सहकार्य म्हणून लॉजमध्ये प्रवेश देणाऱ्या मालकास अटक केली आहे. तसेच या नमुद गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेऊन बाल न्याय मंडाळाचे समक्ष हजर करण्यात आले असून बाल न्यायमंडाळाने त्यास बाल निरीक्षण गृहामध्ये ठेवण्याचे आदेश केले आहेत. या गुन्हयातील मुले ही अल्पवयीन आहेत. याची कल्पना असताना अल्पवयीन मुलांना गैरकृत्य करण्यास मौजे कोडवे येथील स्व मालकीचा लॉज शंकर चोरगे याने उपलब्ध करुन दिला असल्याने सातारा तालुका पोलीसांनी त्यावर अटकेची कारवाई केली आहे.

सदर गुन्हयाचा आधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा व तालुका पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमित पाटील, पोलीस नाईक निलेश जाधव करीत आहेत.

नाशिकमध्ये मुख्याध्यापकाचा प्रताप ! सह शिक्षकाच्या अंगठ्याचा घेतला चावा अन्..

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आपण आजपर्यंत लहान मुलांची भांडणे झालेली पाहिली असतील. पण जर शाळेतील शिक्षकांची भांडणे झाली तर? असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात घडला आहे. यामध्ये विद्यार्थी नव्हे तर चक्क शिक्षकांनीच शाळेतील पोरांसारखे भांडण केले आहे. या भांडणांमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतला आहे. शिक्षक-मुख्याध्यापकाच्या या वादाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळ या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. यामध्ये शालेय कॅटलॉक संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकामध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. यानंतर हा वाद एवढा वाढला कि शाळेच्या मुख्याध्यापकांनी थेट शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतला. सुरेश अहिरे असे मुख्याध्यापकाचे नाव असून ब्रह्मचैतन्य राजगुरू असे जखमी शिक्षकाचे नाव आहे.

मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल
मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील हे भांडण थेट पोलिसांपर्यंत गेले आहे. जखमी शिक्षक ब्रह्मचैतन्य राजगुरू यांनी मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांच्याविरोधात येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येवला पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काॅलेज परिसरात पोलिसाला जखमी करून पळालेल्या सराईत गुन्हेगारास अटक

crime

कराड | कराड येथील काॅलेज परिसरात भरदिवसा दुपारी पोलिसांशी झटापट करून सराईत गुन्हेगार पळून गेला होता. यावेळी इनोव्हा कारमधून पळून जात असताना पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत एका पोलिसालाही जखमी झाला होता. या पळून गेलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. ओगलेवाडी पोलिसांनी रहिमतपूर येथे ही कारवाई केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रतीक संजय यादव (वय – 22, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, 6 जानेवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास कृष्णा कॅनॉलजवळ सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर इनोव्हामधून आलेल्या सराईत गुन्हेगाराची झटापट झाली होती. चालू कारमधून सराईत गुन्हेगाराला बाहेर ओढत असताना दुचाकी घसरून व संशयिताने धक्का दिल्याने पोलीस कर्मचारी साबिर मुल्ला हे जमिनीवर पडल्याने जखमी झाले होते. त्यानंतर संशयितांनी तिथून कारसह पलायन करण्याचा प्रयत्न केला. विद्यानगरमार्गे मसूरकडे जात असताना साई गार्डन हॉटेल समोरील रस्त्यावर ओगलेवाडी कोरोनाच्या दूरक्षेत्राचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक विजय गोडसे कारवाई करत होते. समोर पोलीस दिसताच संशयितांनी रस्त्यात मध्येच इनोव्हा कार सोडून तेथून पलायन केले होते.

पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता. त्यामध्ये कपडे व 5 न वापरलेले सिमकार्ड मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी इनोव्हा गाडीचा मूळ मालकाचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी गाडीच्या कागदपत्रावरून त्याच्याकडून ज्याला गाडी विकली त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. तेथून पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. तेंव्हापासून पोलिस संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत रहिमतपूर येथे संशयित येणार असल्याची माहिती सपोनि विजय गोडसे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्वतः रहिमतपूर येथे सापळा लावला. संशयित तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोन्डाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवालदार प्रवीण काटवटे, रवींद्र पवार, सचिन सूर्यवंशी, किशोर तारळकर, विनोद माने, रूपाली डुबल, धीरज कोरडे, माणिक थोरात यांनी ही कारवाई केली. साबिर मुल्ला यांनी याबाबतची फिर्याद दिली होती.

शिक्षण मंडळाकडून बोर्डाच्या परीक्षेसाठी केंद्रांची निश्चिती

Exam

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा परीक्षा ऑफलाईन घेण्याचे निश्चित केले आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी मंडळाकडून सध्या तयारी सुरु केली आहे. परीक्षेसंदर्भात मंडळाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विभागात बारावीसाठी 412; तर दहावीसाठी 629 केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेसाठी विभागातून 1 लाख 79 हजार 486 तर बारावी परीक्षेसाठी 1 लाख 64 हजार 333 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. राज्य मंडळ लेखी-ऑफलाईन 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर अद्याप ठाम असून त्यात कोणताही बदल न झाल्याने विभागीय मंडळांनी केंद्र निश्चिती, परीक्षेच्या तयारीवर भर दिलेला आहे.

औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्रांवर होईल. आजपर्यंत राज्यमंडळाचे अजून कुठलेही नवे निर्देश नाहीत. त्यामुळे परीक्षेचे कामकाज सुरळीत सुरू आहे. असे विभागीय सचिव आर. पी. पाटील यांनी सांगीतले.

बंदूक घेऊन बँकेत आले, फायर केली..तरी कर्मचार्‍यांनी पैसे चोरट्यांना दिले नाहीत (Video)

औरंगाबाद : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा जवळील चोंढी आंबा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक तीन चोरट्यांनी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता लुटण्याचा प्रयत्न केला. पंरतु अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद दिली नसल्याने चोरट्यांनी पलायन केले. यावेळी चोरट्यांनी बँकेच्या काचेवर दोन राऊंड फायर केले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. काच फुटल्याने रोखपाल जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंढीआंबा येथील टी पाँईटवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे . शुक्रवारी दररोजचा व्यवहार आटोपून बँकेचे अधिकारी इशान खिस्ते , रोखपाल नितीन ननवरे व सेवक भद्रदीप सरोदे हे काम करीत होते.

दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या पल्सरवरून तिघे जण बँके समोर आले. त्यापैकी दोघे जण बँकेत शिरले तर एक जण बँकेबाहेरच थांबला. यावेळी बँकेत गेलेल्या दोघांनी हातातील बंदूक दाखवून इशान खिस्ते यांना धमकावून बँकेत काय आहे ते देण्याबाबत दरडावले.

मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद न दिल्याने चोरट्यांनी बँकेतून काढता पाय घेतला. बँकेतून जातांना चोरट्यांनी दोन राऊंड फायर केले. राऊंड चॅनल गेटला लागल्यामुळे कुठलीही हाणी झाली नाही. पंरतु बँकेची काच फुटून लागल्याने रोखपाल ननवरे जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख , उपाधिक्षक किशोर कांबळे कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी बँकेतील माहिती घेण्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक; गडकरींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग (Road Safety And 6 Airbags Car) अनिवार्य केल्याची घोषणा केली आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी मोठी घोषणा सरकार कडून करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.

पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या रहिवाशांना पुढील आणि बाजूकडील टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणीमध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.असे गडकरी म्हणाले.

नातेवाईकाचे हातपाय बांधून आरोपीचे विवाहितेसोबत ‘हे’ दुष्कृत्य

rape

सोनभद्र : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील सोनभद्र या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपींनी नातेवाईकाचे हातपाय बांधून एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार केले आहेत. या आरोपींनी पीडित महिलेला जंगलात नेऊन तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केला आहे. यावेळी आरोपींनी या महिलेच्या नातेवाईकांनासुद्धा मारहाण केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे. पोलीस त्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
हि पीडित महिला घटनेच्या दिवशी आपल्या एका नातेवाईकासोबत सोनभद्रच्या घोरावल भागातील मुक्खा फॉलच्या जंगलातून दुचाकीने आपल्या घरी जात होत्या. यावेळी या आरोपींची नजर पीडित महिलेवर पडली. यानंतर या आरोपींनी पीडित महिलेचा आणि तिच्या नातेवाईकाचा पाठलाग सुरु केला. यानंतर पीडित महिला आणि तिचा नातेवाईक एका निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर आरोपींनी दोघांना अडवलं आणि पीडितेसोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली.

यावेळी महिलेच्या नातेवाईकाने विरोध केला असता, आरोपींनी त्या नातेवाईकाला बेदम मारहाण केली.हे आरोपी नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या नातेवाईकाचे हातपाय बांधले. यानंतर त्यांनी पीडित विवाहितेला घनदाट जंगलात घेऊन जात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे. पोलीस या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

नावात राष्ट्रवादी असलं म्हणजे राष्ट्रीय पक्ष होत नाही; फडणवीसांचा टोला

Fadanvis Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी मारली असून भाजपला शह देण्यासाठी कुठे आघाडी तर कुठे स्वबळाचा नारा दिला आहे. यावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर टीका केली आहे. नावात राष्ट्रवादी असलं म्हणजे राष्ट्रीय पक्ष होत नाही असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. फडणवीस यांचा तोच विडिओ भाजपने ट्विट करत राष्ट्रवादीचे वाभाडे काढले आहेत.

नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असं म्हणत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

यावेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादी अंक शरद पवारांवर निशाणा साधत म्हंटल की, शरद पवारांचा पक्ष असा आहे की, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा…, ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही अस फडणवीस म्हणाले.

महामार्गावरील गॅस पाईपच्या कामावरील कामगारांना चाकू व कोयत्याच्या धाकाने चोरट्यांनी लुटले

कराड | मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीत पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी त्या दोघांकडील सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला असून याबाबतची फिर्याद पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, झारखंड राज्यातील हैदर हजारीबाग भागातील पारसनाथ आवधेश कुमार यादव याच्यासह त्याचा कामगार दिलीप कुमार हे दोघेजण कराडातील तुषार कदम यांच्या पोकलॅन मशीनवर कामास आहेत. सध्या हे मशिन भारत गॅसच्या सीएनजी गॅस पाईपलाईन कामासाठी वापरण्यात येत असून मालखेड गावच्या हद्दीत खुदाईचे काम सुरू आहे. गुरूवारी रात्री काम संपल्यानंतर पारसनाथ व त्याचा कामगार दिलीप कुमार हे पोकलॅन मशिनमध्येच झोपी गेले. शुक्रवारी पहाटे अज्ञात तिघांनी त्यांना उठवले. संबंधितांच्या हाताच चाकू व कोयता होता. कोयत्याने हात तोडण्याची धमकी देऊन त्या तिघांनी पारसनाथ याच्याकडील पैसे, अंगठी, मोबाईल तसेच दिलीप कुमार याच्याकडील पैसे व मोबाईल काढून घेतला. त्यानंतर ते तिघेजण तेथुन पसार झाले.

चोरट्यानी तोंड रुमालाने बांधल्यामुळे पारसनाथ व दिलीप कुमार यांना त्यांचा चेहरा पाहता आला नाही. घटनेनंतर पारसनाथ याने त्याच्या कामाचे ठेकेदार आत्माराम नलवडे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याने याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन तीन अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील ‘या’ 15 लॅबला मनपाने बजावली नोटीस

औरंगाबाद – शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. असे असताना ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 15 लॅबला महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी काल सांगितले.

कोरोना संसर्गाच्या काळात राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा सतर्क केल्या आहेत. कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या झाल्या पाहिजे, यासाठी लॅबची संख्या वाढविली जात आहे. त्यासाठी दर देखील निश्‍चित करण्यात आले आहेत. महापालिकेकडून शहरातील 39 खासगी प्रयोग शाळा (लॅब) चालकांनी ॲन्टीजेन, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी परवानगी घेतली. त्यासाठी रुग्ण स्वत:हून लॅबमध्ये तपासणीसाठी आल्यास 100 रुपये, तपासणी केंद्रावरून नमुने घेतल्यास 150 रुपये, रुग्णांच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास 250 रुपये या प्रमाणे शुल्क ठरविण्यात आले आहेत. मात्र, परवानगी घेतल्यानंतरही खासगी लॅब चालकाकडून कोरोनाच्या ॲन्टीजने, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. 39 पैकी 24 लॅबमध्ये चाचण्या होत आहेत. पण उर्वरित 15 चालकांनी अद्याप एकाही चाचणी केलेली नाही. त्यामुळे या लॅबचालकांना परवानगी रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

या 15 लॅबचा आहे समावेश –
एमआयटी हॉस्पिटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिल्ट्री हॉस्पिटल छावणी, यशवंत गाडे हॉस्पिटल गारखेडा, आयएमए हॉल शनिमंदिरजवळ, गणेश लॅबोरेटरी सर्विसेस पुंडलीकनगर, ओरीयन सिटी केअर हॉस्पिटल गुरुगोविंदसिंगपूरा, अमृत पॅथालॉजी लॅब जालना रोड, सुमनांजली नर्सिंग होम लाडली हॉटेलजवळ, युनिसेफ पॅथॉलॉजी लॅब, भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तुरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पिटल सिडको एन-2 आदी.