Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2998

… तर शिवसेना-भाजप एकत्र येईल; शिवसेनेच्या नेत्याचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारचा कारभार चांगला चालला असल्याचे आघाडीतील राज्यातील नेतेमंडळी सांगत आहेत. अशात आता शिवसेनेच्या एका मंत्र्यानेच शिवसेना व भाजप एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. “भविष्यात युतीचा प्रस्ताव ठेवल्यास आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास निश्चितच भाजप सोबतच्या युतीचा विचार विनिमय होऊ शकतो, असे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रात भविष्यात कुठलंही परिवर्तन करायची असल्यास त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी हे आहेत. गडकरी राज्यात आल्यावर ज्यादिवशी मने जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मने जुळतील. आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यादिवशी निर्णय घेतील आणि नितीन गडकरी व अमित शहा यांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते.

दरम्यान, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता चर्चेला उधाण मिळाले आहे. याबाबत आता शिवसेना व भाजपमधील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाणार हे पाहावे लागणार आहे.

‘या’ महानगरपालिका पोटनिवडणुकीत महाआघाडीत झाली बिघाडी, भाजपही रिंगणात

सांगली । महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळा ‘अ’ च्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसीची ही जागा खुली झाल्याने इच्छुकांची गर्दी वाढली आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, वंचित आघाडी, अपक्षांसह 12 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दाखल झालेल्या अर्जांची छाननी मंगळवारी होणार आहे.

माजी महापौर स्व.हारूण शिकलगार यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पूर्वी ही जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनुसार ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे ही जागा खुली झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी तेरा अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देत काँग्रेसच्या उमेदवारालाच विजयाचा गुलाल लागला पाहिजे असे आवाहन केले होते.

त्यानंतर सोमवारी या प्रभागातील काँग्रेसचे नेते माजी महापौर हारुण शिकलगार यांचे पुत्र तोफिक शिकलगार यांनी अर्ज दाखल केला. त्यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. तर त्यांना डमी म्हणून त्यांचे बंधू इरफान शिकलगार यांनी अर्ज दाखल केला आहे. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना देखील राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून उमर गवंडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या शिवाय शिवसेनेने देखील प्रभाग क्रमांक सोळाची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. पोटनिवडणुकीसाठी महेंद्र चंडाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी एबी फॉर्म दिला आहे.

राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर कोरोनाचा शिरकाव; आगामी कार्यक्रम रद्द

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर खबरदारी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरे यांनी आगामी १० दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील 10 दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व भेटी रद्द केल्या आहेत, अशी माहिती आहे. गतवर्षी राज ठाकरेंना देखील कोरोनाची लागण झाली होती.

शिवतीर्थ वरील इतर कर्मचाऱ्यांची देखील खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली असून कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल अद्याप प्राप्त झाले नाही. या कर्मचाऱ्यांचा चाचणी अहवाल आज किंवा उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे

मोलकरीण महिलांचा अवमान केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकरांविरोधात निदर्शने

सांगली । देशातील मोलकरीण महिला व महिला पोलीस अधिकार्‍यांचा अवमान करणारे गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा मोलकरीण संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. मोलकरीण संघटनेच्या अध्यक्ष सुमन पुजारी व सचिव विद्या कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे आमदार पडळकर यांनी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पालकमंत्र्यांच्या घरचे कामगार असल्यासारखे वागतात. तसेच अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले ही धुणे-भांड्याला जयंत पाटलांच्या घरी असल्यासारखे वागतात, असे वक्तव्य केले आहे.

हे वक्तव्य अत्यंत धक्कादायक असून मोलकरीण महिलांच्याबद्दल अवमान करणारे आहे. धुणे भांडी करत असलेल्या महिलांच्या कामास व सर्व महिलांना हीन दर्जा देऊन संपूर्ण स्त्री वर्गाचा अपमान पडळकर यांनी केलेला आहे. याबाबत महिलांच्यामध्ये असंतोष वाढत असून त्या शासनाला विचारीत आहेत की, पुणे-भांडी करणे हे सन्मानाचे काम नाही काय? या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन पडळकर यांच्यावर शासनाने त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

देशात स्त्रीयांच्यावरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी जास्तीत जास्त महिला पोलिस अधिकार्‍यांची आवश्यकता आहे. महिला पोलिसांच्याबद्दल समाजामध्ये आदराची भावना आहे. परंतू पडळकर आमदार असूनही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून वागण्याऐवजी बेजबाबदार वर्तन करीत असल्याची बाब गंभीर आहे, त्यांच्यावर वचक बसवण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या संपातही लालपरी रस्त्यावर सुसाट 

ST

 

 

औरंगाबाद – एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी 8 नोव्हेंबर पासून संपावर आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानंतर औरंगाबाद विभागात टप्प्याटप्प्याने बस सेवा पूर्वपदावर येत आहे. काल दिवसभरात विविध मार्गांवर 104 बस मधून 3 हजार 571 प्रवाशांनी प्रवास केला. शिवाय पुणे, नाशिक मार्गावर 23 शिवशाही सोडण्यात आल्या होत्या. येत्या काही दिवसात बहुतांश मार्गावर बससेवा सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास थांबणार आहे.

31 डिसेंबर रोजी 42 व 1 जानेवारी रोजी 72 बसेस धावल्या होत्या. 2 जानेवारी रोजी 128 तर 3 जानेवारी रोजी 104 बसने 252 फेऱ्या केल्या. त्यातून एकूण 3571 प्रवाशांनी प्रवास केला. यात 23 शिवशाही तर 81 लालपरींचा समावेश आहे. जालना, बीड, गेवराई, तुळजापूर, पुणे, उस्मानाबाद, आंबेजोगाई, औराळा, नाशिक, कन्नड, सिल्लोड, बुलढाणा, अहमदनगर, शहागड, शेवगाव, गंगापूर, कोपरगाव, लासूर, सिल्लोड, चिंचोली, वैजापूर आधी मार्गांवर लालपरीची सेवा सुरू झाली आहे.

औरंगाबाद विभागात आतापर्यंत 750 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जसे जसे कर्मचारी कामावर हजर होत आहेत. त्या त्या पद्धतीने लाल्परी च्या फेऱ्यात वाढ करण्यात येणार आहे.

‘या’ जिल्ह्यातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप सुरु

सांगली । नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर करा, वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करा यांसह प्रलंबित अन्य मागण्यांसाठी सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालय तसेच मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रुग्णालयातील सर्व विभाग यावेळी बंद राहणार आहेत. सांगली आणि मिरजेतील रुग्णालयाबाहेर मार्डच्या डॉक्टरांनी एकत्रित येत यावेळी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

जिल्ह्यातील 120 डॉक्टर संपामध्ये सहभागी झाले आहेत. सरकारी रुग्णालये आणि महाविद्यालयामधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट संघटनेच्या डॉक्टरांनी संप पुकारला आहे. डॉक्टरांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, कोविड इन्सेन्टिव्ह आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तम वसतिगृह सुविधा, जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा मार्डनं इशारा दिला आहे.

सेंट्रल मार्डन लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील संपात सहभागी होणार आहेत. सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालायसोर आज निवासी डॉक्टरांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. मार्डचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अक्षय सतई यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या संपामध्ये जिल्ह्यातील १२० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.

दरेकरांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?? राष्ट्रवादीने गाठलं खिंडीत; नेमकं काय आहे प्रकरण

Darekar NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलनं २१ जागा पटकावत विजय मिळवला मात्र तोच ज्या मजूर प्रवर्गातून दरेकर निवडून येतात त्यावर सहकार विभागाने आक्षेप घेत दरेकरांना “मजूर” म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दरेकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

प्रवीण दरेकर याना विरोधी पक्षनेतेपदी राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही मुंबई बँकेच्या निवडणुकीमध्ये स्वतःला मजूर म्हणायचं आणि विधानपरिषद निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात स्वतःला उद्योजक म्हणायचं अशी धूळफेक फक्त भाजपचे नेतेच करू शकतात. राज्यातील भाजपचा एक जबाबदार नेता अशा प्रकारची धूळफेक करतो तेव्हा भाजपची नैतिकता कुठे जाते असा सवाल महेश तपासे यांनी केला.

महाराष्ट्र सहकार विभागाने कारवाई करत प्रवीण दरेकर याना अपात्र ठरवलं त्यामुळे या सर्व गोष्टी सर्वांच्या नजरेसमोर आल्या मात्र परंतु आता लोकांची फडवणूक करणारे आणि खोट सांगणारे प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महेश तपासे यांनी केली

“संपूर्ण राज्य सरकारलाच लकवा भरलाय “, चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका

सांगली । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे.

या सरकारने कोणतेच काम पूर्ण केले नाही. मराठा आरक्षणापासून ते धनगर आरक्षणा पर्यंत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना पर्यंत सर्वच प्रश्न रखडले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे, तर बुद्धीला लकवा मारल्याची स्थिती आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सांगलीतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला।

शिवसेनेचे आ. महेश शिंदेचा एल्गार : जरंडेश्वरचा पंचनामा झाला आता रयत शिक्षण संस्थेतून हुसकावून लावणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने एक विचार क्रांतीचा देणार आहे. रयत शिक्षण संस्था ही सातारा जिल्ह्याची आमची स्वताःची मालकीची आहे. परंतु काही चुकीच्या लोकांनी त्या संस्थेवर कब्जा केला आणि आमच्या जिल्ह्याच वाटोळं केलं. गेल्या 7 ते 8 वर्षात आमच्यातील एकही तरूण त्या रयत शिक्षण संस्थेत कधीही भरलेला नाही. त्यावेळी आमच्या लोकांनी पैसे दिले. आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटलांना आम्ही अर्थिक ताकद दिली. आम्ही जमिनी दिल्या. परंतु काही ठराविक लोक चुकीच्या पध्दतीने कुटुंबाच राजकारण शिक्षण संस्थेत आणतायत. भविष्याच्या काळात त्याच हे चुकीच राजकारण आपल्याला हुसकवून लावलं पाहिजे.  यांचा एल्गार आज मी यादिवशी करतोय, जे आमच्या जिल्ह्याची ताकद आहे. ज्या संस्था आमच्या जिल्ह्याच्या आहेत. त्या आमच्या जिल्ह्यातला लोकांच्या ताब्यात राहिल्या पाहिजेत, यांची सुरूवात चंचळीच्या व्यासपीठावरून करत आहे, असे म्हणत कोरेगाव तालुक्याचे शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी नविन वादाला तोंड फोडले आहे.

आ. महेश शिंदे कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी ते पुढे म्हणाले, यापुढे कोरेगाव मतदार संघातील कुठल्याही गोष्टीला कोणीही येवून हात लावू शकणार नाही. विधानसभेच्यावेळी सांगितले होते, जरंडेश्वरच्या बाबतीत सांगितले होते. त्याचा पंचनामा झाला आणि 27 हजार कोटीचा घोटाळा बाहेर आला. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. भविष्यामध्ये ही भूमिका घेवून राज्यात आणि जिल्ह्यात फिरणार आहे. रयत शिक्षण संस्थेत मुलांच्या शिक्षणासाठी पैसे घेतले जातात. शासनाचे 1540 कोटी रूपये अनुदान येत असतानाही पैसे घेतात ही शोकांतिका आहे.

मला कुठला मायकलाल हरवू शकत नाही

डी. पी. भोसले काॅलेजमध्ये पैसे घेतले जातात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चांगल्या पध्दतीचे व सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी ही संस्था काढली. पण आता त्याच बाजारीकरण चालले आहे. त्यासाठी महेश शिंदे तुमच्या पाठिशी ठामपणे उभे राहील. हाच विचार घेवून आपण पुढे निघायचो आहे. एकदिवस जरंडेश्वर कारखान्यांचा विचार घेवून निघालो आणि यशस्वी झालो. आज हा विचार घेवून व्यासपीठावरून जातोय, मला माझ्या राजकारणांची चिंता नाही. मला पाडायला कितीपण ताकद लावा. माझ्या सोबत भगवंत आणि सामान्य जनता आहे. कुठला मायकलाल मला हरवू शकत नाही, असा इशाराही आ. महेश शिंदे यांनी दिला.

तेव्हा पवारच म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला आहे;’ चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत पवारांनी सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे, तर बुद्धीला लकवा मारल्याची स्थिती आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सांगलीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताच ताळमेळ नाही. या सरकारमधील नेत्यांकडून एकही काम पूर्ण झालेले नाही. अजूनही राज्यातील महत्वाचे असलेले मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटलेले नाहीत. मात्र, या सरकारने प्रत्येक समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे.

अजूनही राज्यात काही ठिकाणी विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. राज्यात 60 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी अजून सरकारला यावर तोडगा काढता आलेला नाही. फडणवीस सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना या महाविकास आघाडी सरकारने बंद पाडल्या असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.