Friday, December 12, 2025
Home Blog Page 3773

क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा टी -20 सामना पुढे ढकलला

नवी दिल्ली । आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी -20 सामना पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे कोलंबोमधील आजचा सामना एका दिवसासाठी तहकूब करण्यात आला आहे. असे मानले जात आहे की, पुढे ढकललेला खेळ आता बुधवारी होईल, त्यानंतर मालिकेचा तिसरा सामना शुक्रवारी होईल.

क्रुणाल पांड्या कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. जे खेळाडू क्रुणाल पंड्याशी जवळून संपर्कात होते त्यांच्यावर बारीक नजर ठेवली जाईल. हा सामना सध्या एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला आहे, परंतु बुधवारी सामना खेळवणे कठीण जात आहे.

क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा आढळल्यानंतर आता संपूर्ण टीमला आज RT-PCR टेस्ट करावी लागणार आहे. भारताने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली तर टी -20 मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.

एकदिवसीय मालिकेची सुरूवातही पुढे ढकलण्यात आली होती, कारण श्रीलंकेच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि व्हिडिओ विश्लेषक ही मालिका सुरू होण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

यापूर्वी गेल्या महिन्यात इंग्लंडमधील भारतीय कम्पूतही कोविड -19 चे प्रकरण समोर आले होते. भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि प्रशिक्षण सहाय्यक दयानंद गारानी हे कोविड -19 पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. या कारणास्तव, त्यांना लंडनमध्येच राहावे लागले होते, कारण उर्वरित भारतीय संघ सराव सामना म्हणून डरहॅमला आला होता. दयानंद गारानीच्या संपर्कात आल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक बी अरुण, वृध्दिमान साहा आणि अभिमन्यु ईस्वरन यांनादेखील 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागले.

दरम्यान, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे श्रीलंकेहून इंग्लंडला जाणार होते. आता त्यांच्या प्रवासाच्या योजनांवर याचा काय परिणाम होईल हे पाहणे बाकी आहे. पृथ्वी आणि सूर्यकुमार हे दोघेही श्रीलंकेतील संघाचा एक भाग आहेत.

कृषी कार्यानुभव उपक्रम अंतर्गत राजेश्वरी देवरे यांची मालपुर ग्रामपंचायतीला भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील दादासाहेब रावल कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी राजेश्वरी देवरे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या उपक्रमाअंतर्गत साक्री तालुक्यातील मालपुर ग्रामपंचायतीला भेट दिली.

यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि सोबतच जमलेल्या लोकांना काही शासकीय योजनांची माहिती दिली.यावेळी ग्रामसेविका योगिता बच्छावं मालपुर गावातील प्रकाश काकुस्ते,तुषार भामरे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश्वरी देवरे यांच्या या भेटीच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक सूरज चांदूरकर आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.

राजेश्वरी देवरे यांनी या भेटी संदर्भात “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलताना सांगितले की “आजवरच्या शैक्षणिक वर्षात आम्ही जे शिकलो.ते प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन त्या ज्ञानाचा प्रसार करण्याची संधी मला कृषी कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत मिळाली याचा खूप आनंद होतो आहे.त्याच बरोबर भविष्यातही शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर काम करायला आवडेल,असेही त्या म्हणाल्या.

इंग्रजी शाळा संघटनेच्या वतीने आंदोलन; विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्तांना निवेदन

English School Association

औरंगाबाद | बऱ्याच वेळा राज्यातील विविध शाळेच्या संघटनांनी आंदोलन करून देखील इंग्रजी शाळांच्या मागण्या प्रलंबित आहे. त्यामुळे मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या शिष्टमंडळाने ‘म्हसनात नेऊ नका’ या नाटकातील यमदूत आणि इतर पात्रांची रंग व वेशभूषा करून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर निवेदन देण्यात आले.

राज्यात एकाच वेळी विविध व इंग्रजी शाळा संघटनेच्यावतीने नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर या विभागीय स्तरावर आंदोलन सुरू आहे. लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी ही वेशभूषा आणि रंगरंगोटी केल्याचे दिसत आहे. शासनाने इंग्रजी शाळांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सर्व इंग्रजी शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा मेसा, मेस्को, इसा, मेष्टा (एफ) इंग्लिश मीडियम स्कूल संघटना, आरटीई फाउंडेशन यांनी दिला आहे.

आरटीई प्रतिपूर्तीची थकित रक्कम मिळावी, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पालकांनी शाळेची फीस भरणा करण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रके निर्गमित करावे, विना टी.सी प्रवेश परिपत्रक रद्द करणे, शाळा इमारतीस लाईट बिल व मालमत्ता करात 50 टक्के सवलत देऊन करोना काळातील 100% फीस माफ करणे, स्कूलबस टॅक्स रद्द करणे, सवलत देऊनही वर्षभर फीस न भरणाऱ्या पालकांच्या पाल्याचा प्रवेश रद्द करून शाळांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत शासनाने अध्यादेश काढावा, शाळेसोबत संबंध नसलेल्या व्यक्तींना शाळेत प्रवेश बंदी करून संरक्षण कायदा करणे, आरटीई प्रतिपूर्तीसाठी रक्कम शाळेच्या फीस प्रमाणे कायद्यानुसार वर्षातून दोन टप्प्यात विनाअट मिळावी, आरटीई अंतर्गत नर्सरी ते इयत्ता बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावे. यासह बारा मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रल्हाद शिंदे हस्तेकर, सरचिटणीस प्रवीण आव्हाळे, उपाध्यक्ष नागेश जोशी, हनुमान भोंडवे, जिल्हाध्यक्ष रत्नाकर फाळके, जिल्हा सचिव विश्वासराव दाभाडे, राजेश लिंबेकर, शहराध्यक्ष सुनील मगर, सचिन पवार, संतोष सोनवणे, महिला प्रमुख मोनाली महालपुरे, सुरेखा माने आदींची उपस्थिती होती.

संजय राऊत म्हणतात उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावं; आता पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी देखील संजय राऊतांच्या सुरात सूर मिसळत उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविला.

महाराष्ट्रातील पूरस्थितीवर भाष्य करताना पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी याबाबत विचारले असता पवार म्हणाले, आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आनंदच आहे”.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-

उद्धव ठाकरेंकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल. राष्ट्रालाही उद्धव ठाकरेंसारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. उद्धव ठाकरे एक दिवस देशाला नेतृत्व देतील . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे असे राऊत म्हणाले.

Stock Market : सेन्सेक्स 271 अंकांनी घसरला तर निफ्टी 15,745 वर बंद झाला

नवी दिल्ली । आज मंगळवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 271.69 अंकांनी खाली 52,580.58 वर बंद झाला. त्याचबरोबर एनएसई निफ्टी 78.95 अंकांनी किंवा 0.5 टक्क्यांनी घसरून 15,745.50 वर बंद झाला. आज बीएसईच्या 30 शेअर्सपैकी 10 शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर आज एनएसईच्या 50 शेअर्सपैकी 33 शेअर्समध्ये घट झाली आहे.

या शेअर्समध्ये झाली वाढ
आज टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, एलटी, टायटन आणि आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स बीएसईवर वाढले आहेत. त्याच वेळी, डॉ रेड्डी, एक्सिस बँक, सन फार्मा, कोटक बँक, एचडीएफसी, आयटीसी, रिलायन्स, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, एम अँड एम, भारती एअरटेल, अल्ट्रा टेक सिमेंट, एचसीएल टेक, बजाज-ऑटो, एनटीपीसी, टीसीएस, पॉवर ग्रिड, इन्फोसिस आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचा स्टॉक खाली आले आहेत.

3,374 कंपन्यांचे शेअर्स वाढले
बीएसई वर ट्रेडिंग बंद झाल्यावर 3,374. कंपन्यांचे शेअर्स वाढले. त्यापैकी 1,660 कंपन्यांचे शेअर्स घसरणीवर बंद झाले, तर 1,605 कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. आजची एकूण मार्केटकॅप 2 कोटी 34 लाख रुपये आहे.

टॉप -5 गेनर्स आणि लूजर्स
आज एनएसई वर हिंडाल्को, एसबीआय लाइफ, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि एसबीआय यांचे शेअर्स गेनर्स ठरले आहेत. त्याचबरोबर आज डीआर रेड्डी, सिप्ला, अ‍ॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स आणि दिवी लॅबचे शेअर्स लूजर्स ठरले आहेत.

दर्ग्याला दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून दागिने केले लंपास

theft

औरंगाबाद : खुलताबाद येथील दर्गा येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरट्यानी डल्ला मारला आहे. चोरट्यानी घरातून एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.

हिलाल कॉलनी येथील गुलाम अहेमद खान हे त्यांच्या कुटुंबियांसह शनिवारी दुपारी ३ ते रात्री ८ वाजेदरम्यान खुलताबाद येथे गेले होते. घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यानी कुलुप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यानी लंपास केले.

त्यात तीन तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळा सोन्याची अंगठी आणि चार ग्रामचे कानातले चोरी झाले आहेत. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोडखे करत आहे.

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

bAMU
bAMU

औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण शाळा महाविद्यालय बंद आहेत. परंतु ऑनलाइन पद्धतीने शिक्षण अपोजिट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण तसेच परीक्षाही घेतल्या जात आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षा घेतल्या गेल्या, परंतु काही परीक्षाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाही. त्याचबरोबर वकिली व्यवसाय करणाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया इक्झामिनेशन या परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख 15 जुलै होती. परंतु निकाल न लागल्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज भरता येत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

मे महिन्यामध्ये विधी शाखेच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार आहेत परंतु प्रथम वर्षाचे निकाल जाहीर केल्याशिवाय पुढील वर्गाचे निकाल जाहीर करता येणार नाही प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उशिरा झाल्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. आठवडाभरात या शाखेच्या सर्वच वर्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी सांगितले आहे.

अर्जेटिनामध्ये ‘या’ केमिकलमुळे तलावाचे पाणी झाले गुलाबी, लोकं करत आहेत चिंता

अर्जेटिना । अर्जेटिनाच्या दक्षिणेकडील पॅटागोनिया भागात, एका मोठ्या तलावाचे संपूर्ण पाणी गुलाबी झाले आहे. तलाव आणि पर्यावरणीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की,” हे तलाव गुलाबी होण्याचे कारण म्हणजे एक केमिकल आहे, ज्याचा उपयोग लॉबस्टरच्या निर्यातीत केला जातो.

तलावाच्या पाण्याचा रंग सोडियम सल्फेटमुळे होतो, जो मासे कारखान्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. त्याच्या कचऱ्याला चूबूत नदी प्रदूषित करण्यासाठी जबाबदार धरले जात आहे. या नदीचे पाणी लेक कॉर्फो आणि पाण्याच्या इतर स्त्रोतांकडे जाते.

नदी आणि तलावाच्या सभोवतालच्या पर्यावरणाची हानी होत असल्याच्या तक्रारी अनेक स्थानिक लोकं बर्‍याच काळापासून करत आहेत, परंतु याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ट्रीलेव शहरातील स्थानिक लोकंही या प्लॅंटमधून तयार होणार्‍या कचर्‍यामुळे त्रस्त आहेत. यामुळे दिवस-रात्र शहरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे आजार देखील पसरत आहे.

पर्यावरण कार्यकर्ता असलेले पाब्लो लाडा म्हणाले की,” ज्यांच्याकडे पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी आहे तीच लोकं हे विष पसरवत आहेत. गेल्याच आठवड्यात हा तलाव गुलाबी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यावरण इंजीनिअर असलेले फेडेरिको म्हणाले की,” सोडियम सल्फेटमुळे या पाण्याचा रंग गुलाबी झाला आहे. कायद्यानुसार माशांचा कचरा नदी किंवा पाण्यात सोडण्यापूर्वी तो स्वच्छ केला पाहिजे. मात्र तलावाजवळील कंपनी हा कायदा पाळत नाही. “

विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे ‘जबाब दो’ आंदोलन

strike

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आज आज मध्यवर्ती विभागीय कार्यालयासमोर ‘जवाब दो आंदोलन’ करण्यात आले. २०१९ मध्ये भरती झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

२०१९ मध्ये भरती झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी बऱ्याच दिवसापासून वारंवार निवेदनाद्वारे प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता, मात्र प्रशासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी कोणतेही प्रतिउत्तर आले नाही. म्हणून, एसटी कर्मचाऱ्यांनी आज विभागीय कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन केले.

प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आज जे आंदोलन शांत पध्दतीने केले आहे. ते पुढे जाऊन उग्र स्वरूपात करण्यात येईल असा इशाराही एसटी कर्मचाऱ्यांनी दिला. प्रशासनाने आमचे प्रश्न मार्गी लावावे आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करून घ्यावी,अशी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात अमोल जाधव, रवींद्र चव्हाण, राम तुपे आदींसह आंदोलनात ५० ते ६० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

अफगाण सुरक्षा दलांचा तालिबानला जोरदार तडाखा, कालदार जिल्ह्यावर पुन्हा मिळवला ताबा

काबूल । अफगाणिस्तानात तालिबान्यांची दहशत कायम आहे. दरम्यान, अफगाण राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दल (ANDSF) देखील तालिबान्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. याच भागात अफगाण सुरक्षा दलाने सोमवारी बलख प्रांतातील कालदार जिल्ह्याचा तालिबानकडून ताब्यात घेतला. स्थानिक माध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे. बख्तर या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी ANDSF ने या जिल्ह्यावर पुन्हा ताबा मिळवला.

राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वृत्तानुसार, एका न्यूज एजन्सीने म्हटले आहे की, सैन्याने कारवाई सुरू केल्यानंतर ANDSF ने तालिबानी अतिरेक्यांकडून कालदार जिल्हा ताब्यात घेण्यात यश मिळविले. या लष्करी कारवाईत तालिबान गटाचे सुमारे 20 लोकं मारले गेले तर डझनभर जखमी झाले.

तत्पूर्वी, टोलो न्यूजने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, अफगाणच्या राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलाने निम्रोजमधील बामियान आणि चाखणसुर जिल्ह्यातील सैगन आणि कहमर्द जिल्ह्यांचा ताबा मिळविला आहे. बामियानचे राज्यपाल ताहिर जुहैर म्हणाले की, “आज सकाळी सुरू झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी काही वेळातच हा जिल्हा ताब्यात घेतला आणि तिथे आपल्या देशाचा झेंडा फडकविला गेला.” त्याचबरोबर, आगामी काळात अफगाणिस्तानातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या 426 जिल्ह्यांपैकी 212 जिल्ह्यांमध्ये तालिबान्यांनी ताबा घेतला आहे. असे असूनही, काबूल अजून त्यांच्यापासून फार लांब आहे. केवळ अफगाणिस्तानची नॅशनल सिक्युरिटी फोर्स (ANDSF) तालिबानशी जोरदार लढा देत नाही तर अमेरिका, रशिया, इराण, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान सारख्या देशांमध्ये ज्या पद्धतीने तालिबानबद्दल शंका आहे, त्याचा परिणामही आगामी काळात दिसून येईल.

अफगाणिस्तानातील परिस्थितीचे निरीक्षण करीत असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की,” 19 जुलै 2021 पर्यंत तालिबान्यांनी 212 जिल्ह्यांमधील आपल्या ताब्याची पुष्टी केली आहे. जिथे परिस्थिती आणखी वेगाने बदलू शकते. अफगाणिस्तानाचे जिल्हा मुख्यालय आणि शहरात भारतासारखी दाट लोकवस्ती नाही. काही जिल्हा मुख्यालयात केवळ मोजकीच घरे आणि कार्यालये आढळतील.

तालिबानी सेनेचे कोणतेही पथक वाहनातून तेथे जातात आणि त्यांचा झेंडा लावतात. ज्यानंतर ते ठिकाण त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगतात. परंतु काही तासांतच सरकारी लष्करी सैन्य ते पुन्हा काढून टाकतात.